शनिवार, २८ मार्च, २००९

शिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.

महाराष्ट्राला विशाल सागरी किनारा लाभला आहे. निसर्गानेच अशी रचना केली आहे की , महाराष्ट्राच्या पश्चिमेला हा समुद आणि किनाऱ्यावरची जंगलमय कोकणपट्टी दक्षिणोत्तर पसरलेली आहे. पूवेर्स घाटावरचा देश , मधून बलदंड आणि नदीनाल्यांनी सजलेला सहस्त्रशीर्ष सह्यादी असे हे महाराष्ट्राचे रूप आहे. त्यात कोकणपट्टा समुदाच्या सान्निध्यामुळे अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तेवढाच तो सांभाळावयास जोखमीचाही ठरतो. कारण या पश्चिम समुदाच्या बाजूने सारे पश्चिमी जग कोकणावर हल्ले करावयास सतत टपलेले असावयाचे. युरोपीय अठरा टोपीवाले , क्रूर सत्ताकांक्षी अरब आणि दैत्यवृत्तीचे औबिसिनियन काळे हबशी यांची ग्रहणे कोकणपट्टीला सततच ग्रासत असत.

चाचेगिरी करणाऱ्यांची क्रूर धाड जवळजवळ रोजच कुठे ना कुठे पडतच असायची. पोर्तुगीज आणि सिद्दी यांनी कोकणच्या काही भागात आपली सत्ताच कायमची मांडली होती. त्यांच्या जोडीला आता (इ. स. १६६४ पासून पुढे) इंग्रज मुंबईत कायमचे सत्ताधारी होऊन बसले होते. शिवाजीमहाराजांनी या संपूर्ण कोकण कुंडलीचा सुरतेपासून कारवारपर्यंतचा पुरेपूर अभ्यास (सव्हेर्) केलेला दिसून येतो. आपल्या हिंदवी स्वराज्याची ही पश्चिम सरहद्द समुदाला बिलगलेली असणार अन् हा समुद अनेक शत्रूंनी सततच व्याप्त असणार हे ओळखून संपूर्ण कोकणपट्टाच विनाअपवाद स्वराज्यात असला पाहिजे , असा त्यांचा ठाम निष्कर्ष आणि निर्णय होता.

महाराजांना कोकणपट्टीवर माणसे फार फार चांगली मिळाली. उरणपासून कारवारपर्यंतच्या या कोकणात जवळजवळ साठ टक्के प्रदेश आणि किनारा महाराजांना या कोकणी माणसांनी जिंकून दिला. पण पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला पश्चिम ठाणे जिल्हा , गोमांतक आणि सिद्दींच्या ताब्यात असलेला मुरुड जंजिरा , त्याचप्रमाणे मुंबईची सात बेटे व्यापून बसलेल्या इंग्रजांना समूळ उखडून काढण्याची महाराजांची महत्त्वाकांक्षी धडपड शंभर टक्के कधीच यशस्वी होऊ शकली नाही. याचा अभ्यास झाला पाहिजे. का होऊ शकली नाही ? कोणचे बळ कमी पडले ? माणसे तर मासळीसारखी चपळ , पोलादासारखी कणखर , कोल्ह्यासारखी बुद्धिमान , चतुर वाघासारखी तिखट , सुसरीसारखी डाव साधणारी अन् मुत्सद्देगिरीत कलमी आंब्यासारखी गोड अशी महाराजांना लाभली होती. मग महाराजांपाशी असे काय कमी पडले , की त्यांना सिद्दी , फिरंगी अन् इंग्रजी वैऱ्यांना समूळ उखडता आले नाही ?

एक तर मराठी आरमार हजार वर्षानंतर अगदी नव्यानेच समुदात उतरले होते. आरमारावरची युद्धसामग्री शत्रूपेक्षा कमीच अन् नवी होती. आगरी , भंडारी , कोळी , गावित कुणबी इत्यादी सगळे कोकणी मराठे पार्थपराक्रमी होते. पण अभिमन्युसारखे जरा नवीनच होते. त्यामुळे वेळ खाणारी सागरी युद्धे महाराजांना जास्तच वेळ खर्च करून लढावी लागली. यश मिळत होते. पण गती कमी पडत होती. वेळच कमी पडत होता. त्यामुळे महाराजांची हयात संपली पण हे तीन परके शत्रू शिल्लक उरले.

आता यातून मुद्दा असा की , महाराजांचा आरमारी ध्येयवाद लक्षात घेऊन पुढे पेशव्यांनी या तीनही वैऱ्यांना कायमचे नष्ट करण्याचे ध्येय प्रथम क्रमांकाने डोळ्यापुढे ठेवावयास हवे होते. देशावरचा अखिल भारतीय स्वराज्य विस्ताराचा व्याप पेशव्यांनी स्वीकारल्यामुळे आरमाराकडे म्हणजेच सागरी सरहद्दीकडे पेशव्यांचे बळ कमी पडले. त्यातून पुन्हा आपसातील भांडणे आम्हाला बाधली. त्यामुळेच हे तीन वैरी आमच्या छाताडावर कायमचे बंदूकी रोखून टिकू शकले. कान्होजी आंग्रे आणि आंग्रे परिवार आनंदराव धुळप आणि धुळप परिवार हाही तेवढाच शूर होता. पोर्तुगीजांची उत्तर कोकण किनाऱ्यावर दाणादाण उडविणारा चिमाजी अप्पा , शंकराजी महादेव फडके , खंडोजी माणकर , अणजूरकर नाईक वगैरे मंडळीही तेवढीच कर्तबगार होती.

इ. स. १७५१ मध्ये तर पेशव्यांच्या एका हेरवाडकर सरदाराने गोव्यात फोंड्याजवळ खासा पोर्तुगीज गव्हर्नर जनरललाच रणात ठार मारले. इ. स. १७३७ मध्ये पेशव्यांनी जंजिऱ्याचा खासा सुलतान सिद्दी सात याला रणात उरण येथे ठार मारले. इतिहास घडला पण वर्तमान घडले नाही. टिकले नाही. याचे कारण नेमकेच सांगायचे झाले , तर छत्रपती शिवाजीमहाराजांचे धोरण आणि अनुकरण या मंडळींना साधले नाही. आपसात वैर अन् वैऱ्यावर खैर करीत राहिलो आम्ही. इ. स. १७५५ मध्ये आपसातील भांडणापायी नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेऊन सुवर्णदुर्गाजवळ आंग्ऱ्यांचे म्हणजेच स्वराज्याचे आरमार भगव्या झेंड्यासकट समुदात बुडविले.

इतिहासात आमच्या कोणच्या ना कोणच्यातरी अन् एकूण सर्वांच्याच चुका झाल्या. त्याचे परिणाम राष्ट्राला भोगावे लागले. ' हे राज्य एक आहे ' असे आज्ञापत्रात महाराजांचे मनोगत अमात्यांनी लिहून ठेवले आहे. म्हणजेच राष्ट्रीय एकतेचा , चारित्र्याचा आणि उत्तुंग महत्त्वाकांक्षेचा महाराजांनी दिलेला धागा आणि आदेश आम्ही विसरलो. अजूनही विसरलेलेच आहोत. आपसातल्या भांडणांपायी , क्षुद मानापमानापायी , स्वार्थापायी अन् एकमेकांशी व्यक्तीगत आणि सामाजिक पातळीवरून भांडतो आहोत अन् भांडताना जयघोष मात्र शिवाजी महाराजांचा करतो आहोत. विवेक हरवला आहे. नित्य नवा दिन जागृतीचा उगवतच नाही. पण काय करावे ? कुणी चैनीत वारा खाण्यात गंुतलाय , कुणी चारा खाण्यात गुंतलाय. कुणी गुटखा खाण्यात गुंतलाय. वैतागलेल्या गरिबांना व्यवस्थित आत्महत्या करण्याइतके विष खरेदी करायलाही पैसे नाहीत. करंटे मिळाले सर्वही , जो तो ' दु ' र्बुद्धीच सांगतो.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.

दिल्लीत औरंगजेब वैतागला होता ' शिवाजी ' नावाच्या दुखण्याला. इ. स. १६६० पासून त्याने महाराष्ट्रावर सतत स्वाऱ्या चालू ठेवल्या. मोगल , राजपूत , पठाण , अरब , रझाकी , इराणी अन् असेच अनेक लढवय्ये सेनापती आणि सैनिक तो स्वराज्यावर पाठवीत होता. युद्धसाहित्य आणि पैसा अपरंपार ओतीत होता. मनुष्यबळाला तोटा नव्हता , तरीही कोणालाही शिवाजी महाराजांच्या विरुद्ध यश मिळत नव्हते. मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखान पठाण यांचा अपवाद सोडला तर बाकी सगळे सेनानी नापास होत होते.

एक गोष्ट लक्षात येते की , औरंगजेब स्वत: महाराजांविरुद्ध स्वराज्यावर कधीही चालून आला नाही. त्याच्या मनात सतत एक धास्ती होती की , माझाच पराभव झाला , तर काय होईल. म्हणून तो धोका पत्करत नव्हता. महाराज आग्ऱ्यात आणि आपल्या जबड्यात गवसले असतानाही पसार झाले. याचा त्याला अतिशय पश्चाताप होत होता. पश्चाताप ? होय पश्चाताप , तो त्याने आपल्या स्वत:च्या तोंडाने पुढे अनेकदा बोलून दाखवला आहे. त्याच्या नोंदी त्याच्या स्वत:च्या डायरीत आहेत. तो सतत पुढे बोलून दाखवीत असे की , ' मी माझ्या आयुष्यात सर्वात मोठी भयंकर चूक केली. मी त्या शिवाजीला आग्ऱ्यात ताबडतोब ठार मारले नाही. '

इ.स. १६७० ते ७२ या तीन वर्षात मराठ्यांनी मोगलांना अक्षरश: हैराण केले. त्यावेळी दिलेरखान स्वत: मराठी मुलुखांवर आणि किल्ल्यांवर हल्ले चढवीत होता. पण जो अनुभव त्याला पुरंदर किल्ल्याशी झुंजताना आला , तोच अनुभव सतत येत गेला.

याच काळात दिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला. या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेले होते. त्यातीलच कण्हेरा गड या नावाचा डोंगरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दिलेरखान हा कण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंत कडवा आणि हट्टी असा सरदार होता.

कण्हेऱ्याच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या सातशे मराठी पायदळानिशी तळ ठोकून होता. कारण मोगलांच्या फौजा केव्हा स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता. म्हणून ही सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती. या तुकडीचा नेता होता रामाजी पांगेरा. हा रामाजी विलक्षण शूर होता. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते. (दि. १० नोव्हेंबर १६५९ ) त्याने पराक्रमाची शर्थ केली. तो हा रामाजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी होता. एक दिवस दिवसाउजेडी त्याला हेरांनी खबर दिली की , औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ घेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे.

दिलेरची फौज खरोखरच मोठी होती. त्याच्यापुढे रामाजीची फौज चिमूटभरच होती. ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामाजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कण्हेरा गडावर जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते. पण रामाजी पांगेऱ्यातला वाघोबा चवताळून उठला. तो आपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभा राहीला. दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला समजलेच होते. रामाजी आपल्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्या आवेशात तो गरजला , ' मर्दांनो , खानाशी झुंजायचंय , जे जातीचे असतील , ( म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ते) येतील. मर्दांनो , लढाल त्याला सोन्याची कडी , पळाल त्याला चोळी बांगडी ' असे बोलून रामाजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन् दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्याने एकच हरहर केला.

साक्षात जणू भवानीच संचरली. अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले. मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट करू लागले. अन् दिलेरखान आलाच... वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन् मुरारबाजी देशपांडा आठवला. झुंज शथीर्ची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामाजीचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता. अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्य पळत सुटले. दिलेरलाही माघार घ्यावी लागली. रामाजी पांगेऱ्याने दाखवून दिले की , मराठीयांची पोरे आम्ही , भिणार नाही मरणाला. चिमूटभरांनी परातभरांचा पराभव केला.

कण्हेरा गडाला दिलेरखानची सावलीही शिवू शकली नाही. अशी माणसं महाराजांनी मावळ मुलखातून वेचून वेचून मिळविली होती. त्यातलाच हा रामाजी पांगेरा. इतिहासाला त्याचं घर माहीत नाही , त्याचं गाव माहीत नाही , त्याचा ठाव माहिती नाही. त्याचा पराक्रम मात्र माहिती आहे.

आणि आम्हाला रामाजीही माहिती नाही आज अन् कण्हेरागडही माहीत नाही आज.

कदाचित पुढे मागे संशोधकांना या रामाजी पांगेऱ्याची अधिक माहिती कागदपत्रांतून मिळेल. अन् काळोखातून उन्हाचा कवडसा उजळत यावा तसा त्याचा इतिहास आमच्या काजळलेल्या काळजात प्रकाश टाकेल.
- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.

शिवाजीमहाराजांचे एकूण आयुष्यच अवघे ५० वर्षे आणि दोन महिन्यांचे. अविश्रांत श्रम हेच या आयुष्याचे सार. ते श्रम केवळ शरीरालाच नव्हते तर मनाला आणि बुद्धिलाही गराडा घालून बसले होते. इ. १६४६ पासून ते इ. १६८० पर्यंत ३५ वषेर् या राष्ट्रनिर्मात्याला अव्याहत भयंकर वादळी आयुष्यच जगावे लागले. त्यांच्या जीवनात चमत्कृतीपूर्ण नाट्यमय घटना घडत गेल्या. आज हे सारे विषय तुम्हा आम्हाला दिपवून टाकतात. आपण त्यातील नाट्याचा रोमहर्षक आनंद लुटीत असतो.

त्यावर नाटके , कादंबऱ्या , चित्रपट आणि काव्ये महाकाव्ये रचीत असतो. पण त्यातील तळमळ , ध्येयवेड घामाची शिंपण आपण कधी एकांतात मनाची समाधी लावून विचारात घेतो का ? विचार केलाच तर एवढाच करतो , की शिवाजीमहाराजांचा पुतळा किती लाख रुपयांचा बनवायचा ? त्याची स्थापना कुठे करायची अन् कुणाच्या हस्ते करायची ? त्यांनी केलेले राष्ट्र आणि समाज उभारणीचे काम की , ते करण्याचा सक्रिय प्रयत्न आपण करतो का ? याचे प्रामाणिक उत्तर नकाराथीर्च असते. होतो फक्त जयजयकार!

सह्यादीच्या डोंगराळ दुर्गम प्रदेशात त्यांनी स्वराज्य मांडले. त्याची देखरेख ठेवण्याकरताही ते जातीने हिंडत असल्याच्या नोंदी सापडतात. ' राजेश्री गड किल्ल्यांच्या पाहणीस अमुक भागात गेले. ' अशा नोंदी सापडतात. प्रत्यक्ष लहानमोठ्या लढायांचा तपशील तर किती सांगावा ? त्यातीलच ही एक नोंद पाहा. महाराजांचा राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला. त्याची तयारीही रायगडावर सुरू झाली. रायगड कामाधामांत आणि तेवढ्याच लगीन आनंदात बुडून गेला होता. अन् त्यातच महाराजांच्या मनात वाई आणि भोरच्या जवळचा केंजळगड नावाचा किल्ला जिंकून स्वराज्यात घेण्याचा विचार आला. वाई आणि भोर या भागातील हा एकच डोंगरी किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात उरला होता. अन् महाराजांनी तो स्वत: जातीने हल्ला करून , लढून घ्यावयाचे ठरविले. माझ्या मनात विचार येतो. की हा किल्ला जिंकून घेण्याकरता महाराजांनी स्वत:च जाण्याची आवश्यकता होती का ?

तो कुणीही घेऊ शकला असता , तरीही महाराज स्वत: अचानक रायगडावरून ससैन्य गुपचूप निघाले का ? तो दिवस होता दि. २२ एप्रिल १६७४ या दिवसापूर्वी अवघ्या एकच महिना आधी म्हणजे दि. १९ मार्च १६७४ या दिवशी महाराजांच्या एक राणीसाहेब अचानक रायगावरच मृत्यू पावल्या होत्या. महाराजांचं या काशीबाई राणीसाहेबांवर अतिशय प्रेम होतं. त्या या गजबजलेल्या संसारातून अचानक निघून गेल्या. महाराज अतिशय दु:खी झाले. सरसेनापती प्रतापराव गुजर हे महाराजांचे अत्यंत जिव्हाळ्याचे योद्धे होते. तेही या आधी महिन्यापूवीर्च रणांगणात ठार झाले होते. (दि. २४ फेब्रु. १६७४ ) एका बाजूने राज्याभिषेकाची मंगल तयारी चाललेली होती अन् दुसऱ्या बाजूने महाराजांच्या काळजातून दु:खाचे अश्रू पाझरत होते.

हे दु:ख विसरण्याकरताच महाराजांनी ही दि. २२ एप्रिल ची केंजळगडची मोहिम काढली असेल का ? त्याचवेळी वार्धक्याने थकलेली मृत्यूच्याच दिशेने निघालेली आपली आई समोर त्यांना दिसत नव्हती का ? अन् राज्याभिषेकाचा दिवस अवघ्या सव्वा महिन्यावर आलेला महाराजांना दिसत नव्हता का ? तरीही महाराज केंजळगडच्या मोहिमेवर निघाले. दि. २४ एप्रिल १६७४ या मध्यरात्री महाराजांनी स्वत: ससैन्य केंजळगडावर हल्ला चढवला. धडाडून लढाई पेटली. महाराजांनी केंजळगड जिंकलाही.

चांगले झाले. तुमच्या आमच्या आजच्या शिवचरित्राच्या आनंदातही भर पडली. पण युद्धाच्या त्या अंधाऱ्या रात्री वैऱ्याच्या तलवारीचा फटकारा महाराजांवरच फिरला असता तर ? शिवचरित्र राज्याभिषेकाच्या आधीच संपले असते. पण तो राष्ट्रपुरुष त्या काळात तसा वागला. या त्यांच्या वागण्याचा आम्ही आज कधी विचार तरी करतो का ? फार फार तर एखादी कविता रचून मोकळे होतो. आपल्याला महाराजांचे रक्ताचे अन् घामाचे थेंब दिसतात. पण त्यांचे अश्रू कधी दिसतात का ?

एकांतात मनोसमाधी या चरित्राशी साधता आली तरच ते दिसू शकतील.

याच काळात पावसाळा समीप आलेला असतानाही (इ. १६७४ मे मध्य) महाराज चिपळूण जवळच्या दळवटणे या गावी आपल्या मराठी सैन्याची एक छावणी योजनापूर्व ठेवण्यासाठी स्वत: गेले होते. कोकणचा नकाशा भूप्रदेश आणि तेथील हवामान डोळ्यापुढे आणा आणि महाराजांची ही राज्यसाधनाची लगबगसुद्धा डोळ्यापुढे आणा. म्हणजे आज सुट्टीच्या काळात पत्ते कुटायची वा टीव्हीला मिठी मारून बसायची इच्छा थोडीतरी बाजूला राहील.

उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधाराने शिवाजीमहाराजांची डायरी आपल्याला लिहिता येतेय. लिहा. अन् स्वत:च शोधून पाहा की , महाराजांनी आराम विश्राम घेण्यात किती वेळ खर्च केलाय. विश्रांतीकरता म्हणून ते एकदा मनोहरगडावर आणि वर्धनगडावर राहिल्याची नोंद आपल्याला सापडेल. पण विश्रांतीकरता जाऊन राज्याची आणि राजकारणाचीच कामे तेथे उरकीत बसल्याचा आपल्याला सुगावा लागेल हा! आग्ऱ्याच्या कैदेत औरंगजेबाच्या कृपेने महाराज तीन महिने छान विश्रांती घेत होते. नाही! या पलिकडे महाराजांना विश्रांती गवसलीच नाही.

महाराजांचे असंख्य पुतळे. विविध शिल्पकारांनी घडविलेले आपण पाहतो. बहुतेक सर्वच पुतळ्यांत महाराजांच्या हाती तलवार दाखविलेली आणि ते घोड्यावर बसलेले आहेत , असेच आपण पाहतो. क्वचित एखाददुसराच पुतळा हात उंचावून उभा असलेला आपल्याला दिसतो. असं वाटतं , त्या पुतळ्यातील शिवाजीमहाराज हा उंचावून तुम्हा आम्हालाच सांगताहेत की ' पराक्रमाचे तमाशे दाखवा! '
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.

शिवाजीमहाराजांच्या मनावर अगदी लहानपणापासूनच धामिर्क संस्कार झालेले समजून येतात. त्यांच्या वयाची पहिली सहा वर्षे तर शहाजीराजांच्या सहवासात खूप धावपळतीतच गेली. शहाजीराजे निजामशाहीच्या रक्षणासाठी आणि राज्यकारभारही चालविण्यासाठी सतत शहाजहानच्या मोगली फौजेशी झुंजत होते. घोडदौड आणि लढाया यांतच त्यांचा काळ जात होता. जिजाऊसाहेब , तुकाऊसाहेब आणि कुटुंबिय मंडळी यांनाही सतत राजांच्या सांगाती राहावे लागत होते. छावणीचा मुक्काम पडेल , तेवढीच स्थिरता या कुटुंबाच्या वाट्याला येत होती. जिजाऊसाहेब या तर देवधर्मात रमणाऱ्याच होत्या. त्यांच्या सहवासात तोच भाव आणि स्वभाव चिरंजीव शिवाजीराजांच्यात उतरला. जिजाऊसाहेबांची विशेषत: भक्ती भवानीदेवीवर आणि गणपतीवर होती. शंभूमहादेव हे तर त्यांचे कुलदैवतच होते. शंभूभट राजोपाध्ये आणि अन्य काही आश्रित पुजारी आणि शागीर्द मंडळी , पुराणिक , ज्योतिषी आणि नित्यनैमित्तिक सणवार समारंभ आणि धामिर्क विधी यथासांग सांभाळणारी मंडळी राजकुटुंबाबरोबर असायचीच. या सर्व वातावरणाचा परिणाम आणि आईची शिकवण शिवाजीराजांच्या मनावर सतत संस्कार करीत राहिली.

