शुक्रवार, २८ ऑगस्ट, २००९

बाप्पा रे!

तुला हाक मारताना आताच्या प्रथेप्रमाणं प्रिय म्हणावं की तीर्थरूप म्हणावं याचा निर्णय करता आला नाही. मग ठरवलं तुला हाकच मारायची. तीसुद्धा एकेरी. कारण त्यातून जवळीक साधल्याचा आभास निर्माण करता येतोच; शिवाय आताच्या काळाला धरूनही होतं. आता कुणाशीही पटकन एकेरीत बोलण्याचीच रीत आहे. टेलिव्हिजनवर किंवा जाहीर कार्यक्रमात 'मोठ्या' माणसाची मुलाखत घेताना असं एकेरी बोलून आपलंही वजन वाढवता येतं. ही दाखवेगिरी आहे, असं तू म्हणशीलच. पण अशी दाखवेगिरी करूनच आता सर्वकाही साध्य करता येतं.

बाप्पा रे! कोणे एकेकाळी भादपद महिन्याच्या शुद्ध चतुथीर्ला तू घरोघरी यायचास. धुंवाधार पावसानं हवाही ओलीगच्च झालेली असायची आणि आसमंत हिरवागार. श्रावणसरींचा गोडवा आणि मधूनच पडणारे उन्हाचे उबदार सोनेरी कवडसे यांची मोहक चित्रं मनात ताजी असतानाच तुझं आगमन व्हायचं. घर आनंदानं भरून जायचं. पाव्हणा म्हणूनच तू यायचास आणि पाव्हण्यासारखाचा राहून निघून जायचास. पुढच्या वषीर् लवकर येण्याचं आश्वासन मुलांच्या मनात पेरून जायचास. तुझं येणं-जाणं असं सहज होतं. पण बाळ गंगाधर टिळक नावाच्या माणसाला लोकांना एकत्र करण्याचा हुकमी एक्का म्हणून तूच चांगला वाटलास. घराघरातल्या देवघरातच राहून गुपचूप परत जाणारा तू सार्वजनिक ठिकाणी राहू लागलास. तुझं असं एका मर्यादित अर्थानं सामाजिकीकरण होणं ही काळाचीच गरज होती. देवाचं असं सार्वत्रिकीकरण तेव्हा आवश्यकच होतं. पण तेव्हाच का; आताही काही काही बातम्या ऐकल्या की अशा सार्वत्रिकीकरणाची आजही गरज आहे, असं तीव्रतेनं वाटतं बरं. पण आता अशा सार्वत्रिकीकरणाऐवजी राजकीयीकरण करणंच अनेकांच्या उपयोगाचं असतं. अशी गरज अधिकाधिक भासू लागली तेव्हापासून तुझ्या आगमनालाच एक बटबटीत रूप येऊ लागलं.

बाप्पा रे! लहानपणापासून ऐकत आलो की तु बुद्धीची, कलेची देवता आहेस. ज्ञानेश्वर माऊलीनं भगवद्गीतेवरील आपलं भाष्य 'मऱ्हाटी' बोलीत सुरू करताना सुरुवातीला २१ ओव्यांमध्ये तुझंच स्मरण केलं. 'अकार चरण युगुल। उकार उदर विशाल। मकार महामंडल। मस्तकाकारे।। हे तिन्ही एकवटले। तेथ शब्द ब्रह्मा कवळले। ते मिया श्रीगुरूकृपा नमिले। आदिबीज।। आता अभिनववाग्विलासिनी। जे चातुर्यार्थ कलाकामिनी। ते श्रीशारदा विश्वमोहिनी। नमिली मिया।। ' असं तुझं वर्णन करून तुला दंडवत घातला. गीतेवरचं ते मऱ्हाटी भाषेतलं भाष्य ही त्या काळातली बंडखोरी होती. संस्कृतातलं धन प्राकृतात आणून जनसामान्यांसाठी खुलं करणं हा विदोहच होता. पण आम्ही मुदलातलं विसरलो आणि ज्ञानेश्वरीची पूजा करण्यातच धन्यता मानू लागलो. भावार्थ नजरेआड करायचा आणि बाह्योपचारालाच महत्त्व देऊन त्यातच गुुंतून पडायचं ही तशी आमची जुनीच रीत. वाईट एवढंच वाटतं की तीच रीत अजूनही चालू आहे.

बाप्पा रे! हे एकविसावे शतक. तुला २१ आकडा प्रिय. दुर्वा व्हायच्या त्या २१. मोदक अर्पण करायचे ते २१. अथर्वशीर्ष म्हणायचं तेही किमान एकवीसदा! जो आकडा तुला प्रिय तोच आकडा धारण करणारं शतक सध्या चालू आहे. आता या शतकात तरी आम्हाला चांगली बुद्धी दे. ज्ञानाची कास धरण्याची वृत्ती दे. विश्लेषक नजर दे. नवीन ते ग्रहण करण्याची क्षमता दे. आजचे प्रश्न समजून घेण्याची कुवत दे. जात आणि धर्म या गोष्टी वैयक्तिक जीवनापुरत्याच ठेवण्याची उपरती सगळ्यांनाच होऊ दे. आमच्या राजकारण्यांना, नाही रे बाप्पा; सत्ताकारण्यांना दूरवरचं बघण्याची दृष्टी दे. तुझा उत्सव हा मन प्रसन्न करणारा होऊ दे. प्रदूषण आणि पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शेती आणि पाणी या विषयाचं महत्त्व साऱ्या साऱ्यांना उमजू दे!

