शुक्रवार, २६ डिसेंबर, २००८

शिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक .

दिलेरखान हा मोगल सेनापती पठाण होता। पण् त्याची निष्ठा सर्वस्वी औरंगजेबाच्या पायाशी होती। वास्तविक पठाण जमातीचे मोगलांशी वैरच होते. कारण दिल्लीची सत्ता पठाण वंशाकडून खेचून घेऊन बाबर हा दिल्लीचा पहिला मोगल बादशाह झाला होता. पण हे आसले काही नाते लक्षातही न घेता दिलेरखान त्यांची सेवा करीत होता. इतकी तळमळून अहोरात्र शाही चाकरी करणारा माणूस राजपुतांच्याशिवाय इतर कोणत्याही समुदायात मिळणे अशक्य होते. औरंगजेबाच्या मनात संशयाने कायमचेच कुरुप केलेले होते. त्याचा कोणावरही विश्वास नसायचा.
स्वत:च्या मुलामुलींवर तर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. मिर्झाराजांवरही नव्हता. पण त्याचे राजपुती कर्तृत्त्व , शौर्य आणि मोगल बादशाहीबद्दलची स्वामीनिष्ठा औरंगजेब जाणून होता. म्हणूनच मिर्झाराजांवर त्याने महाराष्ट्रावरील मोहिम सोपविली. पण तिथेही संशयी स्वभाव व्यक्त झालाच. मिर्झा व सीवा दोघेही राजपूत. ते कदाचित आपल्या- विरुद्ध एक झाले तर ? आपली नुकसानी झाली तर ? म्हणून मिर्झावर सावध लक्ष ठेवण्यासाठीच औरंगजेबाने दिलेरला या मोहिमेत बरोबर दिले होते. हे मिर्झाराजाने ओळखले होते. म्हणूनच अनेकदा मतभेद आणि अवमान गिळून टाकून मिर्झा दिलेरच्या कलाकलाने वागत होता. पुरंदरच्या वेढ्यात मिर्झा आणि दिलेर यांचे अनेकदा खटके उडाले. मिर्झाने शक्य तेवढे स्वत:ला सावरीत सावरीत अलगद पडते घेतलेले दिसून येते.
दिलेरखान पुरंदरसाठी अत्यंत नेटाने हट्टाला पेटला होता. त्याचे एकूण या मोहिमेतील वर्तन पाहिले की , दुसऱ्या महायुद्धातील एखाद्या जनरल पॅटनची किंबहुना हिटलरचीच आठवण होते. पण येथे दिलेरच्या बाबतीत ते वर्तन कौतुकाचेच वाटते.
पुरंदरच्या पूर्व पहाडावर असलेल्या ' काला बुरुजावर ' दिलेरने मोठ्या कष्टाने तोफा डागल्या व मारा सुरू केला. पण मराठ्यांच्या या बुरुजावर असलेल्या दारुच्या साठ्याचा स्फोट झाला अन् बुरुज उडाला. ऐंशी मराठे हशम एका रकमेने उडाले. ठार झाले. दिलेरला हे अचानक यश मिळाले. आनंदाच्या भरात किंचितही न रेंगाळता त्याने ताबडतोब या खिंडारावर आपल्या फौजेचा एल्गार केला. स्वत: दिलेरखान उभा होता. त्याला वाटले की , आपण किल्ल्यात घुसणार , नक्की आत्ताच किल्ला मिळणार. पण मराठे तेवढेच अक्राळविक्राळ होते. काळा बुरुज उडालेला , ऐंशी मराठी माणसं चिंधड्या झालेली समोर दिसूनही मराठे कचरले नाहीत. त्यांनी मागेच असलेल्या सफेद बुरुजावरून या मोगली हल्ल्यावर जबर प्रतिहल्ला चढविला. तो एवढा तिखट होता की , हल्ला करणारे मोगल माघारा पळत सुटले. ही मराठी जिद्द पाहून दिलेर चकीत झाला. पण तेवढाच भयंकर संतापला. अन् मग तो संताप पुरंदरावर त्याने आगीसारखा ओकावयास सुरुवात केली. काळ सरकत होता. दिवस उलटत होते. पण दिलेरच्या काळजात निराशेची रात्र होतच नव्हती. गडही मिळतच नव्हता. तेव्हा दिलेरने आपल्या सेनाधिकारी सरदारांसमोर संतापून आपली पगडी घालणार नाही. असा हा हट्टी , संतापी दिलेर , औरंगजेबाला असे सरदार मिळाले पण ते त्याला सांभाळता आले नाहीत. माणसं कशी सांभाळावीत , त्यासाठी आपल्या काळजाचा तुकडा कापून द्यावा लागला तरी तो द्यावाच हे शिकावं शिवाजीराजांकडून औरंगजेबाला हे कसं जमणार ?
अखेरपर्यंत पुरंदरगड दिलेरला जिंकून घेता आलाच नाही. गडावर मराठी सैन्याला नेता नव्हता. मुरार बाजी ठार झाले होते. तरीही पुरंदर झुंजतच होता. नेता नसतानाही एक दिलाने , एक मनाने आणि एक निष्ठेने अशी मरणाच्या तोंडावर उभे राहून झुंजणारी माणसं स्वराज्याला महाराजांनी घडविली. खऱ्या अर्थानं पुरंदरावर यावेळी लोकशाही होती. खऱ्या अर्थानं लोकशाही यशस्वी होते ती अशीच. आपसांत क्षुद , स्वाथीर् भांडणे भांडून नव्हे!
आमच्या लोकशाहीचे दर्शन लोकसभेत आणि विधानसभेत आपल्याला नेहमीच घडते. आपण पावन होऊन जातो.
दिलेर आणि मिर्झाराजे हे दोघेही औरंगजेबाकरीता आणि मोगली तख्ताकरीता जिवाचं रान करीत होते. या दोघांच्याही आयुष्याची अखेर कशी झाली ? हताश आणि दु:खमय. याच मिर्झाराजाला औरंगजेबाने उदयराज मुन्शी या , मिर्झाराजाच्याच नोकराकडून विष घालून पुढे (दि. ११ जुलै १६६७ ) बुऱ्हाणपूर येथे मारले. आणि दिलेरचं काय झालं ? आयुष्यभर त्याने औरंगजेबाची जीव उगाळून सेवा केली. पुढे संभाजीराजांच्या विरुद्ध मांडलेल्या युद्धात दिलेर असाच लढत होता. मराठे हरत नव्हते. मोगलांना यश मिळत नव्हते. चिडलेल्या औरंगजेबाने दिलेरलाच दोष दिला. ' तुमच्याच अंगचोरपणामुळे आपण हार खातो आहोत ' असा आरोप औरंगजेबाने घेतला. (इ. १६८५ ) त्यावेळी दिलेरनं मान खाली घातली. त्याला काय यातना झाल्या असतील त्या त्यालाच ठाऊक. आयुष्यभर ज्याची सेवा केली , तो आपल्याला अंगचोर म्हणतोय.
दिलेरने आपल्या तंबूत एकांती विषय पिऊन आत्महत्या केली. हे पाहिल्यावर आठवावेत शिवाजीराजे. त्यांचे कैसे बोलणे होते ? कैसे चालणे होते ? त्यांची सलगी देणे कैसे असे ? तानाजी , कान्होजी जेधे , जिवा महाला , बाजी प्रभू , दौलतखान , बाळ प्रभू चिटणीस , येसबा दाभाडे , धाराऊ गाडे , हिरोजी फर्जद अन् असेच कितीतरी हिरे आणि हिरकण्या महाराजांच्या हृदयातच जाऊन बसलेल्या दिसतात. प्रेम ही एक अलौकिक शक्ती आहे. ती नेत्यांनी अन् अनुयायांनीही कधी विसरू नये. तिचं दर्शन घडावं. प्रदर्शन करू नये. स्वाथीर् व्यत्यय कामामध्ये येऊ नयेत. यशाचे प्रत्यय यावेत. खरे प्रेम अबोलच असते. ऐसी कळवळ्याची जाती , लाभाविण करिती प्रिती. शिवकाल म्हणजे ठायी ठायी या प्रेमाचा प्रत्यय.
- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.

पुरंदर गड बुलंद आहे बेलाग आहे। प्रचंड तर घटोत्कचासारखा आहे. असा हा गड चटकन मिळावा असा प्रयत्न दिलेरखान करीत होता. महिना उलटून गेला होता. अजूनही गड खानाला चटकन मिळत नव्हता.
अन् एक चित्तरकथाच गडाच्या दक्षिणेस काळदरीत घडली। खानानं गडाचा दख्खन दरवाजा तोफांच्या सरबत्तीने अस्मानात उडविण्याचा घाट घातला. दोन प्रचंड तोफा मोठ्या कष्टाने काळदरी या गावापासून गडाच्या या दख्खन दरवाजापासून थोड्या अंतरावर असलेल्या डोंगरमाथ्यावर चढविण्यात आल्या. खाटल्यावर पहुडलेल्या घटोत्कचानं आपला एक गुडघा उंचावावा तसा हा डोंगरमाथा दिसतो. भोवती झाडी. समोर उंचावर तो दरवाजा. हा दरवाजा जर कब्जात आला तर पुरंदरच्या थेट बाले किल्ल्यावरच आलमगिरी झेंडा लावता येईल हा दिलेरचा डाव. हे काम अत्यंत अवघड होते. पण तोफांच्या माऱ्याने दरवाजा उडवून ते साधता येईल असा खानाचा विश्वास होता. या तोफांच्या मोर्च्यावर एक मोगली तुकडी आणि दोन प्रख्यात सरदार खानाने नेमले. दाऊदखान कुरेशी आणि रसूल बेग रोजभानी हे ते दोघे. अहिमही होते. म्हणजे हा दरवाजा आता अशा तोफांच्या आणि मोगली सरदारांच्या तोंडासमोरच उभा होता. त्या मानाने दरवाजा बऱ्याच उंचीवर गडाच्या खोबणीत होता.
अन् या तोफांचा मारा दरवाज्यावर सुरूही झाला. दोन-तीन दिवस उलटले. दरवाजा पक्का होता. (अजूनही आहे.) अन् याचवेळी एका रात्री गडद अंधारातून आणि गडाच्या अंगावर असलेल्या झाडीझुडपांतून सुमारे चारशे मावळे , काळदरीकडून गडावर उंदरासारखे या दरवाजाच्या रोखाने घुसले. चढू लागले. या मावळ्यांच्या पाठीवर धान्याची आणि बारुदाची म्हणजे तोफा बंदुकांच्या दारुची लहानमोठी पोती होती. महाराजांनी राजगडावरून पुरंदरगडावर मुरारबाजींना ही रसद गुपचूप पाठविली होती. सुमारे दोनशे पोती होती. मोगली सैन्याच्या आणि तोफांच्या तडाख्यातून हे मावळे मोठ्या हिमतीने , कष्टाने आणि चतुराईने गड चढत होते. दाऊदखान कुरेशी आणि रसूलबेग रोजभानी यांना या चोरांच्या चतुराईची चुकूनही चाहूल लागली नाही. दख्खन दरवाज्यावरच्या मराठ्यांनी अचूकपणे दिंडीदरवाजा उघडला. ही मराठी कुमक आणि रसद गडात अगदी सुखरूप पोहोचली. दख्खन दरवाजा बंद झाला. मोगली तोफा उडचत होत्या.
रात्र संपली. दिवस उगवला. मुरारबाजींना ही नवीन कुमक पाहून केवढा आनंद झाला असेल नाही ? खास महाराजांनी गडाला पाठविलेली ही मदत.
अन् रात्र संपल्यावर दिवसाउजेेडी दाऊदखानला अन् रसूलबेगला बातमी लागली की , रात्रीच्या अंधारातून आपल्या समोरच्या झाडीतून मोठी थोरली कुमक मराठ्यांनी गडावर नेली. दोघेही सरदार थक्क झाले , सुन्न झाले , गप्प झाले , गप्पच राहिले. कारण ही आपली फजिती आपणच कशी कुणाला सांगायची! अन् जर गडाच्या उत्तर पायथ्याशी असलेल्या दिलेरखानाला ही फजिती समजली , तर तो संतापेल. अन् काय करील याचा नेम नाही , हे ते दोघे ओळखून होते. म्हणून गप्पच बसले.
तो दिवस मावळला. रात्र झाली. तोफा उडतच होत्या. अस्वलानं शिकावं तशा.
गडाच्या बाले किल्ल्यावर याच रात्री एक भयंकर धाडसी कवटाळ किल्लेदाराने योजले. त्याने चाळीस मावळ्यांना सज्ज केले. मोगलांच्या उडणाऱ्या तोफांवरच झडप घालण्यासाठी केवढे धाडस! या चाळीसातील काहींच्या जवळ टोकदार मोठे लोखंडी खिळे आणि हातोडे होते. ही सशस्त्र टोळी दख्खन दरवाजाच्या दिंडीतून गुपचूप बाहेर पडली. झाडीतून लपत छपत तोफांकडे उतरू लागली. या छाप्याची कल्पनाही दाऊद आणि रसूल यांना आली नाही. या मराठ्यांनी एकदम अंधारातून येऊन मोगलांवर झडप घातली. मोगलांचा गोंधळच उडाला. झटापट पेटली. हातोडेवाल्या मावळ्यांनी गदीर् करून तोफांच्या छिदात खिळे घातले. घाव घातले. तोफा क्षणात निकामी झाल्या. काम झाले. मावळे जितक्या झपाट्याने आले तितक्याच झपाट्याने झाडीत पसार झाले. चार सहा मावळे मारले गेले.
दख्खनची दिंडी उघडली गेली. मावळे किल्ल्यात शिरले. दिंडी बंद झाली. खानाच्या तोफा ठार बंद पडल्या होत्या. काळगडावर मावळी कुमक पोहोचली. आज आपल्या तोफा बेकाम होऊन निपचित पडल्या. तोबा!
या गोष्टी लपून राहिल्या नाहीत. दिलेरखानाला त्या समजल्या. तो आगीसारखा भडकला. संतापून तो या बंद पडलेल्या तोफांच्याकडे दौडत आला. दाऊद आणि रसूल गुन्हेगारासारखे मान खाली घालून उभे होते. संतापलेल्या दिलेरखानाने आपला क्रोध शब्दात उधळावयास सुरुवात केली. अत्यंत कठोर भाषेत दाऊद आणि रसूल यांची तो अब्रू सोलून काढीत होता. थांबतच नव्हता. तो त्यांना बेवफादार , हरामखोर , नालायक , बत्तमीज अशा घनघोर शिव्यांनी झोडपीत होता. कितीतरी वेळ.
त्यांनी दोघांनी तरी किती ऐकून घ्यायचे ? जबाबदारी त्या दोघांवर होती हे खरं. पण आता त्याबद्दल किती शिव्या घालायच्या ? अखेर एक क्षण असा आला की , दाऊदखान कुरेशीने मान वर करून दिलेरखानालाच जाब विचारला , ' तुमच्याच छावणीत दारूगोळ्याचा सारा साठा भडकून उडाला , कोण जबाबदार होतं त्याला ? आम्ही ? की तुम्ही ?'
दाऊदचा सवाल मुँहतोड होता. अन् मग! दाऊदखान आणि रसूल बेग यांची लांब दुसऱ्या छावणीत बदली करण्यात आली! ते परिंड्याच्या किल्ल्याकडे रवाना झाले. पुरंदर झुंजतच होता.
- बाबासाहेब पुरंदरे

बुधवार, २४ डिसेंबर, २००८

शिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ

दिलेरखानाने आपली किल्ले घेण्याची मोहिम सुरू करण्याचे ठरविले. प्रथम पुरंदर आणि सिंहगड हे किल्ले ' लक्ष्य ' म्हणून निश्चित केले. मोगली सर्जाखानाने सिंहगडास मोर्चे लावले. यावेळी सिंहगडावर जिजाऊसाहेब आणि महाराजांच्या एक राणीसाहेब होत्या. या नेमक्या कोणत्या राणीसाहेब होत्या , त्यांचे नाव सापडत नाही. पण जिजाऊसाहेब सिंहगडात असल्यामुळे आधीच बलाढ्य असलेला सिंहगड अतिबलाढ्य बनला. सिंहगडचा किल्लेदार यावेळी कोण होता त्याचेही नाव समजत नाही. पण गेल्याच वषीर् (दि. २८ मे १६६४ ) जसवंतसिंह राठोड आणि भावसिंह हाडा या दोघांवर जबरदस्त हल्ला करून त्यांचे मोचेर् पार उधळून लावून अन् त्यांना पिटाळून लावणारा जो मराठा किल्लेदार होता , तोच हा आताही असावा.
पुरंदर किल्ल्याला एकजोड किल्ला आहे. त्याचं नाव वज्रगड. म्हणजे दिलेरखानाने पुरंदर वज्रगड आणि सिंहगड हे किल्ले प्रथम घेण्याचे निश्चित केले. दिलेरखान आणि त्याच्याबरोबर मिर्झाराजेही पुरंदरच्या दिशेने निघाले. त्यांचा मार्ग पुणे ते हडपसर-लोणी-फुरसुंगी-चोराची आळंदी- सोनोरी-सासवड ते पुरंदर असा होता. दिलेरखानाचा कामाचा झपाटा विलक्षण गतीमान होता. आळस आणि चैनबाजी त्याच्या स्वभावातच नव्हती. मोगलांकडील एकूण सेनानायकांत या शंभर वर्षात हा दिलेरखान म्हणजे एकमेव वेगळा अपवाद ठरावा असा इस्लामी सेनानायक होता. एखादे काम अंगावर घेतले की ते पुरे करण्याकरिता तो अहोरात्र बेचैन असायचा.
दिलेरखान म्हणजे मूतिर्मंत निष्ठा , मूतिर्मंत तळमळ , मूतिर्मंत तडफड. खान आणि मिर्झाराजे पुण्याहून निघाले आणि 3 ० मार्च १६६५ या दिवशी सोनोरीच्या डोंगराच्या दक्षिण पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावात पोहोचले. त्यांच्याबरोबर अफाट युद्धसाहित्य आणि लवाजमा होता. तरीही अवघ्या १५ - १६ दिवसांत पुण्याहून ते सोनोरीस पोहोचले. सैन्य निदान पाऊणलाख तरी होतेच. येथे एक आठवण देतो. हेच अंतर फक्त 3 ० हजार सैन्यानीशी चालून जायला पूवीर् शाहिस्तेखानास पूर्ण नऊ दिवस लागले होते. दि. १ मे ते ९ मे १६६० अर्थात दिलेरखानसारख्या सतत भडकत राहणाऱ्या बारुदगोळ्याची शाहिस्तेखानसारख्या गचाळ सेनानीशीच काय पण कोणत्याही इतर इस्लामी सेनानीशी तुलना करता येणार नाही.
मोगलांनी तोफखाना मोठाच आणला होता. त्यात तीन तोफा प्रचंड होत्या. दि. 3 १ मार्च १६६५ रोजी मध्यरात्री अचानक मराठ्यांच्या शेपाचशे स्वारांच्या टोळीने खानाच्या या सोनोरीजवळच्या छावणीवर एकदम वळवाच्या पावसासारखा हल्ला चढविला. छावणी झोपलेली होती. त्या प्रचंड छावणीवर हा हल्ला तसा लहानसाच होता. पण इतका भयंकर होता की , मोगलांची क्षणात तारांबळ उडाली. मराठे सुसाट वादळासारखे आले. अचाट वेगाने तुटून पडले. त्यांनी भन्नाट कापाकापी केली अन् सुसाट पसार झाले. कसे आले , कोठून आले , कोठे गेले पत्ताच नाही. आले गेले मनोगती. दिलेरला मराठ्यांचा पहिला परिचय असा झाला.
दि. १ एप्रिल रोजी खान तशाच वेगाने १५ कि. मी.वर असलेल्या पुरंदरच्या पायथ्याशी जाऊन पोहोचला. खानाने लगेच मोचेर्बंदी सुरू केली. स्वत: खान जातीने नेतृत्त्व करीत होता. मिर्झाराजे या वेढ्यापासून दीड कि. मी. असलेल्या नारायणगावापाशी आपली छावणी ठोकून राहिले.
एक दिवस दिलेरच्या वेढ्यात भयंकर भडका उडाला. खानाचा दारुगोळ्याचा साठा अचानक पेटला. सगळी दारू प्रचंड स्फोटाने एकाक्षणात खाक झाली. भयानक नुकसान झाले. हा अपघात ? की मराठ्यांनी केलेला आघात ? नक्की माहित नाही. पण बहुदा मराठ्यांच्या गुप्तचरांनीच ही ठिणगी टाकली असावी.
पुरंदरच्या भोवती अक्षरश: तोफा बंदुकातून आग गडावर फेकली जात होती। मराठी इतिहासातील एक रौद संग्राम म्हणून या युद्धाचा अध्याय दाखवावा लागेल.
यावेळी मराठी सैन्याची पथके जागोजाग मोगलांना सतावीत होतीच. पण मनुष्यबळ कमी पडत होते. महाराज निश्चयाने उभे होते. त्यांची मनोभूमिका त्यांच्याच शब्दात अशी , ' पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठीच मी जन्माला आलो आहे. माझ्या भूमीचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य. ते बजावण्यास मी कधीही चुकणार नाही. '
मोगलांचा धूमाकूळ पुणे जिल्ह्यात चालू होता. तो त्यांनी केंदित केला होता. त्यामुळे आग भयंकर होती. याचवेळी कोकण भक्कम आणि निर्धास्त होते. महाराजांचे आगरी , भंडारी , कोळी , प्रभू , कोकणी मराठे कोकणची अन् विशेषत: किनारपट्टीची राखण करीत होते. मिर्झाराजाने यावेळी औरंगजेबास डाक पाठवून विनंती केली की , गुजराथेतून मराठी कोकणावर तुम्ही मोगली फौजा पाठवा. हे कोकण झोडपले पाहिजे. औरंगजेबाने हे केले नाही का ? माहित नाही. पण पूवीर् शाहिस्तेखानाने कोकणावर पाठविलेल्या एकूण एक सरदारांचा कोकणी मराठ्यांनी पार धुव्वा उडवून दिलेला होता. पूर्ण फजिती. हे औरंगजेबाच्या लक्षात असावे. म्हणूनच बहुदा त्याने कोकणातील आगरी , कोळी , भंडाऱ्यांची कलागत काढली नाही. दिलेर आणि मिर्झाराजा यांनीही पुण्याहून कोकणावर आपल्या फौजा पाठविण्याचे धाडस केले नाही. कोकणच्या माणसांची इथे ओळख पटते. असे हे कोकण , असे हे मावळ , चिवट , चपळ , चमत्कारिक.
- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.