पण एवढे सर्व असूनही शिवाजीराजे हे धामिर्क कर्मकांडात वा भाबड्या देवभोळ्या व्रतवैकल्यात अजिबात गुरफटलेले दिसत नाहीत. ते श्रद्धावंत निश्चित होते पण भिक्षुकी कर्मकांडात तासन्तास घालवणाऱ्या आणि नवसासायांसावर , शकुन अपशकुनांवर आणि मानीव शुभअशुभ भविष्यांवर त्यांचा विश्वास नसावा , असेच कागदोपत्री प्रत्ययास येते. त्यांची कारस्थाने आणि रणांगणे वद्यपक्षातील तिथ्या मिथ्यांना झालेली दिसतात. उदाहरणार्थ पन्हाळ्याची मोहिम वद्य त्रयोदशीला आहे , तर सुरतेवरची दुसरी स्वारी ऐन आमावस्येला आहे. समुदावरच्या स्वाऱ्या भरतीओहोटी पाहून आखलेल्या दिसतात. अन् अमुक अंतराच्या पलिकडे समुद प्रवास केला , तर धर्मच बुडतो ही भोळसट कल्पना महाराजांच्या मनात चुकुनही फिरकत नाही. त्यांचे आरमार आणि व्यापारी नौका मस्कतपर्यंत बिनधास्त जात. महाराजांनी , सौदागर करतात तसा व्यापार केला नाही. पण व्यापार करणाऱ्या कोकण किनाऱ्यावरील आपल्या लोकांना विरोधही केला नाही. संरक्षणच दिले.

महाराज रोज मितकाल पूजाअर्चा करीत असत. त्यांचे राजोपाध्ये , वैदिक पुजारी आणि भोपे व्यवस्थेस असत. केशव पंडित पुरोहित हा संस्कृतज्ञ विद्वान पुराणिक महाराजांना शक्य असेल तेवढ्या वेळेत पौराणिक ग्रंथातील विषय वाचून दाखवित असे. ( या केशव पंडिताने दंड निती नावाचा स्वत: एक ग्रंथही लिहिला.)

महाराजांच्या रोजच्या पूजेत एक सुंदर शिवलिंग म्हणजे बाण होता. महाराज मोहिमेवर वा प्रवासास जात , तेव्हाही हा बाण त्यांच्या बरोबर असे. अखेरपर्यंत हा बाण त्यांच्या सन्निध होता. हा बाण , म्हणजेच हे शिवलिंग अंदाजे पाऊण किलो वजनाचे आहे. बाणाचा रंग काहीसा भस्मीसावळा आहे. अर्थात हा बाण पाषाणाचा आहे. त्यावर अंगचीच जानव्यासारखी रेषा आहे. हा बाण इ. १६९९ पासून इ. १६७७ पर्यंत सिंहगडावर राजाराम महाराजांच्या समाधीपाशी नित्यपूजेत ठेवलेला होता. त्याची रोज पूजाअर्चा व नित्यनैमित्तिक उत्सवविधी साताऱ्याचे महाराज छत्रपती यांच्या राजघराण्यातूनच होत असे. इ. १९७७ मध्ये हा बाण श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे राजमातासाहेब यांनी सिंहगडावरून साताऱ्यास आणविला आणि आपल्या अदालत राजवाड्याच्या देवघरात तो ठेवून त्याची पूजाअर्चा चालू ठेवली. सध्या हा बाण साताऱ्यास अदालत राजवाड्यात देवघरातील पूजेतच आहे. शिवाजीमहाराजांच्या नित्य पूजेतील ही पवित्र ' स्मृती ' आज अतिशय आस्थापूर्वक सांभाळली जात आहे , म्हणून आवर्जून ही माहिती येथे नमूद करीत आहोत.हा शिवबाण महाराजांना कुणी दिला ?

कोठून मिळाला ? की , परंपरेनेच भोसले राजघराण्यात तो सांभाळीत आलेला आहे ? यातील काहीच नक्की सांगता येत नाही.

महाराजांनी प्रतापगडावर इ. १६६१ च्या श्रावण महिन्यांत अष्टभुजा महिषासुरमदिर्नी भवानीदेवीची स्थापना केली. त्यांची आणि सर्वच राजघराण्याची या देवीवर अपार भक्ती होती. महाराज स्वत:ला या भवानीदेवीचे ' भोपे ' म्हणजेच देवीचे सेवक समजत असत. आरतीचे वेळी महाराज भोपे म्हणून आरती करीत. अर्थात या उपचारात कवड्याच्या माळा , मळवट आणि हाती पेटलेला पोत आलाच. नवरात्रात आणि प्रत्येक महिन्याच्या पौणिर्मेस यथासांग पूजा आणि पालखीची प्रदक्षिणा होत असे. (परंपरेने हे सर्व आजही चालू आहे.)

या पूजाअर्चा आणि शिखरशिंगणापुरावरील शंभू महादेवाच्या व्यवस्थेत अतिशय आस्था आणि पावित्र्य सांभाळले जाई. पण त्यात उत्सवबाजीचे अवडंबर कधीच नसे. त्याला साधेपणा आणि मर्यादा होती. महाराजांच्या देवभक्तीला बुवाबाजी वा क्षेत्रबाजी चिकटली नाही. महाराज राज्यकतेर् तत्पर आणि सावध छत्रपती बनले. मठाधिपती झाले नाहीत. स्वराज्याच्या प्रचंच नेटका साधून त्यांनी परमार्थ केला. प्रतापगड , शिखर शिंगणापूर , तुळजापूर , पंढरपूर , जेजुरी , चिंचवड , मोरगांव , सप्तकोटीश्वर , श्रीशैलभ , पुणे कसबा गणपती आणि करवीर महालक्ष्मी आदि देवस्थानांविषयी त्यांची भक्ती आणि आस्था उत्तुंग होती. ती अबोल होती. त्यात जाहिरातबाजी नव्हती. हे सर्व देवतार्चन ते मितस्वरूपात करीत होते. पण त्यांचे सवोर्श्च दैवत होत , स्वराज्य आणि देवता होती सर्व प्रजा.

महाराज धामिर्क होते. श्रीभवानीचे ते भक्तही होते. पण मग त्यांचा आहार , व्यवहार आणि नैवेद्य काय होता ? नेमके म्हणावयाचे तर ते मांसाहारी होते का ? अपेयपान ते करीत होते का इत्यादी अनेक प्रश्ान् आपल्या डोळ्यापुढे येतात. पण त्या संबंधाचे अधिकृत पुरावे अजिबात मिळत नाही. हौस म्हणून किंवा खाण्यापिण्याची आवड म्हणून महाराजांनी मुद्दाम कधी हरणासश्यांची शिकार केल्याची एकही नोंद मिळत नाही. व्यसन तर राहोच , पण क्वचित निमित्तानेही त्यांनी मांसाहार केल्याचे उदाहरण अजूनतरी मिळालेली नाही. ते पंढरपूरचे माळकरी वैष्णव नव्हते , पण अघोरी शाक्तही नव्हते. अत्यंत साधे आणि सात्विक जीवन जगणारे पण वेळ आली की रौद तांडव करणारे अन् शत्रूचा वा अपराध्याचा शिरच्छेद करणारे भवानीपुत्र होते. शैव होते. वारकरीही होते. या भूमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा दुसरा कोण होता ? तो सर्वच धर्मांचा आणि सांप्रदायांचा आदर करणारा पालक होता.

महाराजांच्या देवघरातले देव निजीर्व सोन्याचांदीचे नव्हते. तेे सजीव रक्तमांसाचे होते. महाराजांचे हृदय हाच त्या देवांचा देव्हारा होता.
- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.

मराठी राज्य निर्माण झाले. ते हळूहळू वाढतही गेले. शिवाजीमहाराजांना इतरेजन मात्र बंडखोर समजत होते. प्रस्थापित बादशाहांच्या विरुद्ध बंडाळी करून निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याला दख्खनी पातशाहीतील लोक आणि दिल्लीच्या मोगलाईतील लोक सार्वभौमत्त्वाचा मान देत नव्हते. इतकेच नव्हे , तर आमच्यातीलही बरेच स्वजन महाराजांना राज्यकर्ता समजत होते. त्यांना राजा मानत नव्हते. तो सार्वभौमत्वाचा साक्षात्कार जनतेला होण्याची नितांत आवश्यकता असते.

आमची भूमी , आमचा ध्वज , आमचे पंतप्रधान , आमची संसद , आमचे आरमार , आमचा समुद आणि आमचे राष्ट्रपती याच्यापुढे जगातील सर्व गोष्टी आम्हाला दुय्यम आहेत , असल्या पाहिजेत. त्यांची अप्रतिष्ठा होता कामा नये. ती प्रतिष्ठा प्रथम आम्हीच सांभाळली पाहिजे. ती पोस्टाच्या तिकिटावरच्या चित्रापासूनच ते संसदेवर फडकणाऱ्या राष्ट्रध्वजापर्यंत आमच्या हृदयांत , आमची आम्हालाच उदात्ततेने जाणवली पाहिजे. कधीकधी लहानमोठ्या अशा घटना घडतात , की या उदात्ततेला धक्का बसतो. आपल्या मनातही सुरुंगासारखा स्फोट होतो. नुकतेच घडले. एका शेजारच्या राष्ट्राचे अध्यक्ष आमच्या देशात पाहुणे म्हणून आले. त्यांचे अगदी योग्य असे आम्ही स्वागतही केले. पण ते ज्या विमानातून आले , त्या विमानावर जो आमचा राष्ट्रध्वज लावलेला होता , तो उलटा लावला गेला होता.

आणखी एक आठवण. पण जरा वेगळी. पंडित नेहरुंच्या काळात एका युरोपीय देशात , जगातील सर्व राष्ट्रांत जे कोणचे अतिशय उदात्त , भावनेने भारावलेले राष्ट्रीय गीत (राष्ट्रगीत नव्हे) तेथील जनता प्रेमाने गाते , अशी एकूणएक राष्ट्रप्रेमी गीते एकत्र करून त्यांची भाषांतरे छापण्याचा उपक्रम त्या युरोपीय राष्ट्राने योजला. त्या राष्ट्रात असलेल्या आमच्या राजदूताकडेही अशा अखिल भारतीय पातळीवर लोकादरांस आणि प्रेमास पात्र ठरलेले राष्ट्रविषयक गीत त्या युरोपीय राष्ट्राने मागितले. आमच्या राजदूताने कोणचे गीत दिले ? आमच्या राजदूताने एका हिंदी सिनेमातील एक प्रेमगीत पाठवून दिले! आता ही सगळीच कहाणी दळत बसायची का ? जाऊ द्या. पण असे का होते ? कारण आमचे मनच ' स्वदेशी ' झालेले नाही.

शिवाजी महाराज लहानसान गोष्टीतही स्वराज्याची अस्मिता आणि प्रतिष्ठा कसे जपत होते याचे द्योतक असलेले महाराजांचेच एक पत्र उपलब्ध आहे. गोवळकोंड्याच्या अबुल हसन कुतुबशहा बादशाहास भेटावयास महाराज जाणार होते. ही भेट राजकीय होती. आजच्या भाषेत बोलायचे तर राष्ट्रीय पातळीवरची होती. म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम छत्रपती महाराज गोवळकोंड्याच्या बादशाहाला भेटावयास जाणार होते. तेव्हा ' आम्ही बादशाहांस भेटावयास कोणत्या पद्धतीने येऊ ' हे महाराजांनी आपल्या मराठी राजदूताच्यामार्फत गोवळकोंड्याच्या वजीरांस आणि बादशाहास स्पष्ट शब्दांत कळविले आहे. महाराजांच्या राजदूताचे नाव होते प्रल्हाद निराजी नासिककर. महाराज म्हणतात की , ' आम्ही बादशाहांस भेटावयास येऊ , त्यावेळी आमची सर्व राजचिन्हे आमच्या समवेत भेटीचे वेळी असतील ' छत्र , मोचेर्ले , सोन्याच्या मुठीच्या चवऱ्या , ध्वज , माहिमरातब , गुर्ज (राजदंड) इत्यादी सर्व राजचिन्हे समवेत आणि धारण करून आम्ही येऊ. शाही नौबत (छत्रपतींची राजदुंदुभी) , निरंकुश स्वारीचा हत्ती त्यात असेल.

हे सर्व सुचविण्यात आणि त्याप्रमाणे घडविण्यात महाराजांचा कोणता हेतू होता ? बडेजावाने मिरविण्याचा आणि आपला डामडौली दिमाख करून गोवळकोंडेकरांना दिवविण्याचा किंवा हिणविण्याचा होता का ? अजिबात नाही. पण एक सार्वभौम स्वतंत्र महाराजा आपल्या राष्ट्राच्या वतीने तुमच्याकडे भेटीस येत आहे याची जाणीव त्यांना आणि आपल्यातील आंधळ्या सुजनांनाही देण्याकरता हा रिवाज महाराज जाणीवपूर्वक आचरीत होते. जगातील सर्वच सार्वभौम देश हा रिवाज पाळतात. आमचे हिंदवी स्वराज्य नव्यानेच जन्माला आलेले असल्यामुळे आम्हाला जाणीव नव्हती , ती देण्याची अशी गरज होती , इतकेच. पण त्याला केवढा अर्थ आहे. महाराजांची आणि कुतुबशाहाची भेट अशाच पद्धतीने घडली.

पुढची एक आठवण सांगावीशी वाटते. श्रीमंत थोरले बाजीराव हे दिल्लीकरांचा मुलुख जिंकत जिंकत चंबळा नदी ओलांडूनही पुढे गेले. पण दिल्लीच्या बादशाहाच्या बाबतीत त्यांच्या भावना जरा उणेपणानेच व्यक्त झाल्या. पुढे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी तर आपल्या राजदूतामार्फत दिल्लीच्या मोगल बादशाहाला आहेर म्हणून सोन्याची किल्ली अर्पण केली. गोष्ट किरकोळ वाटेल , पण राष्ट्रीय भावनेचा विचार केला , तर ती गंभीर आहे. सोन्याची किल्ली नजराणा म्हणून देणे म्हणजे आमच्यावरचे आपले वर्चस्व आम्ही मान्य करतो आणि सर्वस्वाच्या अधिकाराची ही किल्ली आपणास अर्पण करतो असा त्याचा अर्थ होता. येथे छत्रपतींच्या , पंतप्रधानांच्या आणि एकूणच हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौम प्रतिष्ठेला धक्का लागत होता. लागला.

आणखी एक गोष्ट सांगून टाकू काय ? पाहा कशी वाटते. इ.स. १९५२ साली ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ ( द्वितीय) यांचा राज्याभिषेक सोहळा लंडनमध्ये साजरा झाला. त्यावेळी भारत सार्वभौमच होता. पण कॉमनवेल्थचा सदस्य होता. जगातील अनेक देश कॉमनवेल्थचे सदस्य नव्हते , तरीही जागतिक रिवाजाप्रमाणे ब्रिटिश राणीचा आदर आणि अभिनंदन करण्यासाठी प्रतिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. भारताच्या वतीनेही भारताचे राजदूत ( हायकमिशनर) उपस्थित होते. रिवाजाप्रमाणे राणीला काही मौल्यवान आहेर करणे आवश्यक आणि योग्यच होते. पण तो आहेर कसा असावा आणि काय असावा याचा विचार आमच्या देशाने म्हणजेच परराष्ट्र खात्याने आणि परराष्ट्रमंत्र्यांनी करण्याची आवश्यकता होती. पण तसा केला गेला नाही. आमच्या भारताच्या राजदूताने राणीला गुलाब फुलांचे छत्र अर्पण केले. काय बोलावे ?

हिऱ्यामोत्यांची भरलेली सोन्याची परात एकवेळ आहेर म्हणून राणीला दिली असती , तरी चालले असते. पण सार्वभौमत्वाचे सवोर्च्च प्रतीक म्हणजे छत्र. ते द्यावयास नको होते. पाहा पटते का!

आपल्या राष्ट्राच्या अस्मितेला थोडासुद्धा धक्का लागता कामा नये , याची दक्षता सर्वांनीच अगदी परदेशांत प्रवासाकरता किंवा विद्याथीर् म्हणून अभ्यासाकरता जाणाऱ्या प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता असते. राष्ट्रीय चारित्र्याला त्यातूनच उजाळा मिळतो. नम्रता असावी. लाचारी नसावी.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.

स्वराज्य निर्माण होण्यापूर्वी बादशाही अमलात न्याय देण्याचे काम काझी या नेमलेल्या व्यक्तीकडे असे. तो देईल तो न्याय. त्याला नियमावली ( पिनल कोड) नव्हते. या काझीकडेच कोणाचे धर्मांतर करावयाचे असेल , तर तेही काम अधिकृतपणे असे. काझी काय योग्यतेचा असेल अन् त्याची मनस्थिती काय असेल त्यावर न्याय कसा मिळणार , की अन्यायच होणार हे अवलंबून असे. पण असेही दिसून येते , की आदिलशाही आणि निजामशाही राज्यांत काझी मंडळींनी प्रक्षोभक म्हणा वा अन्यायकारक म्हणा , असे न्यायनिवाडे लोकांना फारसे दिलेले दिसत नाहीत.

पण काझी पद्धतच मुळात एकांगी आणि सदोष होती. जिजाऊसाहेब शिवाजीराजांसह पुण्यात वास्तव्यास कायमच्या आल्या. ( इ. १६३७ ) आणि भोसले जहागिरीचे रुपांतर आदर्श राज्यकारभारात करावयास आऊसाहेबांनी सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी गाजावाजा न करता वा कोणताही भडकपणा न देता ' काझी ' हे पद बंद केले. प्रारंभीच्या काळात तर काही वषेर् जिजाऊसाहेब स्वत:च न्यायदानला बसत असत. न्याय देणाऱ्या व्यक्तीची बौद्धिक आणि मानसिक वृत्ती तराजूसारखी समतोल असावी लागते. जिजाऊसाहेबांची तशी होती. समाजातील अनेक तंटेबखेडे त्यांनी समतोल न्याय देऊन सोडविलेले दिसतात. त्यांनी दिलेली काही निवाडपत्रे (जजमेंट) आज उपलब्ध आहेत.

सिंहगडावरती श्रीअमृतेश्वर कालभैरवाचे देऊळ होते. आजही आहे. या देवळांत न्यायाधीश म्हणून बसून जिजाऊसाहेबांनी न्यायनिवाडे जनतेला दिलेले सापडतात. या उपलब्ध निवाडपत्रांत एक नोंद शेवटी नोंदलेली दिसते. ती म्हणजे , ' तुम्हांस हा निवाडा जर अमान्य असेल , तर गोतमुखे (ज्युरी) तुम्ही निवाडा मागावा ' यावरून न्यायपद्धती निदोर्ष आणि जनतेचे नुकसान न होऊ देण्याकडे कशी सावध राहील याची दक्षता जिजाऊसाहेब घेताना दिसतात. यावेळीही जिजाऊसाहेबांचे पिनलकोड नव्हतेच. पण समतोल विवेक आणि साक्षीपुरावे लक्षात घेऊन हे काम चालत होते. हीच परंपरा प्रगल्भ होत होत वाढत्या स्वराज्यात न्यायदान सुरू झाले.

न्यायाधीश हे अष्टप्रधानातील एक मंत्रीपदच आहे. निराजी रावजी नासिककर या पंडितांकडे हे सरन्यायाधीशपद होते. धामिर्क बाबतीतील न्यायनिवाडे देणे वा मार्गदर्शन करणे अष्टप्रधानातील ' पंडितराव ' या मंत्र्यांकडे असे. अतीगंभीर स्वरूपाच्या शारीरिक शिक्षा संबंधित आरोपीला द्यायची असेल , तर तो अधिकार छत्रपतींकडेच होता. मृत्युदंडासारखी गंभीर शिक्षा अन्य खालच्या श्रेणीतील , न्याय देणाऱ्या व्यक्तीस वा पंचायतीस देता येत नसे. साक्षीपुरावे अपुरे आणि अधुरे असतील तर दिव्य करण्याचा निर्णय छत्रपती देत. हे दिव्य करण्यास सांगण्याचा अधिकार छत्रपतींसच असे. पुढच्य काळात तो पेशव्यांनीही वापरला.

जरा विषयांतर करूनही एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. प्रख्यात आदिलशाही सरदार अफझलखान याने दिलेले काही न्यायनिवाडे उपलब्ध आहेत. त्यात अफझलखानाने कोणावरही अन्याय केलेला दिसत नाही. स्वत:ला कातिल-ए-काफीरान (म्हणजे काफरांची कत्तल करणारा) म्हणवून घेणारा अफझलखान न्यायाधीश म्हणून न्याय देताना जातीय पक्षपात करीत नाही असे दिसते , हेही नमूद केले पाहिजे.

एखादा जमीनजुमल्या बाबतचा किंवा वतनांबाबतचा जटील प्रश्ान् निर्माण झाला , तर त्याबाबतीतला निर्णय असाच चिकित्सेने छत्रपती देत असत. त्याचा सविस्तर कागद लिहून तयार केला जात असे. त्याला महजर असे म्हणत. त्यावर समाजातील विविध थरांतील प्रमुखांचे शिक्के आणि साक्षी असत. काही अशा महजरांवर प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांचीही साक्ष आहे. उदाहरणार्थ पालीच्या खंडोबासमोर झालेला खराडे घराण्याचा महजर पाहा.