बाप्पा रे! तुझ्या तीर्थरूपांच्या आवडत्या चंदावर आम्ही पोचलो आहोत; मंगळावर जाण्याची तयारी करतो आहोत. केवळ अवकाशविज्ञानातच नाही, तर विज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये आम्ही प्रगती करत आहोत. पण प्रगतीची ही कवाडं महानगरांपुरतीच आहेत. ती खेड्यापाड्यांतही पोचायला हवीत. आधुनिक आयुविर्ज्ञानाचे फायदे अगदी आडबाजूच्या खेड्यात राहणाऱ्याला सामान्य माणसालाही मिळू देत. त्यासाठी आम्हाला बळ दे. येणाऱ्या दुष्काळाला तोंड देण्याची शक्ती दे. पुन्हा अशी वेळ येऊ नये म्हणून प्रदूषण कमी करण्याची, अधिकाधिक झाडं लावण्याची, तिवरांचं रक्षण करण्याची, पाणथळ जागा वाचवण्याची, खाड्यांमध्ये भराव न घालण्याची, प्लास्टिकच्या पिशव्यांना दूर ठेवण्याची, थमोर्कोलच्या आराशीला बाजूला सारण्याची बुद्धी आम्हाला दे. थोडक्यात, आमची जीवनशैली सुधारण्याची उपरती आम्हाला होऊ दे. इतकं करशील ना रे बाप्पा?
यावें... शिवपार्वतीनंदना, आपले स्वागत असो! दैत्यदानवकंदना, आपलं आगमन आम्हाला कल्याणकारी ठरो. गजवदना, मूषकवाहना आम्ही अधीर मनाने तुमच्या आगमनाची केव्हापासून वाटत पाहातो आहोत. आपण यावे, आम्ही आनंदाने आणि परमभक्तीने तुमच्यासमोर नतमस्तक होण्यास आतुरलो आहोत.

आमच्याप्रमाणे आमच्या गेल्या कित्येक पिढ्या तुमच्यासमोर अशाच किंबहूना यापेक्षा अधिक भक्तिभावनेने नतमस्तक होत आल्या आहेत. गेली किती शतकंहा तुमचा उत्सव अखिल हिंदूमात्र उत्साहात, आनंदात घरोघरी साजरा करत आले आहेत त्याची तर गणतीच नाही. हे गणराया, कुठल्याही पंथाचा, कुठल्याही जातीचा हिंदू तुम्हाला निरंतर पिढ्यानुपिढ्या वंदन करत आला आहे. तुमचं भजन-पूजन गेली हजारो वर्षं या भारतभूमीत निनादतं आहे. आपली म्हणजे गजाननाची मूतीर् घरातल्या मखरातून सार्वजनिक मैदानात आणणारे लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला तुमचा उत्सव आता यावषीर् ११६ वर्षांचा झाला. केवळ पाच उत्सवांनी सुरू झालेली ही उज्ज्वल परंपरा आणि प्रथा आता पन्नास हजार एवढी प्रचंड संख्या गाठण्याएवढी विशाल झाली आहे. हा उत्सव महाराष्ट्रात सुरू झाला आणि महाराष्ट्रातच वाढला. असं सांगतात की, इतक्या मोठ्या प्रमाणात सातत्याने दहा-अकरा दिवस चालणारा दुसरा उत्सव जगाच्या पाठीवर कुठेही नाही. या उत्सवात मुख्यत: तरुण भाग घेतात. तुमच्या भक्तीभावनेने देहभान विसरतात. त्यांच्या हातून क्वचित काही आगळीक घडली की त्याचा गाजावाजा केला जातो. काही आगळीक होऊ नये म्हणून सर्वप्रकारची दक्षता घेतली पाहिजे हे खरंच! पण उत्सवी वातावरण म्हटलं की, उत्साहाला उधाण आल्याशिवाय कसं राहिल आणि उधाण समुदाचं काय किंवा माणसाच्या मनातल्या आनंदाचं काय, कधी कधी सीमारेषेचं उल्लंघन करणारच. तुमच्या उत्सवाचं योगदान इतकं प्रचंड आहे की, त्या जोरावरच उत्साही कार्यर्कत्यांकडे थोडं क्षमाशील दृष्टीने पाहिलं जातं.