कारवार किनाऱ्यावरील बसनूर उर्फ बसिर्लोखर महाराजांचा आरमारी छापा पडला. पण या मोहिमेमागे किती पद्धतशीर योजना त्यांनी केली असेल याचा अभ्यासकांनी विचार करावा. आधी हेर पाठवून तेथील लष्करी आणि राजकीय स्थितीची पूर्ण माहिती मिळवून नंतरच ही सागरी मोहिम त्यांनी केली. त्यात यश चांगले मिळाले. पण अपेक्षेप्रमाणे पुरेपूर मिळाले नाही. जेथे यश मिळाले नाही त्याचाही त्यांनी नंतर पुरेपूर अभ्यास केलेला दिसतो. प्रत्येक विषयात ते अभ्यासाला आणि योजनाबद्ध आराखड्याला महत्त्व देत असत. आमचे आजचे थोर समाजसेवक बाबा आमटे तरुणांना उद्देशून एक गोष्ट निक्षून सांगतात , मलाही त्यांनी ती सांगितली. ती अशी ' भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन काम करा ' किती महत्त्वाचा इशारा आहे हा नाही ? अगदी हेच सूत्र महाराजांच्या कार्यपद्धतीत आढळते.
पण भान ठेवून केलेल्या योजनेत जर कुणी कार्यकर्ता अनुयायी चुकला किंवा त्याने जाणूनबुजून कुचराई केली , तर बेभान होऊन केलेले काम अपेक्षित होते. थोडाफार असाच प्रकार कारवार मोहिमेत कोणा तरी हेरगिरी करणाऱ्या गुप्तचराकडून घडला. आपला मराठी माणूस अचूक वागावा , अचूक चालावा आणि अचूक बोलावा ही महाराजांची अपेक्षा नेहमीच असे. पण त्यातूनही असा क्वचितच का होईना , पण चुकार गडी निघत असे. कारवार मोहिमेत अशी चुकीची वा अपुरी गुप्त बातमी आपल्याच हेरांनी दिल्यामुळे आपणांस थोडे अपयश आले हे महाराजांनी हेरले. पण त्यांनी कानाडोळा केला नाही. त्यांनी त्या संबंधित हेराला शासनही केले. करायलाच हवे होते. नाहीतर चुका करायची चटक लागते. कोणाची तरी चिठ्ठी आणली की , मोठमोठ्या गुन्ह्यातील प्रतिष्ठित आरोपी अलगद सुटतात , नंतर मानाने मिरवतातही. हे बरे नव्हे.
या कारवार मोहिमेच्या काळातच महाराजांचा वाढदिवस (फाल्गुन वद्य तृतीया) येऊन गेला. हा त्यांचा पस्तीसावा वाढदिवस. पण तो साजरा केल्याची नोंद नाही. इतकंच नव्हे त्यांनी आपला कोणताही वाढदिवस साजरा केला नाही.
आज मात्र आमच्या ' तरुण , तडफदार , तेजस्वी ' हिरोंना विसाव्या वर्षांपासून ' प्रत्येक वर्षी आपला वाढदिवस जाहिरातबाजीने साजरा करण्याची चटक लागली आहे. सिद्धीच्या मागे लागावे , प्रसिद्धीच्या नव्हे. शिवरायांस आठवावे. जीवित तृणवत मानावे. महाराजांनी स्वराज्य साधनाची लगबग कैसी केली , ते स्मरावे. स्वत:चा आरोग्यसंपन्न शंभरावा वाढदिवस साजरा करण्याची जरुर महत्त्वाकांक्षा ठेवावी. त्यासाठी निर्व्यसनी असावे. असो. बहुत काय लिहिणे ?
मोहिम संपवून महाराज भूमार्गाने परतले. मोहिमेवर येत असलेले मिर्झाराजे पुण्याच्या दिशेने सरकत होते. ते आणि दिलेरखान पुढच्या मोहिमांची चर्चा करीत असावीत असे दिसून येते. दोघांचेही हेतू एकच होते. शिवनाश! पण पद्धती वा मार्ग जरा भिन्नभिन्न होते. दिलेरचे म्हणणे असे की , ' या शिवाजीराजाचे किल्ले एकूण आहेत तरी किती ? फार फार तर चाळीस. ते सर्वच किल्ले आपण युद्धाने जिंकून घेऊ. हा विचार आपल्या प्रचंड सैन्यबळावर दिलेर मांडीत होता. हा विचार केवळ शिपाईगिरीचा होता. त्यात सरदारी नव्हती. डोके कमीच होते. मिर्झाराजांचा विचार वेगळा होता. त्यात अभ्यास दिसून येतो. मिर्झाराजांचे म्हणणे थोडक्यात असे शिवाजीराजाचे किल्ले घेणे वाटते तितके सोपे नाही. कारण त्या किल्ल्यातील मराठी माणसं अजिंक्य आहेत. ती फितवा फितुरीने विकत घेणे वा लढूनही जिंकून घेणे जवळजवळ अशक्य आहे. या माणसांचे म्हणजे लढाऊ सैनिकांचे घरसंसारच जर आपण तुडवून काढले आणि त्यांची बायकापोरे , शेतीवाडी आणि त्यांची खेडीपाडी पार मुरगाळून काढली तर गडागडांवर असलेले हे मराठी आपोआप भुईवर गुडघे आणि डोकं टेकतील. त्यामुळेच शिवाजीराजा हा आपोआप शरण येईल.
असा विचार आणि पुढे प्रत्यक्ष तो विचार कृतीत आणू पाहणारा मिर्झाराजा जयसिंग हा एकमेव शत्रू वा सेनापती ठरला. बाकीचे सगळे हाणामारी आणि जाळपोळ करणारे केवळ दंगेखोर. दिलेर आणि मिर्झा हे दोन सेनापती आपापले विचार घेऊन पुण्यात दाखल झाले.
महाराजांनी एक तिसराच प्रयत्न करून पाहिला. मोगलांचे बळ अफाट आहे आणि मिर्झाराजा हा सेनापतीही शहाण्या डोक्याचा आहे. जर हे प्रचंड मोगली वादळ आपल्या अंगावर न येऊ देता परस्पर विजापुरच्या आदिलशाहकडेच वळविता आले तर स्वराज्याला मोगली धक्का लागणार नाही , या हेतूने महाराजांनी मिर्झाराजाकडे अशी बोलणी वकिलामार्फत केली की , हा विजापूरचा बादशाह आदिलशाह दिल्लीचा शत्रू आहे. त्याचा तुम्ही पुरा मोड करा. आम्ही तुम्हांस मदत करू.
म्हणजे विजापूर खलास करून टाकायचं अन् त्यात आपणही चार ओंजळी कमवायच्या असा हा महाराजांचा डाव होता. तो डाव मिर्झाराजांनी अचूक ओळखला. आणि त्यांना दादच दिली नाही. मोगली फौज त्यांनी थेट पुण्यावर आणली. पुणे ही त्यांची केंद छावणी झाली. शाहिस्तेखानापासून पुणे मोगलांच्याच ताब्यात होते. आता आपण टाळू पाहात असलेले मोगली आक्रमण टळत नाही , हे महाराजांना कळून चुकले. संकट कितीही मोठे अंगावर आले तरीही आपला आब न सोडता ताठ उभे राहायचे हा महाराजांचा नेहमीचा स्वभाव.
मिर्झाराजा आणि दिलेरखान यांनी आपापल्या पद्धतीप्रमाणे मराठ्यांविरुद्ध डाव खेळायचं ठरविलं. मराठी स्वराज्याची जाळपोळ , लूट जनतेवर अत्याचार ही मराठ्यांना शरण आणण्याकरिता मिर्झाराजाने ठरविलेली खेळी त्याने सुरू केली. पुण्यात कुबाहतखानास , कार्ला , मळवली , वडगांव या मावळ भागात कुतुबुद्दीनखान आणि पुण्याभोवतीच्या भागात इंदमणबुंदेला , रायसिंग सिसोदिया इत्यादी सरदारांना ही धूमाकूळ घालण्याची कामगिरी सांगून धामधुमीस प्रारंभही केला. (मार्च. १६६५ ) ब्रिटीश भूमीवर सतत बॉम्बवर्षाव करून ब्रिटीश सैन्याचे धैर्य खचविण्याचा हिटलरने असाच प्रयत्न दुसऱ्या महायुद्धात केला होता हे आपल्याला आठवतंय ना ? अशाच घनघोर प्रसंगी राष्ट्राचे चारित्र्य दिसून येते. ते खचते तरी किंवा धगधगते तरी.
परीक्षा होती स्वराज्यातील जनतेची. मराठी सैनिकांना हा मोगलाई वणवा दिसत होता. आपली घरेदारे आणि बायकापोरे पार चिरडून निघत आहेत , हे मराठ्यांना उघडउघड दिसत होते. समोरासमोर मोगलांशी झुंजायला मराठी माणूसबळ कमी पडत होते. तरीही प्रतिकार चालूच होता. स्वराज्यास आरंभ झाल्यापासून आत्तापर्यंत (१६४६ ते १६६५ ) मराठी सैनिक सतत लढतोच आहे. विश्रांती नाहीच अन् आता तर ढगफुटीसारखे मोगली हत्ती आपल्यावर तुटून पडले आहेत. हे मराठ्यांना दिसत होतं. महाराजांनाही दिसत होतं. नकाशा पाहिला तर हा मोगली धूमाकूळ मुख्यत: पुणे जिल्ह्याच्या मध्य आणि पश्चिम भागावर मिर्झाराजांनी केंदित केला होता.
पण इथेच शिवशाहीचा मावळा सैनिक आपलं प्रखर धैर्य , शौर्य , सहनशीलता , त्याग , निष्ठा आणि नेतृत्त्वावरील विश्वास अन् प्रेम अगदी नकळत , अगदी सहज , अगदी उत्स्फूर्त अन् अगदी हसतहसत जगून वागून दाखवित होता. यालाच राष्ट्रीय चारित्र्य म्हणतात. या काळातील या आक्रमक आगीच्या वर्षावात कोणत्याही किल्ल्यावरचा वा दऱ्याकपारातल्या ठाण्याछावणीतला मराठा सैनिक हताश , निराश , गर्भगळीत वा अगतिक झालेला दिसत नाही. हे कशावरून ? फितुरी नाही. आपापल्या कामात कसूर नाही अन् महाराजांकडे केविलवाण्या विनविण्याही नाहीत की महाराज आमचे संसार मातीला मिळताहेत. महाराज हे युद्ध थांबवा. शरण जा. तह करा. आम्हाला वाचवा.
मराठी स्वराज्याच्या पाठीचा कणा वज्रासारखा आणि गर्दन शेषासारखी ताठ दिसून आली ती या मिर्झा-दिलेर यांच्या आक्रमणाच्या काळातच. असा हा कणा होता की , वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.
- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.

शाहिस्तेखानाच्या फटफजितीनंतर , त्याच्याच हाताखालचा सरदार जसवंतसिंह राठोड हा खूप मोठी फौज घेऊन पुण्याशेजारच्याच सिंहगडाला वेढा घालण्यासाठी आला. त्याने गडाला मोर्चे लावले. त्याच्याबरोबर त्याचा मेव्हणा बंुदीमहाराजा भावसिंह हाडा हाही होता. झुंज सुरू झाली.
शाहिस्तेखानाची झालेली फजिती सर्वात जास्त असह्य होत होती या जसवंतसिंहाला आपण पुण्यात लाल महालाभोवतीच्या छावणीत असताना खानावर छापा पडावा हा जणू या सिंहाला स्वत:चाच अपमान वाटत होता. झालेल्या फजितीचा थोडातरी बदला घेण्याकरीता आपण शेजारचा सिंहगड घ्यावा असा जसवंतचा हेतू होता.
हा वेढा चालू असतानाच सिंहगडच्या पश्चिमेच्या बाजूने स्वत: महाराज पाच हजार घोडदळ घेऊन सुरतेवर गेले. जसवंतला याचा पत्ताच नव्हता. महाराज सुरतेहून परत असेच जसवंतच्या पश्चिमबाजूने राजगडला गेले. जसवंतला याचाही पत्ता नव्हता. बातमीदार नाहीत , लष्करी गस्त नाही , सावधपणा नाही. कशी या मोगलांना कल्पना आली की , हे मराठे कोल्हे आपल्या अवतीभोवती आट्यापट्या खेळताहेत अन् आपल्याला त्यांचा भयंकर धोका आहे. पण केवळ प्रचंड युद्धसाहित्य , पैसा आणि अपार सैन्य याच्या जिवावर आपण मराठ्यांना मोडून काढणार आहोत अशी स्वप्न हे लोक पाहत होते. निव्वळ हा त्यांचा भाबडेपणा होता.
आता पाहा , दि. ६ एप्रिल १६६ 3 या दिवशी शाहिस्तेखानावर महाराजांचा छापा पडला. त्या दिवसापासून ते पुढे मिर्झाराजा आणि दिलेरखान दुसरी प्रचंड मोहिम घेऊन याच पुण्यात येईपर्यंत , म्हणजेच मार्च १६६५ पर्यंत मोगलांचा मुक्काम पुण्यात होताच. या पावणेदोन वर्षात मोगली सरदारांनी काय काय मिळवलं ? काहीही नाही. जसवंत आणि भावसिंह हे सिंहगडाला गराडा घालून बसले होते. प्राप्ती काय ? शून्य. मधूनमधून मराठ्यांच्याच हातचा मार खात होते.
याच काळातील शिवाजी महाराजांची कमाई लक्षात घ्यावी. सुरतेची खंडणी ही त्यांची प्रचंड आथिर्क कमाई. मुधोळकर बाजी घोरपड्यांचा समूळ फडशा , कुडाळवर खवासखानाचा पूर्ण पराभव , सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास प्रारंभ , जिजाऊसाहेबांची महाबळेश्वरास सुवर्णतुळा दानधर्म , कारवारवरील आरमारी स्वारी अन् याशिवाय अनेक लहानमोठी स्वराज्यातील कामे यशस्वी. हा हिशोब पाहिल्यावर मोगल आणि मराठे यांचा उद्योग कोणत्या काळ काम आणि वेगाने चालला होता हे लक्षात येते.
महाराजांचा कामाचा हा झपाटा पाहिला की , त्यांच्या ध्येयवादाची कल्पना येते. साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर आपण मराठे आणि आपला महाराष्ट्र स्वराज्य मिळवीत आहोत , याची सावध जाणीव महाराजांना आणि त्यांच्या सौंगड्यांना होती.
पाहा. या साऱ्या उद्योगात उपभोगाला , उनाड चैनबाजीला , आळसाला अन् आरामाला कुठे जागा सापडते का ? नाही , नाही , नाही. जीणशीर्ण अवस्थेतून स्वतंत्र होणाऱ्या राष्ट्राने या चंगळबाजीच्या वासालाही उभे राहू नये. पहिल्या दोन पिढ्यांनी करायचे ते राष्ट्र उभारणीसाठी कष्ट , कष्ट आणि कष्टच. त्याची गोड फळे खायची ती पुढच्या पिढ्यांनी. आपण फक्त करायची साधना आणि आराधना. आपण जगले पाहिजे व्रतस्थ वारकऱ्यासारखे.
हे सारे शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनात अखंड दिसून येते. म्हणूनच त्याही वेळचे लोक म्हणत की , हे राज्य म्हणजे देवताभूमी , हे राज्य श्रीच्या वरदेचे आहे. हे राज्य व्हावे हे श्रीचे मनात फार आहे. मराठीयांचे गोमटे करावे यासाठी अवघा डाव मांडिला.
हे सारं स्वराज्यावर औरंगजेबाच्या वतीने चालू न येणाऱ्या राजपुतांना , बुंदल्यांना , जाटांना आणि शाही छावणीत इमानेइतबारे चाकरी करणाऱ्या पंडितांना कधी दिसलेच नाही का ? दिसले असेल , पण उमजले नाही. कारण देश आणि समाज यांच्याशी काहीतरी आपल्याला करावयास हवे ही भावनाच शून्यात होती. खाना पिना , मजा करना या पलिकडे त्यांना जीवनच नव्हते.
जसवंतसिंगने सिंहगडला वेढा घातल्याला पाऊण वर्ष होऊन गेले होते. परिणाम शून्यच. अखेर एके दिवशी जसवंतसिंहाने गडावर सुलतान ढवा केला. म्हणजे काय ? म्हणजे एकवटून गडावर हल्ला चढविला. पण तो हल्ला गडावरच्या मराठ्यांनी पार चुरगाळून काढला. हल्ला वाया गेला. पण मराठ्यांनीही एके दिवशी (२८ मे १६६४ ) गडावरून बाहेर पडून पायथ्याशी असलेल्या जसवंतसिंहाच्या छावणीवर भयंकर हल्ला चढविला. त्यांनी मोगलांना झोडपून काढले. खुद्द जसवंतसिंहालाही जखमा झाल्या. जसवंतसिंह आणि भावसिंह अवघ्या मोगल फौजेनिशी पुण्याकडे धूम पळाले. पूर्ण पराभव. हे दोन सिंह जिवंत सुटले हीच कमाई.
म्हणजे थोडक्यात हिशोब असा की शाहिस्तेखानच्या या टोलेजंग मोहिमेत मोगलांची कमाई काय ? तर फक्त चाकणचा छोटासा किल्ला.
खरोखर हा सारा इतिहास चित्रपटाच्या (डॉक्युमेंटरीज) माध्यमातून तुम्हा उमलत्या तरुणांपुढे मांडला पाहिजे.
- बाबासाहेब पुरंदरे