न्याय आथिर्कदृष्ट्या गोरगरिबांना वा कोणालाही महागडा पडू नये , अशी दक्षता स्वराज्यात घेतली जात असे. जिंकणाऱ्याला ' शेरणी ' आणि दावा हरणाऱ्याला ' हरकी ' द्यावी लागे. पण त्यात अतिरेक होत नसे.

स्वराज्याच्या सार्वभौम राजचिन्हांत तराजू राजसिंहासनाशेजारी एका सोन्याच्या भाल्यावर टकावलेला असे. तराजूही सोन्याचाच असे. तराजू हे न्यायाचे प्रतीक होते. याचा अर्थ स्पष्ट आहे , की स्वराज्यातील न्याय समतोल होता. तेवढाच स्वराज्यातील व्यापार समतोलच राहावा ही अपेक्षा आणि अलिखित आज्ञाही होतीच ना!

या न्यायदानात संबंधित वादी-प्रतिवादींना प्रश्ान् विचारले जात. शिवापूरच्या देशपांडे घराण्यातील दिवाणी खटल्यातील संबंधितांना स्वत: शिवाजी महाराजांनी विचारलेले प्रश्न आजच्या नामांकित वकिलांनाही मामिर्क वाटतात. या उलटतपासणीत महाराजांची तर्कशुद्ध आणि बिनतोड बौद्धिक पातळी लक्षात येते. सुपे परगण्यांत संभाजीमामा मोहिते यांनी केलेला अन्याय आणि खाल्लेली लाच महाराजांनी कठोरपणे निपटून काढलेली दिसेल. वशिले आणि लाचलुचपत यांना महाराजांच्या तराजूत पासंगालाही जागा नव्हती.

पूवीर्पासूनच चालत आलेले काही देवदेवस्थानांचे अधिकारही महाराजांनी रद्द केले. त्यांत ' पडत्या भावाने शेतकऱ्यांकडून धान्य आणि अन्न पदार्थ खरेदी करण्याचा अधिकार काही धर्मस्थळांना होता. ' पडता भाव म्हणजे बाजारभावापेक्षा खूपच कमी किमंतीत पण वतनी हक्काने माल खरेदी करण्याचा अधिकार. असा अधिकार चिंचवडच्या देव संस्थानास होता. महाराजांनी तो अधिकार रद्द केला. कारण देताना महाराजांनी म्हटले , की ' यांत शेतकऱ्यांचे आणि गरिबांचे नुकसान होते. ' पण त्याच धर्मस्थळाला महाराजांनी आवश्यक तो धान्य , अन्य शिधा आणि वस्तू स्वराज्याच्या सरकारी कोठारातून देण्याची विनामूल्य व्यवस्था केली , हेही लक्षात घेण्यासारखे आहे.

काही कठोर गुन्हा करणाऱ्यांना लहानमोठ्या शिक्षा दिल्या जात असत. त्यात मृत्युंदड वा गंभीर शारीरिक शिक्षाही दिल्या जात होत्या. पदाजी शिळमकर या माणसाला महाराजांनी डोळे काढण्याची शिक्षा दिल्याची नोंद आहे. त्याचा गुन्हा तेवढाच गंभीर असला पाहिजे. पण तो गुन्हा लक्षात येत नाही. तुरुंग होते. अंधार कोठड्याही होत्या. पण कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षताही होती. जेजुरीच्या गुरव घडशी भांडणात एकाला सिंहगडावर विनाचौकशी , अनधिकृतपणे तुरुंगात किल्लेदाराने डांबल्याबद्दल महाराज फार रागावले. त्या निरपराध माणसाची त्वरित सुटका केली. असेही प्रकार क्वचित घडत. पण क्वचितच. स्वराज्यात न्यायाची प्रतिष्ठा सिंहासनाच्या शेजारीच होती.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .

इतिहासाच्या साधनांपैकी ' बखर ' हा
एक ऐतिहासिक साक्षीपुराव्याचा विषय अभ्यासकांत मानला जातो. पण त्याचा लेखनांत उपयोग करताना अतिशय चिकित्सेनेच करणे आवश्यक असते. शिवाजी महाराजांच्या जीवनासंबंधातील अनेक बखरी आज उपलब्ध आहेत. महाराजांच्या ऐन समकालातील एकही मराठी बखर उपलब्ध नाही. ' सभासदाची बखर ' मात्र त्यातल्या त्यात सर्वात जवळची आहे. महाराजांच्या मृत्युनंतर सुमारे १६ वर्षांनी कृष्णाजी अनंत मजालसी उर्फ सभासद या गृहस्थाने ती जिंजी येथे छत्रपती राजाराम महाराज यांच्या सांगण्यावरून लिहिली.

हा कृष्णाजी अनंत सभासद छ. शिवाजी महाराजांच्या परिवारातील होता. तो ' मजालसी ' म्हणजे एक प्रकारच्या सल्लागार मंडळातील सभासद आहे. त्यामुळे अनेक शिवकालीन घटनांचा तो प्रत्यक्ष समकालीन साक्षीदार ठरतो. त्यामुळे त्याच्या लेखनावर ' समकालीन आधारग्रंथ ' म्हणून अभ्यासक विश्वास ठेवतात. या बखरीतही घटनांचा आणि कलानुक्रमाचा तसेच राजकीय संदर्भांचा कुठे कुठे घोटाळा उडालेला येतो. पण तरीही करणाऱ्यांच्या तो लक्षातही येतो. पण तरीही सभासद बखरीचे दोष लक्षात घेऊनही महत्त्व कायम राहतेच.

इतर अनेक बखरी शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर वेगवेगळ्या काळात लिहिलेल्या आहेत. त्यांचा वापर अतिशय जपूनच करावा लागतोे. कारण त्यात ऐकीव , पारंपरिक आणि काल्पनिकही हकीकती सापडतात. म्हणून बखर वाङ्मय हे अतिशय जपून अभ्यासपूर्वक वापरण्याचे साधन आहे. ते निर्धास्तपणे एकदम स्वीकारताही येत नाही अन् एकदम केरातही टाकून देता येत नाही.

शिवकालावरील बखरींत लेखकांनी भाबड्या भक्तीने किंवा रागासंतापाने अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. महाराजांच्याबद्दल भक्तीभावाने बखरकार विलक्षणच ' चमत्कार ' करताना दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे महाराजांना ते चक्क शिवशंकराचा साक्षात अवतारच मानतात. एक वेळ तेही समजू शकते. पण बुद्धिला अजिबात न पटणाऱ्या गोष्टी अंधश्रद्धेनेच लेखकांनी लिहून ठेवलेल्या आहेत. दैवी साक्षात्कार हा त्या लेखनातील मुख्य भाग दिसतो.

महाराजांच्या अंगात श्रीभवानी देवीचा वेळोवळी , पण महाकठीण प्रसंगी संचार होत असे असा बखरकारांचा विश्वास आहे. खरंच असे असते , तर महाराज आग्ऱ्याच्या भयंकर संकटात शिरले असते का ? स्वत: महाराजांनी म्हटले आहे की , ' मी आग्ऱ्यास यावयास नको होते. मोठी चूक झाली. '

महाराजांना स्वप्नात किंवा एकांती चिंतनात अवघड प्रश्ानंची सोडवणूक कशी करावी हे जर सूचित झाले असेल तर ते पूर्ण नैसगिर्क आणि संभाव्य ठरते. पण उठल्यासुटल्या ' देव अंगात येतो ' आणि बोलतो हे पटावयास जड जाते.

मी योगी स्वामी कुवलयानंद यांना या ' अंगात ' येण्याच्या मानसिक अवस्थेबद्दल योगशास्त्रात काही आधार किंवा शास्त्रीय स्थान आहे का , असे , विचारले होते. त्यांनी मला सांगितले की , समाधी साधनेच्या प्रक्रियेतील ज्या अनेक सूक्ष्म आणि मोठ्या अवस्था असतात त्यातील अंगात येणे ही एक अगदी प्राथमिक , शास्त्रीय आणि प्रामाणिक अशी भाववस्था आहे. पतंजली योगदर्शनात पतंजली ऋषींनी या भावावस्थेचा फक्त एकाच सूत्रात उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ असा होऊ शकतो की , अत्यंत उदात्त आणि उत्कट अशा कामात जर माणूस तितक्याच उदात्त आणि उत्कट भावनेने कार्यरत असेल , तर त्याला ' पुढे काय घडणार आहे ' याचा सूचक असा अंतर्मनातून विचार सुचतो. तो विचार त्याच्या तोंडूनही मोजक्या शब्दांत उमटलाही जाऊ शकतो.

भारतीय मानसशास्त्राचे पतंजली हे महान योगी होते. आता यापेक्षा अधिक सांगणे अवघड आहे. योग आणि मानसशास्त्र याच्या अभ्यासकांनीच यावर अधिकारवाणीने भाष्य करावे. मी थांबावे.

पण याबाबतीत संबंध येतो तो बखरींशी आणि बखरकारांशी. शिवाजीमहाराजांपेक्षाही साधुसंतांच्या बाबतीत बखरकारांनी विलक्षण थक्क करणारे कथा प्रसंग रंगवून लिहिले आहेत. ते लिहिताना आपण आपल्या आराध्य संत सत्पुरुषाचा नकळत अवमानच करीत आहोत , याचे भान बखरकारांना राहिलेले नाही. बखरकारांनी भाबड्या भक्तीभावात लिहून ठेवलेल्या काही कथा इतक्या विक्षिप्त आणि चक्क मूर्खपणाच्या आहेत , की त्या येथे सांगायचेही धारिष्ट्य होत नाही. त्यात या संतसजन्मांची केवळ अप्रतिष्टाच होत नाही , तर त्यांचे चारित्र्याहनन होते आहे याचे भान या बखरकारांना आणि भगत मंडळींना राहिलेले नाही. हे कार्य केवळ बखरकारच करतात असे नाही , तर समाजातील काही धूर्त मंडळीही करतात. म्हणूनच सध्याच्या काळातही कधी मारुतीच्या अंगाला घाम फुटतो तर कधी गणपती दूध पितो.

हे सर्व सांगण्याचा एकच हेतू आहे की , सर्वच बाबतीत पण विशेषत: ऐतिहासिक व्यक्तींच्या बाबतीत आपण अंधश्रद्ध आणि भाबडे असता कामा नये. शिवाजीमहाराज हे एक माणूस होते. त्यांनाही संकटे आणि भावभावनांना तोंड द्यावे लागत होते. ते त्यांनी कसे दिले याचा अभ्यास झाला पाहिजे.
-बाबासाहेब पुरंदरे

शुक्रवार, २७ मार्च, २००९

शिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.

आपल्याला नेहमीच कुतुहल वाटत असते , की एवढा मोठा हा लोकनेता आणि सिंहासनाधिश्वर छत्रपती राजा वागत कसा होता , बोलत कसा होता , एकूण स्वभावानेच कसा होता! राजा कधी थट्टा विनोद करीत असे का , की सतत गंभीर होता ? शिवाजी महाराजांच्याबद्दल एक मामिर्क विधान श्रीसमर्थांनी केले आहे. ' शिवरायांचे कैसे बोलणे , शिवरायाचे कैसे चालणे , शिवरायाचे सलगी देणे कैसे असे ?' या प्रश्ानर्थक वर्णनातच महाराजांचे व्यक्तिमत्त्व डोळ्यापुढे येते. महाराजांच्या चेहऱ्यावर सततच स्मितहास्य तरळत असे त्यांना भेटलेल्या युरोपीय वकिलांनी आणि प्रवाशांनी नोंदवून ठेवले आहे. या त्यांच्या स्मितहास्यातच महाराजांचे लोकसंघटनेचे यश आणि वर्म स्पष्ट होते. त्यांच्या एकूणच प्रचंड आणि अत्यंत अवघड अशा उद्योगात लोकसंपर्काला आणि प्रसंगी समोरच्या विरोधकालाही जिंकून घेण्याचे बळ होते. स्मितहास्य ही त्यांच्या बिझनेस स्कील आणि मॅनेजमेंटमधली सर्वात मोठी इन्व्हेंस्टमेंटमधली होती. मी हे इंग्लिश शब्द जाणूनबुजून वापरतो आहे. कारण ते आम्हा आजच्या पुरोगामी आणि पॉलिश्ड मंडळींना चटकन समजतात आणि अपील होतात!

महाराजांच्या या वागण्याबोलण्याबाबतची सर्वात पहिलीच नोंद अन् तीही पूर्ण विश्वसनीय अशी परमानंद नेवासकरांनी शिवभारतात करून ठेवली आहे. महाराज १५ - १६ वर्षाचे असतानाच त्यांनी सुरू केलेल्या स्वराज्यस्थापनेची चुळबूळ जागच्याजागीच मोडून काढण्यासाठी विजापूरच्या आदिलशाहने आपला एक बडा सरदार अंबाजी घोरपडे यांस सैन्यनिशी महाराजांविरुद्ध मावळात रवाना केले. वास्तविक घोरपडे सरदार महाराजांना धरावयास किंवा मारावयास किंवा निदान प्रचंड दमदाटी करावयास अन् गप्प बसवावयास आले होते. पण महाराजांनी त्यावेळी त्या छोट्याशा वयात सरदारसाहेबांशी भेट आणि मुलाखत घेऊन असे गोड भाषण केले आणि त्यांना पटवून दिले की , ' आम्ही बादशाहांच्या विरुद्ध बंडाळी करीतच नाही. बेवसाऊ पडलेल्या गडांचा आणि वाड्याघोड्यांचा नीट बंदोबस्त ठेवीत आहोत , तेही बादशाहांच्या हितासाठीच. '

परमानंदांनी महाराजांची ही पहेली मुलाकात सविस्तर लिहून ठेवली असती , तर किती बरे झाले असते! पण त्यांनी या बाबतीत एवढेच लिहिले आहे की , एखादा गारुडी नागाला ज्याप्रमाणे भुलवतो , झुलवतो अन् सफाईने परतवून लावतो , त्याचपद्धतीने मोठ्या कुशलतेने महाराजांनी घोरपड्यांना विनासंघर्ष , गोड बोलून परतविले. हे प्रकरण प्रत्यक्ष महाराजांच्याच तोंडून बदललेले , परमानंदाने नोंदविले आहे.

आपल्या देशात अनेक धर्म , सांप्रदाय , पंथ-उपपंथ पूवीर्पासूनच अस्तित्त्वात आहेत. भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदाय , शाक्तपंथ , गाणपत्य सांप्रदाय , शैव , वीरशैव , महानुभाव , नाथसांप्रदाय , हटयोगी , कर्मठवैदिक , दत्तसांप्रदाय , पुरी आणि गिरी गोसावी सांप्रदाय , श्वेतांबर आणि दिगंबर जैन धमीर्य , झरॅस्टरियन पारशी , यहुदीज्यु , सुफी सांप्रदाय , शिया- सुनी , जेस्युईट , शीख (नानक पंथीय) रोमन कॅथॉलिक , प्रोस्टेस्टंट , अघोरी भक्तीपंथ , पंचमकासादि आचार पाळणारे शाक्त इत्यादी आणखी काही पंथ सांप्रदाय आपल्या सर्व भेद पोटभेदांसह शिवकाळातही नांदत होते. त्यात अनेकांची प्रार्थनास्थळे आणि मठआखाडे इत्यादीही अस्तित्त्वात होते. पण शिवकालीन कागदपत्रांचा जास्तीतजास्त खोलवर अभ्यास करीत असतानाही वरील विविध भक्तीमागीर्यांच्यात जातीय दंगेधोपे आणि त्यातून रयतेचे होऊ शकणारे नुकसान कधीही घडलेले दिसून येत नाही. सर्वधर्मसमभावाची घोषणा न करताही हिंदवी स्वराज्याचे आचरण समभावी होते. सर्वांचे आचार , सणसमारंभ , उत्सव , मिरवणुका , यात्रा- जत्रा आनंदात चालत होत्या. या उलट मोगली राज्यात सत्ताधीश भेदभावाने आणि अन्याय अत्याचाराने वागल्याचे असंख्य पुरावे मिळतात. औरंगजेबाने सतनामी गोसाव्यांवर जसे अत्याचार केले , तसे शिया सांप्रदायिकांवरही केल्याच्या नोंदी आहेत.

जरा विषयांतर करून एक गोष्ट नमूद कराविशी वाटते , ती औरंगजेबाबाबत. औरंगजेब स्वत: कठोर धर्मव्रती होता. मूतीर्भंजनाच्याबाबतीत तर तो फार आग्रही होता. ' बना कदेर् मस्जिद तबा कर कुनिष्त ' असे औरंगजेबाचे शिलालेख सापडले आहेत. याचा अर्थ असा , मूतीर् नष्ट करून येथे मशिद तयार केली , असा आहे. बिदर (कर्नाटक) येथे श्रीनृसिंहाचे मंदिरभंग करून त्यावर कोरलेला त्याचा शिलालेख आजही अस्तित्त्वात आहे. त्याचे इतरही धर्मवेड प्रकार ऐतिहासिक पुराव्यांत उपलब्ध आहेत. पण एक गोष्ट विलक्षण होती , की औरंगजेबाने कोणत्याही जातीधर्माच्या संतसत्पुरुषांच्या समाध्यांना अजिबात धक्का लावलेला नाही किंवा त्यांचा कोणत्याही प्रकारे अपमान केलेला नाही. हा एक औरंगजेबी स्वभावातील गोड चमत्कारच म्हणावयाचा! महाराष्ट्रातील श्रीज्ञानेश्वर , श्रीदेव , श्रीचिंचवड , श्रीत्र्यंबकेश्वर , श्रीसासवड , श्रीसज्जनगड , श्रीदेवगिरी , श्रीपैठण या संतसत्पुरुषांच्या समाधीस्थळांवर औरंगजेबाची सत्ता प्रस्थापित झाली होती. पण त्याने तेथे असलेल्या समाध्यांना धक्का लावला नाही. इतकेच नव्हे , तर ऐतिहासिक मराठी थोर राजपुरुषांच्या समाध्या आणि वृंदावने असलेल्या रायगड , सिंहगड , वढू , इंदापूर , श्रीगोंदे , पुणतांबे इत्यादी ठिकाणी असलेल्या , तसे पाहिले तर शत्रूपक्षीय व्यक्तींच्या समाध्यांनाही त्याने हात लावला नाही. यातील त्याची नेमकी मानसिकता काय असावी ते समजत नाही. दारा शुकोह हा औरंगजेबाचा सख्खा थोरला भाऊ होता. राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी औरंगजेबाने त्याला अतिशय क्रूरपणाने दिल्लीत ठार मारले. दाराची साधी कबर हुमायून बादशाहाच्या कबरीच्या प्रांगणात आहे आणि होती. औरंगजेबाने आयुष्याच्या अखेरच्या पर्वात एक आज्ञापत्र काढून दाराशुकोहच्या कबरीजवळ ' रोज दिवा लावत जा ' असा आदेश दिलेला सापडतो.

असो. हे झाले जरा विषयांतर. पण या सर्व पार्श्वभूमीवर हिंदवी स्वराज्यातील सर्वधर्मांबाबतची आस्था , आदर आणि आचरण उठून दिसते. शिवाजीमहाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांचे तरुणपण औरंगजेबाच्या कैदेत गेले. तेथे औरंगजेबाची एक मुलगी झिनतुन्निसा ही या शाहूराजांशी आईसारखीच वागली. शाहूराजांना इस्लामची दीक्षा द्यावी असे औरंगजेबाचे मनांत होते. हे ऐतिहासिक सत्य आहे. या झिनतुन्निसाने आपल्या बापाचा हा हट्ट मोडून काढला. त्यामुळे शाहूराजे स्वधर्मातच राहू शकले. एकूणच झिनतुन्निसाच्या उदार मातृतुल्य पेमाचा वागणुकीचा आदर छत्रपती घराण्यानेही सांभाळला. या झिनतुन्निसाच्या मृत्युनंतर (ती दिल्लीत खूप म्हातारी होऊन वारली. तिची कबर दिल्लीत आहे) छ. शाहूराजांनी तिची स्मृती म्हणून साताऱ्यात तिची एक प्रतिकात्मक समाधी कबर बांधली. त्या कबरीची व्यवस्था आजही अतिशय आस्थापूर्वक ठेवली जाते.

जाता जाता हेही सांगून टाकूया का ? त्यात शिवाजी महाराजांची संस्कृती दिसते. औरंगजेब आणि अन्य दक्षिणी बादशाही घराणी आणि या सर्वांचे सरदार दरकदार यांना शिवाजीमहाराजांनी लिहिलेली काही पत्रे आज उपलब्ध आहेत. त्यात महाराजांनी या सर्व शाही मंडळींना बहुमानाथीर् विशेषणांनी संबोधिले आहे. पण त्यांच्यासंबंधात महाराजांनी अन्य कोणलाही लिहिलेल्या पत्रात त्यांनी या शाही मंडळींना बहुमानानेच उल्लेखिले आहे. औरंगजेबाचाही उल्लेख ते तसाच करताना दिसतात. महाराजांची संस्कृती आणि सभ्यता राजकुलीन होती.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.