या प्रदीर्घ काळात कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या भक्तीत एवढाही उणेपणा येऊ दिला नाही. कधी अन्नधान्याची टंचाई, कधी वर्षादेवतेचा रूसवा, कधी गगनाला भिडणारी महागाई तर कधी देशाच्या सीमेवर जमणारे युद्घाचे ढग आणि कधीकधी तर लोकशाहीच्या नावाखाली चालणाऱ्या निवडणुकीच्या गदारोळामुळे गढुळलेलं वातावरण... या आणि यासारख्या अनेक चिंता-विवंचना पाचवीलाच पूजलेल्या असतानासुद्घा तुमची चतुथीर् मात्र आम्ही मनापासून, आनंदाने साजरी करत आलो आहोत. 'सुखकर्ता दु:खहर्ता' ही तुमची श्रीसमर्थ रामदासस्वामींनी लिहिलेली आरती आम्ही गेली साडेतीनशे वर्षं मनापासून म्हणतो आहोत. 'अथर्वशीर्षा'ची आवर्तनं, सहस्त्रावर्तनं उत्सवात नित्यश: होत आहेत. तुमचा अवाढव्य देह आणि त्या देहावर विराजमान झालेलं गजराजाचं मस्तक अनेकांच्या कुतूहलाचा विषय. माणसाच्या देहावर हत्तीचं मस्तक बसेलच कसं, असा प्रश्न मोठमोठ्या विचारवंताना, संशोधकांना गेली अनेक वर्षं, अनेक तपं सतावतो आहे. पण 'अथर्वशीर्ष' ह्याचा एक अर्थ 'अ-थर्व', न थरथरणारं शीर्ष म्हणजे डोकं.. अथर्वशीर्षाचं पठण मानसिक शांतता आणि बौद्घिक स्थिरता देते असा निर्वाळा आहे. आता शीर्ष म्हणजे डोकं स्थिर राहायला हवं असेल तर ते तसंच वजनदार नको काय? येणाऱ्या आणि येऊ घातलेल्या सर्व अडीअडचणींना शांत डोक्याने सामोरं जायचं असेल तर डोकं तसं भरभक्कम पाहिजेच.

कोणी कोणी सांगतात, अथर्वशीर्ष हे मंत्रगर्भ स्तोत्र अथर्ववेदाच्या परिशिष्टात आहे. म्हणजे एकापरीने शीर्षस्थानी आहे. म्हणून त्याचं नाव 'अथर्वशीर्ष'. असेलही, कोणी काही, कोणी काही अनुमाने काढून त्यानुसार तुमच्याकडे पाहतात. कोणी म्हणतात, तुम्ही शेतकऱ्यांचे आवडते आहात. तुमचा शेतकऱ्यांवर लोभ आहे. म्हणून भाताच्या लोंब्या असाव्यात तशी तुमची सोंड आहे आणि धान्य पाखडण्यासाठी ज्या सुपांचा उपयोग केला जातो तसे तुमचे कान आहेत. म्हणून तर तुम्हाला 'शूर्पकर्ण' असंही म्हणतात. पण एक गोष्ट खरी, तुमचं आगळंवेगळंं रूप, चार हात, 'लंबोदर' म्हणजे मोठं पोट, गजमुख हा सगळा काही वेगळाच प्रकार आहे.

कोणी सांगतात, तुम्ही मूळचं आर्यांचं दैवत नाही. तुमच्या स्वरूपाची मूळ संकल्पना 'विघ्नहर्ता' म्हणून नव्हे, तर 'विघ्नकर्ता' म्हणून झाली. अजूनही अगदीच अल्प प्रमाणात असणारे काही लोक तुम्हाला 'विघ्नकर्ता' म्हणून ओळखतात आणि तुम्हाला वचकतात, बिचकतात. मात्र गेल्या हजारो वर्षांच्या प्रवासात तुमचा 'विघ्नकर्ता' हा स्वभाव कुठे कधीकाळी असलाच तर तो आता पूर्णत: दूर झाला आणि आपलं बळ वापरून भक्तभाविकांची विघ्नं, संकटं दूर कशी करावीत, त्यांच्या आधी व्याधींचं निरसन कसं करावं या गोष्टीकडेच आपण अधिक ध्यान दिलंत. आम्हाला याचा अनुभव आहेच. पण आमची तुमच्यावर असलेली भक्ती त्या अनुभवासाठी हपापलेली नाही. तुमच्यावर आमचं मनापासून प्रेम आहे. तुमचे पाय आमच्या घराला लागावेत म्हणून कितीतरी आधीपासूनच तुमच्या आगमनाकडे आम्ही डोळे लावून असतो. तुम्ही आल्यावर तुमची काळजी आम्ही मनापासून घेतो. तुमच्या मूतीर्ला एवढीही इजा पोहोचू नये म्हणून आमच्या जीवाची तळमळ अखंडपणे चालू असते आणि आम्ही तुमच्या भक्तांनी तुमच्यावरची भक्तीपोटी किती आघात सोसले, तुमचे भक्त कोणाकोणाशी आणि कसे कसे लढले हे तर तुम्ही जाणताच.