शुक्रवार, १९ डिसेंबर, २००८

शिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते

जीवनात संकटे कोणावर येत नाहीत ? सुख-दु:खाच्या धाग्यांनी प्रत्येकाचे जीवन विणलेलेच असते। प्रखर तेजस्वी सूर्यालाही ग्रहणकाळ अटळ असतो। आता स्वराज्यावरही एक महाप्रचंड आक्रमण येऊ घातले होते. दिल्लीत औरंगजेब अशा मोठ्या मोहिमेची योजना करीत होता. ही त्याची स्वराज्यावरील मोहिम जणू निर्णायक ठरणार आहे , असा प्रचंड आखाडा तो मांडीत होता. खरोखरच हे लहानसं हिंदवी स्वराज्य या मोगली मोहिमेत टिकणार की संपणार असाच जबडा औरंगजेबाने उघडला होता. प्रचंड सैन्य , तोफखाना , हत्ती , युद्धसाहित्य , खजाना दक्षिणेवर जणू फुटलेल्या प्रचंड धरणासारखा लोटावयाचा हा आराखडा होता. म्हणजे त्याच चुका पुन्हा एकदा औरंगजेब करीत नव्हता का ? तळहाताएवढ्या शिवस्वराज्याचा आणि मूठभर शिवसैन्याचा समूळ नाश करण्याकरीता हे अफाट बळ महाराष्ट्रावर पाठविले की , आपले काम चोख होणार. आपण फक्त वाट पाहायची , मोगली झेंडा शिवाजीच्या राजगडावर फडकल्याच्या बातमीची आणि तो शिवाजी मारला गेल्याची किंवा कैद केल्याची. आपण अलमगीर आहोत. सीवा एक भुरटा दंगेखोर आहे. असेच मूल्यमापन प्रारंभापासून (ते स्वत:च्या अंतापर्यंत) औरंगजेब करीत होता. बळाने बुद्धिचा पराभव करता येतो अशी त्याची कल्पना होती. इथेच तो चुकत होता. अन् आजही अनेकजण अशाच चुका करतात. हिटलरने चचिर्लच्या बाबतीत आणि अमेरिकने व्हिएतनामच्या बाबतीत अशीच चूक केली. परिणाम जगाला दिसून आला. औरंगजेब हीच चूक आत्ता ( इ. १६६५ ) नव्याने करीत होता. प्रचंड युद्धसाहित्य आणि सेना असूनही शाहिस्तेखानचा पराभव का झाला याचा त्याने थोडासुद्धा विचार केलेला दिसत नाही. शिवाजीमहाराजांचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती योगेश्वर श्रीकृष्णाच्या ( कागदावर न रेखलेल्या पण कृतीत आणलेल्या) चक्रव्यूहाइतकी अभेद्य आणि आत्मविश्वासू होती. या शिवनीतीचा आणि शिवकार्याचा पराभव करण्याची ताकद कोणत्याही शत्रूकडे नव्हती. तिचा पराभवच करावयाचा असेल तर त्यांचेच लेक करू शकतील. अन् त्यांच्याच लोकांनी या शिवनीतीचा आणि शिवस्वराज्यकार्याचा घात केलेला पुढे आपल्याला दिसून येत नाही का ?
आज इतिहासात उभा दिसतो आहे तो असाच औरंगजेब। शिवाजीराजा न समजलेला महान शत्रू.
पुन्हा एकदा प्रचंड सैन्य दक्षिणेवर निघाले। औरंगजेबाने एक गोष्ट मात्र मोलाची केली. त्याने विवेकी , अनुभवी आणि बुद्धिमान असा सेनापती नेमला. त्याचे नाव मिर्झाराजा जयसिंग. हा एकमेव सेनापती असा आहे की ज्याने शिवाजी महाराजांच्या युद्धपद्धतीचा शिवअनुयायांचा आणि शिवमुलुखाचा बराच विचार केलेला आहे. पण त्यातही औरंगजेबाने आपल्या संशयी स्वभावाप्रमाणे दिलेरखान पठाण या जबरदस्त सरदारास जवळजवळ बरोबरीचे अधिकार देऊन मिर्झाराजांबरोबर पाठविले. दिलेरखान हा जबर योद्धा आहे. पण त्याला डोके कमी आहे. ते पुढे दिसून येईलच. औरंगजेबाने शिवाजीराजांविरुद्ध मिर्झाराजा आणि दिलेर यांना पाठविले. म्हणजेच तीन पायांची शर्यत खेळायला एकमेकांचे एकेक पाय एकत्र बांधून धावायला पाठविले.
स्वराज्यावरील हाच तो ग्रहणकाळ. हे ग्रहण क्षणिक की खग्रास हे काळ ठरविणार होता. नव्हे , स्वराज्यच ते ठरविणार होते. म्हणजेच स्वराज्यातील जनता आणि रणांगणावरचे मराठी सैनिक. नक्की आकडे माहित नाहीत. पण सुमारे दीड ते पावणेदोन लाख फौज या मोगली मोहिमेत आहे. इतर मोहिमांपेक्षा या मोहिमेत एकच गोष्ट (प्रकर्षाने) दिसून येते की , मिर्झा आणि दिलेर यांच्याबरोबर जनानखान नाही. मिर्झाराजे आणि दिलेर इ. १६६४ , ऑक्टोबर २९ नंतर मोहिमशीर झाले.
विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की , या प्रचंड आक्रमणाच्या वार्ता महाराजांना समजत होत्या. त्यांना पुरेपूर कल्पना होती. ते सावध होते. याच काळात त्यांनी एक साधे गणित मांडलेले दिसते की , ही मोगली लाट (इ. १६६४ ) च्या दिवाळीच्या दिवसांत दिल्लीहून निघतेय. ती आपल्या सरहद्दीवर येऊन पोहोचायला , म्हणजेच पुण्यावर पोहोचायला अजून पाच महिने लागणार आहेत , हे निश्चित. तेवढ्या वेळेत इतर काही कामे उरकता येतील. म्हणून महाराजांनी कर्नाटक सागरी किनाऱ्यावरील कारवार , मर्जा , अंकोळा , भटकळ , सदाशिवगड आणि बसनूर इत्यादी महत्त्वाची आदिलशाही ठाणी गिळून टाकण्याची योजना केली. आपल्या उत्तर आणि पूर्व स्वराज्यसरहद्दीची चिंता त्यांना नव्हतीच. पुरंदर , लोहगड , माहुलीगड , कसाराघाट इत्यादी ठाणी सुसज्जच होती. कोकणी सौंगड्यांच्या पूर्ण भरवशावर ते कोकणात निर्धास्त होते. महाराजांनी याचवेळी येत असलेल्या सूर्यग्रहणाचे दिवशी एक दानसोहळा करावयाचे योजिले. दि. ६ जाने. १६६५ , पौष वद्य आमावस्या या दिवशी सूर्यग्रहण होते. महाबळेश्वर येथे त्यांनी आपल्या आईची म्हणजेच जिजाऊसाहेबांची सोन्याने तुळा केली. हे सर्व धन दानधर्मात खर्च करावयाचे असते. ते केले. महाराज दि. ८ फेब्रुवारीस मालवणांस आले. पूर्वयोजनेने आरमार बंदरात सिद्ध होते. महाराज गलबतावर चढले. कारवारवरील ही त्यांची मोहिम आरमारातून होणार होती. त्यांच्या आयुष्यातील ही एकमेव आरमारी स्वारी. महाराज कारवारवर निघाले. मिर्झा राजा बुऱ्हाणपुरावरून औरंगाबादकडे सरकत होता. महाराजांनी सूर्यग्रहणाचेवेळी स्नाने , दाने , पूजाअर्चा केल्या होत्या. मिर्झाराजेही व्रतवैकल्ये करीत स्वराज्यावर येत होते. बगलामुखी कालरात्री या भवानीदेवीची त्यांनी होमहवनपूर्वक आराधना केली. पुढे शिवशंकराची कोटीलिंगार्चने अंत:करणपूर्वक केली. औरंगजेबाला यश मिळावे आणि शिवाजीराजाचा पूर्ण विनाश व्हावा ही मिर्झाराजांची श्रीचरणी प्रार्थना होती. एकाचे मन असे , दुसऱ्याचे मन तसे. तिसरे मन औरंगजेबाचे. त्याला शिवाजीराजेही नको होते अन् मिर्झाराजेही नको होते. या तीन मनांचा आम्ही कधीही अन् आजही अभ्यास केला नाही अन् करीतही नाही.
- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत

कुडाळची मोहिम फत्ते करून महाराज ससैन्य मालवणास आले. हा सागरी किनारा. मालवणातून महाराजांचे लक्ष समुदावर फिरत होते. ते बेट त्यांना समोरच दिसत होते. बेटाचे नाव कुरटे बेट. महाराजांनी आपल्या कोकणी शिलेदारांसह हे बेट , होडीतून जाऊन पाहिले. त्यांना फार आवडले. ते म्हणाले , ' इथं सागरी किल्ला बांधावा '.
खरं म्हणजे सुरतेहून आणलेली संपत्ती सागरी सरहद्द बळकट करण्यासाठी महाराज कुठेतरी पण योजनापूर्वक खर्च करण्याचा विचार करीत होतेचे। या कुरटे बेटावर जर पाणकोट बांधला तर दक्षिणेकडील गोवेकर फिरंग्यांच्या आणि इतर शत्रूंच्या तोंडावर आपलाही एक जबरदस्त जंजिरा उभा राहील हा विचार त्यामागे होता आणि महाराजांनी तो बोलूनही दाखवला , ' येथे जलदुर्ग बांधावा ऐसा मानस आहे ' यानिमित्ताने यावेळी एक चित्तरकथाच घडली. या नव्या पाणकिल्ल्याचे भूमीपूजन करावे , त्याकरिता आधी सुमुहूर्त पाहावा अन् लगेच संकल्प सोडून मग कामास सुरुवात करावी असा विचार त्यांचे मनी आला. त्यांनी बरोबरच्या कारभाऱ्यांस पूर्वतयारीची आज्ञा दिली. महाराजांचे बरोबर त्यांचे राज गुरुजी होतेच. अडचण काहीच नव्हती. पण महाराज म्हणाले , ' येथे आपले गुरुजी नकोत ' मग ? जे मालवणातील स्थानिक धामिर्क कायेर् करणारे नेहमीचे गुरुजी असतील त्यांनाच बोलवावे. कारभाऱ्यांना कदाचित यावेळी संभ्रमही पडला असेल. आपले गुरुजी आहेत ना ? मग स्थानिक कशांस ?
पण यातच या राजाचे मन व्यक्त होणार होते. स्थानिक माणसांकडून अशी कायेर् करवून घेतली की , स्थानिक माणसांची मने स्वराज्याच्या कामात अधिकच रुजतात , एकरुप होतात. त्यांची नाती अतूट होतात. मालवणातील स्थानिक गुरुजी होते , कोणी एक जानभट अभ्यंकर वयोवृद्ध स्वभावाने खास मालवणी. जरा तिखट.
महाराजांनी जानभटांस आणावयास कारकुनांबरोबर पालखी पाठवली. भटजी घरीच होते. पालखी आली. कारकून म्हणाले , ' कुरट्या बेटावर महाराज राजश्री जलदुर्ग बांधीताती , तरी प्रथम पूजनांस मुहूर्त पाहणे आहे. संकल्प सोडणे आहे. म्हणून राजेश्री आपणास बोलविताती. पालखी आणली आहे. चलावे. '
पण भटजी साफ नकार देऊन म्हणाले , ' आमचे येणे होत नाही '
नवलच. एवढा शिवाजीराजा राजकाजासाठी बोलावतोय , पालखी पाठवतोय अन् हे भटजी येत नाहीत. काय कारण ? जानभट कारणही सांगेनात. पालखी परत गेली. महाराजांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी पालखीसह पुन्हा कारकुनांना जानभटजींकडे निमंत्रण पाठविले. पुन्हा तेच. गुरुजींनी नकार दिला. पालखी परतली. महाराजांनी कारकुनांना पुन्हा पाठविलं अन् म्हटलं की , ' भटजींस घेऊन येणे. न आलियास उचलून घेऊन येणे. '
अन् तसंच करावं लागलं। कारकुनांनी नम्र जबरदस्ती करून गुरुजींना पालखीतून महाराजांकडे आणलं. महाराजांनी त्यांचे न येण्याचे कारण पुसलं , तेव्हा तो गरीब ब्राह्माण म्हणाला , ' महाराज , येथे धर्मराज्य आले. आनंदच आहे. पण येथे तुम्ही जलदुर्ग बांधू पाहता. आम्हांस संकल्प मुहूर्त सांगावयास बोलविता. पण आम्हांस भय वाटते. कारण की , पलिकडे (वेंगुर्ला भागात) आदिलशाही ठाणी अजून आहेत. ( त्यापलिकडे गोवेकर फिरंगी आहेत.) ते उद्या येथे चालून आल्यास प्रथम आम्हांसच धरतील म्हणून भय वाटते. ' महाराजांच्या अगदी मनांतले विचार समिंदरातल्या देवमाशासारखे उसळून आले. स्थानिक सरहद्दीवरील अवघ्या प्रजेस असा पूर्ण विश्वास वाटला पाहिजे की , आमच्या राज्याची ही सरहद्द आमच्या राजाने अगदी पक्की बंदोबस्तात जागती ठेविली आहे. तो आपली पुरेपूर खबरदारी घेणारच आहे , हा विश्वास अवघ्यांच्या मनांत ठाम होणे गरजेचे आहे.
म्हणूनच तर महाराजांनी या धामिर्क कार्यासाठी स्थानिक वेदमूतीर्ंना बोलविले। महाराजांनी आपला विचारही बोलून दाखविला की , ' चिंता करू नका. येथे असे समर्थ लष्करी ठाणे घालतो की , आमचे सार्मथ्य पाहून सरहद्दी पलिकडचे जे शत्रू असतील , ते दहशत खाऊन उठोन निघूनच जातील. '
सरहद्दीच्या रक्षणाबद्दलचा महाराजांचा हा विचार किती मोलाचा होता! आमच्याच देशात आमचेच नागरिक निर्वासित व्हावेत हे बरे नव्हे. आमच्या सरहद्दी चिरेबंदीच असल्या पाहिजेत. आमच्या सरहद्दीवरची बायकामाणसेच काय , पोरेबाळेच काय पण गाईवासरेही निर्धास्त असली पाहिजेत. आमचे राज्यकतेर् आमच्या पाठिशी अहोरात्र जागे उभे आहेत हा विश्वास ठामपणे सर्वांच्या मनांत असला पाहिजे , हा विचार केवढा मोलाचा आहे. महाराजांच्या मनांत तोच होता.
मग श्रीगणेश पूजन झाले. मुहूर्त ठरला. चिरा बसला. बेटावर बांधकामास सुरुवात झाली. सुरतेतील खंडणी स्वराज्याच्या नव्या आरमारी तळासाठी खचीर् पडू लागली.
शाही फौजेचा पूर्ण पराभव झाला होता , तरीही विजापूरच्या आदिलशाहाने व्यंकोजीराजे भोसले यांना दोन गावे इनाम दिली , स्वराज्याविरुद्ध अन् भावाविरुद्ध इमानदारीने लढल्याबद्दलचे हे इनाम.
-बाबासाहेब पुरंदरे

बुधवार, २६ नोव्हेंबर, २००८

शिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.

शहाजीराजे भोसले हे २ 3 जानेवारी १६६४ रोजी कर्नाटकात होदिगेरी या ठिकाणी घोड्यावरून पडून मृत्यू पावले। राजगडावर मातु:श्री जिजाबाईसाहेब सती जाण्यास सिद्ध झाल्या. पण मोठ्या मुश्कीलीने शिवाजीराजांनी आपल्या आईस सती जाण्यापासून माघारा फिरविले. या दिवसापासून शिवाजीमहाराज आठ महिने सतत आईच्या सहवासात राहिले. स्वत:चे आणि आईचेही दु:ख निवविण्याचा हा महाराजांचा प्रयत्न होता. ते आईला कुलदेवतेच्याच ठिकाणी मानीत असत.
शहाजीराजांची समाधी शिमोग्याजवळ होदिगेरी येथे त्याचवेळी व्यंकोजीराजांनी बांधली. हे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ. त्यांनीच राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली. शहाजीराजांच्या समाधीवर ' श्री शाजीराजन समाधि ' असा लेख कोरलेला आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर महाराजांनीही राजगडावर विपुल दानधर्म केला। आईवडिलांच्या बाबतीत महाराजांचं मन अतिशय नम्र होतं. नितांत श्रद्धावंत होतं. पूवीर् एकदा (इ. १६४९ मे-जून) शहाजीराजांच्याच पत्रामुळे कोंढाणा उर्फ सिंहगड हा मोलाचा किल्ला आदिलशाहस देऊन टाकण्याची वेळ महाराजांवर आली. स्वराज्यातला तळहाताएवढाही प्रदेश शत्रूच्या ताब्यात जाण्याची वा देण्याची वेळ आली तर महाराजांना अतोनात वेदना होत असत. इथं तर सिंहगडसारखा किल्ला वडिलांच्या चुकीमुळे , बेसावधपणामुळे बादशाहला द्यावा लागतोय याच्या वेदना आणि तेवढाच वडिलांच्यावरती राग महाराजांच्या मनात उफाळून आला. आणि ते शहाजीराजांच्याबद्दल रागावून कडू बोलले. पण क्षणातच त्यांनी स्वत:ला सावरलं आणि जरी वडील चुकले असले , तरी वडिलांच्याबद्दल असे कडू बोलणे योग्य नाही याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी सोनो विश्वनाथ डबीर यांच्यापाशी आपले व्याकूळ दु:ख आणि पश्चाताप व्यक्तही केला. यावरून आणि इतरही काही चारित्र्याची जडणघडण कशी झाली याची आपल्याला कल्पना येते.
इथं आणखीन एक गोष्ट लक्षात येते , ती जिजाबाई आऊसाहेबांच्या बद्दलची। या आईने आपल्या शिवबांवर अगदी सहजपणे दोन संस्कार केलेले दिसून येतात. त्यातला पहिला संस्कार शहाजीराजांच्या बाबतीतला. तिने आपल्या मुलापाशी शहाजीराजांच्या हातून घडलेल्या राजकीय चुकांबद्दल कधीही टीका आणि कठोर दोषारोप केलेले आढळून येत नाहीत. अन् दुसरी गोष्ट म्हणजे शत्रूपक्षातीलही कोणत्याही धर्माच्या वा जातीच्याबाबत कडवट द्वेषभावना निर्माण होऊ दिली नाही. तशी एकही नोंद उपलब्ध नाही. ती महाराजांना , ' या अफझलखानाला ठार मार ' असं म्हणते पण तो मुसलमान आहे म्हणून त्याला ठार मार असा भाव त्यात अजिबात दिसत नाही. जातीधर्मद्वेषाच्या पार पलिकडे गेले ही मायलेकरे आमच्या इतिहासात दिसून येतात. जिजाऊसाहेबांची ही शिकवण म्हणजे मराठी इतिहासातील एक पवित्र अध्याय आहे. त्यावर अशा चार ओळी लिहून भागणार नाही. विस्मृत प्रबंधच लिहावयास हवा.
या वषीर्चा ( इ। १६६४ ) पावसाळा संपत आला आणि ऑक्टोबरच्या प्रारंभीच्या महाराजांना विजापुरकडची खबर मिळाली की , खवासखान या सरदारास बेळगांवमागेर् कोकणात कुडाळ भाग शिवाजीराजांकडून जिंकून शाही अमलाखाली आणण्याकरिता मोठ्या सैन्यानिशी कूच करण्याचा हुकुम झाला आहे. खानाबरोबर मुधोळहून बाजी घोरपडे यांनाही जाण्याचा हुकुम सुटला आहे.
हे बाजी घोरपडे बादशाहचे निष्ठावंत सेवक। आणि म्हणूनच स्वराज्याचे शत्रू बनले होते. त्यांनीच पूवीर् शहाजीराजांना बेड्या घालून कैद केले होते. या सर्व गोष्टींचा राग जिजाऊसाहेबांच्या आणि महाराजांच्या मनात सतत धुमसत होता. वडिलांचे चिरंजिवांस तर सांगणे होते की , ' बाजी घोरपडे यांचे वेढे घ्यावेत ' वेढे म्हणजे सूड.
आईवडिलांची ही इच्छा आणि स्वराज्यातीलच एक कठोर कर्तव्य म्हणून महाराजांनी याचवेळी (ऑक्टोबर १६६४ ) राजगडावरून तडफेने कूच केले। बाजी मुधोळहून खवासखानास सामील होण्याच्या आतच त्यांनी मुधोळवरच धडक मारली. या अचानक छाप्यात बाजी घोरपडे महाराजांचे हातून ठार झाले. वर्षाच्या आतच महाराजांनी वडिलांची इच्छा पूर्ण केली. हा मुधोळवरील महाराजांचा छापा लष्करी दृष्टीनेही अतिशय अभ्यास करण्यासारखा आहे. हाही एक प्रबंधाचा विषय आहे. या छाप्याने विजापूर हादरले. कारण मुधोळ ते विजापूर हे अंतर फार कमी आहे. याचा दुसरा अर्थ असा होता की , शहाजीराजांच्या मृत्यूनंतर महाराजांनी थेट विजापुरच्या वेशीपर्यंत धडक मारली होती. महाराजांच्या या सगळ्या लष्करी वेगांचा अभ्यास केला , तर असा गतीमान सेनापती भारतात तर सापडत नाहीच , पण युरोपिय इतिहासातही कोणी दिसत नाही. थोडा फार नेपोलियनच महाराजांच्या जवळपास येऊ शकतो.
मुधोळवरच्या छाप्यानंतर महाराजांनी थेट कुडाळ-सावंतवाडीवर दौड घेतली आणि तेथे येऊन बसलेल्या खवासखानावर त्यांनी हल्ला चढविला. खानाचा पूर्ण पराभव झाला. राजगड ते विजापूर ते मुधोळ ते कुडाळ ही अंतरे नकाशात पाहिली की आणि कमीतकमी वेळात महाराजांनी मारलेली यशस्वी दौड पाहिली की माझे वरील विधान वाचकांच्या लक्षात येईल.
या कुडाळ स्वारीत एकच गोष्ट महाराजांना जाणवली असेल की , खवासखानाच्या फौजेत व्यंकोजीराजे भोसले हे आपले भाऊ आपल्याविरुद्ध लढावयास उभे आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर दोन भाऊ एकमेकांच्या विरुद्ध शत्रू म्हणून उभे राहावेत हे आमच्या वाट्याला वाढून ठेवलेले कायमचेच दुदैर्व आहे. खवासखान आणि व्यंकोजीराजे पराभूत झाले ; अन् सुखरूप विजापुरास सुखरूप पोहोचले.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी! झेड सिक्युरिटी!