धार्मिक बाबतीत शिवाजीमहाराजांचे मन अतिशय उदार किंबहुना श्रद्धावंत होते. कोणत्याही धर्माच्या वा सांप्रदायाच्या प्रार्थनास्थळांचा , धर्मग्रंथांचा , रीतरिवाजांचा वा धर्मोपदेशक गुरुजनांचा त्यांनी सुलतानांप्रमाणे अवमान वा छळणूक कधीही केली नाही. त्या सर्वांचा त्यांनी आदरच केला. महाराज जेवढ्या आदराने आपल्या कुलगुरुंशी बोलत , वागत तेवढ्यात आदराने ख्रिश्चन , मिशनरी , धमोर्पदेशकांशीही वागत. मुसलमान साधुसंतांशीही त्यांचे वागणे अतिशय आदराचे असे. केळशी (जि. रत्नागिरी) येथील बाबा याकूत या संत अवलियांशी महाराज मराठी संतांइतकेच भक्तीभावाने वागत. काही ठिकाणच्या मशिदींना व्यवस्थेसाठी महाराजांनी अनुदाने दिलेली आहेत. अनेक किल्ल्यांवर मशिदी होत्या. त्यांचीही आस्था आणि व्यवस्था उत्तम ठेवली जात असे. चाँदरातीला चंददर्शन घडताच किल्ल्यांवरून तोफ उडत असे. बखरींतही महाराजांनी मुस्लिम सैनिकांबद्दल वेगळेपणा म्हणजेच भेदभाव दाखवल्याची एकही नोंद मिळत नाही.

पण महाराज धर्मभोळे , गाफील , ढिसाळ किंवा अंधश्रद्ध अजिबात नव्हते. पोर्तुगीज जेस्युईट मिशनरी दक्षिण रत्नागिरी भागांत अनेकदा सशस्त्रब्रससैन्य घुसखोरी करीत. तेथील मराठी बायकापोरांना गुलाम करून पळवून नेत. बाटवीत आणि स्त्रियांची जबरदस्तीने वाटणी करीत. गोवा इन्क्वीझिशनसारखे जुलमी राक्षसी प्रकार सतत चालू ठेवीत. ऑईल टॉर्चर , वॉटरटॉर्चर , फायरटॉर्चर यासारखे भयानक प्रकार या इन्क्वीझिशनमार्फत गोमांतकात चालू होते. हे सर्व प्रकार बंद पाडण्यासाठी संपूर्ण गोमांतके पोर्तुगीजांकडून जिंकून स्वराज्यात घेणे हाच एकमेव उपाय होता. महाराजांनी त्याकरिता प्रयत्न केले. थोड्या भागांत , थोड्या प्रमाणात त्यांना यशही आले. पण गोवा मुक्त होऊ शकला नाही. पण महाराजांनी एकदा बारदेशच्या स्वारीला वेळेला , मराठी बायकापोरांना आणि पुरुषांना जबरदस्तीनं गुलाम करणाऱ्या जेस्युईटांच्या सैन्यावर स्वत: जातीनिशी , योजनापूर्वक प्रतिहल्ला चढवला आणि त्यांचा पूर्ण बिमोड केला. त्यातील काही मिशनऱ्यांचे त्यांनी हात कलम केले. तेथे दयामाया केली नाही की , हे धमोर्देशक आहेत , संत आहेत हेही पाहिले नाही. याच्या नोंदी पोर्तुगीज दप्तरांत अधिकृत आहेत. डॉ. पांडुरंग पिर्सुलेर्कर आणि डॉ. ए. के. प्रियोळकर यांनी आपल्या गंथात हे नमूद केले आहे. पण महाराजांनी मिशनऱ्यांच्याच चांगल्या आणि लोकोपयोगी कार्याला पाठिंबाच दिला आहे. ६ जाने १६६४ या दिवशी फादर अॅम्ब्रॉस हा कम्युसिन ख्रिश्चन मिशनचा धमोर्पदेशक महाराजांना सुरत येथे स्वत: भेटावयास आला आणि त्याने ' आपण कृपा करून आमच्या प्रार्थनास्थळास , धर्ममठास आणि आमच्या हॉस्पिटलमधील गोरगरिब , दु:खी रुग्णांस त्रास देऊ नका. ' अशी विनंती केली. तेव्हा महाराजांनी काढलेले उद्गार (आणि त्याप्रमाणे आचरणही) फार लक्षात घेण्यासारखे आहेत. ते त्या फादरला म्हणाले , ' तुम्ही लोक गोरगरिबांच्याकरिता किती चांगले काम करता हे मला माहीत आहे. तुमच्या प्रार्थनास्थळांना आणि काम करणाऱ्या लोकांना (ख्रिश्चन मिशनऱ्यांना) आमच्याकडून अजिबात धक्का लागणार नाही. (आपणांस संरक्षणच दिले जाईल.) '

महाराज सर्वच धर्मातील संत सत्पुरुषांचे आशीर्वाद घेत होते. सर्वांच्याबद्दल अपार आदर ठेवीत होते. पण राजकारणात वा राज्यकारभारात त्यांचा सल्ला सहभाग घेत नव्हते. कोणताही साधुसंत त्यांचा राजकीय सल्लागार किंवा गुरू नव्हता. कोणत्याही साधुसंताने राज्यकारभारास किंवा राजकारणात हस्तक्षेप किंवा सल्लामसलत केल्याची एकही अधिकृत नोंद अद्याप मिळालेली नाही किंवा एकही अधिकृत कागदपत्र उपलब्ध झालेले नाही.

राजकारणांत अजिबात भाग घेतला नाही म्हणून कोणाही शिवकालीन संत सत्पुरुषाचे थोरपण कमी ठरत नाही. या सर्व संतांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक लोकजागृती , खऱ्या आणि डोळस श्रद्धेचा उपदेश , निर्व्यसनी आणि सदाचारी समाज निर्माण करण्याकरता त्यांनी आजन्म केलेले कार्य त्यांचे अत्यंत शुद्ध आणि साधे वर्तन आणि सर्वात मोठे राष्ट्रीय कार्य म्हणजे पारतंत्र्याच्याही बादशाही काळात मराठी भाषेची त्यांनी केलेली अलौकिक सेवा हे होय.

वा. सी. बेंदे या थोर इतिहासपंडितांच्या संशोधनाने मराठी इतिहासाला एक गोष्ट ज्ञात झाली की , श्रीगोंद्याचे शेख महम्मदबाबा हे मालोजीराजे भोसले , म्हणजेच शिवाजी महाराजांचे आजोबा यांचे धामिर्क परम श्रद्धास्थान होते. मालोजीराजांची श्रद्धाभक्ती अहमदनगरच्या शाहशरीफ या थोर सत्पुरुषांवरही होती. त्यांच्याच आशीर्वादाने मालोजीराजांना पुत्र झाले , अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांनी याच शाहशरीफ या संतांचे नाव आपल्या मुलांना ठेवले. शहाजीराजे आणि शरीफजी राजे या दोन्ही मुलांना मालोजीराजांनी ती नावे ठेवली. ' तौ शाहशरीफ सिद्धनामांकिता उभौ ' अशी अगदी स्पष्ट नोंद परमानंदाने शिवभारतात केलेली आहे.

जर शिवपूर्वकाळात , नजिक हे थोर मराठी संतसाहित्यिक झाले नसते , तर मराठी भाषेचे , मराठी संस्कृतीचे , मराठी दैवतांचे आणि मराठी आयडेन्टीटीचे केवढे मोठे नुकसान झाले असते! हे संत समाजसुधारक होते. ते लोकशिक्षक होते. त्यांना कोणत्याही धनदौलतीची वा सत्ताधिकाराची अभिलाषा नव्हती. एकदाच फक्त चिंचवडच्या गणेशभक्त साधुमहाराजांनी शिवाजीमहाराजांच्या राज्यकारभारात जरा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महाराजांनी त्यांना नम्रतेनेच पण स्पष्ट शब्दांत असे सुनावले , की पुन्हा तशी चूक त्यांचे हातून घडली नाही. कोणत्याही साधुसत्पुरुषाने महाराजांकडे धनधान्याची मागणी केली नाही. साधुसंत म्हणजे ईश्वराचे सर्वात जवळचे नातलग. ते विरक्तच असतात. त्यावर धंदा करतात , ते लबाड धामिर्क दलाल. अशा दलालांना महाराजांनी जवळीक दिली नाही. तशी संधीच कोणाला मिळाली नाही.

-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.

राष्ट्राच्या जीवनाच्या दृष्टीने आणि त्याच्या प्रगतीच्या दृष्टीने कर्तबगार माणसे घडवावी लागतात. विशेषत: राजकीय क्षेत्रात तर अशी माणसे तयार करावीच लागतात. अशा कर्तृत्त्ववान जबरदस्त धुरिणांची ' शाळा ' शिवाजीमहाराजांनी तयार केली. त्यात योद्धे तयार झाले , राज्यकारभारी तयार झाले. त्यातूनच हिंदवी स्वराज्य तयार झाले. पुढे एकदा (इ. १६७७ फेब्रुवारी) गोवळकोंड्याचा बादशाह अबुलहसन कुतुबशाह मराठ्यांंच्या मांदियाळीतील येसाजी कंकाचं विलक्षण धैर्य , शौर्य आणि कौशल्य पाहून शिवाजी महाराजांना म्हणाला , ' महाराज , हा येवढा येसाजी कंक आपण आमच्या पदरी द्या '

बादशाह येसाजीवर बेहद्द खूश झाला होता. म्हणून तो म्हणतोय , हा माणूस आमच्या पदरी द्या , तेव्हा महाराजांनी जे उत्तर दिले , ते एका बखरीत नमूद आहे. ते म्हणाले , ' आम्ही मोतियांची माळ गुंफली. त्यातील मोती आपण मागता. कैसा द्यावा ?' याचा अर्थ स्पष्ट आहे. अशी मोतियांची माळ तयार करणारे आपल्या इतिहासात तीन नेते डोळ्यासमोर राजकीय क्षेत्रात दिसतात. त्यातील पहिले नेते छत्रपती शिवाजी महाराज. दुसरे नेते बाजीराव (पहिले) पेशवे आणि तिसरे महात्मा गांधी. या तिघांनीही हुकमी शक्ती निर्माण केली.

पण हीच परंपरा खुंटली. आपल्याला राष्ट्र उभे करावयाचे आहे. हाच विचार खुंटला. म्हणूनच आपल्याकडे ' मॉब ' गोळा झाला आणि होतोय. सिलेक्टेड आणि इंटलेक्च्युअल असे नवीन पिढीत , एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही , युवानेते आज नजरेत येतात का ? सध्या तरी भीती वाटते आहे , की सगळ्या भारताचाच बिहार होणार काय ?

महाराजांनी आरमार अगदी नव्याने सुरू केले. हे काम केवढे कठीण होते! शून्यातून अथांग सागरात लढवय्ये आणि लढाऊ योद्धे आणि युद्धनौका निर्माण करावयाच्या होत्या. समोर शत्रू होता , युरोपीयन. सागरी सैनिक तर ' श्रीगणेशा ' पासून तयार करावयाचे होते. अवघ्या तीन वर्षात महाराजांनी या बाळ आरमाराला ऐरावताचे बळ आणले. आरमारी सैनिकांच्या तरबेज हत्यारबाजीच्या आणि तोफा बर्कंदाजीच्या उत्कृष्ट शिपाईगिरीच्या जोडीला , सागरी किल्ल्यांची आणि लढाऊ गलबतांची बांधणी करणारे कामगारही महाराजांनी उभे केले. जेम्स डग्लस याने आपल्या ' अराऊंड बॉम्बे ' या गंथात इ. स. १८८५ मध्ये लिहून ठेवले आहे , की ' अरे! तो शिवाजी महाराष्ट्राच्या भूभागात जन्माला आला. जर तो आणि त्याचे वाडवडील सागरी जीवनात जन्माला आले असते , तर तुम्हा युरोपीय लोकांना त्याने आफ्रिकेच्या अलिकडे पूवेर्ला (म्हणजेच कोकण किनाऱ्याकडे) फिरकूही दिले नसते. '

हे सारे महाराजांनी शून्यातून निर्माण केले. सैनिकी , आरमारी , डोंगरी वा राजकारभारी क्षेत्रात महाराजांनी जबर आणि तरबेज म्हणजेच जाणत्या युवकांची हुकमी शक्ती उभी केली. या हुकमी शक्तीला अतिशय महत्त्व आहे. त्याकरिता सर्व माणसांचीच मानसिकता आगळीवेगळी घडवावी लागते. त्याची ताकद यंत्रापेक्षा जास्त असते. कारण यंत्रच माणसांनी निर्माण केलेले असते. महाराजांनी ही सजीव आणि सुबुद्ध , तत्पर आणि विवेकी माणसांची शाळाच निर्माण केली.

रायगडावरच्या टकमक टोकाकडे आमचे नेहमीच विस्फारून लक्ष जाते. तो भयंकर कडा जणू आपल्याला बजावीत असतो , की ' पोरांनो , इथून चढायची हिम्मत होईल फक्त वाऱ्याच्या झोताला आणि उतरायची हिम्मत होईल फक्त पाण्याच्या धोधो धारेला. मी अजिंक्य आहे. सीतेच्या अंत:करणात रावणाला प्रवेश मिळणं जेवढं अशक्य तेवढंच माझ्या या कड्यावरून चढून येणं शत्रूलाही अशक्य. कारण मी महाराजांचा कडा आहे आणि माझ्या खांद्यावर उभे आहेत तरबेज बलाढ्य , बुद्धिमान आणि इमानदार मराठी युवक. शिवसैनिक. '

हा टकमक्या कडा स्वराज्याशी दोह करणाऱ्या हरामखोरांचा कडेलोट करण्याकरिता महाराजांनी खास ठेवला होता म्हणे! पण शिवकाळात या कड्यावरून कोणाचाही कडेलोट केल्याची नोंद नाही. कारण स्वराज्याशी कोणी हरामखोरी केलीच नाही ना!
-बाबासाहेब पुरंदरे

बुधवार, १८ मार्च, २००९

शिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.

शिवाजीराजांनी प्रारंभापासूनच हे ओळखले होते , की स्वराज्य उभे राहील आणि वाढेल ते कोणत्यातरी जबरदस्त अभिमानामुळेच. मग तो अभिमान आपल्या इतिहासाचा , भाषेचा , भूमीचा किंवा परंपरेचा असो. देवदैवतांची भक्ती आणि परंपरेने चालत आलेल्या पौराणिक कथा यांचाही तो अभिमान असू शकतो. महाराजांच्या मनात या सर्वच गोष्टींचा अभिमान आणि आदर उदंड साठवलेला होता. पण या अभिमानापोटी महाराजांनी कोणत्याही परधर्माचा , रीतरिवाजांचा वा भाषेचा द्वेष कधीही केला नाही. कधीही कोणाचा अपमान किंवा छळणूक केली नाही. आपली भाषा ही श्रीमंत आणि सर्व विषयांतील ज्ञानांनी समृद्ध असावी हाच विचार महाराजांच्या मनांत आणि आचरणात कायम दिसून येतो.

संस्कृत भाषेवर तर त्यांच्या मनांत नितांत प्रेम आणि भक्ती होती. महाराजांचा शिक्का आणि मोर्तब ही अगदी प्रारंभापासून संस्कृतमध्येच होती. त्यांचे अधिकृत शिक्क्याचे पहिले पत्र किंवा सर्वात जुने पत्र सापडले आहे ते इ. १६३९ चे. म्हणजेच त्यांच्या वयाच्या नवव्या वषीर् त्यांचा संस्कृत शिक्का वापरला जाऊ लागला. कदाचित त्याही पूवीर् हा शिक्का वापरला जात असेल. पण इ. १६३९ पूवीर्चे असे संस्कृत शिक्क्याचे विश्वसनीय पत्र अद्याप उपलब्ध झालेले नाही. म्हणजेच इ. १६३९ चे महाराजांचे पत्र हे पहिलेच पत्र शिक्का मोर्तबीचे असले तरी वयाच्या नवव्या वर्षी महाराजांनी स्वत: युद्ध , अर्थपूर्ण आणि आपला ध्येयवाद व्यक्त करणारे कविताबद्ध संस्कृत भाषेतील शिक्का मोर्तब स्वत: तयार केले असेल असे वाटत नाही. ' प्रतिपच्चंदलेखेव वधिर्ष्णुविंश्व वंदिता शाहस्नो: शिवस्वैषा मुदा भदाय राजते ' आणि पत्रलेखन पूतीर्ची मुदा होती ' मर्यादेयंविराजते ' ही शिक्कामोर्तब अत्यंत उदात्त राजकुलीन आहे.

ही मुदा बहुदा जिजाऊसाहेबांच्या इच्छेप्रमाणे व मनोभावनेप्रमाणे कोणा जाणकार संस्कृत कवीकडून तयार करवून घेतली असावी. ' प्रतिपदेच्या चंदाप्रमाणे विकसित होत जाणारी ही शहाजीपुत्र शिवाजीराजे यांची मुदा विश्ववंद्य व कल्याणकारी आहे. ' हा या शिवराजमुदेचा आशय आहे. यातच शिवाजी महाराजांचा उदात्त , महत्त्वाकांक्षी आणि विश्वकल्याणकारी ध्येयवाद आणि आयुष्याचा संकल्प व्यक्त होतो. प्रत्यक्ष स्वराज्याच्या राजकारभारास प्रारंभ झाल्यापासून महाराज अधिकाधिक लक्ष आपल्या मराठी भाषेवर व मूळ मातृभाषा असलेल्या संस्कृतवर देताना दिसतात. त्यांच्या राजपत्रातून फासीर् भाषेतील शब्द कमी होऊन मराठी भाषा अखंडित लक्ष्मी अलंकृत राजश्रीया विराजित सकळ गुणालंकरण अशी श्रीमंत होत गेलेली दिसते. पुढे तर बाळाजी आवजी चित्रे उर्फ चिटणीस यांच्याकडून महाराजांनी ' लेखनप्रशस्ती ' या नावाचा एक निबंधच लिहवून घेतला. महाराजांचे सापडलेले शिलालेख संस्कृतमध्येच कोरलेले आहेत. रायगडावर जगदीश्वर मंदिरावर असलेला शिलालेख म्हणजे रायगडचे वर्णन करणाारे सुंदर संस्कृत भाषेतील एक गोड काव्यच आहे.

महाराजांचे पदरी अनेक संस्कृतज्ञ पंडित होते. परमानंद गोविंद नेवासकर , संकर्षण सकळकळे , धुंडिराज व्यास , रघुनाथ पंडित अमात्य , बाळकृष्ण ज्योतिषी संगमेश्वरकर , केशव पंडित पुरोहित , उमाजी पंडित , गागाभट्ट इत्यादी. याशिवाय पाहुणे भाषा पंडितही अनेक होते. जयराम पिंड्ये , गोरेलाल तिवारी , कवीराज भूषण , निळकंठ कवी कलश इत्यादी. अन् प्रत्यक्ष स्वराज्याचे युवराज संभाजीराजे हेही संस्कृतचे उत्तम पंडित होते. युवराज शंभूराजे संस्कृतभाषेत इतर पंडितांबरोबर संवाद चर्चा करीत असत. अशी ही रायगडची राजसभा विद्वत्जंग होती.

स्वराज्यात कोणालाही कोणत्याही भाषेत लेखन , वाचन आणि अभ्यास करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. एका पुसटश्या उल्लेखावरून असा तर्क धावतो , की प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांना फासीर् भाषेचा परिचय असावा आणि संस्कृत भाषाही त्यांना येत असावी. रामायण महाभारतादि गंथांची ओळख , किंबहुना चिरपरीचय त्यांना नक्कीच होता. त्यांच्या काही पत्रांत या पौराणिक काव्यातले संदर्भ स्पष्ट दिसतात. स्वत: शिवाजीमहाराजांनी ओवी अभंगासारख्या चार सहा ओळी केलेली एक भक्ती युक्त रचना तंजावरच्या दप्तरखान्यात उपलब्ध आहे. अर्थात ते कितपत विश्वसनीय आहे हे आत्ताच सांगता येत नाही. अधिक पुराव्यांची गरज आहे.

याशिवाय शिवकाळात आणि शिवराज्यात अनेक संस्कृत मराठी , फासीर् , दख्खनची उर्दू आणि हिंदुस्थानी भाषेत लहानमोठ्या काव्यरचना वा ग्रंथरचना करणाऱ्यांची यादी तशी बरीच मोठी आहे. त्यातूनही आपणांस शिवचरित्राचा आणि इतिहासाचा अभ्यास करता येतो.

कलेच्या बाबतीत स्वराज्यात काय काय घडले , हे फार विस्ताराने सांगण्याइतके उपलब्ध नाही , तरी पण शिल्पकला , चित्रकला , संगीत , कापड-विणकाम , दागदागिने , होकायंत्रे , दुबिर्णी , चष्मे , रोगराईवरील औषधे , तोफा बंदुका , हुके (हातबॉम्ब) तमंचे (ठासणीची पिस्तुले) , कडाबिनी ( अनेक गोळ्या एकाचवेळी उडवण्याचे बंदुकीसारखे हत्यार) आणि तलवारी , कट्यारी , पट्टे , भाले , विटे , वाघनखे , बचीर् , तिरकामठे , बिचवे , गुर्ज इत्यादी पोलादी हत्यारे स्वराज्यात तयार होत असत.

तेवढीच परदेशातूनही आयात केली जात असत. रोग्यावर औषधोपचार करण्याकरिता पोर्तुगीज , फ्रेंच आणि इंग्रज डॉक्टरांनाही क्वचित प्रसंगी बोलावीत असत. कापडचोपड , पैठण , येवले या ठिकाणी भारी किंमतीचे तयार होत असे. पण किनखाप , गझनी , भरजरी तिवटे हे बहुदा उत्तरेकडून आणि बऱ्हाणपूर , औरंगाबाद , दिल्ली अशा बाजारपेठांतूनच येत असे. मराठ्यांना तलवारींची आवड मोठीच होती. युरोपीय देशातील आणि मस्कत , तेहरान , काबूल इत्यादी ठिकाणी तयार होणाऱ्या तलवारी फार मोठ्या प्रमाणात आजही जुन्या मराठी घराण्यांत अडगळीत पडलेल्या सापडतात.

महाराष्ट्रात कोणत्याही जाती समाजात शूर पुरुष होऊन गेलेले दिसतात. तसेच शाहीर कवी झालेलेही सापडतात. ईश्वराची सेवा आपापल्या इच्छेप्रमाणे आणि धर्ममताप्रमाणे करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य येथे होते.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .

महाराजांना विद्वान पंडितांच्याबद्दल , कुशल कारागिरांच्याबद्दल आणि प्रतिभावंत कलाकारांच्याबद्दल नितांत प्रेम होते. त्यांचे सर्व आयुष्य राजकारणाच्या आणि रणांगणाच्या धकाधकीत गेले. जर त्यांना स्वास्थ्य लाभले असते , तर त्यांनीही कोणार्कासारखी अतिसुंदर आणि भव्य मंदिरे आणि प्राचीन राजांप्रमाणे नद्यांना सुंदर घाट बांधले असते. स्वराज्यापाशी तुडुंब पैसा नव्हता. राजापाशी शांत आणि निविर्घ्न वेळ नव्हता. पण हा मराठी राजा रसिक होता.

प्रतापगडावरचे श्रीभवानी मंदिर , गोव्यातील श्रीसप्तकोटीश्वर मंदिर , पुण्याचे श्रीकसबा गणपती मंदिर , पाषाणचे श्री सोमेश्वर मंदिर (अन् लगूनच असलेला राम नदीवरील घाट) महाराजांनी बांधलेले आपण आजही पाहतो आहोत. राजपूत राजांप्रमाणे आणि मोगल बादशाहांप्रमाणे महाल आणि प्रासाद महाराजांना बांधता आले नसते काय ? पण त्यांचे दोन्हीही हात ढाली तलवारीत गुंतलेले होते. त्यामुळे झाले ते एवढेच झाले. बराच पैसा खर्च करून सुंदर बांधलेले एक भव्य गोपुर मात्र आंध्रप्रदेशात श्रीशैलम येथे आजही उभे आहे. ते शैलमचे मंदिरास उत्तरेच्या बाजूस असलेले गोपुर महाराजांनी बांधले.

तिथे एक गंमत आहे. हे गोपुर बांधताना ते स्वत: एकही दिवस हजर राहू शकले नाहीत. वास्तुकलाकारांच्या हाती परवालीने पैसा ओतून या गोपुराचे काम करवून घेतले गेले. हे झालेले काम त्यांना स्वत:ला कधीही पाहता आले नाही. पण काम करणाऱ्या कुशल वास्तुकलाकारांनी बांधकाम अप्रतिम केलेले आहे. आपण या गोपुराच्या दारात उभे राहिलो , तर आपल्या डाव्या हातांस म्हणजेच पूवेर्कडे असलेल्या भव्य देवडीत (देवडी म्हणजे देवाचिये द्वारी , क्षणभरी उभे राहण्याकरता किंवा बसण्याकरिता असलेली सुंदर जागा) आपण पाहिले , तर त्या सायसंगीने दगडी भिंतीवर शिवाजीमहाराजांची मूतीर् कोरलेली आपणांस दिसेल. महाराज श्री शैलेश्वरास नम्रतापूर्वक भक्तिभावाने नमस्कार करीत आहेत. असे त्या शिल्पात दाखवले आहे. हे शिल्प तेथे काम करणाऱ्या , त्यावेळच्या कलाकार शिल्पकारांनी कोरलेले आहे.

महाराजांनी अनेक जुने किल्ले दुरुस्त केले आणि अगदी नव्याने आठ किल्ले बांधले. ते सर्वच किल्ले बलदंड आहेत. त्यातील राजगड किल्ला तर अतिशय देखणा आहे. राजपुतांनी प्रचंड अन् सुंदर महाल बांधले. जैसलमेर , जयपूर , जोधपूर , बंुदी , भरतपूर , दतिया , बिकानेर इत्यादी ठिकाणचे महाल स्वगीर्य सौंदर्याने नटलेले अहेत हे अगदी खरे. पण स्वातंत्र्याने मात्र त्यातला एकही महाल वा किल्ला कधीच सजला नाही. ती सार्वभौम स्वातंत्र्याची सजवणूक महाराजांनी किल्ले बांधून आणि लढवून सह्यादीच्या खडकाळ प्रदेशात मयसभाच उभी केली.

महाराजांनी शेतकऱ्यांसाठी बंधारे आणि विहिरी बांधल्या. शिवापूर आणि पाचाड (रायगड) येथे फळबागा सजवल्या. पण एवढेच. याहून अधिक काही करता आले नाही. जे दगडाधोंड्यात करता आले नाही , ते त्यांनी विद्वान प्रतिभावंतांकडून लेखणीने कागदावर करवून घेतले. राज्यव्यवहार कोश या नावाचा शब्दकोश त्यांनी धुंडीराज व्यास आणि रघुनाथ पंडित अमात्य यांचेकडून लिहवून घेतला. अमात्यवथीर् रघुनाथनामा , करो ति राज व्यवहाराकाशम् सारी मराठी भाषा फासीर् आणि अरबी भाषेने अल्लाउद्दीन खलजीपासून ते औरंगजेबापर्यंत गराडली गेली होती. राज्य व्यवहारातील बहुतेक शब्द हे फासीर् वा अरबीच होते. आपल्याच राज्यात आपलीच भाषा असली पाहिजे असा महाराजांचा मनोमन निर्णय होता. ' स्व ' या शब्दाचे महत्त्व आम्हाला कधी कळलेच नाही.

आजही आम्हाला ते कितपत कळले नाही. आजही आम्हाला ते कितपत कळले आहे ? परक्यांच्या भाषेत आम्ही आमच्या आवडीच्या माणसांवर प्रेम करतो. आमच्या भाषेत ते प्रेम आम्हांस जमतच नाही. आम्ही नकळत किंवा कळूनही अरब बनतो , इराणी बनतो. भाषा हा राष्ट्राचा प्राण आहे. अहो आमचा बायकोवरही हक्क नाही. कारण ' बायको ' ( पत्नी) हा शब्द मराठी नाही. तो तुकीर् शब्द आहे. म्हणजे आमची बायको ही पण मराठी नाही. राज्य व्यवहारातील सर्व नामे क्रियापदे , विशेषणे आणि गौरवाची गाणी अन् शिव्याशाप आमच्याच भाषेत असले पाहिजेत. महाराजांनी पहिला प्रयत्न राज्यव्यवहार कोश तयार करून केला. प्राईम मिनिस्टरला पेशवा म्हणायचे नाही. त्याला पंतप्रधान म्हणायचे. कारकुनाला लेखक वा लेखनाधिकारी म्हणायचे. समुदावरच्या अॅडमिरल सरखेलाला आपल्या भाषेत सागराध्यक्ष म्हणायचे. अन् अशी शेकडो उदाहरणे या कोशात आहेत. एकदा संज्ञा बदलली की संवेदनाही बदलतात. त्यातूनच अस्मिता फुलतात. अन् मग त्या अस्मितांसाठी माणूस अभिमानाने प्राण द्यावयासही तयार होतो.

महाराजांनी अज्ञानदाससारख्या मराठी शाहिरांकडून आपल्या शूरवीरांचे पोवाडे तयार करवून घेतले. अन् गाणाऱ्या शाहिरांच्या हातात सोन्याचे तोडे घातले. खगोलशास्त्रावरती आणि कालगणनेवरती महाराजांनी बाळकृष्ण दैवज्ञ संगमेश्वरकर यांजकडून संस्कृतमध्ये करणकौस्तुभ नावाचा निखळ शास्त्रीय गंथ लिहवून घेतला. अशा सुमारे सतरा अठरा गंथांचा आत्तापर्यंत शोध लागला आहे. अधिकही असतील.

येथे एक आठवण द्यावीशी वाटते. महाराजांनी ही सरस्वतीची आराधना आपल्या लहानशा आयुष्यात केली. पेशवाईत इ. १७१३ पासून इ. १८१८ पर्यंत एकही गंथ लिहवून घेतला नाही.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.

केळशीच्या बंदरात जिवाजी विनायक सुभे
दार यांची वाट पाहात दौलतखान आणि दर्यासारंग थांबले होते. सुभेदार जी रसद आणि युद्धसाहित्य घेऊन येणार होते , ते आलेच नाहीत. काय घोटाळा झाला कोण जाणे! पण अपेक्षेपेक्षा जास्त वेळ वाट पाहूनही सुभेदार न आल्यामुळे दौलतखानाने रायगडाकडे बातमी पाठवली की , ' आम्ही अगदी वेळेवर केळशीच्या बंदरात गलबते घेऊन थांबलो आहोत. पण जिवाजी सुभेदार अद्यापही आलेले नाहीत , तरी आम्ही काय करावे ? आज्ञा करावी. '

केळशीची ही खबर महाराजांस रायगडावर समजली. कोणतेही काम ठरल्याप्रमाणे वेळच्यावेळीच करण्याचा महाराजांचा शिरस्ता आणि कडक हट्ट होता. इथे तर ऐन युद्धकाळात कांसा बेटावर काम करणाऱ्या शेकडो मराठी लोकांच्याकरिता रसद पाठवण्यास थोडाही उशीर करून चालणार नव्हता. सुभेदार जिवाजींचा हा गलथानपणा किंवा बेखबरदारपणा पाहून महाराज संतापले आणि त्यांनी जिवाजी विनायक सुभेदार यांना असे झणझणीत पत्र पाठवले , की त्यातील एक एक अक्षर लवंगी मिरचीसारखे तिखट होते. महाराजांनी लिहिले होते , ' कांसा बेटावर हशम , कामाठी आणि आरमारी शिपाई काम करीत आहेत. जंजिऱ्याच्या श्यामलांस जबर शह देण्यासाठी आम्ही दांडा राजपुरीसारखी दुसरी दांडाराजपुरी कांसा बेटावर उभी करू पहात आहोत. तुम्ही मात्र बेदरकार दिरंगाईने बेफिकिर वर्तता ? तुमच्यामुळे दौलतखान आणि दर्यासारंग आरमारानिशी खोळंबून पडले. असे बेजबाबदारीने वागण्यासाठी गनिमानेच ( जंजिरेकर सिद्दीने) तुम्हांस काही ( लाचलुचपत) देऊन आपलेसे केलेले दिसते. बेदरकारीने म्हणत असला की , दुसरीकडून कोठून तरी कांसा बेटावरील कामास मदतीचा मजरा (तरतूद) होईल. ही अशी बुद्धी तुम्हांस कोणी दिली ? ब्राह्माण म्हणून तुमचा मुलाहिजा कोण ठेऊ पाहतो! बरा नतीजा (परिणाम) पावावा. बहुत काय लिहिणे ? तरी तुम्ही सूज्ञ असा. '

एकूण या प्रकरणात जिवाजी विनायकाचा गुन्हा स्पष्ट दिसून येतो. त्याने जर काही घोटाळा झालाच असेल , तर स्वार पुढे पाठवून केळशीस दौलतखानास खबर देणे जरुर होते , हे तर अगदी उघड आहे. पण त्यानेही काहीच कळवले नाही. त्यामुळे महाराजांनी संतापून ' तुमचा मुलाहिजा कोण ठेवू पाहतो. ' असा जाब पुसला. यावरून महाराजांचा स्वभाव , कडक शिस्त आणि विलक्षण तत्परता दिसून येते. या प्रकरणात जिवाजी विनायकांचे काय झाले ते समजत नाही. पण बहुदा महाराजांनी सुभेदारीवरून त्यांना बडतर्फ केले असावे असा साधार अंदाज आहे.

हीच शिस्त महाराजांच्या जीवनांत कडकपणे पाळली गेेलेली दिसून येते. कारवार स्वारीच्या वेळी (इ. १६६५ फेब्रु.) एका मराठी हेराने पाठविलेल्या गुप्त बातमीत चुका झाल्या म्हणून महाराजांना कारवारी मोहिमेत थोडा फटका खावा लागला. नुकसान झाले. महाराजांनी त्या चूक करणाऱ्या हेराला शिक्षा केली. नेतोजी पालकराने सेनापती पदावरून , शामराजपंत रांजेकरांना पंतप्रधानपदावरून आणि नरहरी गंगाधरांसारख्या बुद्धिमान मंत्र्याला मंत्रीपदावरून काढून टाकणारे महाराज कोणाही लहान आणि मोठ्या सरकारी नोकरदाराला मुलाहिजा ठेवीत नसत.

शिदोजी प्रतापराव गुजर हा पुढे सिंहगडचा किल्लेदार होता. (इ. १६७६ ) त्याने बेचौकशी जेजुरीच्या देवस्थानच्या नारायण महाराज देव यांच्या केवळ निरोपावरून गडावर तुरुंगात डांबले. हे महाराजांस समजले , तेव्हा महाराजांनी शिदोजी गुजराला जाब विचारला की , ' तू चिंचवडकर देवमहाराजांच्या सांगण्यावरून एका गरिबाला गडावर तुरुंगात डांबतोस ? हा अधिकार तुला कोणी दिला ? तू चाकर कोणाचा ? छत्रपतींचा की चिंचवडकर देवांचा ?' त्या गरिबांस महाराजांनी पूर्ण मुक्त केले. शिदोजीस काही शिक्षा केली का याची माहिती मिळत नाही. पण नक्कीच शिक्षा वा जुर्माना ठोठावला असावा असे वाटते. हा शिदोजी गुजर म्हणजे प्रसिद्ध प्रतापराव गुजरांचा प्रत्यक्ष पुत्र होता. चिंचवडकर देव महाराज हे थोर गणेशभक्त साधुपुरुष होते. त्यांनाही महाराजांनी एक पत्र लिहून म्हटले आहे की , एका गरिबावर आपण का अन्याय केलात ? ' आमची बिरदे तुम्ही घ्या. (बिरदे म्हणजे बिरुदे , अधिकारपद) आणि आपली बिरदे आम्हांस द्या. ' म्हणजे याचा अर्थ असा की , तुम्ही छत्रपती व्हा आणि आम्ही चिंचवडास आरत्या धुपारत्या करीत बसतो! हे पत्र इतके बोलके आहे , की आमच्या आजच्या सर्व पक्षातील सर्व लहान आणि मोठ्या अधिकाऱ्यांनी त्याचा महिनाभर अभ्यास करावा.

कांसा बेटावरील किल्ल्याचे बांधकाम अतिशय कठीण अडचणींना तोंड देतदेत पुरे होत होते. थबकत नव्हते. सिद्दीच्या विरोधाला टक्कर देऊन महाराजांनी किल्ला बांधून पूर्ण केला आणि या किल्ल्याला नाव दिले. ' पद्मदुर्ग. '

महाराजांचे अनुशासन युरोपीय टोपीकरांपेक्षाही शिस्तबद्ध , वक्तशीर , योजनाबद्ध आणि उत्कृष्ट दर्जाचेच होते. म्हणूनच अस्ताव्यस्त खर्च , साहित्याची नासाडी आणि प्रजेचे हाल कधीही झालेले दिसत नाहीत. अचानक पाऊस आला आणि सरकारी धान्याची गोदामे भिजून सडून , रोगराईपण झाली आणि परिणाम प्रजेला भोगावे लागले , असे वृत्तांत सध्या आपण ऐकतो , तसे कधीही घडले नाही , घडत नसे.महाराजांचे आसूड हे असे भीडमुर्वत न ठेवता कडाडत होते.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.

महाराजांचं लक्ष चौफेर होतं. पण सर्वात जास्त लक्ष
कोकण किनाऱ्यावर होतं. हाबशी , अरब आणि तमाम युरोपीय टोपीवाले कोणच्याक्षणी आपल्या या कोकण किनाऱ्यावर येतील , याचा नेम नव्हता. पोर्तुगीज आणि सिद्दी , इंग्रज आणि डच हे असेच आले नाहीत का ? सिद्दी , पोर्तुगीज आणि मुंबईकर इंग्रज हे असेच अचानक आमच्या भूमीवर राज्य थाटून बसले नाहीत का ? म्हणून महाराज अतिशय सावध होते आणि या राज्य थाटून बसलेल्या परकीय गनिमांना तळामुळासकट उखडून काढण्याचा ते सतत विचार आणि प्रयत्न करत होते.

आताही महाराजांच्या मनांत जंजिरेकर हाबश्यांच्या विरुद्ध कडवा कावा करण्याचा विचार आला. पण पूर्वतयारी उत्तम करून आणि जय्यत तयारीनिशी.

जंजिऱ्याच्याच समुदात उत्तर दिशेला सुमारे पाच कि.मीवर एक बेट आहे. बेटाचे नाव कांसा. या बेटावर आपण सागरी किल्ला बांधावा , असा विचार त्यांचे मनांत आला. तो उत्तम नौकातळ ठरेल अन् उत्तरेकडून जंजिऱ्याला गळफास लावता येईल असा त्यांचा बिनचूक आरमारी विचार होता.

महाराजांचे एक जबर वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे लष्करी गुप्तता. सगळा डाव डोक्यात पक्का तयार ठेवायचा अन् मग अगदी संबंधितांना तो समजावून सांगायला अन् मग त्याची मोहिम सुरू करायची , हा महाराजांचा स्वभावच बनला होता. त्यांच्या आयुष्यात या गुप्ततेला अतिशय महत्त्व होतं. त्यामुळेच त्यांचा गनिमी कावा अधिकाधिक यशस्वी झालेला दिसून येतो. एखाद्या मोहिमेत समजा माघार घ्यावी लागली किंवा चक्क पराभवच झाला , तर लगेच पुढे काय करायचे याचे राजकारण बुद्धिबळाच्या डावासारखे त्यांच्या मनांत आधीच मांडलेले असे. यात क्वचित प्रसंगीच फसगत होतही असे. पण ती क्वचितच.

आताही महाराजांच्या मनांत कांसा बेटावर किल्ला बांधण्यासाठी जरा दीर्घकाळ खाणारी योजना आली. समोरच जंजिऱ्याच्या सिद्दीसारखा वाघ आ करून बसलाय. वायव्य दिशेला मुंबईकर इंग्रज बसलेत. आगरकोटला पोर्तुगीजांचे एक लष्करी पॉकेट आहेच. अशा परिस्थितीत दगडाधोंड्याचा एक लष्करी किल्ला बेटावर बांधायचा आहे. भोवतालचे शत्रू गप्प बसणार नाहीत. विरोध होईल. हा सारा विचार करून महाराजांनी कांसा बेटाची योजना स्वराज्यातील कोकणी किनाऱ्यावर पूर्वयोजनेने केली. म्हणजेच गवंडी , लोहार , सुतार , बेलदार , मजूर आणि बांधकाम करवून घेणारे जाणते सिव्हील इंजिनीयर्स हे आधीपासून निश्चित केले. अन् हे बांधकाम सुरू झाल्यापासून संपेपर्यंत उत्तम चालावे याकरता इतर बंदरातून सतत जरुर त्या साहित्याचा आणि अन्नधान्याचा पुरवठा करणारी लहानमोठी गलबते सुसज्ज ठेवली. कामगारांना कोणत्याही बाबतीत तुटवडा किंवा हालअपेष्ट वा उपासमार होऊ नये याची जय्यत पूर्वतयारी महाराजांनी अगदी गुप्तरितीने आधी तयार ठेवली.

अन् एके दिवशी ही सर्वच यंत्रणा रात्रीचे वेळी आपापल्या जागेवरून ठरलेल्या योजनेनुसार कामाला लागली. कांसा बेटावर कामगार अचानक उतरले. आरमारी मचव्यांचा संरक्षणासाठी बेटाभोवती सुसज्ज गराडा पडला. औषधे , जळाऊ सरपण , निवाऱ्याकरता तंबूराहुट्या , शंभर प्रकारची कामेधामे करण्याकरिता लागणारे कामाठी मजूर , रात्री मशाली अन् तेलदिव्यांची व्यवस्था , स्वच्छ पाणी इत्यादी प्रत्येक गोष्टीची तरतूद आधी सुसज्ज ठेवली होती , ती कामाला लागली. अन् दुसऱ्याच दिवशी उजाडता उजाडता , जंजिऱ्याच्या किल्ल्यावरून हाबश्यांना दिसून आले , की कांसा बेटावर मराठे रातोरात अचानक उतरले आहेत. अन् अकस्मात त्यांनी किल्ला बांधायलाही प्रारंभ केला आहे. हाबशी थक्कच झाले.

इथे एक आठवण होते. दुसऱ्या महायुद्धात (इ. १९३९ ते १९४५ ) जर्मनीने काही देश उदाहरणार्थ नॉवेर् , इतके अचानक आणि अकस्मात काबीज केले , की त्या देशातल्या हवामानालाही उमगले नसावेत.

हीच अचानकता आणि आकस्मिकता महाराजांच्या लष्करी हालचालीत होती. नेहमीच होती.

कांसा बेटावरचे बांधकाम सुरू झाले. सिद्दीच्याही आरमारी दांडगाया सुरू झाल्या. पण बांधकाम निवेर्ध चालू राहिले. याचे मुख्य कारण सर्वचजण निष्ठेचे होते. आपापल्या कामांत तत्पर आणि तरबेज होते. त्यांना लागणारी प्रत्येक गोष्ट विनाविलंब पुरविणारी व्यवस्था चोख होती. भोवतीचे संरक्षक आगरी , कोळी , भंडारी आरमारी सैनिक सुसरीसारखे जागे होते.

याचवेळी एक विलक्षण घटना घडली. कांसा बेटावर पुरवठा करण्याकरिता महाराज गुप्तरितीने अत्यंत योजनापूर्वक ठिकठिकाणच्या बंदरांना हुकुम पाठवीत असत. मग तेथून तो माल सुखरूप बेटावर पोहोचण्याकरिता गलबते सिद्ध असत. ती गलबते योग्य वेळी निघत आणि योग्यरितीने बेटांवर पोहोचत. मधे आधे शत्रूने म्हणजे सिद्दींनी काही घातपात केला तरी इतर मार्गानी येणारी गलबते बेटावर पोहोचत. कामगारांची अडचण होत नसे.