गोव्यात चारशे वर्षांपूवीर् पोर्तुगीजांच्या राजवट जेव्हा स्थिरावली, तेव्हा त्यांनी तुमचा उत्सव होऊ नये म्हणून जीवघेणी बंधनं तुमच्या भक्तांवर लादली. त्याआधी असलेलं मोगली वातावरण तुमच्या भक्तांना छळत होतेच. पोर्तुगीजांनी मोगलाला पिटाळून लावलं आणि सुरुवातीची काही वर्षं तुमच्या पूजन-अर्चनाबाबत उदार धोरण दाखवलं. पण थोडीशी स्थिरस्थावरता येताच त्यांनी आपलं खरं रूप बाहेर काढलं आणि उत्सवात गणेशपूजन करणाऱ्याला देहदंडाची शिक्षा फर्मावली आणि तो देहदंडही असातसा नाही. गणेशभक्ताला अक्षरश: आगीच्या लोळात ढकलून देऊन त्याला तीव्र यातना देण्याचा अघोरी प्रकार सुरू केला. एवढ्यानेही काही झालं नाही. इतक्या हालअपेष्टा समोर दिसत असतानासुद्धा तुमच्या भक्तांनी गुपचुपपणे तुमचं पूजन चालूच ठेवलं होतं. मूतीर् घडवणं आणि घरात आणणं अवघडच होतं. म्हणून तुमचं एखादं चित्र पेटीच्या झाकणाच्या आतल्या बाजूला लावायचं आणि घराची दारं-खिडक्या बंद करून ती पेटी उघडून मनापासून तुमचं पूजन करायचं आणि हलक्या आवाजात तुमची आरती म्हणावयाची, मंत्रपुष्पांजलीचा उच्चार करायचा. आजदेखील कागदावरच्या चित्राची परंपरा क्वचित कुठे आढळतेे आणि तिथे मूतीर्ऐवजी कागदाच्या चित्राचं पूजन केलं जातं. हे असंच, कदाचित इतकं तीव्र नसलं तरी हालअपेष्टा भोगायला लावणारे प्रसंग अनेकदा आले. तुमची चेष्टाकुचेष्टा अन्य धमिर्यांकडून नाठाळपणे केली गेली. पण त्या निंदेचंही तुम्ही आणि तुमच्या भक्तांनी स्वागतच केलं. तुम्ही तर ही निंदेची उत्तरं आपल्या विशाल कानाआड करत आलात.

आम्ही महाराष्ट्रीय लोक तुम्हाला जे मानतो त्याची पाळंमुळं फार पुरातन काळापर्यंत गेलेली असली तरी सात-आठशे वर्षांपूवीर् ज्ञानेश्वरमहाराजांनी अध्यात्म क्षेत्रातलं उच्चतम तत्त्वज्ञान आपल्या मराठी भाषेत आणलं ते 'ँ़ नमोजी आद्या' अशा अजरामर शब्दांनी तुमचे स्मरण करून! गेली कित्येक शतकं जेव्हा जेव्हा काही नव्या कार्याला प्रारंभ केला जातोे तेव्हा 'प्रारंभी विनंती करू गणपती' असंच आम्ही म्हणतो. सुमधुर संगीतामुळे मराठी भाषेत चिरतरूण राहिलेलं संगीत नाटक 'सौभद' लिहिताना अण्णासाहेब किलोर्स्करांसारख्या मराठी रंगभूमीच्या आद्य दिग्गज नाटककाराची मती कुंठित झाली. त्यांना काही सूचेना, नाटक अर्ध्यावर थांबलं. अण्णांंना मुंबईच्या एका दुकानात तुमच्या मूतीर्चं दर्शन झालं आणि काय आश्चर्य, तत्क्षणी त्यांना पुढची कथा सुचली. अण्णांनी झपाट्याने नाटक पूर्ण करून महाराष्ट्रशारदेच्या चरणी अर्पण केलं. पुढल्या शे-पन्नास पिढ्या या नाटकाचा मनमुराद आनंद लुटत आल्या. घरातल्या दारावरच्या गणेशपट्टीपासून ज्या घरात तुमचं चित्र नाही, ज्या देवघरात तुमची मूतीर् नाही असं कोणतंही घर वा देवघर सापडणार नाही. अगदी आजकालची फ्लॅटसंस्कृतीही याला अपवाद नाही. आम्ही तुमच्याशी किती एकरूप झालो आहोत म्हणून सांगू! आताच्या जीन्स-टीशर्टच्या युगात वावरणारी मुलं-मुली तुमच्या मंदिरासमोरच्या लांबच लांब रांगेत तासन्तास तिष्ठत उभी असलेली दिसतात. ते काय मनात भक्तिभाव असल्याशिवाय? त्यांना काही प्रचिती आल्याशिवाय का? असा तुमचा महिमा आमच्या मनोमनी रूजला आहे. यावे गणेशदेवा! सुखकर्ता दु:खहर्ता हे आपलं बिरूद सार्थ करण्याकरता यावं.

बा अदब, बा मुलाहिजा, होश्शियार, श्रीगणेशजी आ रहे है, निगाह रक्खो होश्शियार!
-ज्योर्तिभास्कर जयंत साळगावकर

मंगलमूर्ते दयाळा...

काहीतरी अपेक्षेने किंवा नवस बोलण्यासाठी देवदर्शनाला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मंदिरात भक्तांपेक्षा याचकांचीच गर्दी जास्त असते. गणेश या देवतेबद्दल तर 'नवसाला पावणारा गणपती' ही संकल्पना भलतंच स्वार्थी मूळ धरू लागली आहे. समाजमनावर याचा विपरीत परिणाम होतोय. ज्या गणेशाने सर्व मोह, लोभ, विकारांचा त्याग केला, त्या वीतरागी गणेशाकडे नवस बोलणं हे ईश्वरीय अज्ञानाचं द्योतक आहे.

....

हे गिरिजाकुमरा गजानना, लंबोदरा, विघ्नहरा तुला माझा शिरसाष्टांग नमस्कार.

गणराया, जे भक्त तुझे चिंतन करतात, त्यांना विघ्नं बाधत नाहीत. त्यांच्या सर्व शुभ आकांक्षा पुऱ्या होतात. म्हणून सर्व मंगल कार्यारंभी तुला वंदन करण्याची पद्धत आहे. तू चतुर्दश विद्यांचा स्वामी आहेस. वेद, शास्त्रे आणि पुराणे हे तुझेच ध्वनी आहेत. कृपानिधी गणनाथा, अभयदाता विनायका, माझ्या बुध्दीमध्ये चैतन्य येऊ दे. माझ्या मनामध्ये जीवनमुक्त होण्याची वासना प्रबळ होत आहे. ती पुरी व्हावी यासाठी मी तुला साष्टांग नमस्कार करतो.