सुरतेच्या मोहिमेत ८ जाने. १६६४ रोजी इनायतखानाने महाराजांकडे वकील म्हणून एक मारेकरीच पाठविला , हे आपण पाहिले। महाराजांच्याकरिता मावळ्यांनी जी सुरक्षा ठेवली होती ती लक्षात घेण्यासारखी आहे. अशी व्यवस्था महाराजांच्याभोवती ठेवणं हा त्यांच्या सौंगड्यांचा अंगीभूत सहज स्वभावच बनला होता. दगा करणं हा शत्रूचा स्वभावच असतो. शत्रू फक्त संधी साधत असतो. महाराजांचं संरक्षण करणं हा मावळी डोळ्यांचा आणि हातांचा अगदी घारींसारखा स्वभावधर्मच झालेला दिसून येतो. अफझलखानाच्या भेटीच्या वेळी शामियान्यात जिवा महाला सकपाळ हा जर सावध राहिला नसता तर ? घातच. सुरतेच्या मारेकऱ्यानेही वकीलीचे नाटक करीत करीत महाराजांवर एकदम अचानक झडप घातली. जर जवळचे मावळे सावध नसते तर ? घातच. पुढे आग्ऱ्याच्या कैदेतही याच मावळ्यांचा अबोल पहारा महाराजांभोवती होता. पुढे जालन्याच्या स्वारीतच (इ. १६७९ ) महाराजांच्या अंगात फणफणून ज्वर चढला. त्यावेळी केसरीसिंह आणि मोहकमसिंह हे अचानक मराठ्यांवर हल्ला करावयास आले. अशा आजारपणात महाराजांचं रक्षण करणं , त्यांना सुरक्षित ठिकाणी नेणं अवघड होतं. बहिजीर् नाईकाने महाराजांना आपल्या पाठीवर घेऊन पट्टा नावाच्या किल्ल्यावर सुखरूप पोहोचवलं. महाराजांची ही सिक्युरिटी भोवतीच्या सौंगड्यांनी उत्कृष्ट सांभाळली. त्यात उत्तम नोकरी करणे या गोष्टीपेक्षा कडव्या निष्ठेने राजा राखणे हाच भाग जास्त दिसून येतो. वास्तविक ' महाराजांचा दरबार तो सर्वांस सहज ' असा लौकीक होता. म्हणजे महाराजांना कोणीही भेटू शकत असे. पण याचा अर्थ भोंगळ बेसावधपणा असा नव्हता.
आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किती तरी थोर व्यक्ती घातपाताने मारल्या गेल्या। कोणाकोणाचा मृत्यू संशयास्पद घडला. उदाहरणार्थ डॉ. श्यामाप्रसाद मुखजीर् , लाल बहादूर शास्त्री , महात्मा गांधी , इंदिराजी , राजीव गांधी , जनरल अरुणकुमार वैद्य , पं. दिनदयाळजी या थोरांच्या मृत्युचे दु:ख आपणास आहे. जगाच्या पाठीवर असे प्रकार घडतच आले आहेत. त्याबाबतीत जास्तीतजास्त दक्षता घेऊन सुरक्षाव्यवस्था ठेवणे एवढेच आवश्यक आहे , असे म्हणता येते.
पण शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जी सिक्युरिटी त्यांच्या खाश्या मित्रांनी ठेवली ती निश्चितच उद्बोधक आहे. महाराज अंगात वेळप्रसंगी चिलखत घालीत असत. कधी पोलादी चिलखत , कधी कापडी चिलखत. त्याला बख्तर असा शब्द आहे. पण त्यांचं सर्वात मोठं चिलखत आणि अभेद्य शिरस्त्राण म्हणजे त्यांचे निधड्या छातीचे मावळे. या मावळ्यांनीच ही हृदयातील ठेव प्राणापलिकडे जपली.
मराठ्यांच्या पुढील इतिहासात घातपाताचे प्रसंग अनेक आहेत। सेनापती संताजी घोरपडे , सेनाधुरंधर संताजी भोसले अमरावतीकर , नारायणराव पेशवे , जयाप्पा शिंदे , वकील महादेव भट हिंगणे , वकील धर्मराव तमाजी गलगलीकर इत्यादी राजकारणी व्यक्तींचे खून पडले. त्यामुळे राजकीय उलथापालथीही झाल्या. त्याचा अभ्यास केला तर या सिक्युरिटीचे महत्त्व लक्षात येते. सिक्युरिटी हा थट्टेचा , विनोदाचा विषय नाही. ती अत्यंत गरजेची गोष्ट आहे. समर्थांनी तर असे म्हटले आहे की , महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनी आपला जीव धोक्यात घालणे हे योग्य नाही. ' धुरेने युद्धासी जाणे , ही तो नव्हे राजकारणे. ' स्वत:ची अतिशय दक्षता घेणे म्हणजे भेकडपणा असा अर्थ कुणी लावू नये.
पेशवाईत गारद्यांनी नारायणरावष्श्ा पेशव्यांवर खुनी हल्ला केला। ऐन शनिवारवाड्यातच पेशवा मारला गेला. पण त्यांच्याआधी सदाशिवराव भाऊ पेशवा , नानासाहेब पेशवा , माधवराव पेशवा यांच्यावरही मारेकऱ्यांनी अचानक खुनी हल्ले केले होते हे सरदारांना माहित नव्हते का ? राजघराण्यांना तर ही भीती नेहमीच असते. शनिवारवाड्यात एका पेशव्याचाच खून झाला , तसाच कोल्हापुरात राजवाड्यात प्रत्यक्ष एका छत्रपती महाराजांचाच खून झाला. हे ऐतिहासिक सत्य आहे. यातून योग्य तो बोध घेणं आवश्यक आहे. राजकीय खून केवळ हत्यारांनेच केले गेले असे नाही , तर खाण्यापिण्याच्या पदार्थातूनही केले गेले आहेत.
चाणक्याच्या काळात खून करण्याचा एक विलक्षणच प्रकार ' मुदाराक्षस ' या नाटकांत , विशाखदत्त या नाटककाराने नमूद केला आहे. तो प्रकार म्हणजे ' विषकन्या '.
आजच्या काळातील एड्सपेक्षाही या विषकन्येचा प्रयोग भयंकर आहे. अशा विषकन्येशी शारीरिक संबंध ज्याचा येईल , तो मरणारच. म्हणूनच त्या स्त्रीला विषकन्या म्हणत.
एकूण खून पाडण्यातही खूप व्हरायटी आहे. ती भयंकर असली तरी मनोरंजक आहे. पण राजकीय आणि सामाजिक जबाबदारी ज्यांच्या शिरावर आली आहे , त्यांनी राष्ट्राच्या आणि समाजाच्या हिताकरीता स्वत:ची सुरक्षितता ठेवणं हे अत्यंत मोलाचे काम आहे. टॉप सिक्युरिटी , झेड सिक्युरिटी , स्वयंसिक्युरिटी.
कोल्हापूरच्या चौथ्या शिवाजी महाराज छत्रपतींना इंग्रजांनी वेडे ठरवून अहमदनगरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले. त्या कैदेत छत्रपती महाराजांना इंग्रज अधिकाऱ्याने अतिशय वाईट रितीने ठार मारले. इथे महाराज अगतिकच होते. पण स्वामी श्रद्धानंदासारख्या संन्याशाचा खून झाला , तो संरक्षक दक्षता न घेतल्यामुळे. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजे भोसले घराण्यांत अनेक घातपाती प्रकार झाले , तो सिक्युरिटी न ठेवल्यामुळेच शत्रूंनी डाव साधले. शिवछत्रपती हे एकच असे नेते होते की , ते शत्रूच्या झडपेत कधीच सापडले नाहीत.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.

शाहिस्तेखानवरच्या छाप्याच्या बातम्या औरंगजेबास तपशीलवार समजल्या। त्याचा संताप वाढतही राहिला। आता या सीवाच्याविरुद्ध नेमके कोणते पाऊल टाकावे याचा विचार तो करीत होता , तेवढ्यात सुरतेवरती महाराजांचा छापा आणि सुरतेची बदसुरत कशी झाली आहे याचाही तपशील त्याला दिल्लीत समजला. त्याच्या संतापात भर पडली. पण अभ्यासात भर पडलेली दिसत नाही. या सगळ्याच मोगलांचा अभ्यास अगदी शून्य वाटतो. खूप मोठं सैन्य , तोफखाना , खजाना , हत्ती आणि अफाट युद्धसाहित्य याच गोष्टींवर या दिल्ली दरबारचा प्रचंड विश्वास होता. मराठ्यांवर नवी मोहिम काढायची म्हणजे या सर्व सार्मथ्यात आणखी वाढ करायची हाच यांचा अभ्यास आणि निर्णय. ' शिवाजी ' हे प्रकरण औरंगजेबास कधीच समजले नाही.
खरोखर ' शिवाजी ' हे प्रकरण आजही २१ व्या शतकात जर खरंच समजले , तर काय होईल ? पं। जवाहरलाल नेहरू म्हणाले , ' जगाच्या पाठीवर जर कोणाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल आणि ते बळकट अन् समृद्ध करायचे असेल तर (त्या राष्ट्राने वा समाजाने) छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास (अन् अनुकरणही) करावयास हवे. '
प. नेहरू यांनी या पूर्ण आशयाचे उद्गार नागपूर येथे धनवटे बिल्डींगवर शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले , त्या प्रसंगी काढले.
महाराज सुरतेहून निघाले. सह्यादीचा घाट चढून ते नासिक जिल्ह्यात पोहोचले. तेथून घाटमाथ्याने राजगडकडे निघाले.
याच काळात म्हणजे दि. २ 3 जाने. १६६४ रोजी महाराजांचे तीर्थरूप शहाजीराजे हे कर्नाटकात शिमोग्याजवळ होदीगेरी या ठिकाणी घोड्यावरून दौडत असता अपघात होऊन पडले. मृत्यू पावले. ही दु:खद खबर दि. ५ फेब्रु. १६६४ यादिवशी राजगडावर पोहोचली.
थोडासा तपशील असा महाराज सुरतेच्या लुटीसह फेब्रुवारी प्रारंभी लोणावळ्याच्या पुढे पोहोचले। तेवढ्यात (बहुदा 3 फेब्रुवारीस) महाराजांना छबिन्याच्या हशमांनी पुण्याकडची खबर कळविली असावी की , मोगलांची फौज पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने येत आहे. महाराजांनी ताबडतोब सर्व लूट नेताजी पालकरांबरोबर शेजारच्याच लोहगडावर सुरक्षिततेकरिता पाठविली. मोगल अंगावर येत आहेत हे पाहून महाराजांनी वडगावजवळ मोगलांची वाट अडविण्याकरिता नारो बापूजी देशपांडे नऱ्हेकर या आपल्या सरदारांस सांगाती सैन्य देऊन पाठविले. महाराज उरवडे , घोटवडे , तव , मुठाखिंड , मोसे , पानशेत , खामगांव खिंड या राजगडमार्गाने पुढे गेले. वडगांवपाशी नारो बापूजी देशपांडे याच्या सेनेची मोगलांशी गाठ पडली. या लढाईत नारो बापूजी ठार झाला. पण मोगलांना काहीच साध्य झाले नाही. शिवाजीराजे राजगडकडे गेले , लूट लोहगडावर बंदोबस्तात पोहोचली.
महाराज खामगावाजवळ पोहोचले. तेथून दक्षिणेस राजगड सुमारे २० किलोमीटरवर आहे. राजांना शहाजीमहाराजांच्या अपघाती मृत्यूची बातमी येथेच समजली. सुरतेची स्वारी , यशस्वी झाली , नियतीने मात्र वडिलांच्या प्राणावर आघात करून त्यांना दु:खात लोटले.
अत्यंत तातडीने महाराज राजगडावर पोहोचले। तेथे आणखी एक भयंकर दु:खाने भरलेले ताट नियतीने वाढून ठेवलेले होते. मातु:श्री जिजाबाईसाहेब या सती जाण्याच्या तयारीत होत्या. वडील गेले , आता आईपण निघाली. प्रयत्नांची शिकस्त करून महाराजांनी शथीर्ने आऊसाहेबांना सती जाण्यापासून परावृत्त करण्यात अखेर यश मिळविले. आऊसाहेब थांबल्या.
हा सारा प्रचंड कल्लोळ आयुष्यभर महाराजांच्या भोवती चितेसारखाच ज्वाला नाचवीत होता. प्रत्येक प्रसंगाला ते तोंड देत होते.
महाराजांना कोणाची मदत होती ? कोणाचीही नव्हती. तापी-नर्मदेच्या उत्तरेला अवघा हिंदुस्थान मोगलांची सेवा करीत होता. राजपुतांच्याकडे मदतीच्या अपक्षेने पाहण्याची सोयच नव्हती. याच राजपुतांच्या जीवावर औरंगजेबाचे राज्य सुरक्षित होते.
पण इथेच शिवाजीमहाराजांच्या स्वराज्याच्या तत्त्वज्ञानातील एक महान तत्त्व सतत टवटवीतपणे बहरत होते. स्वावलंबन. कोणावरही अवलंबून न राहता स्वराज्याच्याच बळावर स्वराज्याचाच विचार विस्तार आणि समृद्धी करायची हे महराजांचे महान तत्त्व होते.
अजूनही पुण्यात मोगल छावणी होतीच. शाहिस्तेखान आसाम-बंगालच्या सुभेदारीवर ढाक्याकडे निघून गेला होता. पण पुण्यात छावणी कायम होती. सिंहगडाला जसवंतसिंह याने घातलेला वेढा अजून चालूच होता. महाराज मोगलांच्या पोटात सुरतेपर्यंत गेले आणि लूट घेऊन परत आलेसुद्धा , याचा या जसवंतसिंहाला पत्ताच नव्हता. अगदी उघड आहे. तसा पत्ता त्याला असता , तर त्याने महाराजांना सिंहगडाच्या पश्चिमेलाच अडवले असते. जाऊच दिले नसते. निदान परतीच्या वाटेवर महाराजांना त्याने राजगडाकडे येऊच दिले नसते. पण त्याला कशाचाही पत्ता नव्हता. यातच मोगलांची ठिसूळ लष्करी स्थिती दिसून येते. यालाच मी ' अभ्यासशून्य मोगलाई ' असे म्हणतात.
गेल्या १८ वर्षांत (इ. १६४६ ते १६६४ ) स्वराज्याच्या शत्रूंना कुठेच यश मिळाले नाही. महाराजांचे काही तुरळक पराभवही झाले. उदाहरणार्थ चाकणची लढाई. पण यातून शत्रूनी कोणताच ठोस अभ्यास केलेला दिसत नाही. अन् महाराजांचा अभ्यास थबकलेलाही दिसत नाही. या काळात काही लढाया ते हरले , पण सर्व युद्ध जिंकली. लढायांमुळे अखंड अशांतता स्वराज्यात होतीच की. पण स्वराज्यातील नागरिकांनीही आपले शेतकरी जीवन आणि बलुतेदारी कुठेही ढासळू दिली नाही. मांजर उंचावरून पडले तरी जमिनीवर पडताना ते चार पायांवरच उभे पडते. स्वराज्यही असेच मांजराच्या कुशलतेने आणि कोल्ह्याच्या कौशल्याने सह्यादीच्या कुशीत जगत होते.
- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.

सुरत बंदरात अनेक युरोपियन व्यापारी कंपन्या होत्या। त्यातच इंग्लीश ईस्ट इंडिया कंपनी होती। त्यांची फार मोठी वखार होती. जॉर्ज ऑक्झींडेन हा त्यांचा यावेळी (इ. १६६४ ) प्रमुख होता. सर्व युरोपियन व्यापारी कंपन्यांनी , महाराजांचा हा अचानक हल्ला आलेला पाहून महाराजांपुढे पटकन नमते घेतले आणि ते खंडण्या देऊन मोकळे झाले. पण जॉर्ज ऑक्झींडेनने अजिबात ' खंडणी देणार नाही ' असा निर्धार केला. हे त्याचे धाडस भयंकरच होते. मराठ्यांच्यासारख्या कर्दनकाळ शत्रूला असा कडवा निर्धारी नकार देणे म्हणजे मरण ओढवून घेणेच होते. महाराजांनी तीन वेळा या जॉजॅकडे माणूस पाठवून खंडणीची मागणी केली. त्याचा ठाम नकारच. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे , इंग्रजांची खास इंग्लीश माण्से येथे किती होती ? फक्त ४० अधिक १६० स्थानिक सुरतवाली नोकरमंडळी. सर्व मिळून दोनशे. तरीही जॉर्ज वाघासारखा वागत होता. त्याची वखार म्हणजे बळकट किल्ला नव्हता. वखारीला कंपाऊंड वॉल होती. लढावू तर नव्हता. तरीही जॉर्जचे एवढे बळ ? ते बळ त्याच्या मनात होते. म्हणूनच मनगटातही होते. दोनशे लोकांच्यानिशी तो वखारीच्या रक्षणाकरिता युद्धाला सज्ज होता.
महाराजांनी जॉर्जला निर्वाणीचा खंडणीसाठी खलिता पाठविला आणि मुकाट्याने खंडणी न द्याल तर राजापुरात दीड वर्षापूवीर् आम्ही तुमच्या इंग्रजी वखारीची काय अवस्था करून टाकली ते आठवा! असा इशारा दिला। तरीही जॉर्जने निर्धार सोडला नाही. उलट जबाब दिला की , ' पुन्हा तुमचा वकील खंडणीसाठी आमच्याकडे आला , तर त्याला ठार मारू. '
अखेर महाराजांनी आपली एक सैनिकी तुकडी हल्ला करण्यासाठी इंग्रजांवर पाठविली। जॉर्जने कडवा प्रतिकार केला. काही मराठे ठार झाले आणि महाराजांनी हल्ला थांबविला. चक्क माघार घेतली. ते ही योग्यच होते. कारण महाराज सुरतेत युद्ध करायला आलेले नव्हते. त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट आथिर्क होते. तसं पाहिलं तर दोनशे (त्यात बिनलढावू माणसेच जास्त) वखाररक्षकांचा बिमोड करायला महाराजांपाशी सैन्य नव्हतं का ? पण आत्ता लढाईत वेळ आणि बळ खर्च करून किती नफा वा तोटा होईल याचा विचार महाराजांनी केला. इंग्रजांचे बळ होते , निश्चय आणि निष्ठा.
महाराजांना सुरतेत प्रत्येक तास आणि क्षण महत्त्वाचा आणि अपुरा वाटत होता। इंग्रज खंडणी न देता विजयी ठरले. जॉर्ज ' हिरो ' ठरला.
सुरत शहराच्या उत्तर दिशेस गस्तीवर ठेवलेल्या मराठी स्वारांनी अचूक बातमी महाराजांना सुरतेत पोहोचविली की , ' मोगलांचा सरदार महाबतखान हा मोठी फौज घेऊन पाटणहून सुरतेवर तडफेने येत आहे। महाराजांना ही बातमी समजताच त्यांनी लूट सुरक्षित नेण्यासाठी ताबडतोब सुरतेतून निघण्याची आज्ञा दिली. कारण महाबतखानाशी यावेळी युद्ध करणे परवडणारेही नव्हते आणि उद्दिष्टही नव्हते. उद्दिष्ट होते , लूट सहीसलामत स्वराज्यात नेण्याचे. महाराज इंग्रजांपुढंही भित्रे नव्हते. आता महाबतखानापुढेही भित्रे नव्हते. ते हिशेबी आणि धोरणी होते.
दि। १० जाने. १६६४ या दिवशी सकाळी सुमारे साडेदहा वाजता महाराजांची सेना आणि सुरतेची संपत्ती सुरत सोडून निघाली आणि स्वराज्याच्या वाटेस लागली. सुरतेतून बाहेर पडताना बऱ्हाणपूर दरवाजापाशी महाराज घोड्यावरून क्षणभर सुरत शहराकडे वळले आणि म्हणाले , ' बहुता दिवसांची इच्छा किती होती की , औरंगजेब बादशाहांची सुरत वसूल करावी. ती आज पूर्ण झाली. ' यावेळी इस्ट इंडिया कंपनीतील एक इंग्रज अँथनी स्मिथ हा ( याला मराठ्यांनी कैद केले होते , नंतर सोडून दिले.) बऱ्हाणपूर वेशीपाशी उभा होता. त्याने हे सर्व पाहिले आणि नंतर लिहून ठेवले.
महाराज स्वराज्याच्या मार्गाला लागले। महाबतखान पाटण्याहून वेगाने येत होता. पण तो , महाराज निघून गेल्यानंतर सात दिवसांनी (दि. १७ जाने. १६६४ ) सुरतेला पोहोचला. या सात दिवसांत सुरतेची भयंकर बदसुरत झाली होती. आता सुरतेचा मोगली संरक्षक सुभेदार इनायतखान हा निर्धास्त झाला होता. तो महाबतखानच्या स्वागतास गेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप गदीर् होती. कोणी दु:खाने व्याकूळ होते , बहुतेक सारे इनायतवर संतापलेले होते. त्यानेच शहर वाऱ्यावर सोडून सुरतेच्या किल्ल्यात दडी मारली होती. तोच खान आता महाबतखानाच्या स्वागतास सामोरा चालला होता. त्याच्या वागण्याबोलण्यात वा चेहऱ्यावर अपराधीपणाचा लेशही नव्हता. पूर्ण निर्लज्ज. याचवेळी इंग्रज जॉर्ज ऑक्झींडेन हाही महाबतखानास सामोरा आला. महाबतखानास सुरतेत घडलेल्या एकूण सर्व हकीकती तपशीलवार समजलेल्या होत्या. हा खान इनायतनावर कमालीचा नाराज झाला होता. पण साफसाफ बोलावे अशी ती वेळ नव्हती. त्याने इनायतला काहीच न बोलता , जॉर्जचे हादिर्क कौतुक केले , ' तुम्ही इंग्रजांनी एवढ्या मोठ्या शत्रूशी ताठ मानेने जाबसाल केला याचे खरोखच आश्चर्य आणि कौतुक वाटते ' अशा आशयाचा शब्दात जॉर्जचे गुणगौरव करीत खानाने त्याला एक उत्कृष्ट घोडा आणि एक अत्यंत मौल्यवान रत्नजडीत तलवार भेट म्हणून देऊ केली. तेव्हा जॉर्ज अतिशय नम्रतेने म्हणाला की , ' मी काय विशेष केले ? मी माझे कर्तव्य केले. माझ्या राष्ट्राकरिता (इस्ट इंडिया कंपनीकरिता) अत्यंत दक्षतेने आणि कठोरपणे वागलो. ' महाबतखानाने तरीही त्याचे कौतुक करीत आपल्या मौल्यवान आहेराचा स्वीकार करण्याची जॉर्जला विनंती केली. तेव्हा जॉर्ज म्हणाला , ' मला स्वत:ला काहीही नको. माझ्यासाठी काही करणारच असाल , तर एकच करा. आपले वजन दिल्ली दरबारात आहे. तर आपण औरंगजेब बादशहांस शब्द टाकून आमच्या इस्ट इंडिया कंपनीला जरूर त्या सवलती मिळवून द्या.
यावर अधिक काही बोलण्याची गरज आहे का ? हे कंपनीवाले इंग्रज याच सुरत शहराचे , यानंतर फक्त ९० वर्षांनी ( इ. १७५५ सुमारास) पूर्ण मालकी हक्काचे सत्ताधीश झाले.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे

जर सुरतेच्या सुभेदार इनायतखानाने महाराजांना योग्य तो प्रतिसाद दिला असता आणि महाराजांशी राजकीय पातळीवरून बोलणी करून महाराज मागतात त्या खंडणीबाबत काही ठरविले असते , तर सुरतेतील हा अग्निकल्लोळ टळला असता। पण ते त्या भ्रष्टाचारी सुभेदाराने केले नाही। महाराजांना त्याने आपल्या सैन्यबळानिशी निर्वाणीचा प्रतिकारही केला नाही। तो लपून बसला. अखेर महाराजांना खंडणीचा आणि खंडणी न देणाऱ्यांचा विचार कठोरपणे करावा लागला. जगाच्या इतिहासात कठोर निर्णयाने आपले राजकीय हेतू पार न पाडणाऱ्यांना अखेर स्वत:चाच नाश उघड्या डोळ्याने बघावा लागला आहे. सुरतेच्या प्रकरणावर आज खूप कागदपत्रे आणि वृत्तांत उपलब्ध आहेत. त्याचा बारकाईने अभ्यास केला तर मराठा स्वराज्याचा हा कठोर , कर्तव्यनिष्ठ पण कठोर न्यायीही नेता जे वागला ते योग्यच वागला असे दिसून येईल. यात अभिनिवेश नाही. खोटा अभिमान बाळगून ' शिवाजी महाराज की जय ' म्हणण्याची गरज नाही.
जर शिवाजी महाराज असे वागले नसते , तर ते नेभळट ठरले असते। ते सोवळ्यातल्या मुकटा नेसून राज्यकारभार करायला उभे नव्हते , तर कठोररितीने भवानी हातात घेऊन , वेळच आली तर ब्राम्हण किंवा ख्रिश्चन मिशनरी गुन्हेगारांचा शिरच्छेद करायलाही न कचरणारे विक्रमादित्य होते. आम्ही अनेकदा नेभळटपणामुळे अन् भाबड्या सहिष्णुतेचे ' मुखवटे नेसून राजमुकुट गमावले हो! '
बोलून टाकू का ? नुकतेच घडले आहे। पाक अतिरेकी आमच्या संसदेत घुसले। आमच्या राष्ट्रदेवतेच्या हृदयसिंहासनालाच त्यांनी ठोकर मारली. आम्ही काय केले ? मुखवटा नेसून आम्ही फक्त कागदी इशारा दिला ' हे सहन केले जाणार नाही. '
पाकव्याप्त पण भारताच्याच पूर्ण हक्काच्या काश्मिरी भागात पाक अतिरेकी विषारी सर्पांनी केलेल्या वारूळांवर आम्ही बॉम्ब का टाकले नाहीत ? आपले बॉम्ब न्याय्य ठरले नसते का ?
नाही! ते आम्हाला जमणार नाही। कारण आम्ही सहिष्णुतेचे मुखवटे नेसून शिवाजी महाराजांची भवानी हाती घेण्याची नाटकी चूक करीत असतो. खरं म्हणजे आम्ही सोवळ्याचे मुकटेही नेसता कामा नयेत अन् उपभोगाची भरजरी राजवस्त्रेही पेहरता कामा नयेत. आम्ही श्रीरामाची विरक्त वल्कले परिधान करून पातकी आक्रमकांवर रामबाण सोडले पाहिजेत. महाराज असे रामबाण सोडीत होते.
हा सुरतेतला रावण काय करीत होता यावेळी ? तो सुरतेच्या किल्ल्यात आपल्या एक हजार मोगली सैन्यानिशी लपून बसला होता। त्याने आपला एक वकील , तिसऱ्या दिवशी (दि। ८ जाने. १६६४ ) शिवाजीमहाराजांच्याकडे आपले पत्र देऊन तहाची बोलणी करण्याकरता पाठविला. हा वकील काळाबागेत महाराजांकडे आला. महाराज रोजच्या प्रमाणेच एका प्रचंड झाडाच्या बुंध्याशी उंचट आसनावर बसले होते. महाराजांनी भेटीची परवानगी दिली. तो वकील महाराजांच्या समोर सुमारे पंधरा पावलांवर अदबीने उभा राहिला. आपल्या हातातील कागदाची वळकटी उलगडीत तो महाराजांना म्हणाला , ' आमचे सुभेदार इनायतखान आपल्याशी तह करावयास तयार आहेत. आमच्या तहाच्या अटी अशा ' तो वकील एवढे बोलतोय , तेवढ्यात महाराज दरडावले , ' तहाच्या अटी ? अटी आम्ही घालायच्या की तुम्ही ? भेकडाप्रमाणे तुमचा सुभेदार किल्ल्यात लपून बसलाय. आणि तो आम्हाला अटी पाठवतोय ?'
तेवढ्यात तो वकील ' महाराज , आपल्याला अगदी महत्त्वाचे मला काही सांगायचे आहे ' ( आपके तहनाईमें मुझे कुछ कहना है।) असे वारंवार म्हणत म्हणत महाराजांच्या दिशेने पावले टाकू लागला। तो क्षणात अगदी जवळ आला आणि त्याने एकदम आपल्या कमरेस असलेली कट्यार उपसली आणि तो घाव घालण्यासाठी महाराजांच्यावर धावला. तो झडप घालणार , एवढ्यात महाराजांच्या नजीक उभ्या असलेल्या मराठा चार-दोन सैनिकांनी या वकीलावरच विजेच्या वेगाने सपासप घाव घातले. इतके ते मराठे सावध होते. तो वकील म्हणजे इनायतखानाने महाराजांचा खून करण्याकरता पाठविलेला मारेकरी होता. मारेकरी मारला गेला. मराठे सैनिक वणव्यासारखे भडकले. आणि मग सुरतेत खरोखरच सूडाचा भडका उडाला. सुरतेत जो काही भयंकर हल्लकल्लोळ उडाला तो सर्वस्वी अन् प्रत्येक बाबतीत बेजबाबदारपणे वागलेल्या इनायतखान सुभेदारामुळेच. इथे नवल वाटते ते औरंगजेब बादशाहचेच. त्याने साम्राज्याच्या पश्चिम सागरी सरहद्दीवर , सुरतेसारख्या जागतिक बाजारपेठ असलेल्या संपन्न अर्थनगरीवर इतका नालायक बेजबाबदार , भेकड निर्लज्ज भ्रष्टाचारी आणि अक्कलशून्य सर्वाधिकारी कसा काय नेमला ?
सुरतेच्या स्वारीने स्वराज्य सैनिकांनी शिलंगण केले। सीमोल्लंघन ' आम्ही कधीही दुसऱ्याच्या मुलुखावर अतिक्रमण वा स्वारी करीत नाही ' असे अभिमानाने सोवळ्यातला मुकटा नेसून सांगणाऱ्या आमच्या मंडळींनी याचा विचार करावा ना ? महाराजांचे हे महाराष्ट्राबाहेर झालेले दुसरे शिलंगण। पहिले शिलंगण त्यांनी अफझलखानच्या स्वारीपूवीर्च कर्नाटकात मासूर या आदिलशाही ठाण्यावर , म्हणजे पुण्यापासून जवळजवळ सातशे कि। मी. दूर केले होते. महाराज तर म्हणत होते की , ' सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापावेतो अवघ्या मुलुखाचे राज्य आपल्या स्वराज्यात सामील करावे.
' केवढी विशाल पण तेवढीच उदात्त , उन्नत , उत्कट आणि उत्तुंग स्वप्न पाहणारा हा नेता होता! अशी स्वप्न जागे असणाऱ्यांनाच पडतात। झोपा काढणाऱ्यांना नाही. त्यांच्या आकांक्षा गगनाच्याही पल्याड सूर्यमंडळ भेदून जात असतात.
राहून राहून रूखरूख वाटते की , पाक अतिरेक्यांच्या काश्मिरातील वारूळांवर , संसदच्या अपमानाचा जाब विचारण्यासाठी बॉम्ब टाकण्याची अप्रतिम संधी आम्ही गमावली. शाहिस्तेखानाच्या आक्रमणाचा जाब महाराजांनी सुरतेवर विचारला औरंगजेबाला.
- बाबासाहेब पुरंदरे

बुधवार, १३ ऑगस्ट, २००८

शिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.

शिवाजी महाराजांचे हे दळवादळ सुरतेच्या रोखाने नजिक येऊ लागल्यावर जनतेत घबराट उडाली. खेड्यापाड्यांतील लोक सैरावैरा पळू लागले. ही त्यांची केविलवाणी घबराट पाहून महाराजांना वाईटच वाटले. त्यांनी आपल्या सैनिकांच्या मार्फत या पळणाऱ्या जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. शिवाजी या तीन अक्षरांची दहशत उत्तरेकडे केवढी पसरली होती , त्याचे हे प्रत्यंतर होते. ' मी शिवाजीच आहे. आम्ही मराठे आहोत. तुम्ही घाबरू नका. तुम्हाला आम्ही अजिबात धक्का लावणार नाही ' अशा आशयाचे धीराचे आश्वासन सैनिक देत होते. त्यामुळे घबराट थोडीबहुत कमी झाली.

या मराठी मोहिमेच्या वार्ता सुभेदार इनायतखानला समजत होत्या. पण तो इतका गाफील होता की , त्याचा ' शिवाजी सुरतेवर येत आहे या बातम्यांवर विश्वासच बसेना.

दुधन्यापाशी म्हणजे सुरतेच्या अगदी सीमेवर महाराज येऊन पोहोचले. त्यांनी आपला अधिकृत वकील (बहुदा वल्लभदास) खानाकडे पाठविला आणि ' मला एक कोटी रुपये खंडणी द्या. मी शहरात येतही नाही. येथूनच परत जाईन. तुमच्या शाहिस्तेखानानं गेली तीन वषेर् आमच्या मुलुखाची भयंकर लूट आणि नासाडी केली. बेअब्रुही केली. त्या नुकसानीच्या भरपाईखातर मला तुम्ही ही खंडणी द्या. ही खंडणी तुम्ही एकटेही देऊ शकाल. ( म्हणजे इतका पैसा तुमच्या एकट्यापाशी आहे. खाल्लेला!) पण मी सोबत धनिकांची यादी देत आहे. त्या सर्वांकडून तुम्हीच रक्कम गोळा करा. ' या आशयाचा सविस्तर मजकूर महाराजांनी सुभेदाराला विदित केला. पण सुभेदाराने हेटाळणी करून हे आवाहन फेटाळून लावले.

मग मात्र महाराज चिडले. गाफील खान चिडला नाही. त्याने विनोदी पद्धतीनेच या भयंकर ज्वालामुखीशी व्यवहार केला. अन् सुरतेसकट तो या मराठी लाव्हारसात एक हजार मोगल सैन्यानिशी बुडाला. सुरतेच्या रक्षणांस म्हणजेच युद्धास त्याने उभे राहावयास हवे होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रज प्रमुख अधिकाऱ्याने म्हणजेच जॉर्ज ऑक्झींडेन याने स्वत: सुभेदाराला भेटून या गंभीर संकटाची पुरेपूर जाणीव करून दिली. पण तरीही तो बेपर्वाच. उलट त्याने जॉर्जलाच म्हटले की , ' तुम्ही अंग्रेज लोक फार मोठे विचारी आणि बहाद्दूर समजले जाता. अन् तुम्हीच या शिवाजीच्या नावाने भुरटेगिरी करणाऱ्या लोकांना इतके घाबरता ?'

या उत्तराने जॉर्ज अधिकच गंभीर बनला. त्याला मुख्यत: आपल्या इंग्रज वखारींची चिंता होती. हा शिवाजी जर आपल्या वखारीवर चालून आला तर ? राजापूरच्या इंग्रज व्यापारी वखारींची याच शिवाजीने (मार्च १६६० ) कशी धूळधाण उडविली ते त्याला माहित होते.

जॉर्ज ऑक्झींडेन आपल्या वखारीत परतला. त्याच्यापाशी काळे अन् गोरे नोकरलोक होते फक्त दोनशे. त्याने एक विलक्षण गोष्ट केली.या दोनशे लोकांच्या खांद्यावर बंदुका दिल्या. यात मजूर , कारकून आणि सैनिक होते. ते आता सर्वचजण सैनिक बनविले गेले. अन् जॉर्जने या दोनशे लोकांसह बँड वाजवित निशाणे घेऊन सुरत शहरात रूटमार्च काढला. जॉर्ज स्वत: त्यात होता. हे संचलन सुभेदाराने स्वत: आपल्या हवेलीतून पाहिले. सुभेदाराला ही केवळ थट्टा चेष्टा वाटली तो हसला.

हा पहिला दिवस. (दि. ६ जाने. १६६४ ) सुरतेबाहेर एक बाग होता. कालाबाग. त्यातील एका मोठ्या झाडाच्या बुंध्याशी महाराज एका खुचीर्सारख्या बनविलेल्या उंचट आसनावर बसले. एवढ्यात एक गंमत घडली. सुरतेत धर्मप्रचाराचे काम करणारा , कॅप्युसिन ख्रिश्चन मिशनचा मिशनरी रे अॅम्ब्रॉस हा महाराजांस भेटावयास बुऱ्हाणपूर दरवाज्याबाहेरच्या कालाबागेत आला. परवानगी घेऊन तो समोर आला. त्याने महाराजांस नम्रतेने विनंती केली की , ' मी ख्रिश्चन मिशनरी आहे. आमचे एक चर्च , मठ आणि रोगग्रस्तांवर उपचार करण्याकरिता हॉस्पिटल आहे. आपले आणि औरंगजेब बादशाहांचे काही राजकीय भांडण आहे. आमचा त्यात काहीच संबंध नाही. तरी मी आपणांस विनंती करतो की , आपण निदान माझ्या गोरगरीब रोगग्रस्तांचा रक्तपात करू नये. '

या आशयाच्या त्याच्या बोलण्यावर महाराज त्याला म्हणाले , ' कुणी सांगितलं तुम्हाला की , मी तुमचा रक्तपात करणार आहे म्हणून! तुम्ही लोक गरिबांकरिता फार चांगले काम करता , हे आम्हाला माहिती आहे. तुम्हाला अजिबात त्रास होऊ नये याची दक्षता आम्ही आधीपासूनच घेतली आहे. तुम्ही निर्धास्त असा.

' रे. अॅम्ब्रॉस परत गेला खरोखरच मराठ्यांची एक तुकडी ख्रिश्चनांच्या या कार्यस्थळाभोवती रक्षक म्हणून उभी होती.

मराठी सैनिकांनी खंडण्या गोळा करण्यास शहरात सुरुवात केली. गडगंज श्रीमंतांकडूनच फक्त खंडणी गोळा केली जात होती. त्यातही टक्केवारी होती। खंडणी घेतल्यावर , त्या त्या धनिकाला रसीद दिली जात होती.

सुभेदार इनायतखान आता मात्र घाबरून सुरतेच्या किल्ल्यात आपल्या एक हजार सैन्यानिशी लपून बसला. त्याने सुरतेेचे धड रक्षणही केले नाही वा खंडणी देऊन शहर वाचविलेही नाही. बेजबाबदार.

सुरत शहराच्या बाहेर पण नजिकच एका एकलकोंड्या मोठ्या घरात एक गुजराथी विधवाबाई राहत होती. तिचा पती धनिक होता. या बाईच्या घराला चुकूनमाकूनही कोणाचा त्रास होऊ नये म्हणून महाराजांनी मराठी रक्षक रात्री पहाऱ्यावर पाठविले होते.

खंडण्या गोळा केल्या जात होत्या. पण जे त्या देण्याचे नाकारीत होते , त्यांच्या घरात शिरून मराठे सक्तीने धन गोळा करीत होते. ठिकठिकाणी मराठ्यांनी पकडलेले बादशाही अधिकारी आणि नोकरचाकर कैद करून कालाबागेत महाराजांपुढे हजर केले जात होते. कुठेही प्रतिकार असा होतच नव्हता. सर्व युरोपीय वखारवाल्यांनी आपले ' देणे ' मुकाट्याने देऊन टाकले होते. पण मग रूटमार्च काढणाऱ्या इंग्रजांचे काय ? जॉर्जने आपल्या वखारीच्या तटांवर तोफा आणि सैनिक सज्ज ठेवले होते. त्यांचे युनियन जॅक वखारीवर फडकत होते. स्वत: जॉर्ज सुसज्ज होता. फक्त दोनशे लोक! हजार लोकांच्या निशी इनायतखान किल्ल्यात लपून बसला होता. दरवाजे बंद होते. किल्ल्याचे आणि विवेकाचेही.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.

महाराज माणसं माणिकमोत्यांप्रमाणेच निरखून पारखून घेत असत. त्यांत ते ९९ टक्के यशस्वीही ठरले. पण तरीही दक्षता घ्यायची ती घेतच असत. सिंहगडाला जसवंतसिंहाचा वेढा पडण्यापूर्वी का कोण जाणे , पण सिंहगडावरती फितवा फितुरीचा संशय शिवाजीमहाराजांच्या मनांत डोकावला. त्यावेळी महाराज स्वत: सिंहगडावर जाऊन आले. त्यांच्या पद्धतीनं त्यांनी गडाची तबियत तपासली. अन् त्यांच्या लक्षात आलं की , गडाची तबियत एकदम खणखणीत आहे. नंतर गडाची ही निरोगी तबियत प्रत्ययासही आली. एप्रिल प्रारंभ ते २८ मे ६४ पर्यंत मोगली राजपूत सरदार जसवंतसिंह राठोड सिंहगड घेण्यासाठी गडाला १ 3 महिने धडका देत होता. गड अभेद्यच राहिला. झेंडा फडकतच राहिला. सिंहांना मात्र टेंगळे आली.

स्वराज्याचा हा बिकट डाव खेळत असताना प्रामाणिक निष्ठावंत आणि कष्टाळू अशा प्रजेने आणि सेनेने महाराजांना जी साथ केली , त्याला तोड नाही. प्रजेनंही साथ दिली याला पुरावा काय ? शाहिस्तेखानच्या आणि नंतर मिर्झाराजा जयसिंहाच्या स्वराज्यावरील चाललेल्या अतिरेकी आक्रमणांच्या काळात मावळातील प्रजा सर्व सोसून , शरणागतीचा विचारही मनात न आणता लोहस्तंभासारखी उभी राहिली. प्रजा म्हणजेच जनता , अशी उभी राहिली तरच शिवाजी महाराज , विन्स्टन चचिर्ल , अन् हो चिमिन्ह हे यशस्वी होत असतात.

महाराज शत्रूला विचार करायलाही अवधि देत नव्हते. शाहिस्तेखानावरील छाप्यानंतर पावसाळा सुरू झाला. संपला. या काळात महाराजांचे हेर , बहिजीर् नाईक , त्याच्याबरोबर बहुदा वल्लभदास अन् सुंदरजी परभुजी गुप्त रूपानं सुरतेच्या टेहळणीस महाराजांनी रवानाही केले. या मराठी हेरांनी सुरत चांगलीच हेरून काढली. कोण कोण लक्षाधीश आणि कोट्याधीश आहेत हे तर टिपून पाहिलेच. पण सुरतेची लष्करी आणि आरमारी परिस्थिती त्यांनी बरोबर न्याहाळली. सुरत सुस्त होती. सुभेदार होता इनायतखान. पैसे खाण्यात पटाईत. पैसे खाण्याची त्याची ' मेथड ' आज आपल्याला नवीन वाटणार नाही. आपण अनुभवी आहोत. बादशाहाच्या हुकुमाप्रमाणे सैन्याची संरक्षक संख्या तो ' कॅटलॉग ' वर दाखवित होता. पण प्रत्यक्षात फक्त एकच हजार सैन्य त्याच्यापाशी होते. बाकीच्या सैन्याचा सर्व तनखा खानाच्या पोटात गुडूप होता. आता ही गोष्ट बहिजीर्सारख्या कोल्ह्याच्या नजरेतून सुटेल काय ? मराठ्यांच्या हितासाठी अशी चतुराई करून इनायतखानसाहेब मराठी स्वराज्याचीच केवढी सेवा करीत होते , नाही!

शिवाजी महाराज आपल्यापासून काहीशे फर्सुख (आठ मैल म्हणजे एक फर्सुख) लांब आहे. तो इकडं कशाला येईल ? आपण अगदी निर्धास्तपणे पैसे खातखात बादशाहचं राज्य सांभाळीत बसायला हरकत नाही. असा अतिव्यवहार्य विचार करून खान सुभेदारीच्या लोडाला टेकलेला होता. सुरतेतील एकूण संपत्तीचा आणि शांत स्थितीचा तपशीलवार अभ्यास करून मराठी हेर राजगडाला परतलेही होते. आता महाराज सुरतेच्या स्वारीवर सुखरूप कसं जायचं अन् डबोलं घेऊन सुखरूप कसं यायचं याचाही तपशील ठरवित होते. त्रास न होता हे साधायचं होतं. वाटेत कुठे कुठे अडचणी आणि शत्रूचा अडसर येऊ शकेल , शक्यतोवर असाच मार्ग ठरविणे आवश्यक होते. शांततेच्या मार्गाने सर्व काही साध्य करायचे अशी नाहीतरी आमची भारतीय परंपरा आहेच.