एकदा महाराजांनी दौलतखान आणि दर्यासारंग या आपल्या आरमारी सरदारांना गुप्त हुकुम पाठवला की , ' केळशीचे बंदरात रसद (पुरवठा) तयार असेल. ती अमूक दिवशी , अमूक वेळेला तुम्ही तेथे पोहोचून ती ताब्यात घ्या. तुमच्या गलबतावर चढवा व कांसा बेटावर दक्षतापूर्वक पोहोचती करा. '

हे काम जोखमीचे युद्धकाळात तर फार फार दक्षतेने करण्याचे.

असाच हुकुम राजापूरजवळच्या प्रभावनवळांच्या सुभेदार जीवाजी विनायक यांस महाराजांनी गुप्तरितीने पाठवला. हे काम जोखमीचे. अन्नधान्य , सरपण व इतर साहित्य केळशीच्या बंदरात ठरल्या दिवशी वेळेलाच पोहोचविण्याची जबाबदारी जिवाजी विनायक यांच्यावर आली.

ठरल्यादिवशी , ठरल्यावेळीच हा माल नेण्यासाठी दौलतखान आणि दर्यासारंग मराठी गलबते घेऊन केळशीचे बंदर बिनचूक दाखल झाले. पण जिवाजी विनायक हे आलेलेच नव्हते. अर्थात रसदही तयार नव्हती. दौलतखान गोंधळला. ठरल्याप्रमाणे घडत नाही याचा अर्थच त्याला कळेना. एवढंच कळत होतं की यांत स्वराज्यकामाचा घात आहे. नुकसान आहे.

दौलतखानाने आणि दर्यासारंगने चार घडी वाट पाहिली , तरीही जिवाजी विनायकाचे मदतीचे काफिले येताना दिसेचनात. आता ?
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.

जीवनातील कोणतीही गोष्ट करताना शिवाजी महाराज असा विचार करत असत की , या गोष्टीचा स्वराज्यावर कोणचा परिणाम होईल ? निदान वाईट परिणाम तर होणार नाही ना ? मग ती गोष्ट राजकीय , धार्मिक , आर्थिक किंवा अगदी कौटुंबिकही असो. महाराजांची स्वत:ची एकूण आठ लग्ने झाली. यातील काही लग्ने ही याच विचाराने साजरी झाली की , या विवाहामुळे स्वराज्याच्या सार्मथ्यात काही उपयोगाचे राजकारण किंवा समाजकारण घडणार आहे का ? नाईक-निंबाळकर , राजे महाडिक , राजे जाधवराव , गायकवाड , इंगळे , मोहिते इत्यादी घराण्यातील मुलींशी महाराजांचे विवाह झाले. ही सर्वच घराणी फार मोठ्या मानाची आणि राजकीय महत्त्वाची होती. ही सर्वच घराणी कोणा ना कोणातरी बादशाहाच्या पदरी सरदारी करणारी होती.
त्यामुळे या विवाहसंबंधामुळे ही घराणी केवळ भोसले राजांच्याच नात्यात गुंफिली गेली. स्वराज्याचे हे सर्व सासरे जबरदस्त लष्करी सरदार बनले. नाती गोती जोडतानाही जिजाऊसाहेबांनी आणि शिवाजीराजांनी स्वराज्याच्या हिताचा विचार केला. नवीन पिढीतही महाराजांनी हेच सूत्र कायम ठेवले. कोकणातील शिकेर्राजे , सुवेर्राजे , विचारेराजे या घराण्यांचाही महाराजांनी असाच विचार केला. यावेळी कोकणात डेरवण , गोंडमळा आणि कुटरे या भागात (तालुका चिपळूण) शिकेर्राजांचं घराणं फारच मातब्बर होतं. मंडळी शूर होती. खानदानी वजनदार होती. पण शिकेर्राजे आदिलशाह बादशाहाच्या पदरी कदीम इज्जतआसार सरदार होते. दाभोळचे वतन वा जहागिरी बादशाहानं शिर्क्यांना बहाल केलेली होती. शिर्क्यांच्यासारखं मातब्बर घराणं स्वराज्याच्या कामात सामील झालं पाहिजे हा विचार महाराजांच्या मनांत सतत वावरत होता.

अन् एक दिवस महाराजांनी आपल्या थोरामोठ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत हा आपला विचार लग्नसंबंध घडवून आणण्याच्या निमित्ताने बोलून दाखवला. त्यावेळी शिकेर् घराण्यातील प्रमुख आसामी होती पिलाजीराजे शिकेर्. पिलाजीराजांना गणोजीराजे या नावाचा मुलगा आणि जिऊबाई (उर्फ येसूबाई) ही मुलगी होती. महाराजांच्या मनांत साटंलोटंच करावं असं आलं. म्हणजे आपली मुलगी राजकँुवर उर्फ नानीसाहेब ही शिर्क्यांच्या गणोजीराजांना द्यावी आणि त्यांची मुलगी येसूबाई ही आपल्या संभाजीराजांना करून घ्यावी असं हे साटंलोटं करावं हा विचार महाराजांनी केला. नातेही जुळेल आणि राजकीय संबंधही जुळून येऊन कदाचित शिकेर्राजे हे आपल्या साऱ्या परिवारानिशी स्वराज्याच्या कामांत सामील होतील. ही अपेक्षा त्यांच्या मनी आली. पण यात एक फार मोठा अवघड असा पेच होता. तो म्हणजे शिर्क्यांच्या जहागिरी वतनाचा. ही त्यांची जहागीर कोकणातच होती. ती आदिलशाहीकडून त्यांना पिढीजात होती. शिकेर्राजे आणि भोसलेराजे यांचे नाते जमण्यात फारसा अवघड पेच येणार नाही. पण शिकेर्राजे स्वराज्यात येतील की नाही ही मात्र शंका होती.

अन् महाराजांनी लग्नाची बोलणी शिर्क्यांशी सुरू केली. नात्याने शिकेर् भोसले सोयरे झाले. लग्ने थाटात झाली. महाराजांची लेक शिर्क्यांची सून झाली. त्यांची लेक येसूबाई महाराजांची सून झाली.

चार दिवस उलटले. अन् महाराजांनी आपल्या मनीचे गूज पिलाजीराजे शिकेर् यांना बोलून दाखवले , की शिकेर् मंडळींनी स्वराज्याच्या सेवेत यावे. सवय लागलेली बादशाही सेवा सोडून इकडे येणे अवघडच होते. पण त्यालाही पिलाजीराजे शिकेर् यांनी मान्यता दिली. आनंदच कलमी आंब्यासारखा मोहरला.

पण यात सर्वात मोठा अवघड भाग होता. तो म्हणजे स्वराज्यात विलीन व्हावे लागणार होते. शिकेर् जहागिरी स्वराज्यात पूर्णपणे देऊन टाकावी लागणार होती. आणि शिकेर् हे स्वराज्याचे , त्यांच्या योग्यतेप्रमाणेच पण स्वराज्याचे पगारी नोकर बनणार होते. असे हे अवघड दुखणे न कण्हता सोसणे शिर्क्यांना जड जाणार होते. पण महाराजांच्या प्रभावामुळे म्हणा की शिर्क्यांच्या मनांत उदात्त भाव निर्माण झाल्यामुळे म्हणा , पिलाजीराजे शिकेर् यांनी आपले दाभोळचे आणि इतर काही असलेले बादशाही वतन स्वराज्यात विलीन करण्यास मान्यता दिली. खरोखर अतिशय आनंदाची पण तेवढीच थक्क करणारी गोष्ट होती. सर्वात सुखावले स्वत: शिवाजीमहाराज कारण स्वराज्यात कुणालाही जहागिरदारी वा सरंजामी वतने न देण्याचा अत्युत्कृष्ट रिवाज , अगदी पहिल्या दिवसापासून महाराजांनीच चालू ठेवला होता.

शिर्क्यांचे शाही वतनदारी जीवनच बदलले. ते स्वराज्याचे शिलेदार आणि पगारी सरदार झाले.

चार दिवस उलटले. लग्नात अगदी छोटी छोटी असलेली मुले हळूहळू मोठी होऊ लागली. अन् पिलाजीराजे शिर्क्यांच्या मनात नकळत मोहाचं मोहोळ जमा होऊ लागलं. त्यांना आपल्या बादशाही वतनाची घडीघडी आठवण होऊ लागली. अन् एक दिवस तर त्यांना वाटू लागलं की , आपले स्वराज्यात विलीन झालेले दाभोळचे वतन आपलं आपल्याला हवंच. इतर कोणाला महाराज वतने देत नसतील , तरी व्याही या नात्यानं महाराजांनी आपलं पूर्वापार वतन आपल्याला द्यावंच.

हा विचार स्वराज्याच्या दृष्टीने घातकी होता. नव्हे , विषारी होता. कारण एकदा ही स्वराज्याची सरंजामशाहीमुळे तबीयत बिघडली , तर स्वराज्याला क्षयासारखा रोग जडेल. अन् एक दिवस हे स्वराज्य स्वार्थात बुजबुजून कोणाच्यातरी म्हणजे वतनदारी देणाऱ्या कोणा परक्याच्याही गुलामगिरीत पडेल.

अगदी शेवटी इंग्रज आले तेव्हा पेशवाईचे असेच झाले ना ? शिंदे , होळकर , गायकवाड , नागपूरकर भोसले , पटवर्धन आणि असंख्य लहानमोठे स्वराज्याचे सेवक आपल्या सरंजामी स्वार्थाकरिता इंग्रजांचे गुलाम बनलेच ना! हे ते विष होते. वतनदार हे तो राज्याचे दायाद. म्हणजे भाऊबंद. ते भाऊबंदकीच करणार. अन् स्वराज्य मात्र मरणार.

महाराजांनी उगवतीपासून मावळतीपर्यंत सारा विचार तोरणा काबीज केल्यापासूनच निश्चित ठरवलेला होता , की कोणास वतन , सरंजाम देणे नाही.

अन् आता तर शिकेर् राजांच्या मनांत हाच विचार आला आणि पिलाजीराजे शिकेर् यांनी महाराजांकडे पत्र पाठवून ' आमचे दाभोळचे सरंजामी वतन आमचे आम्हांस मिळावे ' अशी उघडउघड मागणीच केली आता!

व्याह्यांच्या या मागणीने महारज हादरले. धर्मसंकटच उभे राहिले. व्याह्यांना वतन द्यावे , तर आपल्या सर्व सरदारांवर त्याचा काय परिणाम होईल ? न द्यावे तर शिकेर् नाराज होतील रागावतील. संतापतील. अपमान मानतील आणि पुन्हा बादशाहाला जाऊन सामील होतील. कुणी सांगावं काय होईल ते!

महाराज चिंतेत पडले. अन् त्यांच्या मनांत एक धूर्त सोंगटी अडीच घरं तिरपी सरकली. त्यांनी पिलाजीराजांना पत्र लिहून कळवले. पत्र छान लिहिले. पत्रांत म्हटलं , ' दाभोळचे तुमचे अमानत ( म्हणजे स्वराज्यात विलीन झालेले) झालेले वतन तुम्हांस परत द्यावे ऐसे आमचे ठरले आहे. आमची लेक तुम्हां घरी दिली. तिला पुत्र झाल्यावरी त्याचे नावाने हे वतन द्यावे ऐसे आमचे ठरले आहे.

म्हणजे त्या लेकीला ( तिचे नांव राजकुँवर नानीसाहेब) पुढे मोठी झाल्यावर जेव्हा केव्हा पुत्र होईल , तेव्हा पाहता येईल!

शिकेर्राजेही जरा नाराजले. पण पुढे नक्की आपल्याला दाभोळ परत मिळणार या समाधानात सुखावले. लौकर नातू जन्माला येवो , हीच अपेक्षा राजांच्या मनांत दरवळत राहिली.

पण महाराजांनी मात्र कुणालाही सरंजाम न देण्याचा आपला राज्यकल्याणकारी हेतू ढळू दिला नाही.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.

लायजी सरपाटलाची अचाट धाडसी मोहीम न घडताच वाया गेली. शिवाजी महाराजांना जंजिऱ्याचा हा अफलातून पण वाया गेलेला डाव रायगडावर समजला. मोरोपंतांनी हा डाव आपल्या हातून का तडीला गेला नाही , याचे उत्तर महाराजांना काय दिले ते इतिहासात उपलब्ध नाही. पण महाराज मोरोपंतांवर नाराज झाले , यात शंकाच नाही. कदाचित मोरोपंतांची अगतिकता महाराजांच्या थोडीफार लक्षात आलीही असेल ; पण महाराज नाराज झाले हे अगदी सत्य. ते मोरोपंतांना म्हणाले , ' पंत , तुम्ही कोताई केली. मोहीम फसली. '

लायपाटलांच्या या प्रकरणाच्या बाबतीत अधिक माहिती संशोधनाने मिळेल तेव्हा मिळेल. तोपर्यंत काहीच सांगता येत नाही.

पण याही प्रकरणात महाराजांच्या व्यक्तिमत्त्वावर एक सूर्यकिरण झळकन् झळकून गेला. महाराजांनी कुलाब्यास आज्ञा पाठवून लायजी सरपाटलास रायगडावर बोलावून घेतले.

या जंजिऱ्याच्या प्रकरणाची रायगडावर केवढी कुजबूज चालू असेल नाही यावेळी ?

महाराजांनी भर सदरेवर लायजीस बोलावले. तो आला. उभा राहिला. त्याला पाहून महाराज भरल्या आवाजात म्हणाले , ' शाबास! लायजी तू केवढी मोठी कामगिरी केली , शाबास. जंजिऱ्यास सिड्या लावल्या. '

लायजीला याचा अर्थच क्षणभर कळला नसेल. तो गोंधळलाही असेल. एका फसलेल्या करामतीचे महाराज कौतुक करतात ही गोष्ट मोठ्या नवलाचीच. महाराज आपल्या कारभारी अधिकाऱ्याला म्हणाले , ' लायजी सरपाटलांना पालखीचा मान द्या. ' हे ऐकून सारी राजसदर चपापली असेल नाही ? पण लायजी पाटील नक्कीच चपापला. तो म्हणाला , ' महाराज , मोहिम तर फते झालीच नाही. मग मला पालखीचा एवढा मोठा मान कशाकरिता ? मला नको ' त्यावर महाराज म्हणाले , ' नाही लायजी , हा तुझ्या बहाद्दुरीचा मान आहे. जंजिऱ्यासारख्या भयंकर अवघड लंकेस तू शिड्या लावल्यास ही गोष्ट सामान्य नव्हे. शाबास. म्हणून हा पालखीचा मान. '

तरीही लायजी म्हणत होता , मला पालखी नको. मान नको.

लायजीच्या या मनाच्या मोठेपणाची आणि खोलीची मोजमापं कशानं घ्यावीत ? हा त्याग आहे. ही स्वराज्यनिष्ठा आहे. यालाच आम्ही राष्ट्रीय चारित्र्य म्हणतो आहोत. यावर अधिक काही भाष्य करण्यासाठी आमच्या शिलकीत शब्द नाहीत.

महाराज लायजीचे हे मन पाहून लगेच आपल्या अधिकाऱ्यास म्हणाले , ' लायजी सरपाटलांस एक गलबत द्या आणि त्या गलबताचे नाव ' पालखी ' ठेवा. ' त्याप्रमाणे लायजीस एक गलबत बक्षीस देण्याची व्यवस्था झाली.

हे आणि असे शिवकाळातील प्रसंग पाहिले , की लक्षात येते की , हिंदवी स्वराज्य औरंगजेबाला पुरून कसे उभे राहिले. केल्या कामाचेच मोल घ्यावे ; समाजाचे आणि स्वदेशाचे काम म्हणजे ईश्वरी काम आहे , हीच भावना मनांत ठेवावी. ही शिकवण अगदी नकळत शिवकाळात शिलेदारांच्या मनांत रुजत गेली.

वास्तविक लायजी पाटलासारख्या , येसबा कामठेसारख्या , येसाजी कंकासारख्या शिवसैनिकांवर छोटेमोठे चित्रपट निघायला हवेत. स्वराज्याचे राजेपण प्राप्त झाले असूनही विरक्त जीवन अनेक चित्रपटांत चित्रित केले गेले पाहिजे. ते साधार असावे. अभ्यासपूर्वक केलेले असावे. जर हे घडेल तर आमची पोरेबाळे अशा धनिकांना आणि कलाकारांना भरभरून आशीर्वाद देतील. महाराष्ट्रात अशी कितीतरी ऐतिहासिक ठिकाणे उजाड पडली आहेत की , जिथे स्वराज्य निमिर्तीचा इतिहास घडला. कितीतरी संतसत्पुरुषांच्या समाध्या विपन्नावस्थेत उदासवाणी पडल्या आहेत. त्यांची देखभाल तर राहोच. पण निदान त्यावर माहितीपट काढून या लोकसेवक संतांची ओळख आमच्या नव्या पिढीला होईल. माणसं अंतर्मुख होतील. स्वत:च्या आणि स्वदेशाच्याही चारित्र्याचा विचार करतील. अशी चरित्रे आणि अशी ऐतिहासिक ठिकाणे महाराष्ट्रात रानोमाळ पडली आहेत. पाश्चात्य देशात अगदी लहानसान वास्तूची जपणूक केली जाते. लहानसान चरित्रावरही सुंदर साहित्य निर्माण होते. ब्रिटिश देशात हिंडताना अशी संुदर जपणूक केलेली ठिकाणे पाहिली की , आनंद होतो. पण आमच्याकडे सिंहगडावरच्या तानाजीपासून ते नंदूरबारच्या शिरीषकुमार शहापर्यंत सर्वांचीच आबाळ.

-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले...

समुदाला रत्नाकर म्हणतात. समुदाच्या पोटात अगणित मौल्यवान रत्ने असतात म्हणे. शिवकाळात शिवाजी महाराजांना कोकणात अनेक मानवी रत्ने मिळाली. वेंटाजी भाटकर , मायनाक भंडारी , तुळाजी आंग्रे , दौलतखान , सिद्दी मिस्त्री , दर्यासारंग इत्यादी देवमासे आपल्या प्रचंड बळाचा स्वराज्यासाठी वापर करीत होते. खरोखर कोकणात रत्नाकर होता आणि रत्नागिरीही होता. कोकणच्या भूमीवर गाजलेली घराणी अनेक होती. शिर्के , राजे , सुर्वे , शिंदे , मोरे , तावडे , धुळप , सावंत , नाडकर , चित्रे , मांडकर , जाधव आणि कितीतरी , यातच काही समाजचे समाज आरमारावर स्वार झाले होते.

आगरी , कोळी , भंडारी , गावित , कुणबी , वगैरे. याशिवाय गलबते बांधणारी कामगार मंडळीही अनेक होती. संगमिरी हा युद्ध गलबताचा नवीनच प्रभावी प्रकार. याच कामगारांनी आरमारात आणला. या साऱ्यांचाच संसारापेक्षा समुदावरच अधिक प्रेम होते , निष्ठा होती. अन् शिवाजी महाराजांचेही या सर्वांवर अतुल प्रेम आणि अपार निष्ठा होती. महाराजांच्या आयुष्यातील (दि. १९ फेब्रुवारी १६६० ते ३ एप्रिल १६८० ) सर्वात जास्त दिवस महाराजांचे कोकणात वास्तव्य घडले आहे. कोकणच्या भूमीवर त्यांचे आईसारखे प्रेम होते. कोकणातली माणसं त्यांना कलमी आंब्याइतकी , बरक्या फणसाइतकी आणि मिठागरातील खडेमिठाइतकी आवडीची होती. त्यातीलच हा पाहा एक मासळीहून चपळ असलेला कोळी. याचं नाव होतं , लायजी सरपाटील कोळी. हा कुलाब्याचा राहणारा. विलक्षण धाडसी , शूर आणि विश्वासू.

मुरुडचा जंजिरा सिद्द्यांकडून कायमचा काबीज करण्यासाठी महाराजांचा जीव मासळीसारखाच तळमळत होता. जंजिऱ्यावरील एक मोहीम त्यांनी मोरोपंत पिंगळ्यांवर सोपवली. मोरोपंत कोकणी आणि घाटी हशमांची फौज घेऊन तळघोसाळे आणि मुरुड केळशीच्या परिसरात दाखल झाले. जंजिऱ्यावरची मोहिम कशी करावी याचे आराखडे ते आखीत होते. पाण्यातली लढाई , कशीही करायची म्हटली तरी अवघडच. मोरोपंत विचार करीत होते.

त्यातच या लायजी पाटील कोळ्याच्या डोक्यात एक मासळी सळसळून गेली. त्याचा मोहिमेचा विचार असा की , जंजिरा किल्ल्याच्या तटालाच समुदातून शिड्या लावाव्यात आणि एखाद्या मध्यरात्रीच्या गडद अंधारात होड्यामचव्यांतून मराठी लष्कर या तटाला लावल्या जाणाऱ्या शिड्यांपाशी पोहोचवावे. अन् मग शिड्यांवरून चढून जाऊन लष्कराने ऐन किल्ल्याच्या आतच उड्या घ्याव्यात. हबश्यांवर हल्ला चढवावा. अन् जंजिरा आपल्या शौर्याच्या लाटेने बुडवावा. ही कल्पना अचाट होती. कोंडाजीने पन्हाळगड घ्यावा किंवा तानाजीने सिंहगड घ्यावा , अशी ही अफलातून कल्पना , लायजीच्या मनात आली. हे काम सोपं होतं की काय ? कारण जंजिऱ्याच्या तटाबुरुजांवर अहोरात्र हबशांचा जागता फिरता पहारा होता.