खरं म्हणजे कुठल्याही उपासनेचा अंतिम हेतू मोक्षप्राप्तीच हवा. जन्ममरणाचे फेरे चुकवण्यासाठी अत्यंत तळमळीने, कष्टाने प्रखर उपासना केली पाहिजे. गणेशाच्या उपासकांना 'स्वानंद लोक' प्राप्त होतो आणि पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. अनादि काळापासून मंगलमय स्वरूपाची ही देवता आहे. 'श्री गणेशय नम:' याच मंत्राने कुठल्याही शुभ कार्याचा आरंभ होतो. विश्वमाता आणि विश्वपिता असलेल्या पार्वती-महादेवांनीच गणेशाला प्रथम पूजेचा मान दिला आहे. विघ्नांवर, संकटांवर संपूर्ण नियमन असलेली ही गणेशदेवता भक्तांची विघ्नं सहज दूर करते.

सिद्धी आणि बुद्धी या गणेशाच्या दोन शक्ती. म्हणून कुठलेही कार्य करण्यास लागणारी बौद्धिक प्रेरणा गणेशाच्या कृपेनेच मिळते. सर्व देवांचा आद्य-पूजनीय अनंतकोटिब्रह्मांडनायक, गणांचा अध्यक्ष ब्रह्माणस्पती, सकल विद्यांचा निधी, निर्गुणाचाही मूळारंभ असा जो हेरंब, अष्टसिद्धीयुक्त असून त्याची कृपा असीम असते हे निजभक्तांचे अनुभव आहेत.

अध्यात्म हा विषय अंत:करणात उचंबळणाऱ्या अवर्णनीय भक्तीप्रेमाचा हवा. निखळ प्रेमाला बुद्धी, पांडित्य, व्यवहार अभिप्रेत नसतात. या परमार्थाच्या वाटचालीत निर्व्याज प्रेमाची, अव्याभिचारी भक्तीची, स्फटिकासारख्या स्वच्छ पारदर्शक अंत:करणाची नितांत आवश्यकता असते. पूजा करताना, भगवंताच्या लीला ऐकताना, प्रार्थना करताना, नाम स्मरताना, ईश्वरप्रेमाने ज्याचं अंत:करण भरून येत नाही, कंठ दाटून येत नाही, डोळे पाणावत नाहीत, हृदयात ब्रह्मारूप प्रकटत नाही त्याची भक्ती वांझ असते. ईश्वरचरणी सर्वस्वाने वाहिलेलं मन हीच खरी पूजा होते.

दुदैर्वाने अशी भक्ती पाहावयास मिळत नाही. काहीतरी अपेक्षेने किंवा नवस बोलण्यासाठी देवदर्शनाला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मंदिरात भक्तांपेक्षा याचकांचीच गदीर् जास्त असते. गणेश या देवतेबद्दल तर 'नवसाला पावणारा गणपती' ही संकल्पना भलतंच स्वाथीर् मूळ धरू लागली आहे. समाजमनावर याचा विपरीत परिणाम होतोय. ज्या गणेशाने सर्व मोह, लोभ, विकारांचा त्याग केला, त्या वीतरागी गणेशाकडे नवस बोलणं हे ईश्वरीय अज्ञानाचं द्योतक आहे. आपले प्रश्न पुरूषार्थाने, विवेकाने, अध्यात्मिक साधनेने आपणच सोडवायचे असतात. पण लोकसमूहाला स्वाथीर्, मतलबी ठेकेदारांनी नवसाच्या फळाची प्रलोभनं दाखवली आहेत. गणेश भावाचा भुकेला आहे, नवसफेडीच्या वस्तूंचा नाही. गणेशचतुथीर्पासून अनंत चतुर्दशीपर्यंतचा सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा चालू करताना लोकमान्यांच्या मनात फार उदात्त लोकजागरणच्या भावना होत्या. कारण गणेश ही बुद्धीची देवता आहे. या सार्वजनिक कार्यक्रमातून वैचारिक उद्बोधन व्हावं, अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, मरगळ, निराशा नष्ट व्हावी, प्रबोधनाने जनतेचा आत्मविश्वास वाढावा, प्राप्त परिस्थितीवर मात करण्याचे कौशल्य आत्मसात कसं करावं याबद्दलची व्याख्यानं व्हावी अशा उत्तमोत्तम संकल्पना मांडून त्या महापुरुषाने सर्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. पण आज त्या संकल्पनेचा फज्जा उडालेला दिसतो. भक्तीभावना तर फोफावत नाहीच. पण अनेक वाममागीर् धंदे उत्सवाच्या नावाखाली चालतात.

१) जबरदस्तीने वर्गण्या वसूल करणं.

२) गजाननांच्या प्राणप्रतिष्ठा केलेल्या पवित्र मूतीर्समोर अश्लील सिनेमे, अर्वाच्य भाषा असलेली नाटके, ऑकेर्स्ट्राचा, धांगडधिंगा, कार्यर्कत्यांचं रात्री दारू पिऊन पत्ते खेळणं, दोन मंडळांतल्या मारामाऱ्या पर्यायाने सामाजिक अशांतता दिसते.