राजगड- त्र्यंबकेश्वर-जव्हार-गणदेवी-उधना ते सुरत असा हा सामान्यत: मार्ग होता. साधारणपणे हा मार्ग सह्यादीच्या घाटवाटांतून आणि जंगलातून जाणारा आहे. सुमारे पाच हजार घोडेस्वार आणि संपत्ती लादून घेऊन येण्याकरता सुमारे पाच हजार घोडे महाराजांचे बरोबर निघाले. महाराज सुरत काबीज करायला निघालेले नव्हते. शक्यतो रक्तपात न करताच खंडणी मिळविण्यासाठी ते जात होते. वाटेत जव्हारचा राजा आडवा येतो की काय अशी नक्कीच धास्ती होती. त्याशिवाय लष्करी धास्ती शेवटपर्यंत कुठेच नव्हती. महाराजांनी जी ' पुढची ' दक्षता घेतली होती ती विचार करण्यासारखी आहे. सुरत तापी नदीच्या खाडीवर आहे. सुरतेच्या उत्तरेस , ईशान्येस आणि पूवेर्स महाराजांनी आपल्या सैन्याच्या लहान लहान तुकड्या सुरतेपासून काही किलोमीटर अंतरावरती ठेवलेल्या स्पष्ट दिसतात. या स्वारांना छबिन्याचे म्हणजेच गस्तीचे स्वार म्हणतात. सुरतेतील आपला कार्यभाग पूर्ण होईपर्यंत उत्तर आणि पूर्व बाजूंनी मोगलांचे कोणी सरदार आपल्यावर चालून येऊ नयेत अशी रास्त अपेक्षा त्यांची होती. पण समजा अहमदाबाद , पाटण , पावागड , सोनगट वा बुऱ्हाणपूर येथे मोगली ठाणी होती. त्या ठाणेदारांनी आपल्याला विरोध करण्यासाठी चाल केली तर ? त्या संभाव्य मोगली हल्ल्यांची वार्ता आपल्याला खूप आधीच अचूक कळावी ही योजना महाराजांनी केलेली होती.

अन् तसेच घडले. महाराज त्र्यंबकेश्वरहून दि. १ जानेवारी १६६४ रोजी जव्हारपाशी सिरपांव येथे पोहोचले. सुदैवाने जव्हारच्या राजाने महाराजांना अजिबात विरोध केला नाही. महाराज उधना उर्फ उटना या ठिकाणी पाच जाने. १६६४ रोजी म्हणजे सुरतेपासून अवघ्या १० कि. मी. वर पोहोचले.

सुरतेचा सुभेदार इनायतखान पूर्ण गाफील होता. जगाचा नियमच आहे , गाफील का जो माल है , वो अकलमंदका खुराक है। सुरत बंदर हे मोगल साम्राज्याचं आथिर्क वर्म होतं. सुरतेत येणाऱ्या मालावर बादशाहला प्रचंड जकातीचे उत्पन्न मिळत असे. सुरत ही जागतिक कीतीर्ची बाजारपेठ होती. येथील जकातीचे उत्पन्न जहाँआरा बेगम ( औरंगजेबाची बहीण) हिला मिळत असे. म्हणजे आता महाराजांनी मोगलांच्या नाकावरच नेम धरला होता.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे 'गुप्त' योगदान!

शाहिस्तेखानाच्या फजितीची वार्ता हिंदुस्थानभर पसरली. महाराजांचे हे ऑपरेशन लाल महाल इतके प्रभावी , चमत्कृतीपूर्ण , धाडसी आणि अद्भूत घडले की , साऱ्या मोगल साम्राज्यात तो एक अति आश्चर्यकारक डाव ठरला. सव्वा लाख फौजेच्या मोगल छावणीत घुसून खुद्द सेनापती शाहिस्तेखानावर पडलेला हा मूठभर मराठ्यांचा छापा म्हणजे ढगफुटीसारखाच भयंकर प्रकार होता. ' शिवाजीराजा ' म्हणजे , महंमद घोरीपासून (१२ वं शतक) ते थेट औरंगजेबापर्यंत (१७ वं शतक) झाडून साऱ्या सुलतानांच्या तख्तांना भूकंपासारखा हादरा देणारा विस्फोट होता. या सुलतानांपुढे ठाकलेलं ते आव्हान होतं. हे आव्हान म्हणजे केवळ शारीरिक दांडगाई नव्हती. त्यामागे एक विलक्षण प्रभावी तत्त्वज्ञान होतं. परित्राणाय् साधुनाम् त्यात मानवतेचं उदार आणि विशाल असं मंगल आश्वासनही होतं.

लाल महालावरील महाराजांच्या या छाप्यात शाहिस्तेखानची एक मुलगी हरवली. तिचे नेमके काय झालं ते कधीच कोणाला कळलेलं नाही. पण अनेकजण विशेषत: शाही कुटुंबातली माणसं अन् विशेषत: औरंगजेबाची बहीण जहाँआरा बेगम यांची अशी समजूत झाली होती की , सीवाने ही मुलगी पळवून नेली.

हे सर्वस्वी असत्य होतं. पुरावा तर अजिबातच नव्हता. एक गोष्ट लक्षात येते की , स्वत: औरंगजेबाने असा आरोप शिवाजीराजांवर कधीही केलेला , नंतरसुद्धा सापडत नाही. जहाँआराच्या पत्रांत मात्र ती हा आरोप अनेकदा करते. जाणूनबुजून गैरसमज करून घेणाऱ्यांना व देणाऱ्यांना दिव्यदृष्टी देणारा ' प्रॉफेट ' अजून जन्माला आलेला नाही.

शाहिस्तेखानावर पडलेला भयानक छापा औरंगजेबालाही वाटला नसेल इतका दु:खदायक काही राजपूत सरदारांना वाटला. विशेषत: जसवंतसिंह या जोधपूरच्या सरदाराला वाटला. लाल महालातील हा फजितीदायक छापा घडल्यानंतर (इ. १६६ 3 एप्रिल ६ ) या जसवंतसिंहाने पुण्याशेजाच्या सिंहगडावर हल्ला चढविला. त्याच्याबरोबर त्याचा मेहुणा भावसिंह हाडा (बुंदीमहाराजा) हाही होता. सिंहगडावर मराठी सैन्य किती होते ते नक्की माहिती नाही. पण या मोगली राजपूत सिंहांच्यापेक्षा मराठे नक्कीच , खूपच कमी होते.

या सिंहांना सिंहगड अजिबात मिळाला नाही. त्यांनी गडाला वेढा घातला. आत्ताच सांगून टाकतो की , हा वेढा एप्रिल ६ 3 पासून २८ मे १६६४ पर्यंत चालू होता. सिंहगड अभेद्य राहिला. याच काळात (दि. ५ ते १० जानेवारी १६६४ ) महाराजांचा सुरतेवर छापा पडला. हे मी आत्ताच का सांगतोय ? सुरतेवरच्या छाप्याकरता महाराज ससैन्य याच सिंहगडाशेजारून म्हणजेच जसवंतसिंगच्या सिंहगडला पडलेल्या वेढ्याच्या जवळून सुमारे ५ कि. मी. अंतरावरून गेले. या गोष्टीचा , वेढा घालणाऱ्या या दोन राजपूत सिंहांना पत्ताही लागला नाही. याचा अर्थ असाच घ्यायचा का की , सिंहगडाला झोपाळू मोगल राजपुतांचा वेढा पडला होता अन् त्यांच्या बगलेखालून महाराज सुरतेवर सूर मारीत होते.

मोगलांचे हेरखाने ढिसाळ होते हा याचा अर्थ नाही का! इथे थोडा भूगोलही लक्षात घ्यावा. पुणे ते नैऋत्येला 3 ० कि. मी.वर सिंहगड आहे. सिंहगडच्या असाच काहीसा नैऋत्येलाच २० कि. मी.वर राजगड आहे. महाराज सुरतेसाठी राजगडावरून सिंहगडच्या शेजारून पश्चिमअंगाने , लोणावळा , कसारा घाट , दूगतपुरी , त्र्यंबकेश्वर या मार्गाने सुरतेकडे गेले. त्र्यंबकेश्वरला महाराज दि. 3 १ डिसेंबर १६६ 3 या दिवशी होते. पुण्यातही मोगलांची लष्करी छावणी यावेळी होतीच. राजगड ते सूरत हे सरळ रेघेत अंतर धरले तरी 3 २५ कि. मी. आहे. म्हणजे नकाशात असे दिसेल की , सिंहगडचा वेढा आणि पुण्याची मोगल केंद छावणी याच्या पश्चिमेच्या बाजूने महाराज एखाद्या बाणासारखे दोनशे कि. मी. मोगली अमलाखालील मुलूखांत घुसले. पुणे आणि सिंहगड येथे असलेल्या मोगली छावण्यांना याचा पत्ता नाही.

हे मी सांगतो आहे , यातील मुख्य मुद्दा आपल्या लक्षात आला ना ? अगदी सरळ गोष्ट आहे की , कमीतकमी वेळांत महाराज या धाडसी मोहिमा यशस्वी करीत आहेत , त्या कोणाच्या भरवशावर ? हेरांच्या भरवशावर। हेरांनी आणलेल्या बिनचूक माहितीवर त्यांचे आराखडे आखले जात होते. त्या हेरांच्या कामगिरीचा तपशील आपल्याला मिळत नाही. मोहिमेचे यश आणि मोहिमेचे तपशील लक्षात घेऊनच हेरांनी केलेल्या कामगिरीचा अंदाज आपल्याला करावा लागतो. प्रसिद्धी आणि मानसन्मान यांपासून अलिप्त राहून हे हेर आपापली कामे धाडसाने अन् कित्येकदा जिवावर उदार होऊन अन् कित्येकदा जीव गमावूनही कडव्या निष्ठेने अन् कोणाच्या कौशल्याने करीत होते. अशी माणसे साथीला असली तरच शिवाजीमहाराज सार्वभौम सिंहासन निर्माण करू शकतात. नाहीतर ती अयशस्वी होतात. आठवलं म्हणून सांगतो , पेशवाईच्या अखेरच्या काळात चतुरसिंह भोसले आणि इंग्रजांच्या प्रारंभीच्या काळात क्रांतीकारक उमाजी नाईक खोमणे हे दोन पुरुष शिवाशाहीचा विचार डोक्यात ठेवून धडपडत होते. दोघांनाही अखेर मृत्युलाच सामोरे जावे लागले. पहिला आमच्याच कैदेत तळमळत मरण पावला , दुसरा इंग्रजांच्या कैदेत पडला आणि फाशी गेला. हे दोन अयशस्वी वीर शिवाजी महाराजच नव्हते का ? पण यश आले नाही.

आमच्या तरुणांनी या यशस्वी आणि अयशस्वी शिवाजींचा अभ्यास केला पाहिजे. अज्ञातात राहून स्वराज्याची कामे करणाऱ्या शिवकालीन हेरांचे वाचन , मनन आणि अनुकरणही आम्ही केले पाहिजे. असं केल्यानं काय होईल ? आमच्या आकांक्षांना खरंच गगन ठेंगणे ठरेल!

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.

सूर्याच्या रथाला निमिषाचीही विश्रांती नसते. अगदी खग्रास ग्रहण लागले तरीही सूर्यरथ चालतच असतो. शिवाजीमहाराजांचे मन आणि शरीर हे असेच अविरत करताना दिसते. भव्यदिव्य , उदात्त पण व्यवहार्य पाहणारा हा राजा उपभोगशून्य लोकनेता होता. पुढे एकदा रायगडावर रावजी सोमनाथ या नावाचा महाराजांचा एक सरदार महाराजांना म्हणाला , ' महाराज , आपण राज्याचा विस्तार खूपच केला आहे. परगणे , किल्ले , बंदरे आणि शाही ठाणी कब्जात आणली. आपले अंतिम नेमके उदिष्ट्य तरी काय आहे ? आपण कुठे थांबणार आहोत ?

' या आशयाचा प्रश्ान् रावजीनं पुसला. त्यावर महाराजांनी उत्तर दिले. त्याचा आशय असा , ' राहुजी , सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापावेतो अवघा मुलुख आणि महाक्षेत्रे मुक्त करावीत ऐसा आमचा मानस आहे. '

म्हणजे अवघा भारत मुक्त करावा , त्याचे हिंदवी स्वराज्य बनवावे , असा महाराजांचा मनोसंकल्प होता. शून्यातून अवघ्या गगनाला गवसणी घालणारा हा संकल्प आपण कधी विचारात घेतो का ? हा महाराजांच्या मनातील विचार पोर्तुगीजांच्या लिस्बन येथील ऐतिहासिक दप्तरखान्यातील एका पोर्तुगीज पत्रात डॉ. पांडुरंग पिसुलेर्कर यांच्या अभ्यासात आला. मला स्वत: डॉ. पिसुलेर्करांनीच हा सांगितला. अन् म्हणाले , ' शिवाजीराजाचा हा ध्येयवाद आज आम्ही अभ्यासला पाहिजे.

' अस्सल ऐतिहासिक कागदपत्रांतून दिसणारे शिवचरित्र सूचक उपनिषदांसारखे आहे। आम्हाला त्यावर भाष्य करणारा भाष्यकार हवा आहे. पुढे राजस्थानात रत्नाकर पंडित नावाचा एक विद्वान होता. वास्तविक तो महाराष्ट्रापासून त्या काळात हजार मैल दूर असणारा माणूस. पण दष्टा प्रतिभावंत. त्याने छत्रपती शिवाजीराजांचे वर्णन एकाच शब्दात केले आहे. तो म्हणतो , हा शिवाजीराजा कसा ?

' दिल्लींदपदलिप्सव :'

म्हणजे हा शिवाजीराजा दिल्लीपद आपल्या कब्जात आणू पाहणारा ' आहे. उत्तुंग स्वप्न पाहणाऱ्यांना झोपा काढून चालत नाही. ते सदैव जागे आणि सक्रिय असतात. महाराज तसेच होते.

असो. आता पुन्हा एकदा शाहिस्तेखानाच्या छावणीत आपण डोकावू. शाहिस्तेखानवरती महाराजांचा छापा पडला. दि. ६ एप्रिल १६६ 3. यावेळी औरंगजेब बादशाह काश्मिरात श्रीनगर येथे होता. त्याला या मराठी छाप्याची बातमी दि. ८ मे १६६ 3 या दिवशी कळली. तो चकीतच झाला. चिडलाही. तो त्वरित दिल्लीस परतला. शाहिस्तेखानाची ही तीन वर्षांची मोहिम पूर्ण वाया गेली होती. तो विचार करीत होता. आता या शिवाचा बंदोबस्त कसा करावा ? प्रथम त्याने शाहिस्तेखान मामांना पत्र पाठविले की , ' तुमची बदली आसाम-बंगाल सरहद्दीवर ढाका या ठिकाणी करण्यात येत आहे. तरी ताबडतोब ढाक्याकडे रवाना व्हावे ' त्या काळी या भागात कोणाची बदली वा नेमणूक केली गेली तर ती एकप्रकारे बादशाहांची नाराजी आणि शिक्षाही समजली जात असे. हा बदलीचा हुकूम मिळाल्यावर खानाने औरंगजेबास एक नम्र पश्चातापाचे पत्र पाठवून विनंती केली की , मला एकवार पुन्हा संधी द्या. मी शिवाचा बिमोड करतो. (पण माझी ढाक्यास बदली करू नका.) पण बादशाहने पुन्हा जरा कडक शब्दांत खानास हुकूमावले की , ताबडतोब ढाक्यास रवाना व्हा.

आता निरुपाय होता. दु:खी खान ढाक्याकडे रवाना झाला.

याच काळात आसामच्या राज्यात लछित बडफुकन या नावाचा एक जबरदस्त सेनापती आसामच्या ओहोम राजघराण्याच्या पदरी होता. हा लछित आपल्या संताजी वा धनाजीसारखाच अचाट कर्तृत्त्वाचा सेनापती होता. आसामच्या या स्वतंत्र राज्याचे मोगलांशी सततच युद्ध चालू होते. लछितने तर दिल्लीला अगदी हैराण केले होते. या लछित बडफुकनला शाहिस्तेखान आता आसामवरती येणार असल्याच्या बातम्या मिळाल्या. दक्षिणेतील शिवाजीराजाने या खानाला फजित करून पिटाळला आहे हे लछितला तपशीलवार कळले असावे ; असे दिसते. ' बडफुकन ' या शब्दाचा अर्थ ' बडा सेनापती ' मुख्य सेनापती असा आहे. या लछितने शाहिस्तेखानाला एक पत्र पाठविल्याची नोंद , ' शाहिस्तेखानकी बुरंजी ' या नावाच्या एका आसामी बखरीत आहे. लछित या खानाला लिहितो आहे.

' अरे , तू दक्षिणेस गेला होतास. तेथे असलेल्या शिवाजीराजाने तुझी पार फजिती केली. तुझी बोटेच तोडली म्हणे! आता तू आमच्यावर चालून येतो आहेस. आता तुझे डोके सांभाळा ?

शिवाजीमहाराजांची करामत पार आसामपर्यंत त्याकाळी कशी पोहोचली होती , याचे हे उदाहरण आहे.

आज मात्र या आसामातील जनतेला , किंबहुना भारतातील अनेक प्रांतांना शिवचरित्र माहितच नाही. पण रागावयाचे कशाकरिता आपण ? आपल्याला तरी लछित बडफुकन कुठं माहिती आहे ? पंजाबच्या थोर रणजितसिंहाचे एकतरी लहानसे स्मारक महाराष्ट्रात आहे का ? अजूनही आम्ही भारताच्या इतिहासाचा अभ्यास कुठे करतो आहोत ?

मित्रांनो , मी एक लहानसा प्रयत्न केला। ओरिसा म्हणजे उडिया. आपल्याच भारताचा हा सांस्कृतिक श्रीमंती असलेला देश. उडिया भाषेत शिवचरित्र मी चार वर्षांपूवीर् प्रसिद्ध केले. कटक येथे प्रकाशान झाले. गेल्या चार वर्षात मिळून या शिवचरित्राच्या पन्नास प्रतीही संपलेल्या नाहीत. अधिक काय लिहावे ?

शाहिस्तेखानास आसामच्या मोहिमेतही यश मिळाले नाही. लछितने त्याला जणू पुन्हा एकदा शिवाजीराजांची आठवण करून दिली.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा........

ही चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र. लाल महालात अशी ज्वालामुखीसारखी अचानक उफाळली. खान वाचला. सिंहगडकडे सुखरुपपणे पसार झालेल्या शिवाजीमहाराजांना हा तपशील नंतर समजला. ते जरा खिन्न झाले. कारण जर खान , म्हणजे प्रति औरंगजेबच मारला गेला असता तर केवळ मोगल साम्राज्यातच नव्हे , तर इराण , तुर्काण इतकंच नव्हे तर रुमशाम पावेतो मराठ्यांचा गनिमीकावा रणवाद्यांसारखा दणाणला असता.

गनिमी कावा हे मराठ्यांचे खास खास युद्धतंत्र आहे. या युद्धतंत्राचा अर्वाचीन महाआचार्य म्हणजे चीनचा माओत्सेतुंग आणि व्हिएटनामचा होचिमिन. ते सत्यही आहे. पण आपण माओ आणि मिन यांनी स्वत: वापरलेल्या त्यांच्या जीवनातील गनिमी काव्याचा आणि शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा तैलनिक अभ्यास जरुर करून पाहावा.

लाल महालावरील महाराजांच्या छाप्याच्या बाबतीत मोगलांची प्रतिक्रिया काय ? फक्त घाबरट. दहशत. भाबड्या कल्पनांची विनोदी कारंजी. याच वेळी दिल्लीमध्ये दोन युरोपीय डॉक्टर्स राहत होते. डॉ. थिवेनो आणि डॉ. सिडने ओवेन. या दोघांनी या लाल महाल छापा प्रकरणी लिहून ठेवलं आहे. ' या छाप्याची दहशत एवढी निर्माण झाली आहे की , शिवाजी हा नक्की चेटूकवाला असावा असे लोकांना वाटते. त्याला पंख असावेत. त्याला गुप्त होता येत असावे ' म्हणजे केवळ अफवा , कंड्या आणि अतिशयोक्ती.

हा सारा भाबडेपणा होता. डोळसपणाने मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा अभ्यास कुणीच करीत नव्हतं. आज आपण तो केला पाहिजे.

लष्करी अभ्यासकांनी आणि अनुभवी लष्करी पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या या युद्धपद्धतीचा डोळ्यात तेल घालून अभ्यास केला तर आमच्या हातून पुन्हा ' कारगिल ' सारख्या चुका होणार नाहीत. ' तेजपूर ' सारखा गाफिलपणा होणार नाही. आणि आमच्या संसदेवरच म्हणजे आमच्या राष्ट्राच्या हृदयावरच अतिरेकी छापा टाकणार नाहीत. पाहा पटते का ?

शाहिस्तेखान मात्र कायमचा दु:खी झाला. त्याला आपल्या पराभवापेक्षा भयंकर अन् कायमची होत राहणारी थट्टा , कुचेष्टा असह्य होत असणार. प्रत्येक घासाला त्याला आठवण होत असेल शिवाजीमहाराजांची. उजव्या हाताची तीन बोटेच तुटली ना!

खानाच्या बाबतीत आणखी काही दु:खी घटना लाल महालात आणि एकूण दख्खनच्या भूमीवर घडल्या. लाल महालात उसळलेल्या भयंकर कल्लोळात त्याची एक बायको ठार झाली. त्याचा मुलगा अबुल फतेखान हा तर महाराजांच्या हातूनच मारला गेला. या भयंकर दंगलीत त्याची एक मुलगी नाहिशी झाली. तिचे काय झाले हे कोणालाही आणि इतिहासालाही कधीच समजले नाही. पुढच्या काळात (म्हणजे इ. १६९५ ) प्रख्यात मराठा सेनापती संताजी घोरपडे याचे हातून याच शाहिस्तेखानचा एक मुलगा , हिम्मतखान हा तमीळनाडूत जिंजीच्या मार्गावर असलेल्या जंगलातील युद्धात मारला गेला. शाहिस्तेखान दीर्घायुषी होता. पण या साऱ्या दु:खांची त्याला या दीर्घायुष्यात भयंकर वेदना सहन करावी लागली.