अशा जागत्या शत्रूच्या काळजात शिरायचं तरी कसं ? मुळात समुदात शिड्या लावायच्या तरी कशा ? आवाज होणार , हबशांना चाहूल लागणार. होड्यांत शिडी उभी करून तटाला भिडवली की , दर्याच्या लाटांनी शिड्यांचे आवाज होणार , शिड्या हलणार. वर गनीम जागा असणार. तो काय गप्प बसेल ? त्यांच्या एकवट प्रतिहल्ल्याने सारे मराठे भाल्या , र्वच्या , बंदुकांखाली मारले जाणार. एकूणच हा एल्गार भयंकर अवघड , अशक्यच होता , तरीही लायजी पाटलानं हे धाडस एका मध्यानरात्री करायचं ठरविलं. त्याने मोरोपंतांना आपला डाव समजविला. काळजात धडकी भरावी असाच हा डाव होता. लायजीने मोरोपंतांना म्हटलं , ' आम्ही होड्यांतून जंजिऱ्याचे तटापाशी जाऊन होड्यांत शिड्या , तटास उभ्या करतो. तुम्ही वेगीवेगी मागोमाग होड्यांतून आपले लष्कर घेऊन येणे. शिडीयांवर चढून , एल्गार करून आपण जंजिरा फत्ते करू. '

मोरोपंतांनी तयारीचा होकार लायजीस दिला. किनाऱ्यावर लायजीच्या काही होड्या मध्यरात्रीच्या गडद अंधारातून शिड्या घेतलेल्या कोकणी सैनिकांसह किल्ल्याच्या तटाच्या रोखाने पाण्यातून निघाल्या. आवाज न होऊ देता म्हणजे अगदी वल्ह्यांचा आवाजही पाण्यात होऊ न देता मराठी होड्या निघाल्या. जंजिऱ्याच्या तटांवर रास्त घालणारे धिप्पाड हबशी भुतासारखे येरझाऱ्या घालीत होते. लाय पाटील तटाच्या जवळ जाऊन पोहोचला. त्याच्या साथीदारांनी शिड्या होडीत उभ्या करून तटाला लावल्या. प्रत्येक क्षण मोलाचा होता. मरणाचाच होता. तटावरच्या शत्रूला जर चाहूल लागली , तर ? मरणच.

लाय पाटील आता प्रत्येक श्वासागणिक मोरोपंतांच्या येऊ घातलेल्या कुमकेकडे डोळे लावून होता. पण मोरोपंतांच्या कुमकेची होडगी दिसेचनात. त्या भयंकर अंधारात लायपाटील क्षणक्षण मोजीत होता.

किती तरी वेळ गेला , काय झालं , कोणास ठावूक ? ते इतिहासासही माहीत नाही. पण मोरोपंत आलेच नाहीत. लाय पाटलाने आपल्या धाडसी कौशल्याची कमाल केली होती. पण मोरोपंत आणि त्यांचे सैन्य अजिबात आले नाही. का येत नाही हे कळावयासही मार्ग नव्हता. आता हळुहळू अंधार कमी होत जाणार आणि ' प्रभात ' होत जाणार. (मूळ ऐतिहासिक कागदांत ' प्रभात ' हाच शब्द वापरलेला आहे.) अन् मग उजेडामुळे आपला डाव हबश्यांच्या नजरेस पडणार. अन् मग घातच! पुन्हा असा प्रयत्न करण्याचीही शक्यता उरणार नाही. काय करावं ? लायजीला काही कळेचना. त्याच्या जिवाची केवढी उलघाल त्यावेळी झाली असेल , याची कल्पनाच केलेली बरी.

अखेर लाय पाटील निराश झाला. हताश झाला. त्याने तटाला लावलेल्या शिड्या काढून घेतल्या आणि आपल्या साथीदारांसह तो मुरुडच्या किनाऱ्याकडे परत निघाला. न लढताच होणाऱ्या पराभवाचं दु:ख त्याला होत होतं. मोरोपंतांची काय चूक किंवा गडबड घोटाळा झाला , योजना का फसली हे आज कोणालाच माहीत नाही. पण एक विलक्षण आरमारी डाव वाया गेला अन् लायजीची करामत पाण्यात विरघळली.

एका कोळियाने जाळे फेकियले. परि ते वाया गेले.

हा सारा प्रकार शिवाजी महाराजांस रायगडावर समजला. आणि मग ?
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .

नेतोजी पालकर औरंगजेबाच्या हाती लागला तेव्हा नेतोजीचा काका कोंडाजी पालकर , पुत्र जानोजी पालकर आणि नेतोजीच्या दोन बायका याही शाही बंधनात पडल्या. नेतोजीची आणखी एक बायको होती. ती मात्र निसटली. तिचे पुढे काय झाले , ते इतिहासास माहीत नाही. नेतोजीला एक पुत्र होता जानोजी पालकर. त्याचे वय यावेळी फक्त तीन वर्षाचे होते. औरंगजेबाने या पकडलेल्या संपूर्ण पालकर कुटुंबाला धर्मांतरीत केले.

इ. १६६७ ते इ. १६७६ प्रारंभापर्यंत नेतोजी आणि जानोजी हे अफगाणिस्तानात मोगली छावणीत होते. नेतोजीच्या इतर कुटुंबियांचे काय झाले ते समजत नाही. दौंड ते अहमदनगर या रस्त्यावर काष्टी आणि तांदळी या नावाची दोन गावे आहेत. पालकरांचे घराणे इथलेच. शिवाजी महाराजांच्या एक राणीसाहेब. पुतळाबाईसाहेब यांचे माहेर पालकर घराण्यातील होते. पण नेतोजींचे आणि पुतळा बाईसाहेबांचे नेमके काय नाते होते , ते समजत नाही.

सह्यादीच्या दऱ्याखोऱ्यांत वादळी पराक्रम गाजविणारा एक जबरदस्त योद्धा औरंगजेबाच्या तडाख्यात सापडल्यामुळे कुठल्याकुठे अफगाणिस्तानात फेकला गेला. पालकर घराण्याची एक शाखा नांदेड जिल्ह्यात आहे. परंतु नांदेड , काष्टी तांदळी , नागपूर इत्यादी ठिकाणी आज अस्तित्त्वात असलेल्या पालकर घराण्यांचे परस्परसंबंध काय होते ते कागदोपत्री सापडत नाही. अधिक संशोधनाची गरज आहे.

इ. १६७३ मध्ये काशी क्षेत्रातील एक थोर विद्वान पंडित काशीहून महाराष्ट्रात आला. या पंडिताचे नाव गंगाधरभट्ट उर्फ गागाभट्ट असे होते. त्यांचे आडनांव ' भट्ट ' हेच होते. हे विश्वामित्र गोत्री देशस्य ऋग्वेदी ब्राह्माण घराणे मूळचे पैठणचे. या घराण्यात परंपरेने अनेक ग्रंथ लिहिले गेले. बहमनी सुलतानांच्या प्रारंभकाळात हे घराणे पैठण सोडून बाहेर पडले. शेवटी हे स्थिरावले काशी क्षेत्रात श्रीगंगेच्या काठी.

गागाभट्ट हे महाराष्ट्रीय पंडित. ते शिकाळात इ. स. १६६३ - ६४ या काळात काशीहून महाराष्ट्रात काही महिन्यांपुरते येऊन राहिले होते. शिवाजी महाराजांचा व त्यांचा परिचय त्याचकाळातला. काही धामिर्क प्रश्ानंच्या सोडवणुकीसंदर्भात शिवाजी महाराजांनी एक , धर्मशास्त्र जाणणाऱ्या विद्वानांची समिती नेमली. या समितीचे प्रमुखपद महाराजांनी सात वषेर् वयाच्या युवराज संभाजीराजे हे उत्तम संस्कृतज्ञ भाषापंडित झाले. संभाजीराजांनी पुढे बुधभूषण , नायिकाभेद आणि आत्मचरित्र कथन करणारे एक विस्तृत संस्कृत दानपत्रही लिहिलेले उपलब्ध आहे.

संभाजी महाराजांची पुढच्या काळात जयपूरच्या महाराजा रामसिंगला लिहिलेली संस्कृत भाषेतील पत्रेही सापडलेली आहेत. म्हणजेच युवराज संभाजीराजांच्या अभ्यासू वृत्तीचा प्रारंभ इतक्या लहानपणी शिवाजी महाराजांनी करून दिलेला दिसतो. त्यातून महाराजांचे आपल्या पुत्राच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे किती लक्ष होते , हे ही लक्षात येते. युवराज संभाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल बखरकारांनी व दंतकथा लेखकांनी पुढच्या काळात किती विपरित चित्र रंगविणे हे पाहिले आणि संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतील हा अभ्यासप्रवास पाहिला की , सारे गैरसमज आपोआप विरघळून पडतात.

गागाभट्ट महाराष्ट्रात आले ( इ. १६६३ - ६४ ) त्यावेळी त्यांनी काही धामिर्क , सामाजिक समस्यांवरती जे लेखन केले आणि धामिर्क निर्णय दिले , ते आज उपलब्ध आहेत. तसेच इ. १६७३ पासून पुढे त्यांचे जे काही वास्तव्य स्वराज्यात घडले , त्याही काळात त्यांनी काही ग्रंथ लिहिले , राजाभिषेक प्रयोग , शिवाकोर्दय , समयनय हे ग्रंथ त्यापैकीच होत. समयनय हा ग्रंथ उपदेशात्मक संस्कृत भाषेतील आहे. तो सुभाषितांसारख्या वचनांनी परिपृत आहे.

गागाभट्ट हे शिवाजीमहाराजांच्या दर्शनासाठी येत होते. मूळ नोंदीत ' दर्शन ' हाच शब्द वापरला आहे. त्यावरून त्यांच्या मनात महाराजांचेबद्दल असलेली केवळ आदराचीच नव्हे , तर भक्तिची भावना व्यक्त होते.

काशी क्षेत्रातील या भट्ट घराण्याची वंशावळ उपलब्ध आहे. गागाभट्ट हे बहुदा अविवाहित वेदाभ्यासी आणि पारमाथिर्क जीवनच जगले , असे दिसते. त्यांनी लिहिलेल्या संस्कृत प्रकांड गंथांची यादी बरीच मोठी आहे. त्यांना काशीक्षेत्रातील विद्वत् मंडळात अग्रपूजेचा मान होता. श्री काशीविश्वनाथ आणि श्री बिंदुमाधव ही दोन दैवते त्यांची आराध्यदैवते होती. असे हे मूळ महाराष्ट्रीय पैठणचे पंडित कमीतकमी दहा वषेर् आधीपासूनच महाराजांच्या परिचयाचे होते. ते आता महाराजांच्या दर्शनासाठी रायगडची वाट चालत होते.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.

बहलोलखान पठाणाने आपली फौज प्रतापरावांच्या गराड्यावर सोडली. मराठ्यांची कोंडी फोडण्याकरता बहलोलची फौज मराठ्यांवर निकराने तुटून पडली. मराठ्यांनी शाही फौज अचूक कोंडली होती. बाहेर पडायला शत्रूला वाट मिळेना , फट मिळेना बहलोलचे सारे हल्ले मराठ्यांनी परतवून लावले. फौज पुन्हा कोंडली गेली. सूर्य माथ्यावर तळपत तळपत चढत होता. पाणी ? जर आपण लौकरात लौकर या गळफासातून बाहेर पडलो नाही तर पाण्यावाचून मरायची वेळ येणार आहे , हे बहलोलला समजत होते.

त्या मानानं प्रतापरावांचे सैनिक सुखरूप झुंजत होते. त्यांना पाणी मिळण्याच्या वाटा आणि ती चिमुकली डोण नदी मोकळी होती. खरोखर प्रतापरावांनी या बहलोली सैन्याला गराडा टाकण्याच्या वेळीच जर झोपेतच त्यांच्यावर घाव घालून तोडातोडी केली असती , तर तासा दीड तासातच हे युद्ध रावांनी जिंकलं असतं. पण शाही फौजेला मराठी तडाखा दाखविण्यासाठी राव शिकारीसारखा खेळ मांडून बसले होते.

एक दिवस उलटला , दोन दिवस उलटले , तीन-चार- पाच तरीही कोंडी फुटत नव्हती. मराठे हटत नव्हते. बहलोलची अवस्था व्याकूळ झाली होती. विजापुराहून मदत मागवावी , तरीही अशक्य होतं. रस्तेच मराठ्यांनी बंद करून टाकले होते. यावेळी मोगलांचा सरदार खानजहान बहाद्दूर बहाद्दूरखान कोकलताश हा मिरजेपाशी होता. त्याने बहलोलच्या मदतीस नव्हे , पण मराठ्यांच्या विरुद्ध हल्ला करण्याकरता एकदा चाल केली. पण मराठ्यांनी त्याचा हल्ला पाचोळ्यासारखा उधळून लावला. तो पुन्हा आलाच नाही.

वैऱ्यावरही येऊ नये अशी वेळ बहलोलवर येऊन पडली होती. पाणी नाही , पाणी नाही.

आता पाण्याविना बहलोलची घोडी तडफडू लागली. मरू लागली. पाणी नाही. आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार! अपुरे पाणी किती पुरविणार ? पाणी होते. पुरेपूर होते , ते फक्त मराठ्यांच्या तलवारीत.

पंधरा दिवस उलटले. बहलोेलची काय अवस्था झाली असेल ? त्याची तर अशी उमेद होती की , कोल्हापूर अन् पन्हाळा तर जिंकतोच , पण कोकणातही उतरतो. अन् दर्यावर आदिलशाहीचा शाही शिक्का उमटवतो. पण पाणीच नाही.

वीस दिवस उलटले. बहलोलची जनावरेच काय पण आता माणसेही पाण्यावाचून तडफडू लागली.

यावेळी महाराज शिवाजीराजे पन्हाळगडावरच होते. त्यांना नितांत खात्री होती की , माझा डाव फत्ते पावणार. शत्रूचे डंके आणि झेंडेच काय , पण प्रत्यक्ष शत्रूच्या सरदारांना आणि सेनापतीला ही आमचे राव गिरफ्तार करतील. कब्जात घेतील.

प्रतापरावांना समोर दिसणारी बहलोलची पाण्याविना दाणादाण समजत होती. पण सेनापतीच्या कठोर मनानं ते शत्रू सैन्याचा सर्व बाजूंनी गळा आवळून उभे होते.

हा इतिहास म्हणजे केवळ योगायोग का ? केवळ नशीबाचा खेळ का ? गेली तीनशे वर्ष सुलतानांच्या गुलामगिरीत केविलवाणे कण्हत अन् रडत मराठी माणसं जगत होती. पण आपल्या मनगटाच्या बळावर आज मराठी माणसं अशी जिद्द गाजवीत होती. महाराजांनीच त्यांना शिकवलं होतं की मनात आणा , तुम्ही वाट्टेल ते करू शकाल. अफगाणिस्तानातल्या एका नामवंत पठाणाला एका मराठी प्रतापवंताने चिमट्यात पकडले होते. आता आपले होणार तरी काय , हे बहलोलला समजत नव्हते. उभी असलेली माणसं त्याच्या डोळ्यादेखत पाणी पाणी करीत कोसळत होती. उंटांच्या पोटातही पाणी उरले नव्हते.

प्रतापराव या साऱ्या पठाणी फौजेची कत्तल करणार होते का ? त्यांनी तशी शत्रूची कत्तल करावी असे महाराजांना वाटत होते का ?

नाही! ती मराठी संस्कृतीच नव्हती. पण शत्रूचे सेनापती मराठी झेंड्याच्या पायाशी शरण यावेत , त्यांनी या झेंड्याच्या सावलीत खुशाल जगावं , शत्रूत्त्व सोडावं , स्वराज्याची सेवा करावी अशीच महाराजांची इच्छा आजपर्यंत दिसून आली नव्हती काय ? इथं या उमराणीच्या रणांगणावर शत्रूचा सेनापती हा शरण येऊन आपल्या पुढे दाखल व्हावा हीच इच्छा महाराजांची होती.

महाराज त्या विजयाच्या वार्तेची वाट पाहात होते. आणि मग ?
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.

पन्हाळगड म्हणजे दख्खनचा दरवाजा. या दरवाज्यावर तेरा वर्षानंतर पुन्हा स्वराज्याचा झेंडा लागला. पन्हाळगड आणि गडाच्या पूवेर्कडचा कागलपट्टा स्वराज्यात मराठ्यांनी घेतला याच्या खबरा विजापुरास वाऱ्याच्या वेगाने पोहोचल्याच. यावेळी विजापुरात बादशाह होता सिकंदर बिन अलिआदिलशाह. या सिकंदरचे वय होते चार वर्षाचे. अंगठा चोखण्याचे हे वय. सारा राज्यकारभार पठाणी सरदारांच्या वर्चस्वाखाली गेला होता. वजीरी मात्र खवासखानाकडे होती. विजापूरची अवस्था खंगलेल्या क्षयरोग्यासारखी झाली होती. अशी अवस्था झाली असूनही दरबारात पठाणी पक्ष आणि दक्षिणीपक्ष असे दोन पक्ष निर्माण झाले होते. या पक्षांतील स्पर्धा महाराजांनी अचूक टिपली होती. स्वराज्याच्या विस्ताराला ही भांडणे पथ्यावर पडत होती.

वजीर खवासखानाने कोल्हापूर प्रांत आणि पन्हाळगड पुन्हा जिंकून घेण्याकरता दरबारातील सरदारांस एकत्र बोलावून आवाहन केले. या सरदारांना वजीराने मोठ्या कळकळीने म्हटले , ' यह नातवान बादशाह खुदाने आपके सुपूर्द किया है। पहले जिस तरह आपने सल्तनत जिंदा रखी थी , उसी तरह आगे भी रखो! '

या आवाहनाने सारे सरदार गंभीर झाले. या सरदारांतील एक सरदार तर खरोखरच बेचैन झाला. तेवढाच तो मराठ्यांवर संतप्तही झाला. हा सरदार उत्तम योद्धा होता. उत्कृष्ट सेनापती होता. तो थोडाफार मुत्सद्दीही होता. पण या परिस्थितीने तो भावनाविवश झाला. कारण तो जरी मूळचा अफगाणी पठाण होता तरीही त्याची सिकंदर आदिलशाहासारख्या दख्खनी बादशाहावर अपार निष्ठा होती. या पठाण सरदाराचे नाव होते , अब्दुल करीम बहलोलखान. पन्हाळगड आणि कोल्हापूर प्रांताचा बराचसा भाग बहलोलखानच्या जहागिरीतच समाविष्ट होता. त्यामुळे त्याचे प्रत्यक्ष फार मोठे नुकसान झाले होते. त्याने ही पन्हाळगडची मोहीम आपल्या शिरावर घेतली. बाकीच्या सरदारांनीही बहलोलची मनापासून तारीफ केली.

बहलोलनेही स्वारीवर निघण्याकरता अगदी तातडीने तयारी सुरू केली. निघण्यापूवीर् त्या छोट्या बादशाह सिकंदर आदिलशाहच्या हस्ते बहलोलला मानाचे विडे आणि दोन हत्ती अन् चार घोडे गौरवार्थ बहाल करण्यात आले. फार मोठी फौज घेऊन बहलोल निघाला. त्याची फौज नक्की किती होती , ते समजत नाही. पण अंदाजे ती वीस हजारांपर्यंत असावी. त्यात सहा हत्ती आणि घोडदळ , पायदळ होते. तोफखाना त्याच्या सांगाती नसावा असे दिसते. असल्याची नोंदही नाही.

बहलोल विजापुराहून तिकोटा ते जत या मार्गाने निघाला. तो बहुदा दि. १३ मार्च १६७३ या दिवशी निघालेला असावा. त्याची ही मोहीम मोठ्या इषेर्ची होती. जणू काही दुसरा अफझलखानच मराठी मुलुखावर निघाला होता. तो जतच्या जवळील डफळापूर , उमराणीच्या रोखाने जल्दीने कूच करीत होता. तो दि. १६ मार्च १६७३ च्या मध्यरात्री उमराणीजवळच्या परिसरात येऊन पोहोचला. शुद्ध सप्तमीचा चंद आभाळात कललेला होता. बहलोलने आपल्या दमलेल्या सैन्याला थोडी विश्रांती मिळावी या हेतूने उमराणीच्या त्या उंचसखल मैदानावर मुक्काम करण्याचा हुकुम दिला. हे मैदान खुरट्या झुडपांचे आणि लहानसहान टेकडांचे होते. याच मैदानावर त्याचे सैन्य उतरले. अन् आराम करण्याकरता पहुडले. फार तर तीन-चार तास मुक्काम करून पुढे कोल्हापूरच्या दिशेने निघण्याचा त्याचा इरादा होता.

बहलोलखान पठाण उमराणीच्या रोखाने येत असल्याची खबर प्रतापराव सरनौबत यांना त्यांच्या बातमीदारांनी कळविली. कायमचेच ताजेतवाने असलेले मराठी सैन्य आणि प्रतापराव बहलोलच्या रोखाने उमराणीकडे धावले. प्रतापरावांनी अचूक डाव साधला. बहलोलचे सैन्य आराम करीत होते. त्या सैन्याच्या तळाभोवती आपल्या मराठी सैन्याचा गराडा टाकून त्यांनी बहलोलला कोंडीत गाठले. बहलोलला याची कल्पनाही नव्हती की आपण मराठ्यांच्या जाळ्यात अचूक अडकलो आहोत. प्रतापरावांनी या शाही सैन्यावर यावेळी (दि. १६ मार्चची पहाट) अजिबात हल्ला चढविला नाही. शिकार खेळावी , तसाच डाव रावांनी टाकला. कारण एक अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट इथे घडली होती की , बहलोलखान बिनपाण्याच्या रखरखीत प्रदेशात ऐन मार्चच्या उन्हाळ्यात अडकला गेला होता. जवळच एक लहानशी नदी होती , आजही आहे , तिचे नाव डोण. या नदीला कसंबसं झुरुमुरु पाणी होते. पण ही नदी प्रतापरावांनी ओलांडून पैलतीरावर आपला गराडा टाकला होता. त्यामुळे या नदीचाही बहलोलशी संपर्क रावांनी तोडला होता.