३) मोठ्या आवाजातल्या लाऊडस्पीकरने प्रचंड ध्वनिप्रदूषण, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करणं, गणेशमूतीर् आणताना आणि विसर्जन करताना फटाक्यांच्या माळा लावणं, ताशा वाजवणं, तान्ही मुलं, वृद्ध व्यक्ती,रुग्ण यांचा विचार न करणं, रस्त्यारस्त्यावर गणेशमूतीर् स्थापन करून ट्रॅफिक जाम करणं हे लोकमान्यांना अभिप्रेत होते काय? या सर्वांत गणेशाबद्दल प्रेम किती आणि स्वत:चा आनंद किती हा विचार केल्यास सार्वजनिक गणेशोत्सवात विधायक असं फारसं काही घडत नसून स्वार्थ साधण्याची वृत्ती बळावताना दिसते.

४) भक्तीभावाने गोड स्वरात आरत्या ऐकू येत नाहीत. विचारांची भाषणं होत नाहीत. मार्गदर्शन, प्रबोधन कार्यक्रम नसतात. गणपती विसर्जनाच्या दिवशीही गणेशाला निरोप देताना कंठ दाटून आलेले, व्याकूळ झालेले भक्त दिसत नाहीत. उलट अचकट विचकट हावभाव, उद्वेगजनक अंगविक्षेप, मद्यपान करून धुंद नाचत गुलाल उधळणं या सर्व गोष्टीत काय अध्यात्म आहे, हेच समजत नाही.

५) गणपतीच्या देवळात उलटं चालत जाणं, तासन्तास रांगेत उभे राहणं, नवस बोलून देवाला वेठीस धरणं, हार-तुरे-मिठाई यावर पैसे उधळणं हे सर्व करण्यापेक्षा गणेशाची मनापासून उपासना करणं, प्रेमाने स्तोत्र म्हणणं, आपल्याकडून शांततेचा भंग होणार नाही ही काळजी घेणं, मनोरंजनाच्या नावाखाली होणारी पैशांची उधळपट्टी थांबवून तोच पैसा गोरगरिबांच्या अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान या गरजांसाठी दिल्यास गजाननांची केवढी प्रसन्नता प्राप्त करून घेता येईल!

सूज्ञ भक्तांनी उत्सवाचा उद्देश, भक्तीची मूळ संकल्पना समजून घ्यायला हवी. माझा खूप मोठा प्रेमसखा गणेशा आहे याचीच नेमकी विस्मृती होते. सिनेमा-नाटके-वाद्यवृंद-लावण्या यांचा गजाननांच्या भक्तीशी काहीही संबंध नाही तो अपवित्र धांगडधिंगा प्राणप्रतिष्ठीत पवित्र गणेशमूतीर्समोर घालून आपण पापंच जोडत आहोत हे विचार केल्यास कळेल.

गणेशोत्सवाच्या काळात ५०-५० पावलांवर नव्या मंडळांच्या गणेशमूतीर् स्थापन होतात. सहस्त्रावर्तनाच्या उद्देशाने शेकडो लिटर दूधाचा अभिषेक होतो. ते दूध गरीब कुपोषित बालकांना प्यायला मिळाल्यास गणेशाची केवढी मोठी कृपा प्राप्त करून घेता येईल!

एखाद्या गणेश मंदिरात उसळणारी भक्तांची गदीर् हे त्या देवळाचं किंवा त्या मूतीर्चं 'नवसाला पावणारी देवता' हे गमक नसून स्वत:च्या स्वार्थ साधण्यासाठी होणारी ती लोभी माणसांची गदीर् आहे, निजभक्तांची नव्हे. कारण खरा भक्त मंदिरात कधीही याचना करत नाही तर फक्त व्याकूळ प्रार्थना करतो. मनुष्य जगण्यासाठी जन्माला येत नाही, जाणण्यासाठी येतो. सकाम भक्ती जीवनाचा व्यापार असतो. निष्काम भक्ती आत्म्याचा आनंद असतो. लोकांची गदीर् वाढावी. पर्यायाने दानपेटीत भरपूर माया जमावी या उद्देशाने 'जागृत देवस्थान', 'नवसाला पावणारा गणपती' असे चमत्कार अभिप्रेत असतील तर तिथे स्वाथीर् गदीर् असेल पण जाणकार ददीर् नसतील. चमत्काराच्या जोरावर लोकांना आपल्याकडे आकृष्ट करून घेणं म्हणजे परमार्थातली वेश्यागिरी करण्यासारखं आहे. साक्षात्कार हा परमार्थमार्गाचा कळस आहे.