त्याने बांधलेली एक साधी पण सुंदर मशीद औरंगाबादेत आहे. पुण्यातील मंगळवार पेठेस शाहिस्ताखान पेठ असे नाव पडले होते.

प्रचंड सैन्य , खजिना आणि प्रचंड युद्धसाहित्य हाताशी असूनही त्याला मराठ्यांवर तीन वर्षाच्या दीर्घकाळात एकही मोठा विजय मिळवता आला नाही. चाकण जिंकले. त्याला त्याने इस्लामाबाद असे नाव दिले. मोगल साम्राज्यासारख्या एका प्रचंड सत्तेचा तो सरसेनापती म्हणून महाराष्ट्रावर चालून आला. पण त्याच्या यशाच्या पारड्यात चिंचुक्याएवढेही यश पडले नाही. माणसाला कष्ट करून अपयश आले , तर समजू शकते. कारण त्या कष्टातून शिक्षण मिळते. पण केवळ खुचीर्वर बसून गडगंज पगार खाणाऱ्या माणसाने काहीही न करता चकाट्या पिटण्यात आयुष्य घालविले तर ते त्याचेही आणि कार्याचेही अफाट नुकसान असते.

अशी नुकसानी चाललेली आपण आजच्या जीवनात अनेक संस्थांत आणि मुख्यत: शासकीय नोकरशाहीत पाहतो. अशा माणसांच्या कारभारातून ' मेरा भारत महान ' जागतिक महासत्तांच्या शेजारी बसू शकेल काय ? सर्वच क्षेत्रांत आपल्याला केवढा प्रचंड पल्ला गाठायचा आहे! घोषणा तर आपण नेहमीच ऐकतो. त्या घोषणा शेवटी विनोदी ठरतात. अब्जावधी रुपयांची नासाडी करून , लष्करी छावणीत आपल्या मुलींची अफाट खर्चाने लग्न साजरी करणारे शाहिस्तेखान आम्हाला परवडणार नाहीत. आपल्याला तातडीने गरज आहे. संताजी घोरपड्यांची , हंबीरराव मोहित्यांची आणि येसबा दाभाड्यांची. रागावू नका. हा मी उपदेश करत नाही. आजच्या तरुणांकडून एक माझ्यासारखा ऐंशीवं ओलांडलेला नागरिक अपेक्षा करतो आहे. आकांक्षा ठेवतो आहे. त्या पूर्ण व्हाव्यात , त्यापुढती गगन ठेंगणे , माझ्या तरुण मित्रांनो!

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.

मध्यरात्रीच्या गाढ झोपेत असलेला लाल महाल आणि स्वाभाविकरित्या झोपेचीच पेंग येत असलेले पहारेकरी एकदम हल्ला झाल्यानंतर गोंधळून जावेत , त्यांनी केवळ आरडोओरडाच करावा आणि सैरभैर धावत पळत सुटावे हीच अपेक्षा या हल्ल्यामागे महाराजांची होती. केवळ ' केऑस ' काही मावळ्यांनी लाल महालाच्या मुख्य दरवाज्याच्या माथ्यावर असणाऱ्या नगारखान्यात घुसायचे ,
तेथे झोपलेल्या वाद्य वादकांना असेच एकदम उठवायचं आणि तेथील नगारे , कणेर् , तुताऱ्या , ताशे , मफेर् इत्यादी वाद्ये वाजवायला लावायचे हा आणखी एक गोंधळ उडवून देण्याचा प्रकार ठरविलेला होता. तो अगदी तसाच घडला. काही मावळे नगारखान्यात घुसले. त्यांनी त्या झोपलेल्या वादकांना कसे उठविले असेल याचा तर्क करता येतो. भूतपिशाच्चे जणू अचानक आपल्याला झोडपताहेत असेच त्या वादकांना वाटले असेल.
अर्धवट झोपेत ती घाबरलेली माणसं तेथील वाद्ये मराठ्यांच्या दमदाटीवरून जोरजोरात वाजवावयास लागली. काय घडतंय ते त्या वादकांना कळेचना. ते फक्त वाजवीत होते. कारण पाठिशी नागव्या तलवारीचे मावळे मारेकऱ्यासारखे उभे होते. लाल महालातील प्रचंड गोंधळात हा नगारखान्यातील प्रकार सर्वात विलक्षण कल्पक होता. अंधारात सारा महाल जागा होऊन ओरडत अन् किंकाळ्या फोडीत होता. त्यात स्त्रियांचा कल्लोळ भयंकरच होता.
सर्वांचाच या थक्क करणाऱ्या अचानक हल्ल्याने ( सरप्राईजअॅटॅक) किती गोंधळ उडाला असेल याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे घाबरून उठलेला शाहिस्तेखान स्वत: माडीवरून अंगणात सशस्त्र धावत आला. पण शस्त्र कोणचे होते ? धनुष्यबाण! अशावेळी कुणी धनुष्यबाण घेऊन धावेल काय ? तलवार , पट्टा किंवा निदान भाला तरी घेऊन माणूस समोरासमोर शत्रूवर हल्ला करावयास धावेल ना ? पण खान धनुष्यबाण घेऊन धावला. काय उपयोग ?
त्याचा मुलगा अबुल फतेखान हा जर त्याचवेळी अचानक आडवा आला नसता , तर महाराजांच्या हातून खान अंगणातच ठार झाला असता. पण पोरामुळे बाप वाचला. इथं या अबुल फतेखन पुत्राचं खरोखर कौतुकच वाटते. बापासाठी त्याने आपला प्राण खचीर् घातला.
खान मात्र आल्याजिन्याने धावत होता. महाराज आता त्याचा पाठलाग करीत होते. माडीवरती खानाच्या दालनाला लागून ( बहुदा) दक्षिणोत्तर असा एक मोठा दरुणी महाल होता. त्या मोठ्या दिवाणखाण्यात खानाच्या कुटुंबातील आणि अन्य काही स्त्रिया झोपलेल्या होत्या. त्या जाग्या होऊन मोठमोठ्याने ओरडत , किंकाळत होत्या. तिथे एकदोन जमिनीवरची शमादाने होती. त्याचा प्रकाश कितीसा असणार ? काय घडतंय याचा कोणालाच बोध होत नव्हता. फक्त घबराट उडाली होती.
खान पुढे आणि महाराज मागे असा प्रकार होता. गोंधळलेला खान केवळ जीव वाचविण्याकरताच पळत होता. पुसटत्या प्रकाशात महाराज खानाचा पाठलाग करीत होते. स्त्रियांच्या त्या दालनात खान शिरला. तेथे एक मोठा जाडसर पडदा (बाड) होता. खानाने घाईत तो हाताने उडवला. तो आत शिरला. महाराजांनी त्या बाडावर आपल्या धारदार तलवारीचा घाव घातला. पडदा फाटला गेला.
खान घाबरून धावत आल्याचे तेथील बायकांनी पाहिले. काहीतरी भयंकराहूनही भयंकर घडतंय या जाणिवेने त्या त्याहून भयंकर घाबरल्या. केवळ कल्लोळ! पडद्याला पडलेल्या भगदाडातून महाराजांची आकृती आत येताना स्त्रियांनी पाहिली. तिथं असलेली शमादाने कोणा शहाण्या स्त्रीने फुंकून विझविली. अधिकच अंधार झाला. महाराज आता अंदाजाने खानावर धावत होते. खान घाबरून एका खिडकीबाहेर घाईघाईत चढून खाली दबला. हा सुद्धा एकूण उपलब्ध असलेले पुरावे लक्षात घेऊन केलेला अंदाज आहे. महाराजांना वाटले खान येथेच आहे. म्हणून त्यांनी आपल्या तलवारीचा खाडकन घाव घातला. घाव लागल्याचे त्यांना जाणवले. त्यांना वाटले घाव वमीर् लागून खान मेला. अन् महाराज तेथून तडक आल्यावाटेने परत परतले.
संपूर्ण लाल महालाची वास्तु भयंकर कल्लोळाने दणाणत होती. त्यातच नगारखान्यातील वाद्यांचा कल्लोळ चालू होता.
महाराजांचा मुख्य उद्देश मात्र अंधारात अधांतरीच राहीला. खान बचावला. त्याची फक्त तीन बोटे , उजव्या हाताची तलवारीखाली तुटली.
आपले छाप्याचे काम फत्ते झाले असे समजून पूर्वयोजनेप्रमाणे महाराज आणि मावळे लाल महालातून निसटले. लाल महालाबाहेर या साऱ्या कल्लोळाने खडबडून उठलेले छावणीतील खूप मोगली सैनिक जमा झाले होते. त्यांना काहीच बोध होत नव्हता.
खूप मोठा तपशील उपलब्ध असलेले हे ' ऑपरेशन लाल महाल ' असे घडले. हा थोडक्यात अहवाल. मुख्य आहे तो निष्कर्ष. केवळ लष्करी सैनिकांनी आणि सेनाधिकाऱ्यांनीच या ऑपरेशनचा विचार करावा. चिंतन , मनन करावे , असे नाही. योजनाबद्ध काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विषयांतील प्रत्येक कार्यर्कत्याने या इतिहासाचा सूक्ष्मविचार करावा. वर्तमानकाळात याचा कल्पक योजना म्हणून उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही ? ' मॅनेजमेंट ' आणि प्रचंड प्रकल्प हाताळणाऱ्यांनी या लष्करी कथेचा अभ्यास करून पाहावा. त्यातून प्रेरणा , योजना आणि शेवटी यश काबीज करता येईल. पाहा पटते का ?
-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.

राजगडावरून महाराज सुमारे एक हजार सैनिक घेऊन निघाले. (दि। ५ एप्रिल १६६ 3, चैत्र , शुद्ध अष्टमी , रात्री) ते कात्रजचे घाटात आले. कात्रज घाट ऐन पुण्याच्या दक्षिणेला तेरा-चौदा किलोमीटरवर आहे. महाराजांनी या घाटात काही मावळी टोळ्या ठेवल्या. सुमारे पाचशे मावळे घेऊन ते पुण्याच्या रोखाने निघाले.

इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ती अशी. शाहिस्तेखानाने आपल्या पुण्यातल्या छावणीच्या भोवती रात्रीची गस्त घालण्याकरता आवश्यक तेवढे आपले सैनिक रोजी ठेवले होते. यात काही मराठी सरदार आणि सैनिकही होते. मोगलांच्याकडे नोकरी करणारी ही मंडळी खानाने मुद्दाम गस्तीकरता छावणीच्या दक्षिणअंगास रात्रीची फिरती ठेवली होती. हा रिवाज खान पुण्यात आल्यापासून चालू असावा असे वाटते. या सैनिकांचे काम वास्तविक सकाळी उजाडेपर्यंत अपेक्षित असे. पण पुढेपुढे यात ढिलाई होत गेलेली आढळून येते. हे गस्तवाले साधारणत: मध्यरात्री दिडदोन वाजपर्यंतच गस्त घालीत. नंतर हळूच छावणीत परतून येत. ही गोष्टी महाराजांच्या हेरांच्या लक्षात आली. महाराजांनी या संबंध गस्तीचाच अचूक फायदा टिपला.

गस्त घालायला जाणारे लोक छावणीभोवतीच्या मोगली चौकीदारांना माहित झालेले होते. महाराजांनी याचा फायदा घेतला. आपल्या बरोबरच्या सुमारे पाचशे सैनिकांपर्यंत एक जरा मोठी टोळी त्यांनी आपल्यापाशी ठेवली आणि बाकीच्या मराठ्यांना , ठरविल्याप्रमाणे पुढच्या उद्योगास छावणीत पाठविली. हे बिलंदर सैनिक , जणू काही आपणच मोगली छावणीभोवती गस्त घालणारे नेहमीचेच लोक आहोत अशा आविर्भावात छावणीत प्रवेशू लागले. चौकीदारांनी त्यांना हटकलेही. पण ' आम्ही रोजचेच गस्त घालणारे. आम्हाला ओळखलं नाही ? गस्तीहून परत आलो! ' असा जवाब धिटाईनं करून आत प्रवेशले. चौकीदारांना वाटलं की होय , ही रोजचीच गस्तीची मंडळी. परत आली आहेत. चौकीदारांची अशी बेमालूम गंमत करून हे सैनिक ठरल्याप्रमाणे लाल महालाच्या पूवेर्च्या बाजूस पोहोचले. येथे लाल महालाला किल्ल्यासारखा तट नव्हता. उंच भिंत होती. त्या भिंतीत जाण्यायेण्याचा एक दरवाजा होता. पण खानानं तो दगडामातीत बांधकाम करून बंद करून टाकला होता.

या आलेल्या मराठी टोळीनं अतिशय सावध दक्षता घेऊन या बंद केलेल्या दाराच्या बांधकामास भगदाड पाडावयास सुरुवात केली. माणूस आत जाईल एवढं भगदाड. हा उद्योग करीत असताना किती सावधपणे त्यांनी केला असेल याची कल्पना येते. भगदाड हळूहळू पुरेसे पडले. महाराज येईपर्यंत मावळे तेथेच रेंगाळत राहिले. अर्थात सभोवती सामसूमच होती.

ज्या पद्धतीने हे मावळे सैनिक इथपर्यंत आले , त्याच पद्धतीने मागोमाग महाराजही आपल्या टोळीनिशी आले. महाराजांना आपलाच लाल महाल चांगला परिचयाचा होता. खानाने केलेले बांधकामाचे बदलही त्यांना समजले होते. या भगदाडातून प्रथम महाराजांनी आत प्रवेश केला.

इथे महाराजांचा एक अंदाज चुकला. भगदाडाच्या आत लाल महालाचे परसांगण होते. तेथे काही पाण्याचे बांधीव हौद होते. लाल महालाची ही पूवेर्कडील बाजू होती. या बाजूने लाल महालातून परसांगणात यावयास दोन दारे होती. दोहीत अंतर होते. यातील एक दार असेच दगडामातीने चिणून बंद केलेले होते आणि दुसऱ्या दारालगत एक पडवी उभी करून खानाच्या कुटुंबाचा खासा मुदपाकखाना म्हणजे स्वयंपाक करण्याची जागा , तयार केली होती. तेथील आचारी पाणके इत्यादी सुमारे तेरा-चौदा नोकर तेथेच मुदपाकखान्यात रात्री झोपत असत. ते सध्या रोजा असल्यामुळे पहाटे बरेच लवकर उठत आणि कामाला लागत. हे नोकरचाकर अजून उठलेले नसावेत , असा महाराजांचा अंदाज होता. पण तो चुकला आज ते लवकर उठून कामाला लागत होते. आणि महाराजांना लांबूनच हे लक्षात आले. आता ? आता ते लोक आपली चाहूल लागली तर आरडाओरडा करतील अन् साराच डाव वाया जाईल याची कल्पना महाराजांना आली. आता ? आता फक्त एकच करणं शक्य होतं. एकदम मुदपाकखान्यात मावळ्यांनी गुपचूप घुसायचं अन् साऱ्या नोकरांना कापून काढायचं. निरुपाय होता. हे करणं भाग होतं. महाराजांनी आपल्या मावळ्यांना इशारा केला आणि सर् सर् सर् सर् जाऊन मावळ्यांनी या साऱ्या नोकरांना कापून काढलं.

चिणलेल्या त्या दुसऱ्या दरवाजालाही भगदाड पाडून महाराज आत घुसले. मिणमिणत्या दिव्यांच्या पुसट उजेडात फारसं दिसत नव्हतं. मुदपाकखान्याच्या दाराच्या आतल्या बाजूला जो पहारेकरी होता त्याच्यावर पहिला घाव पडला. तो ठार झाला. आणि त्याच्या ओरडण्याच्या आवाजानं माडीवर असलेला शाहिस्तेखान एकदम खडबडून उठला. तो धनुष्यबाण घेऊन माडीवरून खाली अंगणात धावत आला. आणि नेमका महाराजांच्या समोरच तो आला. त्याला काहीच कल्पना नव्हती. त्याचा एक मुलगा , अबुल फतहखान जवळच्याच दालनांत झोपलेला होता. तो खडबडून बाहेर आला. अंगणात , आपल्या वडिलांवर कोणीतरी घाव घालू पाहतोय हे त्याच्या लक्षात आलं. तो वडिलांना वाचविण्यासाठी पुढं आडवा आला अन् महाराजांच्या तलवारीखाली ठार झाला. खान घाईघाईनं परत माडीकडे पळत सुटला.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.

महाराजांचं हेर खातं अत्यंत सावध आणि कुशल होतं. त्यात एकूण किती माणसं काम करीत होती हे तपशीलवार मिळत नाही. बहिर्जी नाईक जाधव , वल्लभदास गुजराथी , सुंदरजी परभुजी गुजराथी , विश्वासराव दिघे एवढीच नावे सापडतात. पण गुप्तरितीनं वावरणाऱ्या या गुप्तहेर खात्यात बरीच माणसे असली पाहिजेत असे वाटते. परदरबारात राजकीय बोलणी करण्यासाठी जाणारे स्वराज्याचे सारे वकील एकप्रकारे गुप्तहेरच होते. मुल्ला हैदर , सखोजी लोहोकरे , कर्माजी , रघुनाथ बल्लाळ कोरडे आदी मंडळी महाराजांच्या वतीने परराज्यांत वकील म्हणून जात होती. पण तेवढीच हेरागिरीही करताना ती दिसतात. पण आणखीन एक उदाहरण या शाहिस्तेखान प्रकरणात ओझरते दिसते. लाल महालात असलेल्या छोट्याशा बागेचे काम करणारा माळी महाराजांचा गुप्तहेर असावा. लाल महालांत घडणाऱ्या अनेक घटना अगदी तपशीलाने महाराजांना समजत होत्या , हे आपल्या सहज लक्षात येते. शाहिस्तेखानाच्या ज्या ज्या सरदारांनी कोकण भागात स्वाऱ्या केल्या , त्या प्रत्येक स्वारीत शिवाजीराजांनी अत्यंत त्वरेने आणि तडफेने त्या स्वाऱ्या पार उधळून लावल्या. हे या मराठी हेरागिरीचेही यश आहे. अफाट समुदावर तर हेरागिरी करणं किती अवघड , मराठ्यांनी सागरी हेरागिरीही फत्ते केली आहे.

आता तर महाराज प्रत्यक्ष लाल महालांवरच एका मध्यरात्री छापा घालणार होते. सव्वा लाख फौजेच्या गराड्यात असलेला लालमहाल पूर्ण बंदोबस्तात होता. खानाने या महालांच्या दालनांत काही काही फरक केले होते. म्हणजे बांधकामे केली होती. कुठे भिंती घातल्या होत्या , कुठे दरवाजे बांधकामाने चिणून बुजवून टाकले होते. जनान्याचे भाग , मुदपाकखाना , पुरुषांच्या खोल्या इतर खोल्या , त्यांवरील पहाऱ्यांच्या व्यवस्था इत्यादी अनेक गोष्टी लाल महालाबाहेर कोणाला तपशीलवार समजणे सोपे नव्हते. पण महाराजांनी जो लाल महालावर छापा घालण्याचा बेत केला , तो अगदी माहितगारी असलेल्या कोणा मराठी हेराच्या गुप्त मदतीनेच. जर अधिक माहिती ऐतिहासिक नव्या संशोधनाने उपलब्ध होईल , तर हे मराठी हेरखात्याच्या कर्तबगारीवर छान प्रकाश पडेल. आज मराठ्यांना मिळालेल्या यशांचा तपशील लक्षात घेऊन हेरांचे कर्तृत्त्व मापावे लागते आहे.

हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा. तो अखंड उघडा आणि सावधच असावा लागतो. शिवकाळातील हेरखाते हे निविर्वाद अप्रतिम होते. हेर पक्का स्वराज्यनिष्ठ असावाच लागतो. तो जर परकीयांशी ' देवाणघेवाण ' करू लागला , तर नाश ठरलेलाच असतो. हेर अत्यंत चाणाक्ष , बुद्धीवान आणि हरहुन्नरी असावा लागतो. पुढच्या एका घटनेचा आत्ता नुसता उल्लेख करतो. कारवारच्या मोहिमेत मराठी हेरांनी उत्तम कामगिरी केली. पण एका हेराकडून कुचराई आणि चुका झाल्या. महाराजांनी त्याला जरब दाखविलीच.

आता महाराज प्रत्यक्ष लाल महालावरच झडप घालून शाहिस्तेखानाला ठार मारण्याचा विचार करीत होते. ही कल्पनाच अफाट होती. सव्वा लाखाची छावणी. त्यात बंदिस्त लाल महाल. त्यात एका बंदिस्त दालनात खान. अन् त्याला गाठून छापा घालायचा. हे कवितेतच शक्य होते. पण असं अचाट धाडस महाराजांनी आखले. हल्लीच्या युद्धतंत्रात ' कमांडोज ' नावाचा एक प्रकार सर्वांना ऐकून माहिती आहे. महाराजांचे सारेच सैनिक कमांडोज होते. पण त्यात पुन्हा अधिक पटाईत असे जवान महाराजांपाशी होते. त्याचे प्रत्यंतर लाल महालाच्या छाप्यात येते. ' ऑपरेशन लाल महाल ' असेच या छाप्याला नाव देता येईल. ही संपूर्ण मोहिम मुख्यत: हेरांच्या करामतीवर अवलंबून होती. सारा तपशील एखाद्या स्वतंत्र प्रबंधातच. मांडावा लागेल. पण या ऑपरेशन लाल महालचा अभ्यास महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांनिशी इतका बारकाईने केला आहे की , आपले मन या एकविसाव्या शतकाच्या वेशीत थक्क होऊन जाते. या गनिमी छाप्यासाठी महाराजांनी वेळ निवडली मध्यरात्रीची. मराठ्यांचे बहुसंख्य छापे रात्रीच्या अंधारातलेच आहेत. लाल महालावरच्या छाप्यासाठी महाराजांनी चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र निवडली. पुढच्या उजाडत्या चैत्र शुद्ध नवमीस प्रभू राम जन्मास येणार होते! रामनवमी.