जरा पहाट झाली. छावणी अजून बहलोलभोवती विश्रांती घेतच होती. शाही सैन्यातले सहा हत्ती या पहाटे डोण नदीच्या पाण्यावर नेण्याकरिता माहुतांनी चालविले. खरं म्हणजे हे माहुतही पेंगुळलेले होते. हत्ती घेऊन माहूत डोणच्या रोखाने येत होते. थोड्याच वेळात त्यातील कोणा माहुताला अंधुकशा उजेडात समोर पसरलेल्या मराठी स्वारांची चाहूल दिसली. त्याचे धाबेच दणाणले. मराठे! शत्रू समोर दिसताच तो माहूत अन् लगेच बाकीचेही माहूत सावध होऊन मोठमोठ्याने ओरडू लागले.

' गनीम , गनीम! ' हत्ती पुन्हा तळाकडे वळवीत ते माहूत ओरडतच होते , ' गनीम , गनीम! ' हत्तीही चीत्कारत होते. पळत होते. हा कल्लोळ खानाच्या बेसावध तळावर काही क्षणातच पोहोचला. सारं शाही सैन्य खडबडून उठलं. बहलोल उठला. अन् बघतात तो त्या उजाडत्या प्रकाशात त्यांना दिसलं की , आपण मराठ्यांच्या गराड्यात सर्वबाजूंनी वेढले गेलेेलो आहोत.

बहलोलचे डोळे खाडकन उघडले गेेले. त्याला त्याची चूक आणि मराठ्यांनी साधलेला डाव क्षणात लक्षात आला. आता ? ही मराठी कोंडी फोडून बाहेर पडण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. कारण हा सारा रखरखीत बिनपाण्याचा उन्हाळा आणि ती इवलीशी नदीसुद्धा मराठ्यांच्या कब्जात. आता ?

आता निकराचे युद्धच. नाहीतर पाण्यावाचून मृत्यु. त्या परिसरात खोल गेलेल्या चिमूटभर विहिरींना पाणी कितीसे असणार ?

एक लहानशी चूक , बहलोलला किती महागात पडत होती पाहा. रात्री तळ टाकताना त्याने फक्त दमलेल्यांच्या विश्रांतीचा विचार केला. पण त्याचवेळी तळाभोवती आपल्या गस्तवाल्या सैनिकांची गस्त ठेवली नाही. गाढ झोपले आणि हे सगळे मासे आता पाण्यावाचून तडफडायला लागले. जेवढी माणसे तेवढीच जनावरे अन् पाणी नाही अशी अवस्था.

खानाने ताबडतोब बेधुंद अवस्थेत आपल्या साऱ्या सैन्याला ही कोंडी फोडून बाहेर पडण्याचा इशारा दिला. एल्गार , एल्गार , एल्गार!
- बाबासाहेब पुरंदरे

शनिवार, १४ मार्च, २००९

शिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.

कोंडाजी फर्जंद याने पन्हाळ्यासारखा अती अती अवघड गड अवघ्या एकाच हल्ल्यात फक्त साठ सैनिकांच्यानिशी काबीज केला. पन्हाळगडावरच्या या कोंडाजी फर्जंदाच्या झडपेला नाव द्यावेसे वाटते ' ऑपरेशन पन्हाळगड '! चिमूटभर मराठी फौजेनिशी , परातभर शत्रूचा , कमीतकमी वेळेत पराभव करून कोंडाजीने पन्हाळ्यासारखा महाजबरदस्त डोंगरी किल्ला काबीज केला , हा केवळ चमत्कार आहे. पुढच्या शतकातील एका इंग्रजी सेनापतीने फार मोठा पराक्रम गाजवून त्रिचनापल्लीचा किल्ला टिपू सुलतानाच्या हातून जिंकून घेतला.

लॉर्ड कॉर्नवॉलीसने अवघ्या शंभर इंग्रजांच्यानिशी हा महाबळकट त्रिचनापल्लीचा गड जिंकला. (इ. १७९२ ) खरोखर ही लॉर्ड कॉर्नवॉलीसच्या कौतुकाचीच गोष्ट होती. त्याचे कौतुकही इस्ट इंडिया कंपनीच्या हिंदुस्थानातील छावण्या-छावण्यांत तर झालेच , पण इंग्लंडमध्येही वृत्तपत्रांत , पार्लमेंटातही त्याचे अपार कौतुक झाले. ते योग्यच होते. अवघ्या शंभरांनी हा अचाट चमत्कार करून दाखवला होता. पण अवघ्या साठांच्यानिशी पन्हाळ्यासारखा बुलंद आणि महाअवघड गड आमच्या कोंडाजी फर्जंद मावळ्याने तासा- दीडतासांत जिंकला , हे आजच्या आम्हा मराठी माणसांनाही माहीत नसावं हा आमचा विस्मरणाचा केवढा महापराक्रम! किती करावे आमचेच आम्ही कौतुक!

पन्हाळगडावर आम्ही आज जातो , तेव्हा हा इतिहास सांगायला कुणी अभ्यासू गाईडही सापडत नाही. जो गाईड सापडतो , त्याच्याकडून कोणच्या पिक्चरचे शूटिंग कुठे झाले अन् कोणच्या नट-नट्या कसकसा रोमान्स करीत होत्या , हेच ऐकायला मिळते. अन् जिकडेतिकडे कोणत्या तरी नामवंत सिगारेटच्या जाहिराती! महाराजांच्या , कोंडाजी फर्जंदाच्या छत्रपती ताराराणीसाहेबांच्या आणि राजषिर् शाहू छत्रपतींच्या हरविलेल्या ' पन्हाळगडा ' चा आम्हाला पन्हाळगडावर हिंडूनही पत्ता लागत नाही. एक आमचे मुरलीधर गुळवणी मास्तर होते. ते छातीतला खोकला अन् दम्याची धाप सावरीत सावरीत पोराबाळांना पन्हाळा समजावून सांगत होते.

कधीकधी तर पन्हाळ्यापासून विशाळगडापर्यंत महाराज आणि बाजीप्रभू आपल्या मावळ्यांच्यानिशी धोधो पावसातून , रात्री , कसे निसटले हे आमचे गुळवणीमास्तर स्वत: पोरांच्याबरोबर त्या बिकटवाटेने चालत जाऊन समजावून सांगत असत. आता गुळवणीमास्तर नाहीत. धार लागेपर्यंत मास्तरांनी पन्हाळ्यावर लोकांना इतिहास सांगितला. जमविलेली ऐतिहासिक कागदपत्रे आणि गंजलेल्या तलवारी अन् गवसलेल्या बंदुकीच्या शिशाच्या गोळ्या आमच्या पोराबाळांना जडजवाहिऱ्याच्या थाटात वर्णन करून दाखवल्या.

आज आमचे मास्तर नाहीत. पन्हाळ्याचा जणू हा शेवटचा किल्लेदार स्वगीर् निघून गेलाय. खरोखर असं वाटतं की , महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत असे एकेक तरी गुळवणीमास्तर असावेत. आमची पोरंबाळं शहाणी होतील हो! पन्हाळगडाचा पिकनिक स्पॉट होता कामा नये. कोंडाजी फर्जंदाने महाराष्ट्राच्या लष्करी इतिहासात एक सोन्याचं पान दाखल केलं , यात शंका नाही. खरोखर जगाच्या इतिहासात या कोंडाजीच्या लढाईची खास नोंद करावी लागेल.

पन्हाळगड कोंडाजीने काबीज केल्याची खबर शिवाजीमहाराजांना ऐन पाडव्याच्या दिवशी रायगडावर समजली. (दि. ९ मार्च १६७३ ) ज्या घोडेस्वाराने दौडत येऊन रायगडावर महाराजांना ही खबर दिली , त्या घोडे स्वाराच्या तोंडात महाराजांनी स्वत:च्या हाताने साखरेची चिमूट कौतुकाने घातली. ही कौतुकाची चिमूट कोंडाजीच्या आणि त्याच्या साठ मर्दांच्या मुखातच महाराज घालीत होते. महाराज ताबडतोब रायगडावरून पन्हाळगडाकडे निघालेच. सरसेनापती प्रतापराव गुजर यांना घेऊन निघाले. बरोबर फौज घेतली सुमारे पंधरा हजार. नक्की आकडा माहीत नाही. पण अंदाज चुकीचा न ठरावा. म्हणजे बघा. पन्हाळगड जिंकला साठ मावळ्यांनी अन् महाराज कोंडाजीचं कौतुक करायला निघाले होते , सरसेनापतीसह काही हजार मावळ्यांच्यानिशी. महाराज जणू कोंडाजीला ही लष्करी सलामीच द्यायला चालले होते.

महाराजांनी रायगडावरून निघताना मातोश्री जिजाऊसाहेबांना दंडवत करायला पिंड्ये या नावाचा एक विद्वान कवी आलेला होता. त्याने ही नोंद करून ठेवली आहे. इतकेच नव्हे तर पन्हाळगड कसा काबीज केला आहे हे त्याने सविस्तर लिहून ठेविले आहे. या प्रकरणाचे नाव ' पर्णाल पर्वतग्रहणाख्यान '. म्हणजे पन्हाळागड कसा जिंकला याची हकीकत.

महाराज दि. १२ मार्च १६७३ रोजी पन्हाळगडावर पोहोचले. दक्षिणेच्या ' तीन दरवाजा ' नावाच्या भव्य दरवाजाने गडात प्रवेशले. कोंडाजीचे आणि त्याच्या मर्दांचे हे साक्षात सोनेरी कौतुक तीन दरवाज्यांत झळाळत होते. तेरा वर्षांनंतर पुन्हा पन्हाळा स्वराज्यात दाखल झाला होता. केवढा आनंद! रणवाद्यांच्या आणि रणघोषणांच्या दणदणाटात महाराजांनी पन्हाळा पाहिला. त्यांनी सोमेश्वर महादेवाची स्वत: पूजा केली. त्यावेळी सैनिकांनी गडावरील सोनचाफ्याची फुले पूजेसाठी महाराजांपुढे आणून ठेवली. महाराजांनी सोमेश्वराला सोनचाफ्याचा लक्ष वाहिला.

हा झाला इतिहास. गनिमी काव्याचे युद्धतंत्र महाराजांप्रमाणेच त्यांच्या सरदारांनीही किती अचूक आत्मसात केले होते , ते येथे प्रत्ययास आले. आणखी एक गोष्ट. ऐन फाल्गुनी अमावस्येच्या अगदी तोंडावर म्हणजे वद्य त्रयोदशीच्या मध्यरात्री कोंडाजीने काळोख्या मुहुर्तावर ही जबर लढाई दिली.

अवसेच्या अंधाराची वा अशुभ दिवसाची त्याला भीती वाटली नाही. आठवणही झाली नाही. स्वराज्याच्या पवित्र कामाला काळोखी रात्रच काय आमावस्या असली तरीही ती पौणिर्मेहूनही मंगलच. या वषीर्च्या फाल्गुनी अवसेच्या गर्भात चैत्राचा गुढीपाडवा दडलेला होता. अंधश्रद्धा उधळून लावता येते खऱ्या श्रद्धेनेच.

महाराजांनी पन्हाळ्यावर सरसेनापती प्रतापराव गुजर यांना एक अत्यंत महत्त्वाची लष्करी कामगिरी सांगितली. ' सरनौबत , एक करा. पन्हाळगड आपण घेतल्याची खबर विजापुरास आदिलशाही दरबारास नक्कीच समजली असणार. हा पन्हाळगड आणि भोवतीचा आपल्या ताब्यात आलेला प्रदेश पुन्हा जिंकून घेण्याकरिता विजापुराहून नक्कीच कुणीतरी महत्त्वाचा सरदार किंवा शाही सेनापती लौकरच चाल करून येणार. जो कुणी येईल , त्याला तुम्ही आपल्या फौजेनिशी सरहद्दीवरच अडवा. बुडवा. तुडवा. पुन्हा करवीरच्या मुलुखात बादशाही फौजेची टाप पडता कामा नये. '

सरनौबत प्रतापराव गुजर सुमारे (नक्की आकडा माहीत नाही) १५ हजार फौज घेऊन पूवेर्च्या दिशेने सरहद्दीकडे निघाले.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.

होय. फक्त साठच सैनिकांच्यानिशी कोंडाजी पन्हाळ्याकडे निघाला. आता मात्र कमाल झाली. फक्त साठ हत्यारबंद ? पन्हाळ्यावर होते आदिलशाहीचे जवळजवळ दोन हजार हशम. पूर्वी (दि. १६ जाने. १६६६ ) प्रत्यक्ष महाराजांनी आपल्या सुमारे तीन हजार मावळ्यांनिशी पूवेर्च्या बाजूने पन्हाळ्यावर मुसंडी मारली होती. ती साधली नाही.

फार मोठी हानी पत्करून त्यांना माघार घ्यावी लागली. फार पूवीर् इ. १६६० ( मार्च ते सप्टेंबर) सिद्दी जौहराने पन्हाळ्याला केवढा प्रचंड गराडा घातला होता , आठवतो ना! त्याही वेळी जौहरला गड फोडता आला नाही. अशी या पन्हाळ्याची ताकद. त्या पन्हाळ्यावर आता कोंडाजी अवघी साठ मनगटं घेऊन चाल करणार होता! आश्चर्य. कोंडाजीने मागे ठेवलेली मराठी टोळी गडापासून सुमारे आठ कि.मी. वर बांदिवडे गाव अन् नवरानवरीचा डोंगर यांच्या जवळपास ठेवली असावी.

कोंडाजी निघाला. त्याच्या साठांच्या मुठीत हत्यारं होतीच शिवाय अनेकांच्यापाशी कणेर् होते. कर्णा म्हणजे धोत्र्याच्या फुलासारखे किंवा सनईच्या आकारासारखे सुमारे पाच-सहा फूट लांबीचे पितळी वाद्य. शिंगासारखेच ते फुंकायचे. त्याचा आवाज भोम् भोम् भोम् भोम् भोम् असा होतो. हे रणवाद्यच आहे. याला भेरी असेही म्हणतात. आवाज मोठा होतो. अंगावर शहारे आणणारा.

अगदी योजून कोंडाजीने हे कर्णे बरोबर घेतले त्याने मागच्या आपल्या टोळीला राखीव फौजेसारखे ( रिर्झव्ह फोर्स) ठेवले. जणू अंधार पोखरीत कोंडाजी पन्हाळगडाच्या दक्षिण बाजूकडे निघाला. घडीभरात पोहोचला. समोर अंधारात पन्हाळा काळाकभिन्न दिसत होता. सरळ कडा. आपल्या सैनिकांना सर्व सूचना आणि इशारे त्याने देऊन ठेवले होते. कोंडाजीने तो कडा चढावयास सुरुवात केली. मागोमाग साठांची माळही हातापायांच्या बोटांचा खाचीकपारीत उपयोग करून वर चढू लागली. हा हा म्हणता साठांची ही ' प्रचंड फौज ' गडाच्या माथ्यावर पोहोचली. या बाजूला गडावर शाही हशमांचे पहारेच नव्हते. गड सुसरीसारखा सुस्तावला होता. सर्वजण वर पोहोचल्यावर ठरविल्याप्रमाणे कोंडाजीने गडाच्या मुख्य म्हणजे पूर्व बाजूस हल्ला चढविण्यासाठी आपल्या लोकांना , विशेषत: कणेर्वाल्या अनेक हशमांना इशारा केला , फुंका. फुंका. म्हणून कर्णे फुंकण्याचा.

फुंका ? अहो गडावर दोन हजार माणसांचा शत्रू. अन् कोंडाजी आपल्या साठांना म्हणतोय फुंका , फुंका ? अन् मग त्या दोन हजारांनी फुंकलं तर ? पण कोंडाजीचा शवच अतोनात धाडसी आणि कणेर् वाजायला सुरुवात झाली. बाकीचे सैनिकही गर्जू लागले , हर हर महादेव! हर हर महादेव! ज्योतिबाचा चांगभलं! तुळजाभवानी की जय! येळकोट येळकोट जयमल्हार! आणि हे सारे मराठे गडावरच्या दिसेल त्या अन् असेल तिथल्या शत्रू सैनिकांवर वादळासारखे तुटून पडले. आवाज भणाणत होता. गर्जना टिपेला जात होत्या. गड खडबडून उठला. या अचानक आलेल्या हल्ल्याने ते गोंधळलेच. भर रात्री वाद्य वाजवीत गनीम गडात घुसला तरी कसा ? आवाज तर फार मोठा होतोय. म्हणजे मराठे आहेत तरी किती ? या साऱ्याच शंकांनी शत्रूचं सैन्य गडबडलं. कापाकापी जत्रेसारखी सुरू झाली. एकच बेशिस्त गोंधळ अन् पळापळ सुरू झाली. गडाचा किल्लेदार बाबूखान एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर निर्धास्त आरामात होता. त्याला हा अचानक उडालेला गोंधळ आणि र्कण्यांच्या आवाज ऐकू आला. तो उठला. महालाच्या झरोक्यातून बाहेर डोकावला. आणि त्याने मोठमोठ्याने ओरडून विचारायला सुरुवात केली.

' कौन सिंग फुंकता है ? कौन ? कौन ?'

आता कोण सांगणार. शत्रू आलाय हे उघड होतं. स्वत: बाबूखान हत्यारानिशी त्या हवेलीतून धावत सुटला. अन् युद्धाच्या गदीर्वर तो आला. झुंजू लागला.

याचवेळी गडाचा मुख्य सबनीस नागो पंडित गडावर प्रारंभी झुंजत होता. पण तो मराठ्यांचा आवेश पाहून त्या अंधारात तो गडबडलाच. त्याला आणि खरं म्हणजे सर्वच बादशाही सैनिकांना वाटू लागलं की , मराठे संख्येनं खूप असावेत. नागो पंडित तर पळतच सुटला. एकटाच नव्हे तर आपल्याबरोबरचा सारा शाही सैनिकांचा जमाव घेऊन पळत सुटला. सुमारे चारशे सैनिक त्याच्याबरोबर होते. हा नागोबा आपल्या सैनिकांना उद्देशून ओरडत होता , ' पळा , पळा , गनीम अफाट आहे. जीव वाचवा. पळा. '

याचा परिणाम बाकीच्याही असंख्य सैनिकांवर झाला. तेही पळत सुटले , गडाच्या पूर्व दरवाजाकडे. ऐन रणांगणात गडावरच्या तोफांचा उपयोग अशावेळी कसा करणार अन् कोण करणार.

आता गाठ पडली कोंडाजीची बाबूखानाशी. बाबूखानशाही इमानाने लढत होता. या साऱ्या अचानक प्रकाराने त्याची मनस्थिती आता केवळ लढता लढता मरायचेच असं ठरविल्यासारखी झाली होती. आपली शाही फौज सावरून मराठ्यांवर हल्ला करावा हे जमणे आता केवळ अशक्य होते. या अचानक हल्ल्याचा म्हणजेच गनिमी काव्यातील ' सरप्राईज अॅटॅक ' चा हा अचूक परिणाम. कोंडाजीला साधला होता. बाबूखानाच्या दुदैर्वी अन् कमनशिबी किल्लेदारीवर कोसळला होता. त्यातच त्याच्या इमानी पण दुदैर्वी नशिबाने घात केला. बाबूखान कोंडाजी फर्जंदाच्या हातून ठार मारला गेला.

ठरले होते त्याचप्रमाणे कोंडाजीचे डाव सर होत गेले. आता तो आणि त्याचे साथीदार मराठे मोठमोठ्याने ओरडून शत्रू सैनिकांना दरडावून म्हणू लागले , ' हत्यारं टाका. नाहीतर आमची मागून फार मोठी मराठी फौज येतेच आहे. तुम्हा सर्वांची कत्तल उडेल. मुकाट हत्यारं टाका. '

या साऱ्या प्रकारचा परिणाम शत्रूवर झालाच. त्यांचा किल्लेदारही पडला होता. आणि ते सैनिक खरोखरच हत्यारं टाकून शरण येऊ लागले. निशस्त्र झालेल्या सैनिकांचीही संख्या या साठांच्या मानाने खूपच होती का! तरीही हत्यारं टाकून अंधारात ते बाजूला झाले. त्यांच्या नशिबी अंधारच होता. पन्हाळगड काबीज झाला होता.

मागे ठेवलेली दोनशेचाळीस मराठ्यांची ' प्रचंड ' फौज निरोप जाताच पन्हाळगडावर आली.

उजाडत गेले आणि मग निशस्त्र झालेल्या पण मोठ्या संख्येने असलेल्या या हतबल शाही हशमांना दिसून आले की , मूठभर लोकांनी आपला फजितवाडा केला. आपल्याला बावळट बनविले. किल्ला पूर्णपणे कब्जात आला होता. झेंडे लागले होते. कणेर् वाजतच होते. कोंडाजीने रायगडाकडे ही विजयाची बातमी कळविण्यासाठी महाराजांकडे घोडेस्वार पिटाळला.

केवढी युक्तीबाज शक्ती कोंडाजीने दाखविली. अवघ्या , ' साठी लोकांनसी कोंडाजी फर्जंदाने भेदेकरोन पन्हाळा कब्जा केला. ' हे गनिमी काव्याचे बळ. हे स्वराज्यनिष्ठेचे बळ. हे महत्त्वाकांक्षेचे बळ. खरोखरच या महत्त्वाकांक्षेपुढे ते उंच उंच गगन ठेंगणे पडत होते. आजच्या काळातल्या अग्निबाणासारखे ते सुसाट सुटून ग्रहनक्षत्रांचा वेध घेऊ पाहात होते.
-बाबासाहेब पुरंदरे