देवाला नवसफेडीची लालूच दाखविणाऱ्या अज्ञानी भक्तांनी साधा विचार करावा त्या अनंतकोटी ब्रम्हांडनायकाला आपण एवढेसे चिमुकले जीव काय देणार! त्या कर्तुमकर्तुम महाशक्तीला आपल्यासारख्या क्षुद, र्मत्य माणसांकडून कोणती अपेक्षा असणार? कोटी सूर्यांचं तेज असणाऱ्या त्या महाशक्तीला आपण चिमुकल्या निरांजनाने ओवाळतो हा आपला आनंद आहे. मोठेपणाच्या भावनेने आपण देवासाठी जे जे करतो ते सारे परमात्म्यानेच निर्माण केले आहे, हे विसरू नये. फळं, फुलं, जल ही सर्व त्याचीच निमिर्ती नव्हे का? माझे अमूक काम झाल्यास मी तमुक वस्तू तुला देईन असा नवस बोलून आपण त्या विराट शक्तीला किती कमी लेखतो. नित्य तृप्त परमात्मा कशाचीही अपेक्षा करत नाही. तान्हं मूल स्वतंत्रपणे काहीही करू शकत नाही तर त्याचं सर्व आईलाच करावं लागतं. तरीही या एका गोष्टीने आई कंटाळत नाही. उलट त्याचं सर्व करताना मातेला खूप आनंद होतो, धन्य वाटतं. ती गोष्ट म्हणजे त्या तान्हुल्याचा निरागस चेहरा, निष्पाप डोळे, आई दिसली नाही की कासावीस होणं, त्याचं निर्व्याजपण आणि आईला पाहताच खुदकन हसणं एका आईशिवाय त्याला काहीही सुचत नाही.

अति चांगट जरी ललना। खेळ भातुके देता नाना।

तेथे न जडे बाळभावना। कुरूपहीन माता गोड।।

तशी भक्ताची अवस्था होणं आणि त्या भावावस्थेत परमेश्वराची उत्कट भक्ती करणं हेच आध्यात्माचं रहस्य आहे. अभक्तीने केलेले राजोपचारही परमात्म्याला रुचत नाहीत. काही अपेक्षा मनात ठेवून ईश्वरसेवा करणं हा व्याभिचारी व्यवहार होतो आणि व्यवहारात कुठली आली- आपुलकी, जवळीक आणि ओलावा! म्हणून वरवरची बेगडी भक्ती ठेवून सेवेचं प्रदर्शन करू नये. प्रेम नसलेली पण अपेक्षा असलेली गणिकाच प्रेमाचं जास्त प्रदर्शन करते. पण प्रेमाने ओथंबलेली गृहिणी फक्त अबोल त्यागच करत असते. मणभर पेढ्यांपेक्षा कणभर प्रेमच श्रेष्ठ असतं.

गणपती उत्सवानंतर कुठल्या गणपती मंडळाला किती किलो सोनं मिळालं, किती लाख रुपये मिळाले, हिऱ्याचा मोबाईल मिळाला, कोणत्या देवस्थानाचे उत्पन्न सर्वाधिक अशा बातम्या सचित्र पेपरमध्ये किंवा वाहिन्यांवर दाखवल्या जातात तेव्हा या सर्वांची कीव करावीशी वाटते. गजाननांचा साक्षात्कार कोणाला झाला, मानसिक किंवा आत्मिक शांती किती जणांना मिळाली, प्रबोधनामुळे किती जीवने सुधारली त्याबद्दल एकही उदाहरण छापून येत नाही किंवा दाखवलं जात नाही म्हणून उत्सव मंडळं ही मोठी आथिर्क उलाढाली करणारी केंदं होऊ नयेत. कारण खऱ्या भक्तीचा त्यात लवलेशही नसतो. उलट देवाच्या नावावर धांगडधिंगा घातल्याने ते विकृत स्वरूप आस्तिकालाही नास्तिक करण्याचा संभव असतो.

सावधान! यापुढे धांगडधिंग्याची ही सर्व पध्दत बंद करून खऱ्या गणेशभक्ताने त्याच्या चरणी प्रार्थना करावी...

मंगलमूतेर् दयाळा धावत बा येई। दुस्तर या भवजलमधुनी पार मला नेई।

स्वानंदेशा श्रीहेरंबा बहुतचि मी चुकलो। अज्ञानत्वे सर्वस्वाला माझ्या मी मुकलो।

धरणीधरा ऐसे द्यावे। सर्वांभूती लीन म्या व्हावे।

।। मंगलमूर्ति मोरया।।

गुरुवार, २७ ऑगस्ट, २००९

हे तरुणांनीच बदलायला हवं.


आज गणेशोत्सवाचं रूप बदलायची जबाबदारी तरुणांवर आहे. कारण हा उत्सव त्यांचा आहे. ते करू शकतील अशा गोष्टीही भरपूर आहेत.
......


मला तरुणांच्या ओठावर कोणते गीत आहे सांगा, मी त्या देशाचं भवितव्य सांगतो असं कोणी विचारवंत सांगून गेला आहे. अत्यंत समर्पक असे हे उद्गार. दरवषीर् मुंबईत, गोविंदा, गणेशोत्सव अशा दरवषीर् होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळी या वचनाची आठवण येते. मुळात उत्सव म्हटलं की, सळसळती तरुणाईच डोळयासमोर येते. अगदी आयोजनापासून ते सांगता होईपर्यंत. यात ज्येष्ठांचा सहभाग अर्थातच असतो, पण त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा असते. सारी धावपळ, दगदग, आयोजन ही जबाबदारी तरुणांची असायला हवी.

मुंबईत तरी, हे उत्सव म्हटलं की तरुणच डोळयासमोर येतात ही सकारात्मक बाब आहे. उत्सव कदाचित एखादा दिवस किंवा नऊ दिवस किंवा दहा दिवस रंगणारा असो, साधारण १६ ते ३० वर्षं वयोगटातील युवक सर्वत्र दिसतात. बेभान होऊन नाचताना किंवा रात्रभर जागरण करून पुन्हा पहाटे कामाला लागणारा असा हा तरुणांचा गट असतो. यांच्यामुळेच हे उत्सव दणक्यात होतात हेही मान्य करायला हवं. पण गेल्या काही वर्षांत हे उत्सव अधिकाधिक त्रासदायक होऊ लागले आहेत अशाही तक्रारी होत आहेत. अनेकदा नियम, कायदे धाब्यावर बसवून ते साजरे होताना दिसतात. असं होत असेल तर त्याचीही जबाबदारी तरुणांनी स्वीकारावी लागेल. आपल्याकडे उत्सव म्हणजे, भरपूर सजावट, भपना, अमाप खर्च असे समीकरण होऊन बसले आहेत. यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचं समर्थन असं असतं की, आम्ही वर्षभर उत्सव साजरे करत नाहीत, तेव्हा थोडा त्रास झाला तर काय बिघडतं? कोणी याबाबत विरोधी आवाज उठवला तर काही वेळा धमक्यापर्यंत मजल जाते.

यात एक बाब लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे, वर्षभर समाजाचा कोणता ना कोणता घटक आपापले उत्सव साजरे करत असतो. प्रत्येकाने अशी भूमिका घेतली तर वर्षभर लोकांना त्रास सहन करावा लागेल. नको ती गाणी मोठमोठ्याने लावताना कोणीतरी वृद्ध, बालक झोपलं असेल, कोणी विद्याथीर् अभ्यास करत असेल, कोणाकडे शोककार घटना घडली असेल याचाही तरुणांनी विचार करायला हवा. आपल्या हौसेची किंमत इतरांनी का मोजावी असा प्रश्ान् निर्माण होतो.

काही ठिकाणी मंडळाच्या पैशाचे हिशेब लागत नाहीत, किती वर्गणी जमा झाली हे कळत नाही अशा तक्रारीही होतात. असं होणं अर्थातच तरुणांना शोभादायक नाही. या अशा उत्सवांच्या निमित्ताने, अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. उत्सवादरम्यान ते अमलात येतात पण असं कार्य वर्षानुवर्षं कसे करता येतील याचा विचार होत नाही.

तरुणांनी आपली शक्ती कशी कामी लावायची हे ठरवायला हवं. आज मराठी तरु ण लष्करात जात नाही, अशी तक्रार आहे. यावर, साहसाची आवड असणाऱ्यांना याकडे उद्युक्त करण्याचं काम या तरुण कार्यर्कत्यांनी करायला हवं. गरीब वस्तीत शिक्षणाची आच आहे, पण पैशाअभावी ती साध्य करता येत नाही ही स्थिती असणारे अनेक असतात. ही मंडळं, तरुण त्यांच्यापर्यंत कसे पोहोचतील याचा विचार व्हायला हवा.

अनेक मंडळं आपापल्या परीने काम करत असतात, पण तरीही एकंदर चित्र अधिक आशादायक करता येईल. पण असंही दिसतं की, अनेक तरुण कोणत्या का कोणत्या राजकीय पक्षांनी बांधलेले असतात. राजकीय पक्षांचा कार्यक्रम मर्यादित असतो. त्यांना ही शक्ती सत्ता मिळवण्यासाठी, आंदोलने करण्यासाठी वापरायची असते. पण लोकांना भेडसावणाऱ्या रोजच्या समस्यांना हात घालावं असं त्यांना वाटत नाही. साधं उदाहरण म्हणजे, मुंबईतले रस्ते सुमार दर्जाचे आहेत. श्री गणेशाला याच रस्त्यावरून यावं लागतं आणि विसर्जनाचा प्रवासही ठेचकाळत करावा लागतो. पण अशा मंडळांच्या तरुणांनी एकत्र येऊन आवाज उठवल्याचं दिसत नाही, राजकीय पक्षांना हा कार्यक्रम घ्यायला भाग पाडलं जात नाही. याला कारण बहुसंख्य तरुण राजकीय पक्षांकडे झुकलेले असतात, स्थानिक नगरसेवक, आमदार, अशांनी त्यांना बांधून ठेवलेलं असतं.

आज अनेक समस्या सामान्य माणसाला भेडसावत आहेत. हे बहुतेक तरुण याच घरांतून आलेेले असतात. त्यांनी आपली शक्ती आणि युक्ती केवळ उत्सवाचं आयोजन करण्यात दवडण्यात काय अर्थ आहे? उदाहरणच द्यायचं झालं तर, लोकलमधून येत असताना, भजनी मंडळ एका डब्यात जोरजोरात टाळ वाजवत आणि कर्कश्श स्वरात भजनं म्हणत असतात. यात अनेक तरुण असतात. अशा प्रकारे, इतरांना उपदव ठरून देव पावत नाही हे त्यांना कळत नसेल का? रेल्वेचा डबा ही आपली खाजगी मालमत्ता नाही हे त्यांना कळत नसावं? पण दिशा चुकलेले असे युवक उत्सवात वावरत असतात.

हे उत्सवच नव्हे तर, एकंदर सर्वत्र शिस्त, शांतता येईल याची जबाबदारी या युवकांवर आहे. त्यामुळे या युवकांचं कार्य सांगा, मी शहराचं भवितव्य सांगतो, असं म्हणायला हवं.