याच महिन्यात मोगलांचे पवित्र रोज्याचे उपवास सुरू झाले होते. छाप्याच्या रात्री सहावा रोजा होता. आकाशातला चंद छाप्याच्या सुमारास पूर्ण मावळणार होता. पण याचा इथं कुठं संबंध आला ? आला ना! मोगली सैन्य रोजाच्या उपवासामुळे रात्र झाल्यावर भरपूर जेवण करून सुस्तावणार हा अंदाज खरा ठरणार होता. खुद्द शाहिस्तेखानाच्या कुटुंबात हीच स्थिती असणार. शिवाय दिवस उन्हाळ्याचे. शेजारीच असलेल्या मुठा नदीला पाणी जेमतेमच असणार. छापा घालून झटकन ही नदी ओलांडून भांबुडर््याच्या (सध्याचे शिवाजीनगर) भागात आपल्याला पसार होता येणार आणि अगदी जवळ असलेल्या सिंहगडावर पोहोचता येणार हे लक्षात घेऊन महाराजांनी हे ऑपरेशन आखले होते.

छाप्यातल्या कमांडोजनी कसेकसे , कुठेकुठे , कायकाय करायचे ते अगदी निश्चित केलेले होते. संपूर्ण तपशीलच इतका रेखीव आहे की , या ऑपरेशन लाल महालची आठदहावेळा महाराजांनी राजगडावर ' रिहर्सल ' केली असावी की काय असा दाट तर्क-तर्कच नव्हे खात्री होते. कारण जे घडले ते इतके बिनचूक घडले की , असे घडणे कधीही ऐत्यावेळेला होत नसते. आपण तपशील पाहूच.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.

गेल्या चार वर्षांत (इ. स. १६५९ ते ६२ ) असंख्य कर्तबगारांनी अपार कष्टानं , महाराजांच्या योजने आणि आसेप्रमाणे कर्तबगारीची शर्थ केली होती. त्यातील कित्येकजण रणांगणावर ठार झाले होते. जिवा महाला सकपाळ , रामाजी पांगेरे , शिवा काशीद , मायनाक भंडारी , बाजीप्रभू , कावजी मल्हार , बाजी पासलकर , वाघोजी तुपे , बाजी घोलप , अज्ञानदास शाहीर , कान्होजी जेधे आता किती जणांची नावं सांगू ? या स्वराज्यनिष्ठांच्या आणि कर्तबगारांच्या रांगाच्यारांगा महाराजांच्या पाठिशी उभ्या होत्या. त्यामुळेच स्वराज्य सुंदर आणि संपन्न बनत होतं. कुणाचं नाव विसरलं तरी स्वर्गातून माझ्यावर कुणी रागावणार नाही.

पण महाराज मात्र कुणालाही विसरत नव्हते. होते त्यांनाही अन् जे गेले त्यांनाही. शाहिस्तेखानाने उंबरखिंडीच्या लढाईनंतर पुढच्या लढाईची (म्हणजे पराभवाची) तयारी केली. त्याने कोकणातील ठाण्याजवळील कोहजगड नावाचा किल्ला घेण्यासाठी आपली फौज पाठविली. तीही मार खाऊन परतली. आपल्या लक्षात आलंय ना ? की , शाहिस्तेखान एका चाकणच्या मोहिमेशिवाय कुठल्याही मोहिमेवर स्वत: गेला नाही. अन् प्रत्येक मोहिमेमध्ये महाराज स्वत: भाग घेताहेत.

इ. स. १६६३ साल उजाडलं. शाहिस्तेखानानं स्वत: जातीने एक प्रचंड मोहिम योजिली. कोणती ? स्वत:च्या मुलीच्या लग्नाची! खरंच! आपल्या बहिणीच्या मुलाशी त्याने आपल्या मुलीचं लग्न ठरविलं. लग्न अर्थात पुण्यात , लष्करी छावणीत होणार होतं. लाल महालाचं मंगल कार्यालय झालं होतं. मुलाच्या आईचं नाव होतं. दहरआरा बेगम. ही अर्थात खानाची बहीणच. तिच्या नवऱ्याचं नाव जाफरखान. हा यावेळी प्रत्यक्ष औरंगजेबाचा मुख्य वजीर होता. तो या लग्नासाठी पुण्यास येणार होता. आला ही. प्रचंड लवाजमा. प्रचंड थाटमाट. वेगवेगळ्या लग्नीय समारंभांची रेलचेल. खाणंपिणं. सगळी छावणी लग्नात मग्न. शाहिस्तेखानाची केवढी ही टोलेजंग लग्नमोहिम!

अन् समोर दक्षिणेकडे अवघ्या पन्नास किलोमीटरवर एक ढाण्या वाघोबा जबडा पसरून झेप घेण्यासाठी पुढचे पंजे आपटीत होता ; त्याचं नाव शिवाजीराजा.

शाहिस्तेखानाचं हे काय चाललं होतं ? तो शिवाजीराजासारख्या महाभयंकर कर्दनकाळावर मोहिम काढून आला होता की , आपल्या पोरापोरींची छावणीत लग्न लावायला आला होता ? या खानाला विवेकशून्य , बेजबाबदार आणि चंगळबाज म्हणू नये तर काय म्हणावं ? त्याला शिवाजीराजा समजलाच नाही। त्याला गनिमी कावा उमजलाच नाही. त्याला इथला भूगोल कळलाच नाही. आता या मोगली चैनी पुढे बेचैन शिवाजीराजांचा आपण अभ्यास करावा. वास्तविक पुण्यात आल्यापासून एका चाकणशिवाय शाहिस्तेखानानं काय मिळविलं ? काहीही नाही. हा तीन वर्षाचा हिशोब. अन् आता मुलीचं अफाट खर्चानं लग्न. पुढं काय झालं ते मी सांगतोच. पण आपल्याला ते आधीच माहितीच आहे की! शाहिस्तेखानाची प्रचंड फटफजिती.

एक मात्र सांगितलं पाहिजे. खानानं स्वराज्याचं , त्याने कब्जात घेतलेल्या भागाचं फार नुकसान केलं. लूटमार , स्त्रियांची बेअब्रू , मंदिरांची नासधूस , खेड्यापाड्यांचा विध्वंस. मात्र आश्चर्य वाटतं की , पुण्यात तो जिथं राहत होता त्या लालमहाल वाड्याच्या अगदी जवळच असलेल्या कसबागणपती मंदिराला त्यानं उपदव दिला नाही. आळंदी , चिंचवड , देहू , थेऊर इत्यादी देवस्थानांनाही त्याने त्रास दिल्याची एकही नोंद सापडलेली नाही.

शाहिस्तेखानचे मूळ नाव अबू तालिब. तो इराणी होता. मिर्झा अमीर उल् उमरा हैबतजंग नबाब शाहिस्तेखान अबू तालिब हे त्याचं पदव्यासकट नाव. तो औरंगजेबाचा मामा होता. ' शाहिस्तेखान म्हणजे औरंगजेब बादशाहची दुसरी प्रतिमाच ' असं त्याचं वर्णन एका मराठी बखरीत आले आहे. पण औरंगजेबातला एकही सद्गुण या मामात दिसत नाही.

खानाकडचा लग्नसोहळा प्रचंड थाटामाटात दोनतीन आठवडे चालू होता। या संपूर्ण छावणीच्या अवस्थेची माहिती महाराजांना राजगडावर समजत होती. त्यांच्या मनात काहीतरी आपल्या बौद्धिक करामतीचा. उत्पटांग डाव ते खानावर टाकू पाहात होते. याचवेळी त्यांनी सोनो विश्वनाथ डबीर या आपल्या वयोवृद्ध वकीलांना पुण्यास खानाच्या भेटीसाठी पाठवावयाचे ठरविले. पाठविलेही. पण खानाने सोनो विश्वनाथांची भेट घ्यावयाचेच नाकारले. टाळले. या बिलंदर शिवाजीराजाच्या कलंदर वकिलांशी भेटायलाच नको. पूवीर् अफझलखान , सिद्दी जौहर , कारतलबखान यांची या मराठी वकिलांनी कशी दाणादाण उडविली हे त्याला नक्कीच माहिती होतं. तसे आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून असेल पण त्याने भेट नाकारली. म्हणजे परीक्षेला बसायलाच नको म्हणजे मग नापास होण्याची अजिबात भीती नसते.

सोनो विश्वनाथ राजगडास परत आले. काही घडलेच नाही त्यामुळेच या महाराजांच्या डावाचा उलगडा इतिहासाला होत नाही.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.

दारिद्य कोणाच्या वाट्याला आलं तर ते दु:खदायकच आहे. त्यानं प्रयत्नाला देव मानून उत्तम व्यवहारे धन जोडावे संसार गोड करावा. हौसेनं करावा. ज्याला हौस नाही त्यानं संसार आणि राज्यकारभार करूच नये.

अन् दारिद्याचा अभिमान धरणं हा तर गुन्हा आहे. शिवाजीराजांनी माणसांना कष्ट करण्याची चटक लावली. हौस निर्माण केली. म्हणूनच शिवकालीन पत्रात आणि शिवकालीन काही कवींच्या काव्यात सहज उल्लेख येऊन जातात की , ' हे राज्य श्रींच्या आशीर्वादाचं आहे ' ' राज्येश्रींचे राज्य म्हणजे देवताभूमी. ' एका विरकत बैराग्यानं तर म्हटलं की , ' अशुद्ध अन्न सेवो नये ' अशुद्ध अन्न म्हणजे ? अयोग्य , पापी , भ्रष्टाचारी मार्गाने मिळविलेली धनधान्य दौलत. तिचा उपभोग घेऊ नये. श्रमाने मिळवावे. श्रम म्हणजे देवपूजा. आम्हाला केवढी मोठी माणसं इतिहासात मिळाली पाहा! शिवाजीराजांसारखा विरक्त , उपभोगशून्य छत्रपती. चक्रवतीर्. जिजाऊसाहेबांच्यासारखी ' कादंबिनीव जगजीवनदान हेतू: ' असलेली आई , राजमाता. नव्हे स्वराज्यमाता आम्हाला या मराठी मातेनं दिली. या मायलेकरांच्या जीवनांत चंगळमंगळ अन् उधळपट्टी केल्याची एकही नोंद , उल्लेख गवसत नाही.

कादंबिनीव म्हणजे योगिनीप्रमाणे. धर्मपुरुष आम्हाला लाभले तेही सोन्यामोत्यांना ' मृत्तिकेसमान ' मानणारे श्रीतुकाराम महाराजांसारखे तोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी , जोवरी देखिला नाही दृष्टी तुकाराम. या शिवकाळातील सारेच संतसत्पुरुष असे होते. मठ करून ताठा करणारे नव्हते. जनतेच्या भाबड्या श्रद्धेचा उपयोग करून ' इस्टेटी ' निर्माण करणारे नव्हते. म्हणूनच रयत सुसंस्कारांच्या अभ्यंग स्नानात नहात होती. याचा अर्थ इथं शिवाजीराजांच्या पाच-दहा वर्षांच्या स्वराज्यकाळात अगदी स्वर्गलोक अवतरला असंही नव्हे. समाजाची गती ही सावकाशच असते. स्वराज्यपूर्व काळातील इथलं लोकजीवन किती केविलवाणं होतं. पण स्वराज्य वाढू लागल्यापासून तेच जीवन बदलत गेलं. माणसा खावया अन्न नाही अशी अवस्था असलेला मराठी मुलुख स्वराज्यात भरल्या कणगीला टेकून पोटभर भाकरतुकडा खाऊ लागला होता.

इ. स. १६६१ ची कोकण मोहिम संपवून महाराज राजगडास परतले. प्रतापगड ते पन्हाळगड या भयंकर कठीण युद्धकाळातून महाराज अगदी तावून सुलाखून बाहेर पडले होते. अजून शाहिस्तेखान पुण्यात होताच. स्वराज्याचे हेर पुण्यावरती घिरट्या घालीतच होते. त्याचे मोठे यश म्हणजे उंबरखिंडीत केलेला कारतलबखानचा दणदणीत पराभव. पण याच साऱ्या घाईगदीर्तून वेळ काढून महाराजांनी गडावर जखमनाम्याचा दरबार भरविला. जखमनामा म्हणजे ज्यांनी ज्यांनी युद्धात कामगिऱ्या केल्या त्या कर्तबगारांचे भर दरबारात भरघोस कौतुक. याच काळात अज्ञानदास उर्फ आगीनदास नावाचा एक नामवंत शाहीर मराठी मुलुखांत गाजतगर्जत होता. या कौतुकाच्या दरबारात महाराजांनी युक्तिबुद्धिवंतांचे छान कौतुक केले या शाहीराचेही. जेधे नाईकांना त्यांनी मानाचे तलवारीचे पहिले पान दिले. वकिलांना ओंजळी ओंजळीने होन आणि शेलापागोटी दिली. युद्धात जे खचीर् पडले त्यांच्या बायकापोरांना ' अडीचसेरी ' म्हणजे पेन्शन दिले. कोणालाही उणे पडू दिले नाही.

आज आपणही पाहतो ना! आपले राष्ट्रपती अशाच राष्ट्रवीरांना , लोकसेवकांना , कलावंतांना आणि संशोधकांना गौरवाची मानचिन्हे दिल्लीत सन्मानपूर्वक देतात. अशोकचक्र , परमवीरचक्र आणि आमच्यातील महामानवांना भारतरत्न अशासारखे शिरपेंच अर्पण करतात. महाराजांनीही आपल्या कतृत्त्ववंतांचं भरघोस कौतुक केलं नेहमीच.

अशाच काळात शाहिस्तेखानाच्या छावणीतून खानाचा भाचा नामदारखान हा कोकणातील पेण , पनवेलजवळच्या मिऱ्या डोंगर उर्फ मिरागड या किल्ल्यावर फौज घेऊन निघाला. राजगडावर खबरा आल्या. महाराजांना शिकारीची संधी आल्यासारखंच वाटलं असावं. ते महाडच्या बाजूने कोकणात उतरले. मिरागड उत्तरेस आहे आणि महाराजांनी मिऱ्या डोंगरावर हल्ला करणाऱ्या नामदारखानाला आणि त्याच्या शाही फौजेला अचानक हल्ला करून असं झोडपून काढलं की , जणू लोहार तापून लाल झालेल्या लोखंडावर दणादणा घाव घालतो तसं. नामदारखान आपल्या पूर्वपरंपरेप्रमाणे पळून गेला. सारी मोगली मोहिम साफ फसली. ही मोहिम इ. स. १६६२ च्या प्रारंभी झाली. नक्की तारीख सापडत नाही. या मोहिमेत स्वत: महाराज रणांगणावर झुंजत होते. महाराजांच्या या अविश्रांत परिश्रमांना काय म्हणावे ? महाराजांना विश्रांती सोसत नव्हती. त्यांच्या संपूर्ण जीवनात खास विश्रांतीकरता ते एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी दोनचार महिने जाऊन राहिल्याची नोंद सापडत नाही. स्वराज्यसाधनाची लगबग त्यांनी कैसी केली ?

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.

संगमेश्वराच्याच जवळ १२ किलोमीटरवर शृंगारपूर या नावाचं गाव आहे. हे गाव महाराजांनी जिंकलं. जिंकण्यासाठी युद्ध करायची वेळच आली नाही. तेथील शाही जाहगिरदार महाराजांच्या दहशतीने पळूनच गेला. त्यामुळे शृंगारपूर बिनविरोध महाराजांना मिळाले.

गावाच्या पूवेर्ला सहा किलोमीटरवर एक प्रचंड डोंगरी किल्ला होता. त्याचं नाव प्रचीतगड. गडावर आदिलशाही सत्ता होती. तानाजी मालुसऱ्यांनी या गडावर हल्ला चढवून एकाच छाप्यात किल्ला घेतला. केवढं नवल! सहा सहा महिने लढू शकणारे किल्ले शाही फौजांना एक दिवसभरही झुंजवता आले नाहीत. मराठ्यांनी गड घेतला. झेंडा लागला. महाराजांना विजयाची वार्ता गेली. ते पालखीतून प्रचीतगडावर निघाले. बरोबर थोडं मावळी सैन्य होतं. महाराज गडावर पालखीतून येत आहेत हे पाहून गड जिंकणाऱ्या मराठ्यांना अपरंपार आनंद झाला. आपला विजय बघण्यासाठी खास महाराजस्वारी जातीनं येत आहे हा खरोखर दुमिर्ळ योग होता. तानाजीला तर आनंदानं आभाळ भरून आल्यासारखं झालं. गडावरचे लोक गर्जत होते ; वाद्य वाजत होते. महाराज गडावर आले.

दरवाज्यातून आत प्रवेशले. मावळ्यांना आनंदाचं उधाण आलं होतं. जणू इथूनच महाराजांची पालखीमधून त्यांनी मिरवणूक सुरू केली. महाराज लोकांचे स्वागत हसतमुखाने स्वीकारीत पालखीत बसले होते. यावेळी वारा सुटला होता. भळाळणाऱ्या वाऱ्यानं झाडं झुडपं हेलावत होती. महाराजांच्या अंगावरचा शेला फडफडत होता. नकळत शेल्याचा फलकावा पालखीबाहेर लोंबत होता. तो वाऱ्याने उडत होता. मिरवणूक चालली होती. एवढ्यात गचकन कुणीतरी मागे खेचावं असा महाराजांच्या पालखीला जरा हिसका बसला. शेला खेचला गेला. ते पाहू लागले. भोई थांबले. काय झालं तरी काय ? पाहतात तो महाराजांच्या शेल्याचं पालखीबाहेर पडलेलं टोक एका बोरीच्या झुडपाला वाऱ्याने अटकलं गेलं होतं. बोरीला काटे असतात. शेला अटकला. महाराज बघत होते. त्यांना गंमत वाटली.

मावळे काट्यात अटकलेला शेला अलगद काढू लागले. शेला निघाला. पण महाराज हसून सहज गंमतीने म्हणाले , ' या बोरीनं मजला थांबविले. येथे खणा ' मावळ्यांनी पहारी , फावडी आणली आणि त्यांनी बोरीखालची जमीन खणावयास सुरुवात केली. केवळ गंमत म्हणून महाराज बोलले. सगळ्यांचाच उत्साह दांडगा. अन् खणताखणता पहारी लगेच अडखळल्या. माती दूर केली. बघतात तो सोन्यानाण्यांनी भरलेला हंडा! हा केवळ योगायोग होता. महाराजांना भूमीगत धन मिळाले. ते धन कुठे गेले ? महाराजांच्या घरी ? ' कमिशन ' म्हणून काही ' हप्ते ' कोणाकोणाला मिळाले का ?

नाही , नाही , नाही! हे सर्व धन स्वराज्याच्या खजिन्यात जमा झाले.

इथे एक गोष्ट लक्षात येते. महाराजांना एकूण तीन ठिकाणी असे भूमीगत धन मिळाले. तोरणगडावर , कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर आणि हे असं प्रचीतगडावर. हे धन स्वराज्याचं. म्हणजेच रयतेचं. म्हणजेच देवाचं.

पूवीर् महाराजांच्या आजोबांना , म्हणजे मालोजीराव भोसल्यांना वेरूळच्या त्यांच्या शेतातच भूमीगत धन मिळालं. ते मालोजींनी श्रीधृष्णेश्वराचे मंदिर , शिखर शिंगणापूरचा तलाव , एक यात्रेकरूंच्यासाठी धर्मशाळेसारखी म्हणा किंवा मठासारखी म्हणा इमारत अन् अशाच लोकोपयोगी कार्यासाठी खर्च केलं. आपल्या आजोबांचा हा वारसा महाराजांनी आजही सांभाळला. योगायोगानं पण मालकी हक्कानेच मिळालेलं धन मालोजीराजांनी आणि आता शिवाजीराजांनी जनताजनार्दनाच्या पायांपाशी ' श्रीकृष्णार्पणमस्तु ' म्हणत खजिन्यात जमा केलं. देवाचं दान आण जनतेचं धन असेच वापरावयाचे असते. त्याचा अपहार करणे हे महत्पाप.

एक गोष्ट सांगू का ? महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला एका पैशाचेही कर्ज कधीही नव्हते. किंवा खजिन्यात खडखडाट झाला आहे अशी अवस्थाही कधी निर्माण झाली नाही. याचे एक कारण समजले ना ? अपहार , भ्रष्टाचार , पिळवणूक , लुबाडणूक हे शब्दच स्वराज्यात असता कामा नये हा आदर्श महाराजांनी घालून दिला. स्वराज्याचा खजिना नेहमीच शिलकीचा होता.

जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आम्हाला आवर्जून सांगितलं आहे की ,

' जीहुनिया धन उत्तम वेव्हारे

उदासविचारे वेंच करी '

चांगल्या मार्गाने , खूप धन मिळवा आणि उदार मनाने खर्चही करा , हा महराजांचा आदेश होता आणि आहे.

प्रचीतगडची ही तानाजीची मोहिम इ. १६६१ च्या पावसाळ्याच्या पूर्वी झाली.


-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे