मंगळवार, २९ जुलै, २००८

पाऊस

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.

ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,

असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.

पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,

पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.

पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी

पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.

पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,

पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं

पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते

पावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते.

रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.

त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात.



निर्झरास

गिरिशिखरे,वनमालाही

कड्यावरुनि घेऊन उड्या

घे लोळण खडकावरती,

जा हळुहळु वळसे घेत

पाचूंची हिरवी राने

वसंतमंडप-वनराई

श्रमलासी खेळुनि खेळ

ही पुढचि पिवळी शेते

झोप कोठुनी तुला तरी,

बालझरा तू बालगुणी दरीदरी घुमवित येई!

खेळ लतावलयी फुगड्या.

फिर गरगर अंगाभवती;

लपत-छपत हिरवाळीत;

झुलव गडे, झुळझुळ गाने!

आंब्याची पुढती येई.

नीज सुखे क्षणभर बाळ !

सळसळती गाती गीते;

हांस लाडक्या! नाच करी.

बाल्यचि रे! भरिसी भुवनी

***

बालतरू हे चोहिकडे

प्रेमभरे त्यावर तूहि

बुदबुद-लहरी फुलवेली

सौंदर्ये हृदयामधली

गर्द सावल्या सुखदायी

इवलाली गवतावरती

झुलवित अपुले तुरे-तुरे

जादूनेच तुझ्या बा रे?

सौंदर्याचा दिव्य झरा

या लहरीलहरीमधुनी ताल तुला देतात गडे!

मुक्त-मणि उधळून देई!

फुलव सारख्या भवताली।

हे विश्वी उधळून खुली

वेलीची फुगडी होई!

रानफुले फुलती हसती

निळी लव्हाळी दाट भरे।

वन नंदन बनले सारे!

बालसंतचि तू चतुरा;

स्फूर्ती दिव्य भरिसी विपिनी

***

आकाशामधुनी जाती

इंद्रधनूची कमान ती

रम्य तारका लुकलुकती

शुभ्र चंद्रिका नाच करी

ही दिव्ये येती तुजला

वेधुनि त्यांच्या तेजाने

धुंद हृदय तव परोपरी

त्या लहरीमधुनी झरती

नवल न, त्या प्राशायाला

गंधर्वा तव गायन रे मेघांच्या सुंदर पंक्ति;

ती संध्या खुलते वरती;

नीलारुण फलकावरती;

स्वर्गधरेवर एकपरी;

रात्रंदिन भेटायाला!

विसरुनिया अवघी भाने

मग उसळे लहरीलहरी

दिव्य तुझ्या संगीततति!

स्वर्गहि जर भूवर आला!

वेड लाविना कुणा बरे!

***

पर्वत हा, ही दरीदरी

गाण्याने भरली राने,

गीतमय स्थिरचर झाले!

व्यक्त तसे अव्यक्तहि ते

मुरलीच्या काढित ताना

धुंद करुनि तो नादगुणे

दिव्य तयाच्या वेणुपरी

गाउनि गे झुळझुळ गान

गोपि तुझ्या हिरव्या वेली

तुझ्या वेणुचा सूर तरी तव गीते भरली सारी.

वर-खाली गाणे गाणे!

गीतमय ब्रम्हांड झुले!

तव गीते डुलते झुलते!

वृंदावनि खेळे कान्हा;

जडताहि हसवी गाने;

तूहि निर्झरा! नवलपरी

विश्वाचे हरिसी भान!

रास खेळती भवताली!

चराचरावर राज्य करी

***

काव्यदेविचा प्राण खरा

या दिव्याच्या धुंदिगुणे

मी कवितेचा दास, मला

परि न झरे माझ्या गानी

जडतेला खिळुनी राही

दिव्यरसी विरणे जीव

ते जीवित न मिळे माते

दिव्यांची सुंदर माला

तूच खरा कविराज गुणी

अक्षय तव गायन वाहे तूच निर्झरा! कविश्वरा!

दिव्याला गासी गाणे।

कवी बोलती जगांतला,

दिव्यांची असली श्रेणी!

हृदयबंध उकलत नाही!

जीवित हे याचे नाव;

मग कुठुनि असली गीते?

ओवाळी अक्षय तुजला!

सरस्वतीचा कंठमणी

अक्षयात नांदत राहे!

***

शिकवी रे, शिकवी माते

फुलवेली-लहरी असल्या

वृत्तिलता ठायी ठायी

प्रेमझरी-काव्यस्फूर्ति

प्रगटवुनि चौदा भुवनी

अद्वैताचे रज्य गडे!

प्रेमशांतिसौंदर्याही

मम हृदयी गाईल गाणी

आणि असे सगळे रान

तेवि सृष्टीची सतार ही दिव्य तुझी असली गीते!

मम हृदयी उसळोत खुल्या!

विकसू दे सौंदर्याही!

ती आत्मज्योती चित्ती

दिव्य तिचे पसरी पाणी!

अविच्छिन्न मग चोहिकडे!

वेडावुनि वसुधामाई

रम्य तुझ्या झुळझुळ वाणी!

गाते तव मंजुळ गान,

गाईल मम गाणी काही!

***

- बालकवी

तोपची

आचार्य अत्रे कालवश झाल्याची बातमी ऐकल्यावर गदिमांनी ही कविता रचली।

मुलासारखा हट्टी अल्लड

स्वभाव होता सहज जयाचा

त्यास उचली कैसा काळ

हिशोब करून वयाचा

उन्मत्तांच्या शिरी बैसला

घाव जयाचा अचूक अगदी

परशुराम तो आज परतला

परशु आपली टाकून स्कंधी

सर्वांगांनी भोगी जीवन

तरीही जयाच्या अंगी विरक्ती

साधुत्त्वाचा गेला पूजक

खचली, कलली श्री शिवशक्ती

भरात आहे अजुनी लढाई

न्यायासंगे अन्यायाची

आग बरसती तोफ अडखळे

आघाडीचा पडे तोपची

- ग.दि.माडगूळकर

शारदेचे आमंत्रण

ज्यांचा शब्द हृदयस्थ ओंकारातुन फुटला असेल,

ज्यांचा शब्द राघवाच्या बाणासारखा सुटला असेल,

ज्यांच्या जित्या फुफ्फ्सांना छिद्र नसेल अवसानघातकी,

जन्मोजन्म ज्यांचा आत्मा राखेमधुन उठला असेल

ज्यांची मान ताठ असेल प्राचीन लोहखंडाप्रमाणे,

ज्यांच्या जिवात पोलादाचे उभे आडवे ताणेबाणे,

ज्यांच्या धीम्या धीरोदात्त पावलांच्या तालावरती,

धरतीला स्फुरत असेल शाश्वताचे नवे गाने असेल.

सत्यभार पेलत असता ज्यांचा देह झुकला नसेल,

त्रैलोक्याच्या राज्यासाठी ज्यांनी देह विकला नसेल,

मुर्तिमंत मृत्युचीही आमने-सामने भेट होता,

ज्यांच्या थडथड नाडीमधला एक ठोका चुकला नसेल.

ज्यांच्या अस्थी वज्र-बीजे.....नसांत उकळणारे रक्त,

शारदेचे आमंत्रण आज, त्यांनाच आहे फक्त...

- वसंत बापट



एका तळ्यात

एका तळ्यात

एका तळ्यात होती बदले पिले सुरेख

होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥

कोणी न त्यास घेई खेळावयास संगे

सर्वाहूनि निराळे ते वेगळे तरंगे

दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक

आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥

पिल्लस दु:ख भारी भोळे रडे स्वत:शी

भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी

जे ते तयास टोची दावी उगाच धाक

होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥

एकेदिनी परंतु पिल्लास त्या कळाले

भय वेड पार त्याचे वार्‍यासवे पळाले

पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणैक

त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक

- ग.दि.माडगूळकर

जगत मी आलो असा

जगत मी आलो असा (रंग माझा वेगळा)

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!

एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;

सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात मझ्या मी विजांचे घोट प्यालो;

पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;

एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;

एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;

सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....

लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!
- सुरेश भट

पत्र

पत्रे तिला प्रणयात आम्ही खुप होती धाडली,
धाडली आशी होती की नसतील कोणी धाडली
धाडली मजला तिने ही, काय मी सांगु तीचे
सव॔ ती माझीच होती, एकही नव्हते तीचे
पत्रात त्या जेव्हां तिचे ही पत्र हाती लागले
वाटले जैसे कोणाचे गाल हाती लागले
पत्रात त्या हाय ! तेथे काय ती लिहीते बघा
माकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा
साथ॔ता संबोधनाची आजही कळली मला
व्यर्थता या य़ौवनाची तिही आता कळाली मला
नाही तरिही धीर आम्ही सोडीला काही कुठे
ऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे
- भाऊसाहेब पाटणकर

रचना

स्वप्नामध्ये रचिल्या ओळी

यमक मला नच सापडले!

अर्थ चालला अंबारीतुन

शब्द बिचारे धडपडले;

प्रतिमा आल्या उंटावरुनी;

नजर तयांची पण वेडी;

शब्द बिथरले त्यांना;

भ्यालेस्वप्नांची चढण्या माडी!

थरथरली भावना मुक्याने

तिला न त्यांनी सावरले;

स्वप्नामध्ये रचिल्या ओळी

यमक मला नच सापडले!

- विंदा करंदीकर

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे
ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता
की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान
पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती
सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम
काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?
कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती
मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला"
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"
- कुसुमाग्रज

मरणांत खरोखर जग जगते

मरणांत खरोखर जग

जगतेअधिं मरण अमरपण ये मग ते ॥


अनंत मरणे अधीं मरावी

स्वातंत्र्याची आस धरावी

मारिल मरणचि मरणा भावी

मग चिरंजीवपण ये मग ते ॥ १ ॥


सर्वस्वाचे दान अधीं करी

सर्वस्वच ये तुझ्या घरी

सर्वस्वाचा यज्ञ करी तरि

रे! स्वयें सैल बंधन पडते ॥ २ ॥


स्वातंत्र्याचा एकचि ठावा

केवळ यज्ञचि मजला ठावा

यज्ञ मार्ग ! हो यज्ञ विसावा

का यज्ञाविण काही मिळते? ॥ ३ ॥


सीता सति यज्ञीं दे निज बळि

उजळुनि ये सोन्याची पुतळी

बळी देऊनी बळी हो बळी

यज्ञेच पुढे पाऊल पडते ॥ ४ ॥


यज्ञिं अहर्निश रवि धगधगतो

स्वसत्वदाने पाश छेदितो

ज्योतिर्गण नव जन्मुनि जग

तोरे स्वभाव हा! उलटे भलते ॥ ५ ॥


प्रकृति-गती ही मनिं उपजुनियां

उठा वीर कार्पंण्य त्यजुनिया;

'जय हर!'गर्जा मातेस्तव या!

बडबडुनी काही का मिळते? ॥ ६ ॥
- भा.रा.तांबे

शुक्रवार, २५ जुलै, २००८

प्रेरणेची शताब्दी

' केसरी' या वृत्तपत्रातील अग्रलेखांसाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना सहा वषेर् तुरुंगवासाची शिक्षा ठोठावताना हायकोर्टाचे तत्कालीन न्यायाधीश दिनशॉ दावर यांना कल्पनाही नसेल की हा दिवस इतिहासातील एका पुसता न येणाऱ्या पानाचे रूप घेणार आहे... या पानावर दावर यांचा उल्लेख केवळ आनुषंगिक आणि एका जुलमी सत्तेचे प्रतिनिधी म्हणून राहणार आहे आणि त्यांनी ज्याला 'बाणेदारपणे' गुन्हेगार ठरवले होते, त्यांची या शिक्षेवरची प्रतिक्रिया त्याच कोर्टात न्यायमूर्तींच्या सदसद्विवेकाच्या जागल्याच्या रूपात शंभर वर्षांनंतरही घुमत राहणार आहे.
'सेडिशन'च्या आरोपावरून ब्रिटिश सरकारने लोकमान्यांवर भरलेल्या खटल्याच्या निकालाला आज २२ जुलैला शंभर वषेर् पूर्ण होत आहेत. खुदीराम बोस आणि त्यांच्या सहकाऱ्याने ब्रिटिश जिल्हा न्यायाधीशाला ठार मारण्याच्या उद्देशाने बॉम्ब फेकला होता. मात्र त्यात काही ब्रिटिश महिलांचा मृत्यू झाला होता. पुढे खुदीरामना फाशी देण्यात आले मात्र लो. टिळक यांनी केसरीत या घटनेसंदर्भात लिहिलेल्या अग्रलेखांनी सरकारचे पित्त खवळले. खुदीरामसारखे तरुण या मार्गाचा आश्ाय घ्यायला प्रवृत्त का होतात, याचे विश्लेषण लोकमान्यांनी केले होते आणि भारतातील ब्रिटिश सरकारच्या धोरणांतच याचे मूळ आहे, अशा आशयाचा त्यांचा युक्तिवाद होता. अशा हिंसक मार्गांचे हे समर्थन असून, सरकारविषयी असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असा ठपका ठेवत लोकमान्यांविरुद्ध सेडिशनच्या गुन्ह्यासाठी खटला भरण्यात आला. या गंभीर आरोपावरून भरलेला लोकमान्यांविरुद्धचा हा दुसरा खटला होता. त्याआधी १८९७ साली भरलेल्या खटल्यात त्यांना दीड वषेर् तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तरीही लोकमान्यांचे मनोबळ आणि स्वराज्याच्या व्रताप्रतीच्या निष्ठा कणभरही खच्ची करण्यात ब्रिटिश राजवटीला यश आले नव्हते. विशेष म्हणजे पहिल्या खटल्यात लोकमान्यांच्या वतीने ज्यांनी वकीलपत्र घेतले होते आणि टिळकांचे लिखाण हे 'सेडिशन'च्या व्याख्येत बसत नाही, असा युक्तिवाद केला होता, तेच दावर यावेळी न्यायाधीश म्हणून टिळकांचा 'न्याय' करायला बसले होते. यावेळी लोकमान्यांनी स्वत:च सहा दिवस युक्तिवाद केला आणि अग्रलेखाचे विपर्यस्त भाषांतर करण्यात आले आहे, येथपासून कायद्याला अभिप्रेत असलेल्या गुन्ह्याच्या व्याख्येत त्यातील प्रतिपादन कसे बसत नाही, याची काटेकोर चिकित्सा केली.
परंतु 'सेडिशन'चा गुन्हा हे राजकीय हत्यार म्हणूनच तेव्हा वापरले जात असे आणि न्यायाधीशांची त्यातील भूमिका ही ब्रिटिश सत्तेचे एक प्रतिनिधी अशीच असायची. त्यामुळे लोकमान्यांना शिक्षा झाली नसती, तरच नवल होते. मात्र 'या न्यायासनाहूनही श्ाेष्ठ अशी शक्ती अस्तित्वात आहे आणि माझ्या शिक्षेनेच अंगीकृत कार्याला गती मिळेल अशी त्या शक्तीचीच इच्छा असावी,' असे उद्गार काढीत या शिक्षेला लोकमान्य खंबीरपणे सामोरे गेले. या 'न्याय'दानाची विश्वासार्हताच त्यांच्या या ऐतिहासिक उद्गारांनी समूळ नष्ट झाली. पुढे म. गांधी यांनी त्यांच्याविरुद्ध भरलेल्या सेडिशनच्या खटल्यात, लोकमान्य टिळक यांना ज्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली, त्यासाठीच आपल्यालाही व्हावी, हा मी माझा सन्मानच मानतो, असे उद्गार कोर्टातच काढले होते. लोकमान्यांनी प्रतिकाराच्या चळवळीला दिलेल्या या प्रेरणेची शताब्दी स्वतंत्र भारतात साजरी होत असली, तरी 'स्वदेशी' राज्यर्कत्यांनीच आज ब्रिटिशांच्या पावलावर पाऊल टाकीत 'सेडिशन'च्या खटल्याचे हत्यार निभीर्ड पत्रकारितेविरुद्ध उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यात गुजरात, मध्य प्रदेश यासारखी भारतीय जनता पक्षाचे 'शत प्रतिशत' सरकार असलेली राज्ये अग्रणी आहेत. मुंबई हायकोर्टात कोरलेल्या लोकमान्यांच्या ऐतिहासिक वचनाचे स्मरण प्रथम त्यांना करून देण्याची दुदैर्वी वेळ आली आहे.

तरुणाई...ग्लोबलायझेशन नंतरची

एक घटनाक्रम.

१८५७.

मंगल पांडे नावाचा ब्रिटिश पलटणीतला तरुण गायीचं कातडं लावलेली काडतुसं वापरायला नकार देतो. या बगावतीसाठी त्याला देहांत शासन मिळतं . हा वणवा हिंदुस्थानभर पसरतो . या मातीला देश म्हणून पहिली ओळख देण्याचं काम मंगल पांडेनं केलेलं असतं .

१९४२.

गांधीजींची देशाला हाक . हजारो तरुण शाळा कॉलेजातलं शिक्षण , सरकारी नोकऱ्यांवर लाथ मारून स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतात. सगळ्या देशात ब्रिटिशविरोधाची लाट उसळते . प्रदीर्घ लढ्यानंतर ब्रिटिशांना त्यांच्या देशात जाणं भाग पडतं.

१९६५.

स्वातंत्र्यादरम्यान जन्मलेली पिढी तारुण्याच्या उंबरठ्यावर. स्वातंत्र्याने नक्की काय दिलं या विचारांनी गोंधळलेली . त्याच दरम्यान व्हिएतनाम , फ्रान्समधल्या तरुणांच्या चळवळींकडून प्रेरणा घेत इथला मध्यमवगीर्य तरुण संघटित होतो . वेगवेगळ्या झेंड्याखाली तरुणांचं संघटन वाढतं .

१९७५.

आणीबाणी . त्याआधीच्या वर्षी जयप्रकाश नारायण यांनी दिलेल्या संपूर्ण क्रांतीच्या हाकेतून संघटित झालेल्या तरुणांमध्ये संतापाची लाट उमटते. हा तरुण विचारी , शिक्षित , बुद्धिवादी . मोर्चे , सभा , निदर्शनं यामुळे देश ढवळून निघतो . अनेकांना तुरुंगाची हवा खावी लागते . राज्यर्कत्यांना निवडणुका जाहीर करणं भाग पडतं.

१९८५.

खासगी व्यावसायिक शिक्षणसंस्थांचं पेव . फीमध्ये प्रचंड वाढ . खासगी आणि सरकारी कॉलेजेसमधली दरी वाढते . ' इश्यूं ' ची कमी नसतेच. सोबतीला विद्याथीर्प्रतिनिधींच्या निवडणुका . राजकीय पक्षांच्या पंखाखाली विद्यार्थी संघटनांची चलती वाढते. लाखोंची मेंबरशीप आणि विराट अधिवेशनं गाजू लागतात.

आणि ......

२००७ ची संध्याकाळ.

शेतक - यांच्या आत्महत्यांचा विषय घेऊन विरोधी पक्ष रिंगणात उतरलाय. गेली पाच वर्षं आत्महत्या होताहेत. देशातलं हे प्रमाण सर्वाधिक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. कुठलीही तरुणांची संघटना मात्र यावर काही बोलल्याची नोंद नाही. जिथं आत्महत्या होताहेत त्या विदर्भातल्या तरुणाईवरही काही तरंग नाहीत......
००००००
खैरलांजी प्रकरणाला नुकतंच वर्ष झालं. शाहू फुले , आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात आजही दलित बायकामुलांना शेकडो बघ्यांसमोर जिवंत जाळलं जातं . वर्षभर त्या प्रकरणाचा तपास होत राहतो . चौकश्या झडत राहतात . दलित नेते मूग गिळून गप्प बसतात . चार दोन संघटना सोडल्या तर वर्षभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्यांच्यात स्वयंप्रेरणेने उभी राहिलेली तरुणांची एकही संघटना नसते ...

विकासाच्या नावाखाली एसईझेड आलंय . शेतक - यांच्या जमीनी लाटल्या जाताहेत. त्याच्या बदल्यात हातावर ठेवली जाणारी रक्कम कधीच उडून जातेय . शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या चार उद्योगांचं उखळ पांढरं होतंय . बंगालमध्ये नंदीग्राम धुमसतंय . बलात्कारित बायकांच्या किंकाळ्या बाहेरही येत नाहीत . महाराष्ट्रातही एकएक करीत एसईझेड जाहीर होताना शेतकरी असहाय्यपणे बघत राहतो , जमेल तसं सुटं सुटं लढत राहतो . हजारो एकर जमिनींची कुर्बानी देणाऱ्या राज्यात एसईझेडविरोधात एका झेंड्याखाली एकत्र यावं हे कुणाला सुचत नाही . शेतकऱ्यांची तरुण मुलं शेती विकून मिळालेल्या पैशांवर गाड्या उडवतात . दारुकामात रंगतात . बारमधे पोरींवर नोटा उधळतात . त्यांच्याच जमिनींवर उभ्या राहणा - या उद्योगांमध्ये काहीतरी नोकरी नक्की मिळेल या दिवास्वप्नांत रंगून जातात ...
राज्याचा आर्थिक , सामाजिक कणा मोडणाऱ्या घटना घडत राहतात . माध्यमांमधून त्या त्या दिवसाची सनसनाटी बेकिंग न्यूज म्हणून हव्या तशा रंगवल्या जातात. पण हे सगळं पाहताना पेटून उठणारा , डोळ्यात बदलाची स्वप्नं आणि ओठांवर लढण्याची भाषा करणारा तरुण कुठे आहे ? या घटनांविषयी लढणं तर सोडाच पण साधं मत व्यक्त करावसंही वाटू नये ? त्यांचं जग वास्तवापासून एवढं का तुटावं ? नातेसंबंध , पैसा , सेलिब्रेशन्स यांच्या गुंत्यात सामाजिक आणि राजकीय जाणीवा एवढ्या बोथट का व्हाव्यात ?... प्रश्न पडत होतेच . एकामागे एक घडणाऱ्या घटनांनी ते अधोरेखित होत गेले . लेखाच्या निमित्ताने अनेकांशी बोलणं झालं . यात अर्थातच नव्या पिढीचे प्रतिनिधी होते . मागच्या पिढीत तरुणांचं प्रतिनिधित्व केलेले कार्यकतेर् होते , तरुणांच्या मनोव्यापारांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ डॉक्टर होते , विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी होते ... या चचेर्तून नव्या पिढीचं बदललेलं चित्र स्पष्ट झालं . कारणं कळत गेली . आधीच्या पिढीने उगवत्या पिढीबद्दल ' आमच्या वेळी नव्हतं असं . ही पिढीच बिघडलीये ....' असं म्हणत गळा काढण्याइतपतच हे मर्यादित नाही हेही जाणवलं . ...................
हे बदल वेगाने जाणवू लागले ते ग्लोबलायझेशननंतर. ग्लोबलायझेशनचं राजकीय टोक थेट डाव्या देशांच्या पडझडीपर्यंत जाऊन पोहोचतं . रशियाचं अस्तित्व होतं तोपर्यंत अमेरिकेला पर्याय म्हणून तिसऱ्या जगातील देशच नव्हे तर भारतही रशियाकडे पाहत होता . स्वातंत्र्यानंतर भारताची धोरणंही रशियाधाजिर्णी राहिली . मात्र सोविएत युनियनच्या पाडावानंतर सगळं जगच हादरून गेलं . अमेरिका ही एकमेव आणि निविर्वाद महासत्ता राहिली . यानंतरची लढाई आथिर्क वर्चस्वाची आहे हे ओळखत जगभर राजरोसपणे अमेरिकन कंपन्याची आक्रमणं सुरू झालं . सरकारी बंधनं खुली होत खासगीकरण हा परवलीचा शब्द झाला .
ग्लोबलायझेशनपूवीर्ची पिढीही विभक्त कुटुंबपद्धतीतच वाढली असली तरी त्यानंतरचे सांस्कृतिक बदल प्रचंड वेगाने होत गेले. सरकारी नोकरीसाठी जीव टाकणारी पिढी कालबाह्य झाली . त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने पैसे देणारी करिअर्स सहज दिसू लागली . आयटी हा परवलीचा शब्द झाला . भारताकडे जगभरातून एक उत्कृष्ट सविर्स हब म्हणून पाहिलं जाऊ लागलं . परदेशी नोकऱ्यांचं कौतुक राहिलं नाही . यापाठोपाठ आला प्रचंड पैसा . मध्यमवगीर्य कुटंुबात बापाला नोकरीतून रिटायर होताना मिळालेल्या ग्रॅच्युईटी आणि फंडाच्या अनेक पटींत मुलाचं वर्षाचं पॅकेज असणं हे चित्र घराघरात दिसू लागलं . फॅशन , लाइफस्टाइल , खाणं , रिलेशनशिप या सगळ्या गोष्टींच्या अनुकरणासाठी तरुणांचं एकच लक्ष्य ठरलं , अमेरिका !
आथिर्क सुबत्तेबरोबर सांस्कृतिक जीवनात झालेली उलथपालथ चक्रावून टाकणारी आहे . नोकरीत एका ठिकाणी चिकटला की आयुष्याची इतिकर्तव्यता झाली , असं राहिलेलं नाही . हातातल्या संधीपेक्षा चांगली संधी मिळाली की तत्क्षणी नोकरी बदलण्याची तयारी असते . आयुष्यभराची सुरक्षितता , पेन्शन असले विचारही या तरुणांच्या जवळपास फिरकत नाहीत . मात्र आहे तो क्षण पुरेपूर उपभोगण्याची वृत्ती मात्र वाढली . माझं कुटुंब , माझे जवळचे मित्र , फारतर माझा ग्रुप यापलिकडे सामाजिक क्षितीज विस्तारत नाही . पडणारे प्रश्ान्ही ' माझे ' असतात . लहानपणापासून हा परीघ एवढाच राहील याची काळजी पालकांनी घेतलेलीच असते . शाळा , कॉलेज , क्लासेस , छंद ( असलेले , लादलेले ) यांत गुरफटत लहानपण संपतं . कॉलेजलाईफही याहून वेगळं नसतं . परीघ तोच , फक्त अॅक्टिव्हिटीज बदलतात . गेली पंचवीस वर्षं डाव्या चळवळीचं काम करणाऱ्या उदय नारकर यांचं यासंबंधातलं निरीक्षण लक्षात घेण्यासारखं आहे . ते म्हणतात , ' आजची पिढी अमेरिकेचं सगळ्या बाबतीत अंधानुकरण करते . चंगळवाद जनमानसात रुजलाय . साधनं आणि सुखसोयींची उपलब्धता म्हणजे सुख आणि ते मिळवण्यासाठीच जगायचं असतं , हीच जगण्याची मूल्यं असतील तर अशा समाजाकडून सामाजिक जाणीवांची अपेक्षा कशी धरणार ? मागच्या पिढीत चळवळींचं नेतृत्त्व केलेला मध्यमवर्ग आज अस्तित्वातच नाही . आहे तो नवश्रीमंत वर्ग . गरीब , वंचित , अन्याय , दारिद्य या शब्दांना या लोकांच्या शब्दकोशात थाराच नसेल तर या जाणीवा तरुणांमध्ये कशा दिसाव्यात ?'
मनस्विनी लता रवींद्र , आजच्या पिढीची नाटककार. सेन्सिबल . चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्मलेली . तिच्या मताबद्दल उत्सुकता होती . ' आधीच्या पिढीसारखा वैचारिक गोंधळ आमच्या पिढीत नाही . जुनं घट्ट कवटाळून नव्या गोष्टींची फळं चाखण्याची हाव धरण्याचा आधीच्या पिढीचा दुटप्पीपणाही नाही . पैसा आणि रिकग्निशन हवी हेच आमच्यावर लहानपणापासून बिंबवलं गेलं . आमच्या आजूबाजूला आमची म्हणावीत अशी इतकी कमी माणसं आहेत की , नातेसंबंधांबाबत असुरक्षित वाटणं साहजिकच आहे .' मनस्विनीची मतं स्पष्ट असतात . तिच्या आणि तिच्या पिढीच्या लिखाणात हे उमटतं . तिचं ' सिगारेटस् ' स्त्रीपुरुष नातेसंबंधाबद्दल बोलतं . ' अलविदा ' मध्ये मुलगी आणि आईचं नातं दिसतं . मनस्विनी हे मान्य करते . पण आळेकर , तेंडुलकरांच्या नाटकांमध्येही हे नव्हतं का ?
नातेसंबंधांच्या पॉवरपॉलिटीक्समध्ये त्यावेळचे सामाजिक संदर्भ येतातच . ते लक्षात येण्यासाठी काही काळ जावा लागत असेल कदाचित , असं तिचं म्हणणं ! लिखाणातून व्यक्त होणारी तिची पिढी एकेकटी . स्वत : च्या कोषात गुरफटलेली . नाटकांचंही असंच . प्रस्थापित नाटकांपेक्षा वेगळं मत मांडणारी समांतर रंगभूमीची धुरा खांद्यावर घेतलेली माणसं गेल्या पिढीपर्यंत दिसली . त्यांचं अस्तित्व जाणवलं . आजही अनेक गुणी मुलं तिथं धडपडताना दिसतात . पण पूर्णवेळ या चळवळीसाठी वाहून घेण्यासाठी लागणारं आथिर्क पाठबळ उभं करायचं तर त्यांना नोकरी व्यवसाय करणं भाग आहे . आणि आजच्या व्यवस्थेत पूर्णवेळ नोकरी धंदा करून नाटकासाठी वेळ काढणं अवघड होतंय . रंगभूमीवर काही करून दाखवण्याची क्षमता असलेली ही तरूण पिढी या क्षितीजावरून दिसेनाशी होण्याची भीती निर्माण झालीये.
आयटीवाल्या हायफाय पिढीचे मनोव्यापार समजून घेणारे डॉ . राजेंद बवेर् मात्र थोडा वेगळा विचार करतात . त्यांच्या मते , सामाजिक दरी एवढी प्रचंड आहे की ही मुलं समाजाच्या खालच्या स्तराशी रिलेट होऊ शकत नाहीत , हा त्यांचा दोष नाही . आत्महत्या करणाऱ्या विदर्भातल्या शेतकऱ्यांशी माझा काय संबंध , असा प्रश्न विचारण्याइतके सगळेच तरूण समाजापासून तुटलेले नाहीत . या प्रश्नाचं विश्लेषण करता यावं , एवढं या मुलांचं वाचन आणि अभ्यास नक्कीच आहे . पण यासाठी काय करायला हवं हे ना त्यांना कळत , ना याबद्दल काही करावं असे प्लॅटफॉर्म त्यांच्यासमोर असतात . वैयक्तिक पातळीवर ही मुलं सामाजिक बांधिलकी मानतात , असं बर्वे यांचं निरीक्षण आहे . त्यासाठी ठराविक काळ सेवा देण्याची त्यांची तयारीही असते . पण पूर्णवेळ वाहून घेण्याची गरज त्यांना वाटत नाही.
तरूणांच्या राजकीय सजगतेबद्दल तर चिंता करण्यासारखीच परिस्थिती आहे . आधी विद्याथीर् चळवळींच्या माध्यमातून राजकीय शिक्षण आपोआप व्हायचं . आज विद्यार्थी संघटनांचं अस्तित्व नावापुरतंच राहिल्याचं दिसतं . याची कारणं शिक्षणाच्या खासगीकरणामध्ये आहेत . वसंतदादा पाटील यांनी १९८६मध्ये खासगी इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू केल्यानंतर खासगी कॉलेजेसचं पेवच फुटलं . उच्च शिक्षण ही सरकारची जबाबदारी नाही , ही भूमिका घेत हळूहळू सरकारने आपला हात आखडता घेतला . या संस्थांनी आपले कँपस् चकाचक केले . वाट्टेल ती किंमत मोजून साधनसुविधांचं पीक कँपस्मध्ये आणलं . आपल्या मुलानं आयटी नाहीतर मॅनेजमेण्टमध्ये जावं हे नवश्रीमंतांचं स्वप्न झालं . मध्यमवर्गही मग त्यांचं अनुकरण करीत सर्वस्व पणाला लावून , वेळ पडल्यास कर्ज काढून तिथं प्रवेश घेण्यात धन्यता मानू लागला . मग सीईटीचे दरवषीर्चे नवे घोळ , नवे नियम , कोर्टकचेऱ्या या मांडवाखालून गेलेला आणि पालकांच्या अपेक्षांचं , कुवतीबाहेर केलेल्या अवाजवी खर्चाचं ओझं मानगुटीवर लादलेला तरुण कशाला आणि का विरोध करेल ?
विद्याथीर् संघटनांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडावेत ही प्रथा तोंडी लावण्यापुरतीच अस्तित्वात आहे असं दिसतं . विद्याथीर् करिअरिस्ट झालेत , कॉलेजतली मेंबरशीप कमी झालीय ही गोष्ट सगळ्याच विद्याथीर् संघटनांच्या प्रतिनिधींनी मान्य केली . पण संघटना नावापुरत्याच राहिल्यात , हे मात्र त्यांना मान्य नाही . अखिल भारतीय विद्याथीर् सेना ही शिवसेनाप्रणित विद्यार्थी संघटना . संघटनेचे प्रमुख अभिजित पानसे यांच्याशी बोलणं झालं . ' जेजे कॉलेजमधल्या प्राध्यापकाला काळं फासण्याच्या प्रकाराची माध्यमामध्ये रंगवून चर्चा झाली . त्याला नंतर कोर्टाने निलंबित केलं , याला मात्र फारशी प्रसिद्धी मिळाली नाही . गेली ३० वर्षं चचेर्च्या गुऱ्हाळात अडकलेला दप्तरांच्या ओझ्याचा प्रश्ान् आम्ही मागीर् लावला . शिक्षणतज्ज्ञांशी बोलून पुस्तकंही तयार केली . इंजिनिअरिंग मेडिकल शिवायही इतर करिअर असू शकतात , याचं भान आणि माहिती देणारं मार्गदर्शक पुस्तक आम्ही काढलंय ', असं ते सांगतात . खासगी इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस चालवणाऱ्या शिक्षणसम्राटांनी एक रुपया भाड्यावर सरकारी जागा लाटून लूटमार चालवल्याचा त्यांचा आरोप असतो . विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी क्रिकेटचे सामने , युवा साहित्य संमेलनं असेही उपक्रम चालवले जाताहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही संघटना तशी नवी . संघटनेचे प्रमुख अदित्य शिरोडकर यांच्याशी बोलताना अनेक प्रश्न अजूनही ' अभ्यासा ' च्या पातळीवर असल्याचं लक्षात आलं . व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी असवी का , हा त्यातलाच एक मुद्दा . जनमानसाचा कानोसा घेताना यावर विद्याथीर् आणि पालकांच्या संमीश्र प्रतिक्रिया असल्याचं दिसल्याने तो प्रश्ान् म्हणून हातात घेऊ शकलेलो नाही . शैक्षणिक , सांस्कृतिक आणि सामाजिक अशा तीन आघाड्यांवर आमचं काम चालतं . केवळ सांस्कृतिक कार्यक्रमच नव्हे तर करिअर मार्गदर्शनाचे कार्यक्रमही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घेणार आहोत . विदर्भ आणि मराठवाड्यात या कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळाल्याचं ते म्हणाले .
सांस्कृतिक उपक्रम हे आजच्या विद्याथीर् संघटनांचं नवं आकर्षण आहे . यामुळे तरूणांचा प्रतिसाद मिळतोच , शिवाय माध्यमातून चर्चा होत राहते . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नुकतंच झालेलं ' आम्ही दादरकर ' हे त्याचं उत्तम उदाहरण . चमकत्या सेलिब्रिटीजना घेऊन स्टेजवर होणाऱ्या कार्यक्रमांना युवकांचा अर्थातच तुफान प्रतिसाद मिळतो . रा . स्व . संघाशी वैचारिक बांधिलकी मानणारी अखिल भारतीय विद्याथीर् परिषद ही एकेकाळची राज्यातली सर्वात मोठी विद्याथीर् संघटना . या संघटनेचे प्रा . नरेंद पाठक यांच्या मते विद्यार्थ्यांच्या प्रायॉरिटीज बदलल्यात हे सत्य आहेच . ज्यांचा प्रश्न हातात घेऊन आंदोलनं करावीत त्यांचाच प्रतिसाद थंडा , असा अनुभव मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आल्याचं ते सांगतात . १९९२मध्ये अभाविपने काढलेल्या ऐतिहासिक सव्वा लाखाच्या मोर्च्याच्या आता केवळ आठवणीच उरल्यात . रस्त्यावर उतरून प्रश्ान् सोडवण्याचे मार्ग विद्यार्थ्यांना कालबाह्य वाटू लागलेत , असं त्यांचं निरीक्षण . शहरी भागात असं चित्र असलं तरी ' नाशिक छात्र वणवा ' या आंदोलनाच्या माध्यमातून गेल्या वषीर् नाशिकला दोन हजार विद्याथीर् एकत्र आले होते . आता कोल्हापूर अधिवेशनाला अडीच हजारांची उपस्थिती अपेक्षीत आहे . १८५७च्या उठावाला यावषीर् दीडशे वर्षं पूर्ण होताहेत . म्हणून त्यांनी एक फॅशन शो आयोजित केलाय . ' क्रांती परिधान महोत्सव ' असं त्याचं नाव असेल . डीजेच्या तालावर राष्ट्रभक्तीपर गीतंही सादर होतील . विद्यार्थ्यांच्या ' भाषे ' त बोलण्याची धडपड अभाविपसारख्या परंपरा जपणाऱ्या संघटनांनाही करावी लागते , हे पुरेसं बोलकं आहे . स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ही मार्क्सवादी विचारांची बांधिलकी मानणारी संघटना . एकेकाळी शिक्षणाच्या खासगीकरणाविरोधात आंदोलनं गाजवलेली . ' आज आम्ही मार्क्सचं नाव घेऊन विद्यार्थ्यांकडे जात नाही ', एसएफआयचा अलोक देशपांडे सांगतो . ' खरंतर त्याची गरजही नाही . वैचारिक नाळ कोणाशी आहे यापेक्षा आम्ही काय मुद्दे घेऊन लढतो हे महत्वाचं आहे . भगतसिंग मात्र विद्यार्थ्यांना जवळचा वाटतो . एखादी विचारप्रणाली पटणं ही वेगळी गोष्ट आहे . त्यामुळे वैचारिक प्रबोधन हा नंतरचा भाग ', डाव्यांची भाषाही आता अशी बदलतेय . ' हजार पाचशे रुपये फीवाढ हा शहरी मुलांना फारसा मोठा प्रश्ान् वाटत नसला तरी ग्रामीण विद्यार्थ्यांचा विचारही त्यांना शिवू नये हे दुदैर्वी आहे . खरंतर विद्यार्थ्यांमध्ये कधी नव्हे एवढा अवेअरनेस आहे . त्यांना प्रश्नांची माहिती आहे . पण त्याची परिणती कृतीमध्ये होताना दिसत नाही ', हे नमूद करायला तो विसरत नाही . डी . एड . आणि नसिर्ंगच्या विद्यार्थ्यांची आंदोलनं ही एसएफआयची अलीकडच्या काळातली मोठी आंदोलनं . युक्रांदचंही पुनरुज्जीवन झालंय . पूर्णवेळ काम करणारी तरुण मुलं त्यांना मिळतात हे चित्रही दिसतं . दारूबंदी आंदोलन ते हाती घेताहेत .महाराष्ट्र डी कास्ट होण्याची हाक देत पुन्हा एकदा सत्याग्रहाची भाषा तरुणांना किती भावते हे काळच ठरवेल.
राष्ट्रीयपातळीवर विचार करता आरक्षणविरोधात झालेलं आंदोलन हे अलीकडचं सर्वात मोठं विद्याथीर् आंदोलन . ' आमच्या पूर्वजांनी ' त्यांच्या ' पूर्वजांवर अन्याय केले यात आमचा काय दोष ?' असं म्हणत आंदोलन करणाऱ्या तरूणांची समाजाच्या तळागाळातल्या समाजाविषयीची मतं स्पष्ट होतात . आथिर्क निकषांवरच आरक्षण असायला हवं , असाच सूर सर्वत्र येतो.
यासर्व प्रतिनिधींनी कॉलेजमध्ये पुन्हा निवडणुका सुरू करण्याचा धरलेला आग्रह मात्र या सर्वांच्या बोलण्यात होता . लोकप्रतिनिधी निवडण्याचं अठरा वर्षं हे वय कायदा मानत असेल तर कॉलेजच्या निवडणुकीत तरूणांनी का मतदान करू नये हा , सगळयांचा प्रश्ान् . निवडणुका नसल्यामुळे विद्याथीर् संघटनांची कॉलेज कँपसमधली सद्दी संपली , शिवाय राजकीय पक्षांसाठी कार्यकतेर् तयार करणारे कारखाने थंडावले , हाही मुद्दा आहेच.
राजकीय पक्षांकडूनही तरूणांची भरती व्हावी , यासाठी मधूनमधून मोहिमा आखल्या जात असल्या तरी सक्रीय राजकारणात येण्याची क्रेझ कमी झालीये . राजकारणात निवृत्तीचं वय नसल्यामुळे अनेक वयोवृद्ध नेते वर्षानुवर्षं खुर्च्या उबवताना दिसतात . नव्यांना संधी मिळण्याची शक्यताच नसल्याने वयाच्या पंचेचाळिशीपर्यंत अनेक जण तरूणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आघाड्या सांभाळताना दिसतात . या संसदेत अनेक तरुण चेहरे दिसतात , असा युक्तिवाद कोणी करेल . पण ज्योतिरादित्य शिंदे , सुप्रिया सुळे , संदीप दीक्षित , सचीन पायलट , दयानिधी मारन , मिलिंद देवरा ... ही नावं वाचली तरी त्यांची पार्श्वभूमी लक्षात येते . पैशांचं पाठबळ नसणाऱ्या सामान्य कुटंुबातल्या तरूणांना तिकिटं दिलीच जात नाहीत . निवडून येणं ही दूरची गोष्ट . ' पॉलिटिक्स इज अ डटीर् गेम ' हे तरूण पिढीवर एवढं बिंबलंय की करिअर म्हणून याचा विचार करणं ही त्यांना अशक्यकोटीतली गोष्ट वाटते .
सोविएत रशिया कोसळल्यावर जगभर मुक्त बाजारपेठेतला खुला व्यापार सुरू झाला . भारतातही सार्वजनिक क्षेत्रांत सरकारने माघार घेत खासगीकरणाला सुरूवात केली . चळवळीमधले कार्यकतेर् गोंधळले . चळवळी थंडावल्या . त्याच दरम्यान एनजीओजनी डोकं वर काढलं . चळवळीतल्या अनेकांनी एनजीओमध्ये आश्रय घेतला . आजचे तरुण एनजीओकडे एक करिअर म्हणून बघतात . एमएसडब्ल्यू करणं ही त्याची पहिली पायरी . गंमतीची गोष्ट म्हणजे विद्याथीर् प्रतिनिधींशी बोलताना चक्क कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांमध्येही हे एनजीओजचं पीक आलं असल्याचं कळलं . विद्यार्थ्यांनी कुठल्यातरी एनजीओमध्ये सहभागी होणं वेगळं , पण आता कॉलेजमध्ये जाणारे तरूणच चक्क स्वत : च्या एनजीओज सुरू करताहेत अशी माहिती रुपारेल कॉलेजचा जीएस सुजय हांडेने दिली . कॉलेजमध्ये विद्याथीर् संघटनांपेक्षा एनजीओमध्ये असणं जास्त क्रेडिटेबल असतं , असं तो म्हणाला . तिथं कामाला शिस्त असते , सिस्टिीम असते . कालबद्ध कार्यक्रम असतो . साहजिकच तरूणांना या गोष्टींचं आकर्षण वाटतं . मात्र इथूनही निराश होऊन बाहेर पडणारे आहेतच . हर्षदा परब ही अशाच एका एनजीओमधून बाहेर पडलेली तरूणी . ' विमानप्रवास , फाइव्हस्टार हॉटेल्स , दारू यासाठी संस्थेचा पैसा वापरणारे अनेकजण एनजीओजमध्ये दिसत असले तरी ते तिथल्या ' उच्चवगीर्यांसाठी ' च असतं . उमेदवारी करणाऱ्यांना मात्र तुटपुंजा पगार मिळतो . निर्णयप्रक्रियेत त्यांचा कुठेही सहभाग नसतो . इथंही वर्षानुवषेर् जागा अडवून बसलेली माणसं आहेतच ', असं तिचं निरीक्षण . ना धड समाजसेवेचं सुख ना धड पैसा अशा मनस्थितीत अनेकजण बाहेर पडून स्वत : चा नवा संसार थाटून फंडिंगसाठी जाळं टाकून बसतात . फंडिंग असेपर्यंत कामाला जोर . नंतर ही समाजसेवेची कळकळ संपून जाते . अर्थात यातही तळमळीने काम करणाऱ्या एनजीओज आहेत . प्रश्नांना भिडून उत्तरं शोधण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्नही आहे . मात्र एकूण चित्र कापोर्रेट !
मनस्विनी बोलताना म्हणाली , ' चळवळी आम्हा तरुणांच्या भाषेत बोलत नाहीत , हे खरं आहे . अजूनही सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला मार्क्स , लेनिन , गांधीजी , जयप्रकाश , गोळवलकर गुरुजी यांच्याकडेच जायचं का ? बदलत्या परिस्थितीचे संदर्भ घेऊन आजच्या काळात काय उपयोगी पडणार आहे याचा विचार नको ? आजचे प्रश्न शेती , आरोग्य , उर्जा , दळणवळणाची साधनं , पर्यावरण यांच्याशी जोडले आहेत . त्याविषयावर बोलायचं , काम करायचं तर सखोल अभ्यास हवा आणि यासाठी कुणाची फारशी तयारी नाही . त्यामुळे संख्येने कमी असले तरी या क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या अभय आणि राणी बंग यांच्यासारख्यांच्या कामाबद्दल त्यांना आदर असतो.
सामाजिकप्रश्नांविषयी कळवळा नसलेले तरूण पर्यावरणाबद्दल मात्र सजग आहेत . कदाचित ग्लोबल प्रश्ानंशी रिलेट होणं त्यांना सोपं जात असावं . शाळा कॉलेजातलं शिक्षण , वाचन , इंटरनेट यामुळे असेल कदाचित पण ही जाणीव व्यापकपणे आढळते . प्लॅस्टिकचा वापर , जंगलतोड , जैविकसंपदा याबद्दल तरुणपिढीला अगदी अद्ययावत माहिती असते , असं गिरीभ्रमणासंदर्भातले अनेक उपक्रम राबवणारे क्षितीज या संस्थेचे सुहास जोशी सांगतात . पर्यावरणाचे प्रश्न घेऊन काम करणारेही अनेकजण दिसतात . काहीही साधनसुविधा नसताना , प्रसंगी स्वत : ची पदरमोड करून काम करण्याची त्यांची तयारी असते . कोणत्याही फंडिंगशिवाय गेली दहा वर्षं ' सह्यादी निसर्गमित्र ' सारखी संस्था कोकणातली ऑलिव्ह रिडले कासवं आणि समुदी गरुड वाचवण्याचं काम पदरखर्चाने करतेय . कोल्हापूरची ' निसर्ग ' ही संस्था तरुणांमध्ये निसर्गाविषयी जाणीवजागृतीचं काम करते . त्यांच्यातफेर् दरवषीर् वेगवेगळ्या जंगलात आयोजित केल्या जाणाऱ्या कँप्समध्ये इंजिनिअरिंग मेडिकलच्या मुलांची संख्या मोठी असते . याच कँपमधून त्यांना स्वयंसेवकही मिळतात . ट्रेकिंग , हायकिंग यासाठी जाणारे ग्रुपही हा अवेअरनेस तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात . मुंबई ठाण्यातले अनेक ग्रुप्स याबद्दल सजगतेनं काम करताहेत . मात्र यातही संस्थात्मक सहभाग कमी होत असल्याचं निरीक्षण चक्रम हायकर्सचे रवि परांजपे यांनी नोंदवलं . मुलांना कुणाचा अंकुश , शिस्त नको असते . त्यामुळे मित्रांनी मिळून बाहेर पडण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढलंय . यातही ' मजा ' करायला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते.
स्पधेर्चा ताण अगदी लहानपणापासूनच मुलांच्या मानगुटीवर असतो . त्यातून मुक्तता शोधण्याचे पर्याय सुरू होतात . चोरून सिगारेट ओढता ओढता ड्रग्जचा अंमल कधी सुरू होतो कळतही नाही . पुढची पायरी असते रेव्ह पाटर््या . गेल्या वषीर् पुण्याजवळ सिंहगडाच्या पायथ्याशी झालेल्या अशा पाटीर्त पकडेलेल्या शंभर जणांमधले बहुतेक उच्च मध्यमवगीर्य तरुण होते . यात मुलीही होत्या ! व्यसनांची कारणं केवळ नैराश्य आणि तणाव एवढीच नसतात . ऐशखोरी करण्यासाठी हे उद्योग करणारेही कमी नाहीत . एका मोठ्या दिवंगत नेत्याचा मुलगा अशा प्रकरणात बचावल्याचं उदाहरण ताजं आहे . हे प्रकरण फक्त नवश्रीमंतांपुरतं नाही . ऐश करण्याचं ते सर्व स्तरांमधलं समाजमान्य साधन झालंय . रात्री उशीरा बिअरच्या वासाने घमघमत घरी आलेल्या तरूण मुलाला ' कशी झाली पाटीर् ?' असं कौतुकाने विचारणारे पालक आहेत . शहरांतच नव्हे तर अगदी तालुक्याच्या गावांमध्येही बार्स आणि दारूची दुकानं मेडिकल स्टोर्सएवढ्या संख्येनं दिसतात . जमीनी विकून आलेले पैसे उडवत अनेक गुंठेबहाद्दर तरुण चौकांचौकांत झिंगू लागलेत , रात्री बारमधल्या पोरींवर नोटा उधळून सकाळी रिकाम्या खिशांनी घरी परतू लागलेत ! याचं काळजी करायला लावणारं दुसरं टोक म्हणजे बुवा , बाबा आणि मंदिरांसमोरच्या तरूणांच्या रांगा . चतुथीर् , पौणिर्मा , शनिवार हे हमखास गदीर् खेचणारे दिवस . धामिर्कतेपेक्षा यात अंधश्रद्धाच जास्त दिसते . दर्शनाच्या रांगेत काम सोडून तासन्तास उभं राहण्याची या आयटी पिढीची मानसिकता समजण्यापलीकडची आहे . एकीकडे सामाजिक उपक्रमांत तरूण दिसत नाहीत , अशी तक्रार अनेक संस्था संघटना करत असताना अनेक बुवा आणि बाबांच्या तथकथित सोशल अॅक्टिव्हिटीजला तरुणांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय . ' अध्यात्माच्या दुकानांवरची ही गदीर् काळजी करायला लावणारी आहे ', युक्रांदचे प्रणेते कुमार सप्तषीर्र् सांगतात . त्यांनी या मानसिकतेचं खूप चांगलं विश्लेषण केलं . त्यांच्यामते तरूणांमध्ये दोन प्रकारच्या प्रवृत्ती दिसतात . एक असते , इन्स्ट्रक्टिव , आदेशात्मक ! यांना फारसं लॉजिक न वापरता आदेश ऐकायला , पाळायला आवडतं . म्हणून ' अमक्याला हाकलून द्या . तमुक बंद करा ', अशा आदेशाच्या भाषेत बोलणारे बाळासाहेब ठाकरे आजही तरूणांच्या गळ्यातले ताईत आहेत . दुसरी प्रवृत्ती सजेस्टिव , सूचना ऐकणारी . माझं घर , माझा संसार , माझं लग्न , माझी मुलं असे प्रश्ान् घेऊन उत्तरं शोधायला लोक बुवा आणि बाबांकडे जातात तेव्हा त्यांच्या सूचनात्मक गोष्टी कोणताही विचार न करता पाळणारा हा वर्ग असतो.
' यातून काही चांगल्या गोष्टीही घडताना दिसतात . मुंबईतल्या एका लोकप्रिय बाबांचे तरूण शिष्य गणपती विसर्जनानंतर चौपाट्या स्वच्छ करताना दिसतात . बाबांनी सांगितलं म्हणून हुंडा न घेणारे , साधेपणाने लग्न करणारेही अनेकजण आहेत . मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या तरूणांकडून ' हा मेल २१ जणांना फॉरवर्ड करा नाही तर सर्वनाश ठरलेला ', असे मेल येतात तेव्हा यांच्यात तर्कनिष्ठता , योग्यायोग्यता , सारासार विचार करण्याची प्रवृत्ती आहे का याचीच शंका येते .
युवकांच्या सामाजिक जाणीवा एवढ्या बोथट होण्यामागे माध्यमंही तेवढीच जबाबदार आहेत , ही सार्वत्रिक तक्रारही आढळली . लोकांना जे आवडतं तेच आम्ही छापतो किंवा दाखवतो , असं म्हणणारी माध्यमं सेक्स व्हायोलन्स आणि पैशांभोवती फिरणाऱ्या घटनांनाच प्राधान्य देतात . वाचन , चर्चा , इतरांच्या सुखदु : खाची विचारपूस करायच्या वेळात लोक मालिकांमधल्या पात्रांच्या भावनाविश्वाशी एकरूप झालेले असतात . वर्तमानपत्रांच्या प्रादेशिक आवृत्त्या अत्यंत स्थानिक झाल्यात . जिल्ह्याचं शहर असलेल्या पुरवणीत वेगळ्या आणि त्याच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या आवृत्तीत जाणाऱ्या बातम्या वेगळ्या असतील तर आपल्या शेजारी काय जळतं आहे हे कसं कळावं ? बातम्या मनोरंजनाच्या पातळीवर आणल्यामुळे त्यातलं गांभीर्य हरवलंय . काही विधायक छापलं किंवा दाखवलंच जात नसले तर ते तरूणांपर्यंत कसं पोहचावं ?
आजचे तरुण मग सामुहिकरित्या काही करतच नाहीत असं मात्र नाही . पुण्या - मुंबईतल्या कॉलेजेसमध्ये सध्या इव्हेंटस आणि फेस्टिवल्सची धमाल आहे . पूवीर् कॉलेजमध्ये होणाऱ्या गॅदरिंगचं हे आधुनिक रूप . वेगवेगळ्या नावांखाली कॉलेजचं बॅनर वापरून हे फेस्टिवल्स होत असले तरी कॉलेजची भूमिका कँपस उपलब्ध करून देण्यापुरताच असते . बाकी स्पॉन्सरर शोधण्यापासून , स्टेज , पेंडॉल , पाहुणे , जजेस , रजिस्ट्रेशन या सगळ्या गोष्टी विद्याथीर् करतात . एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला लाजवेल अशा पद्धतीने या गोष्टी होतात . रुपारेलच्या सुजय हांडेवर त्यांच्या कॉलेजच्या ' क्षितीज ' फेस्टिवलची जबाबदारी आहे . ' फेस्टिवल्सचं बजेट एक लाखांपासून ऐंशी लाखांपर्यंत असू शकतं . मूड इंडिगो सारख्या फेस्टिवलचं बजेट तर कोटीच्या घरात असल्याचं सांगितलं जातं . एवढे प्रचंड पैसे अगदी जबाबदारीने हाताळले जातात . दरवषीर् इनचार्ज बदलत असल्याने आपल्यावेळी उत्तम कार्यक्रम व्हायला हवा , या जिद्दीने कार्यक्रम होतात . महिनाभर कॉलेजमधली किमान शंभरजणांची टीम फेस्टिवलसाठी राबते . बाहेरच्या कॉलेजेसमधून साधारण पाच - सात हजारांचा क्राऊड फेस्टिवलच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो , असं सुजय म्हणाला.
हेंसमग्र चित्र शहरी मध्यमवगीर्य तरूणांच्या विश्वात डोकावताना दिसलेलं आहे . ग्रामीण तरुण या सगळ्यापासून अनेक मैल दूर आहे . तालुक्याच्या गावी पदवी कॉलेजात शिकणाऱ्यांचे आथिर्क आणि सामाजिक प्रश्ान् निराळे आहेत . कमी उत्पन्न गटातल्या शेतकरी , शेतमजूर आणि दलित मुलांचा शहरी तरुणांच्या या विश्वाशी काडीचाही संबंध नाही . व्यावसायिक शिक्षण नसल्याने पदवीनंतर पुढे भेडसावणारा बेकारीचा प्रश्न आहे . शहरात संगणक जुना झाला पण ग्रामीण भागातला मुलगा अजूनही लोडशेडिंगच्या हिशेबात अभ्यासाचा मेळ घालतोय . सरकारी नोकऱ्या हेच अजूनही अंतिम ध्येय मानणाऱ्या या मुलांना खासगी क्षेत्रातली आव्हानं पेलता यावीत यासाठी ना सरकारी पातळीवर काही प्रयत्न होताहेत ना कॉलेजेसमध्ये काही शिकवलं जातंय . तिथं वीस वर्षांपूवीर्ंची स्थिती कायम आहे .
हे सगळं असं असलं तरी सगळाच अंधार नक्की नाही . समाजासाठी काही करण्याची आस असणारे गट काही करताना दिसत नसले तरी वैयक्तिक पातळीवर ही बांधिलकी मानतात . मराठी भाषा मरते आहे , अशी ओरड सर्वदूर होत असताना मराठी कविता , प्रवास वर्णनं , लेख , कथा , चुटके यांचे दजेर्दार ब्लॉग कल्पकतेने चालवणारे तरूणच आहेत . शेकडो वर्षांची परंपरा असलेले किल्ले , मंदिरं ढासळत असताना सरकारी मदतीची वाट न पाहता त्यांच्या जपणुकीसाठी पदरमोड करुन धावणारेही तरूणच आहेत . मुंबईतल्या बाँबस्फोट आणि जलप्रलयांत लोकांच्या मदतीसाठी कुणा राजकारण्याची किंवा सरकारी रसदीची वाट न पाहता जीव धोक्यात घालून धावणारे तरुणच होते . धामिर्क आणि जातीयतेची भाषा बोलणाऱ्या राजकीय पक्षांना त्यांचं व्याकरण मुळातून बदलायला लावणारेही तरूणच आहेत . आयटीचं शिक्षण घेऊन अमेरिकेची वाट पाहणारे हजारो असले तरी सिलिकॉन व्हॅलीतली हजारो डॉलर्सच्या नोकऱ्यांवर पाणी सोडून मातीच्या ओढीने परतणारे तरूणही आहेतच ....
जागतिकीकरणानंतर बदल होताहेत . त्यांच्या बऱ्या - वाईट परिणामांचं टागेर्ट तरुण पिढी असणार हेही साहजिक आहे . पण हा वेग जबरदस्त आहे . त्या वेगाने योग्य दिशा पकडून धावण्याचं आव्हान आहे . ते पेलता यायला हवं ...

राज्यातून भय्यांची 'साफसफाई' करणार - राज ठाकरे

महाराष्ट्राचा विकास करायचा आणि तो सारा उत्तर प्रदेशी व बिहारी लोकांच्या घशात घालायचा, हे मला मान्यच नाही. त्यामुळे आधी साफसफाई झाली पाहिजे. त्यानंतर 'नवनिर्माण'!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ग्वाही ........

आपला पक्ष मराठी तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी काय करीत आहे?

अहो, आधी विविध सरकारी कंपन्या, तसेच बँकांमध्ये भरलेला उत्तर भारतीय व बिहारींचा 'लॉट' तरी बाहेर कादूया. अनेक ठिकाणच्या नोकऱ्या त्यांनी काबीज केल्या आहेत. त्यांचे पितळ उघडे पाडण्याचे काम चालू आहे. त्यांनी छिनलेल्या नोकऱ्या परत मिळविण्याचाच हा एक भाग आहे. विषारी सापाला मारण्यासाठी केवळ बिळाबाहेर काठी आपटून जमत नाही. त्याला बिळाबाहेर काढूनच मारावे लागते.

मराठी टक्का कमी होत आहे, त्याचवेळी अनेक क्षेत्रांत मराठी व्यक्ती चमकताहेत. असा विरोधाभास का?

हा संख्या आणि गुणांचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात अनेक गुणवान व्यक्ती असून त्यांच्यावरच महाराष्ट्र ताठपणे उभा आहे.

शिवउद्योग तुम्ही सुरू केला होतात ,त्याचे पुढे काय झाले?

चांगलेच काम सुरू आहे. मात्र अनेकांना शिवउद्योगातून चालणाऱ्या कामापेक्षा मायकल जॅक्सनचे काय झाले याचीच काळजी वाटतेय. शिवउद्योगाचे काय झाले याची काळजी ज्यांना वाटतेय, त्यांनी शिवउद्योगाच्या कार्यालयात जाऊन चौकशी करावी.

इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतल्यास प्रगती झपाट्याने होते काय?

इंग्रजीला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. ही जगभरात बोलणारी भाषा असल्याने ती आलीच पाहिजे. मात्र, म्हणून आपली मातृभाषा कशाला सोडायला हवी? फ्रान्समधली 'एअरबस' ही कंपनी विमाने बनविते तेव्हा त्यासंदर्भातील सर्व सूचना फेंच भाषेतच असतात. इतर देश त्यांच्या सोयीनुसार त्या इंग्रजी भाषेत करून घेतात. तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर इंग्रजी बोलले जाते, म्हणून तेथील लोक तमीळ भाषा बोलण्याचे सोडून देत नाहीत.

मराठी माणूस नोकरीच्या मागे लागतो, व्यवसाय-धंद्यात पडत नाही, असे सातत्याने बोलले जाते...

हा ज्याच्या-त्याच्यातील गुणांचा प्रश्ान् आहे. महाराष्ट्राच्या मातीतच सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, जयंत नारळीकर, दादासाहेब फाळके यांच्यासारखी रत्ने जन्माला आली आणि त्यांच्यामुळे महाराष्ट्राचा नावलौकिक वाढला आहे. कितीतरी नामवंत वकील, डॉक्टर, चित्रपट कलाकार तसेच आंतराष्ट्रीय चित्रकारांची मोठी जंत्रीच आहे. मराठी साहित्य आणि कवितांना नोबेलच्या दर्जाचे पुरस्कार लाभले आहेत. मात्र, केवळ मराठीमुळे जगाचे याकडे लक्ष गेलेले नाही. महाराष्ट्राला थोर साहित्यिक तसेच संतांचाही वारसा लाभलेला आहे. हे केवळ महाराष्ट्रातच आहे, इतर प्रांतांत नाही. एखादा नामवंत साहित्यिक वा कवी मारवाडी-गुजराती समाजात दिसत नाही. मात्र, त्याचवेळी ही मंडळी व्यवसायात अग्रेसर आहेत.

उत्तर भारतीय मुद्दा वगळता तुम्ही तुमच्या कार्यर्कत्यांना आणखी कोणती प्रगतीची दिशा दाखविणार आहात?

अहो, उत्तर भारतीयांची साफसफाई झाल्याशिवाय महाराष्ट्राचे नवनिर्माण कसे होणार? केवळ विकास करून तो या उत्तर प्रदेश आणि बिहारींच्या घशात घालायला मी अजिबात तयार नाही. आधी त्यांची साफसफाई करणार आणि मग विकासाला हात घालणार

भूमिपुत्रांना उद्योगांत ८० टक्के नोकऱ्या देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी काय करणार?

उद्योगधंद्यामध्ये ८० टक्के नोकऱ्या मिळायला हव्यात, यासाठी आपण कंपन्यांमध्ये पत्रे पाठविली आहेत. शिवाय तिथे नेमक्या किती जागा भूमिपुत्रांनी भरल्या आहेत आणि किती जागा परप्रांतीयांनी भरल्या आहेत, त्याची आकडेवारी मागवून घेतली आहे. ज्या नव्या नोकऱ्या निर्माण होतील, त्या भूमिपुत्रांनाच कशा मिळतील त्यासाठी व्यूहरचना सुरू आहे.

कार्यर्कत्यांनी पाया पडण्याचा प्रघात आपण बंद केला होतात. मात्र तो अधूनमधून दिसतो..

मला आजही माझ्या कार्यर्कत्यांनी पाया पडलेले आवडत नाही आणि ते मी करूनही घेत नाही. ही एक प्रकारची लाचारी आहे. ती का करू द्यायची आणि करून घ्यायची?

पुढचे पाऊल काय आहे?

सगळ्या गोष्टी एकदम पोतडीतून बाहेर काढायच्या नसतात. त्या हळूहळू बाहेर पडायला हव्यात. त्यामुळे पुढे काय करतोय ते बघत राहा!

कष्टकरी-शेतक-यांसाठी झटणार - उद्धव ठाकरे

परप्रांतीय इथे येतात, रोजगार मिळवितात, तर मग माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी शेतकऱ्याने मुंबईत का येऊ नये? कर्जबाजारी होऊन मरणाकडे वळण्यापेक्षा त्याने जीवनाकडे वळून मुंबईत बस्तान बसवावे, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे...
सांगत आहेत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे .......

मराठी तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी शिवसेना काय करीत आहे?

प्रश्ानंना उत्तरे द्यायला सुरूवात करण्यापूवीर् 'मटा'ला वर्धापनदिनाच्या मनापासून शुभेच्छा! मराठी तरुणांसाठी शिवसेनेने काय केले हे मला विचारण्यापेक्षा, शिवसेना-प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेमुळे जे असंख्य मराठी संसार उभे राहिले, त्यांना विचारा. शिवसेनेने त्यांना काय दिले आहे, हे तेच योग्यपणे सांगू शकतील.

मराठी तरुणांना संधी नाकारली जाते असे का होते?

विविध क्षेत्रांत मराठी तरुणांना संधी मिळवून देण्याचे काम शिवसेना करीत आहे. पण त्याचवेळी मराठी माणसाने स्वत:ची ताकद ओळखायला हावी. मराठीबद्दल चिंता करण्याची गरज नाही. मी सार्मथ्यवान आहे, आपल्यात हिंमत असेल तर तुमची संधी कुणीही हिरावून घेणार नाही. जिथे रोजगाराच्या संधी आहेत, तिथे मराठी तरुणांनी ठामपणानं पाय रोवले पाहिजेत.

' शिववडा' सुरू करून मराठी तरुणांना मोठ्या उद्योगांपासून वंचित ठेवणार आहात का?

वडापाव चांगल्या दर्जाचा दिला तर त्याच्यात जगप्रसिद्ध होण्याची क्षमता आहे. लंडन, न्यूयॉर्कमध्येही मग तो विकला जाईल. या वडापावाला अस्सल मराठी झटका असेल. मॅक्डोनाल्डचा बर्गर काय आहे? जर बर्गर जगभर विकला जात असेल, तर वडापावमध्येही जग व्यापण्याची क्षमता आहे. त्यामुळे शिवसेनेने वडापावाच्या धंद्याला उद्योगाचा दर्जा देण्याचे ठरविले आहे. या व्यवसायावर अनेकांचे संसार उभे राहत असतील तर या धंद्यात गैर काय? या माध्यमातून मी मराठी तरुणांना एका छत्राखाली आणण्याचे काम करीत आहे. त्यानंतर पुढे काय करायचे ते ठरवू.

इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतल्यास प्रगती झपाट्याने होते काय?

चांगल्या नोकऱ्यांसाठी इंग्रजी भाषेतून शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढत आहे. इंग्रजी आवश्यक आहेच. त्या भाषेचे महत्त्व कुणाला नाकारता येणार नाही. पण मातृभाषेकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. मराठी ही समृद्ध भाषा आहे. या भाषेला संतांची परंपरा आहे. आज सर्वत्र बॉलीवुडचा बोलबाला आहे. पण या बॉलीवुडचे जनक दादासाहेब फाळके मराठीच होते. मराठी माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठी आलीच पाहिजे. पण त्याचबरोबर जगात इतरत्र पाय रोवायचे असतील तर इंग्रजीही आली पाहिजे.

मराठी अस्मितेबद्दल सध्या अनेक पक्ष बोलू लागलेत. हे पक्ष शिवसेनेच्या परंपरागत मराठी व्होटबँकेवर डल्ला मारतील असे वाटते काय?

आता कुणीही मराठी अस्मितेबद्दल गळा काढत असले तरी 'असली व नकली' यातला फरक मराठी माणसाला समजतो. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी मराठी माणसाची बांधिलकी आहे. गेली ४३ वर्षं शिवसेना मराठी माणसासाठी लढा देत आहे. याचा विसर मराठी माणसाला पडणार नाही.

मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत आहे. हे रोखण्यासाठी कोणती ठोस पावलं उचलत आहात?

शिवसेनेने मराठी माणसांसाठी लढा उभारला, तो मुंबईत मराठी माणसाने भक्कमपणे आपले पाय रोवावेत यासाठीच. त्याने विविध क्षेत्रे पादाक्रांत करावीत, हीच शिवसेनेची मूळ भूमिका आहे. प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला तो मराठी आणि महाराष्ट्राची शान वाढविण्यासाठीच. मराठी माणसाचा येथील रोजगार व व्यवसायावर खरा अधिकार आहे. परप्रांतीय 'मुंबई' या महाराष्ट्राच्या राजधानीत येतात, येथे रोजगार मिळवितात, तर माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि मराठी असलेल्या शेतकऱ्याने येथे का येऊ नये? कर्जबाजारी होऊन मरणाकडे वळण्यापेक्षा त्याने जीवनाकडे वळून मुंबईत बस्तान बसवावे, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे.

गिरणी कामगार हा मुंबईतला मोठा मराठी वर्ग. या वर्गासाठी शिवसेनेने आजवर कोणते काम केले?

खरेतर गिरणी कामगारांचा लढा उभा केला तो शिवसेनेनेच. गिरणी कामगारांसाठी शिवसेनाप्रमुखांनीच पहिला जोरदार आवाज उठवला. त्यावेळी या व्यासपीठावर त्यांच्याबरोबर जॉर्ज फर्नांडिस व शरद पवार होते. ते पुढे कुठे गेले हे त्यांचे त्यांनाच माहीत. गिरण्यांचा व कामगारांचा प्रश्न उग्र झाला तेव्हा राज्यकतेर् काँग्रेसवाले डोळ्यांवर कातडे ओढून बसले होते. आता मात्र काही बोलघेवडे सेनेने काय केले, असे विचारत आहेत. पण शिवसेना जेव्हा गिरणी कामगारांसाठी लढत होती, तेव्हा यांचा राजकीय जन्म तरी झाला होता का?

लोकप्रतिनिधी निवडताना शिवसेनेने मराठी माणसांना प्राधान्य दिले का?

अर्थातच! तुम्ही काढून पाहा. पत्रकार असोत, अर्थतज्ज्ञ असोत, शेतकऱ्यांचे नेते असोत. विधानसभा, परिषद, राज्यसभा, लोकसभा अशा सर्व सभागृहांमध्ये शिवसेनेने आवर्जून अभ्यासू, तज्ज्ञ अशा मराठीच माणसांना संधी दिली. तुम्हाला आठवत असेल तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या १३ दिवसांच्या सरकारात सुरेश प्रभू यांच्यासारखा मराठी अर्थतज्ज्ञ कॅबिनेट मंत्री झाला होता. याउलट राज्यसभेवर एकमताने उमेदवार निवडण्याची वेळ आली तेव्हा मात्र पी. सी. अलेक्झांडर, राहुल बजाज यांच्यासारखी नावे पुढे करण्यात आली.

सर्वसामान्य मुंबईकराला परवडतील अशी छोटी घरे विकासकांनी उभारावीत, यासाठीचा कायदा करण्यासाठी शिवसेना भूमिका घेणार का?

मराठी माणसांनी मुंबईतील स्वत:ची जागा विकू नये अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. त्याने कोणत्याही परिस्थितीत मुंबई सोडू नए. उलटपक्षी मुंबईत आणखी जागा घ्यावी. चाळींच्या पुनविर्कासात मराठी माणसांची फसवणूक होत असेल, तर त्यांच्याविरोधात आवाज उठविण्यासाठी शिवसेना मराठी माणसांच्या पाठीशी ठाम उभी राहील. पुनविर्कासाबाबत जोपर्यंत मराठी माणसाचे समाधान होत नाही, तोवर शिवसेना कोणत्याही बिल्डरला एकही वीट रचू देणार नाही.

भूमिपुत्रांना उद्योगांमध्ये ८० टक्के नोकऱ्या देणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु या कायद्याची अंमलबजावणी होत नाही?

भूमिपुत्रांना उद्योगंामध्ये ८० टक्के नोकऱ्या मिळाव्यात हा कायदा कोणामुळे झाला? सर्वप्रथम मागणी कोणी केली? त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष कोणी केला? आज बँका, पंचतारांकित हॉटेल, हवाई वाहतूक कंपन्या, रेल्वे यामध्ये मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या त्याचे सर्व श्रेय अर्थातच शिवसेनेला आहे. विविध उद्योगांमध्येही आज शिवसेनेमुळेच 'जय महाराष्ट्र' घुमतो आहे. गर्जतो महाराष्ट्र हा उपक्रम तरुणांना सुवर्णसंधी मिळवून देण्यासाठीच हाती घेतलेला आहे. हा उपक्रम ग्रामीण भागातील तरुणांसाठीही राबविला जाणार आहे.

मुंबईपेक्षा आपण शेतकऱ्यांच्या प्रश्ानंवर अधिक गांभीर्याने लक्ष देत आहात?

मुंबईच्या प्रत्येक प्रश्ानवर शिवसेना आवाज उठवतच आहे. मात्र, ग्रामीण भागाच्या तुलनेत मुंबईकर सुखी आहे. मुंबईत रात्री डोळे झाकूनही चालता येईल, अशी परिस्थिती आहे. खेड्यात दिवसा वीजच नसते, प्यायला पुरेसे पाणी नाही, रात्री-अपरात्री वीज आल्यावर शेताला पाणी द्यायला रात्रभर काम करावे लागते. अशात सर्पदंशाने अनेकांचा मृत्यू होतो. आपले पुढारी ग्रामीण जनतेला चुकूनही दर्शन देत नाहीत. त्यामुळे आता शिवसेना कष्टकऱ्यांना-शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सतत झटत राहील!

खरा ग्लोबल संत, नामदेव

महाराष्ट्राबाहेर पांडुरंगाची जितकी देवळं आहेत , त्याहीपेक्षा अधिक भक्तराज नामदेवांची आहेत। थेट पाकिस्तानातही नामदेवांचं मंदिर आहे. वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रापुरता असलेली भागवत धर्माची ध्वजा आसेतूहिमाचल पोहचवण्याचा मान नामदेवांना आहे. संतांच्या मांदियाळीत सर्वात महत्त्वाचे असूनही ते सर्वाधिक दुर्लक्षित राहिले. .............................................



साक्षात देवाने ज्याच्या हातून नैवेद्य खाल्ला... मुक्ताबाईंनी ज्याला कच्च मडकं ठरवून विसोबा खेचरांचा शिष्य बनवलं... कोरडी भाकरी खाणा-या कुत्र्यामागे जो तूप घेऊन धावला... या आणि अशाच आणखी दोनचार चमत्कृतिपूर्ण प्रसंगांसाठी संत नामदेव आपल्याला माहीत आहेत। पण योगिराज ज्ञानेश्वरांना भक्तिभाव आणि प्रेमाशी नाळ जोडून ‘ माऊली ’ बनवणारे नामदेव. ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान अधिक सोपं करून कीर्तनाच्या रंगी रंगत वारकरी संप्रदायाची बैठक मांडणारे नामदेव. विठ्ठलचरिताचे उद्गाते नामदेव. परिसा भागवतापासून चोखा मेळ्यापर्यंत समाजाच्या सर्व थरांना भागवत धर्माची दीक्षा देणारे नामदेव. महाराष्ट्रात वारकरी विचारांचा ख-या अर्थाने प्रसार करणारे नामदेव. भागवत धर्माची ध्वजा कन्याकुमारीपासून पंजाबापर्यंत नेणारे नामदेव. गुरू नानक आणि संत कबीरांनाही गुरूसमान असणारे नामदेव. उत्तर भारतातील संतमताचे आणि हिंदी भावकवितेचे अर्ध्वयू नामदेव. मराठी , हिंदी , गुजरातीसह पाचहून अधिक भाषांत अभंगरचना करणारे नामदेव. लाखो अमराठी लोकांनी ज्यांच्यावरून आपले आडनाव घेतले आहे , ते नामदेव.



हे नामदेव आपल्याला खरोखर किती माहित आहेत ? आणि माहित नाहीत तर का माहित नाहीत ?



नामदेवांचा जन्म १२७० चा। ऐशी वर्षांचं आयुष्य म्हणजे मृत्यू १३५० चा. पश्चिम महाराष्ट्राच्या पलीकडचा महाराष्ट्र माहित नसणा-या संशोधकांनी त्यांचे जन्मस्थळ कराडजवळच्या बहे नरसिंगपूर हेच मानले. पण आला परभणी जिल्ह्यातले नरसी बामणी हेच गाव जन्मस्थळ सिद्ध झाले आहे. घरातच अनेक पिढ्यांचा विठ्ठलभक्तीचा वारसा मिळाला. विठुरायामागे लहानगा नाम्या वेडा झाला. पण त्याच्या भक्तीने विठ्ठल पण भुलला. दोघांनाही एकमेकांपासून करमेना. विठुराया त्याच्याशी बोलायचा , रागवायचा , माया करायचा. एकदा त्याने नाम्याला सांगितलं , लग्न झालंय तर घरी पण लक्ष दे. त्यामुळे नामदेव रागावून निघाला. मग विठोबानेच त्याला थांबवलं. हाताला धरून खेचून आणलं. बाबापुता करून समजावलं. एवढी त्यांची भक्ती. हे सारं आणि असंच नामदेवाने आपल्या शतकोटी अभंगांमधे सुरस पद्धतीने सांगितलंय.

‘ विठ्ठलचरिताचा उद्गाता ’ या लेखात ज्येष्ठ समीक्षक म। वा. धोंड यांनी नामदेवांच्या रचनेविषयी मांडलेले विचार नवा दृष्टिकोन देणारे आहेत. ते म्हणतात , ‘ नामदेवांच्या काव्यशैलीतूनच विठ्ठलाची ‘ मिथ ’ निर्माण झाली. पुंडलिकाच्या भेटीसाठी विठ्ठलाचा अवतार झाला. पण त्यानंतर अठ्ठावीस युगे तो राउळात विटेवर तिष्ठत उभा राहिला होता. नामदेवांनी त्याला परत बोलताचालता केला. राउळातून भक्तांच्या घरी आणला , भक्तांच्या बरोबरीने कामाला लावला. त्याला ‘ भक्तासारिसा ’ केला.

’ नामदेव ज्ञानेश्वरांना वयाने सिनियर , पण अधिकारानेही। मुक्ताबाई आणि गोरोबा काकांनी नामदेवांचं मडकं कच्च असल्याची प्रसिद्ध कथा आहे. त्यात निवृत्तीनाथ , ज्ञानदेव आणि सोपानदेव हे तिघे भाऊ नामदेवांच्या पाया पडले होते. विसोबा खेचरांनी सर्वात्मक भगवंताची ओळख करून दिल्यावर नामदेवांची भावभक्तीला विचारांचे अधिष्ठान लाभले. ज्ञानदेवांचा योग , ज्ञान आणि नामदेवांची भक्ती यांचा समन्वय झाला. त्यात दोघांचाही अधिक परिपूर्णतेच्या दिशेने प्रवास झाला. दोघांनी राज्यभर संतांची मांदियाळी उभी केली. सर्वांनी एकत्र येऊन उत्तरेत तीर्थयात्रा केली. दोघांचा भक्तीविषयीचा दृष्टिकोन स्पष्ट करणारी एक कथा प्रसिद्ध आहे. राजस्थानच्या वाळवंटात पाणी नव्हतं. तेव्हा ज्ञानेश्वर लघिमा सिद्धीने एका विहिरीत उतरून पाणी प्याले. तर नामदेवांनी विठ्ठलाला साकडे घालून पाण्याचा ओहोळ निर्माण केला. योगिराज ज्ञानदेवांना ज्ञानेश्वर माऊली बनवण्याचं श्रेय अनेक अभ्यासक नामदेवांना देतात , ते उगाच नव्हे.

नामदेव ज्ञानेश्वरांसोबतच्या पहिल्या तीर्थयात्रेच्या वेळी विठ्ठलाचा वियोग सहन करू शकत नव्हते। पण ज्ञानेश्वरांच्या संगतीने त्यांची भक्ती अधिक व्यापक झाली. ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर नामदेवांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. ‘ ज्ञानदीप लावू जगी ’ ही उक्ती सार्थ केली. दुस-या तीर्थयात्रेत रामेश्वरापर्यंत त्यांनी भागवत धर्माचा दक्षिणदिग्विजय केला. त्यानंतर जवळपास पाच वर्ष संपूर्ण उत्तर भारत झाडून काढला. त्यानंतर दोनदा ते पंढरपुरातून तीर्थयात्रेसाठी निघाले. या दोन्ही वेळेस त्यांनी गुजरात , राजस्थान आणि पंजाब येथे जवळपास चाळीस वर्ष मुक्काम केला. पंजाबातील गुरुदारपूर जिल्ह्यातल्या घुमान येथे त्यांचं मुख्य ठाणं होतं. नामदेवांमुळेच हे गाव उभं राहिलं. नामदेवांच्या प्रभावामुळे दिल्लीच्या बादशहा अल्लाउद्दीनने तिथे मंदिरही बांधलं. त्याकाळातली वाहतुकीची आणि संवादाची साधने पाहता त्यांनी केलेल्या कामाची महती पटू शकेल.

उत्तर भारतात नामदेवांमुळेच भागवत धर्माचे विचार नव्यानेच पोहोचले होते. नाथ संप्रदायानेच सनातनी विचारांना थोडेफार आव्हान दिले होते. पण भागवत धर्मासारखा प्रेम , जिव्हाळा आणि साधेपणा त्यात नव्हता. त्यामुळे नामदेव तिथे नवी क्रांतीच करत होते. महाराष्ट्राप्रमाणेच भक्तीचं लोण त्यांनी सर्व जातीधर्मात पोहोचवलं. तिथेही सर्व जातींचे शिष्य उभे केले. एवढेच नाही , तर मुस्लिमांनाही उपदेश केला. त्यातून पुढे रामानंद , कबीर , रैदास , दादू अशा संतांनी समाजिक जागृती घडवून आणली. मीरा , नरसी मेहता , तुलसीदास , सूरदास अशा लोकप्रिय संतांच्या काव्यातही नामदेवांचा आदराने उल्लेख आढळतो. शिख धर्मीयांना देवतुल्य असणा-या गुरू ग्रंथसाहिबात नामदेवांच्या ६१ रचना मोठ्या आदराने समाविष्ट केलेल्या आहेत. आजच्या पंजाब , हरयाणा , दिल्ली , हिमाचल प्रदेश , राजस्थान , मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश तसेच पाकिस्तानातही नामदेवांची मंदिरं उभी आहेत. एकट्या राजस्थानात दी़डशेच्यावर नामदेवांची देवळं आहेत. अगदी जयपुरातही तीन देवळं आहेत. असं असलं तरी त्यांच्या हिंदी रचना मोठ्या संख्येने उपलब्ध नाहीत. ते बहुभाषिक कवी होते. जिथे गेले तिथली बोली स्वीकारली. गुजरातीत लिहिले , खडी बोलीत लिहिले , पंजाबीतही लिहिले. सर्वत्र जात राहिले , गात राहिले आणि लोकांची जीवनं बदलत राहिले. ‘ खरे तर संत नामदेवांच्या महाराष्ट्रातील चरित्र व कर्तृत्वपेक्षा पंजाबातील त्यांचे धर्मकार्य व हिदी कविता , त्या अत्यल्प असूनही , त्यांच्या व्यक्तिमत्वाची उत्तुंगता अधिक सांगत राहतात ’, असे संतसाहित्याचे अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांनी नोंदवलेले मत महत्त्वाचे आहे. नामदेवांचं आणखी एक वैशिष्टय हे की त्यांचा सगळा गोतावळा हा विठ्ठलभक्तीने भारावला होता. त्यांचे वडील दामाशेटी , आई गोणाई , बायको राजाई , आऊबाई , लिंबाई , लाडाई , नोगी या लेकासुना , तसेच नारा , गोदा आणि विठा हे मुलगे सगळ्यांच्याच कमी अधिक अभंगरचना उपलब्ध आहेत. त्यापैकी विठाचे काही अभंग तर थेट तुकारामांची आठवण करून देणारे आहेत. नामयाचि दासी जनाबाई आहेच. शिवाय शिष्योत्तम चोखा महार आणि त्याचे कुटुंब सोयराबाई , निर्मळाबाई , बंकामेळा , कर्ममेळा यांच्यावर नामदेवांचा थेट प्रभाव आहे. परिसा भागवत , जगमित्र नागा , जोगा परमानंद , सावता माळी , असंद सुदामा , नरहरी सोनार , अशा समकालीनांनी नामदेवांपासून स्फूर्ती घेतली होती. विशेष म्हणजे नामदेवांचा हा प्रभाव टिकावू ठरला. त्याचा प्रभाव आजही देशभर पाहता येतो.

गडकिल्ले दुर्लक्षित असताना वेगळे शिवस्मारक कशाला?

गड किल्ल्यांनी राखले स्वराज्य ,
गड किल्ल्यांनी स्थापले स्वराज्य।
गड किल्ल्यांतून लढला मावळा ,
गड किल्ल्यांतून महाराष्ट्र घडला।।

उभ्या महाराष्ट्रात आज साडेतीनशेहून अधिक किल्ले आहेत। प्रत्येक किल्याची आठवण छत्रपती शिवरायांशी जोडलेली... काही तर महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेले। पण हे सारे किल्ले आज दुर्लक्षित , उद्ध्वस्त आणि नामशेष होण्याच्या वाटेवर... हे किल्ले म्हणजे मराठी इतिहासाची आणि शिवछत्रपतींची जिवंत स्मारके. पण या सा-या गडकिल्ल्यांची खिंडारे झाली असताना २०० कोटी रुपयांचा खर्च करुन मुंबईमध्ये वेगळे शिवस्मारक हवे का ?
ज्या गडावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी असो , पहिला जिंकलेला गड तोरणा असो , स्वराज्याची पहिली राजधानी राजगड असो किंवा शिवराज्याभिषेक झाला ती राजधानी रायगड असो... आज हा प्रत्येक गड थोडीफार डागडुजी सोडली तर उपेक्षितच म्हणायला हवा। रायगडावरच्या महाराजांच्या पुतळ्यावर साधे छत्र नाही आणि मेघडंबरीत महाराज नाहीत. हे गडच नव्हे , तर महाराष्ट्रातल्या अनेक वास्तूंची अवस्था ‘ नाही चिरा , नाही पणती ’ अशी झालीय. उनवा-यात ऐतिहासिक वास्तू कोसळत आहेत. अशा वेळी मुंबईत पुतळा उभारुन महाराजांची आठवण कशी जागवली जाईल ?
महानगरी मुंबईत स्मारक हवे असे मानले तरी एकट्या मुंबईतच छत्रपती शिवाजी टर्मिनस , छत्रपती शिवाजी विमानतळ , छत्रपती शिवाजी वास्तुसंग्रहालय , शिवाजी पार्क , छत्रपती शिवाजी मार्ग अशा महाराजांचा वारसा मिरवणा-या अनेक वास्तू आहेत। मुंबईतच स्मारक हवे तर मुंबईत असलेल्या एखाद्या किल्ल्यावर ते उभारता आले असते. पण एवढ्यासाठी समुद्रात भराव टाकून नवे स्मारक बनवणं कितपत व्यवहार्य वाटते ?
मुंबईत अत्याधुनिक आणि डोळे दिपवणारे महाराजांचे स्मारक असावे ही स्वागतार्ह आणि आनंदाचीच गोष्ट आहे. पण महाराजांच्या आठवणी अंगाखाद्यावर खेळवणा-या आणि प्रेरणेचे स्रोत असणारे गडकिल्ले उपेक्षित असताना या स्मारकाला अग्रक्रम देणे तुम्हाला पटते का ?

एकजूट राहिली नाही, हे दुर्दैव

हुतात्म्यांचे बलिदान, मराठी भाषिकांचा एकोपा आणि महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार निर्भयपणे उभे रहिल्यामुळे संयुक्त महाराष्ट्र होऊ शकला। मात्र त्यावेळची एकजूट दुदैर्वाने आज राहिलेली नाही, अशी खंत व्यक्त करीत आहेत, या लढ्यातील सक्रिय कार्यकतेर् आणि विचारवंत प्रा। ग. प्र. प्रधान. ........

माझ्या स्वप्नातला संयुक्त महाराष्ट्र साकार झाला आहे। हुतात्म्यांचे बलिदान, मराठी भाषिकांचा एकोपा आणि महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार निर्भयपणे उभे रहिल्यामुळे संयुक्त महाराष्ट्र होऊ शकला. मात्र, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्यावेळची एकजूट दुदैर्वाने आज राहिलेली नाही. मुंबईची परिस्थिती गेल्या काही वर्षांत फार बदलली आहे. महाराष्ट्रातला गिरणी कामगार हा चळवळीत अग्रभागी असायचा. तो लढाऊ होता. गिरणी कामगारांच्या चळवळीला पुरोगामी लोकांचे नेतृत्व होते. शिवसेना आली आणि ट्रेड युनियनचे ऐक्य फुटले. ट्रेड युनियनच्या ठिकाणी 'दादा' उभे राहिले. नंतर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांचा संप झाला. त्यामुळे मराठी कामगार उद्ध्वस्त होऊन चळवळीची पीछेहाट झाली. लढाऊ कामगारांचा खातमा झाल्यानंतर 'आता परप्रांतीयांनी मात केली', अशी ओरड करण्यामध्ये काय हशील आहे? महाराष्ट्रामधील श्रमिकांच्या चळवळीत फूट पाडली, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रात हिंदी भाषा बोलली जाऊ लागली किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुले जाऊ लागली, तरी महाराष्ट्रातला बहुजन समाज हा मराठी भाषाच बोलत राहणार आहे. त्यामुळे मराठी भाषेची पीछेहाट होणार नाही. आता सर्व स्तरांवर स्त्री-पुरुष लिहायला लागले आहेत.
मी १९६६ ते १९८४ या कालावधीत आमदार होतो। १९८४मध्ये कृतिशील राजकारणातून बाजूला झालो. आता वयाच्या ८० वर्षांनंतर निवृत्ती स्वीकारली आहे. वयामुळे आता माझा वेगवेगळ्या स्तरांवर संबंध राहिलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आदी पक्षांच्या भूमिकेबद्दल मला काही बोलायचे नाही. नव्या पिढीने त्यांच्या पद्धतीने त्यास सामोरे जावे. तंत्रविज्ञानामध्ये क्रांती झाल्यामुळे सर्व स्तरांवर बदल झाले आहेत. 'आकांक्षांचे विस्फोट' ठिकठिकाणी झाले आहेत. धनदांडग्यांचे वर्चस्व वाढत असताना सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, असे श्रमिकांना वाटते, याचे मी स्वागत करतो.
थोडे भूतकाळात डोकावले तर राज्यांची भाषावार पुनर्रचना होणे त्यावेळी आवश्यक होते; कारण प्रत्येक राज्याचा कारभार त्या राज्यामधील लोकांच्या मातृभाषेत चालणे लोकशाहीच्या दृष्टीने आवश्यक असते। त्यावेळी मुंबई राज्य होते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या भागांतील आमदार एकत्र असल्यामुळे विधिमंडळाचे कामकाज इंग्रजीत चालत असे. उत्तरेकडील मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेश या हिंदी भाषिक राज्यांना न्याय मिळाला होता. स्वातंत्र्यानंतर तेलुगु भाषिकांचे राज्य अस्तित्वात आले. तामिळनाडू आणि केरळ निर्माण झाले. मात्र, महाराष्ट्रावर अन्याय झाला होता.
' मुंबई कोणाची', हा कळीचा मुद्दा होता। भांडवलशाहांना वाटत होते की, आमच्या भांडवलातून मुंबई मोठी झाली. महाराष्ट्राचे म्हणणे होते की, आमच्या श्रमातून मुंबई मोठी झाली. भांडवल महत्त्वाचे की गिरणी कामगारांचे श्रम महत्त्वाचे, हा मुद्दा होता. महाराष्ट्राला मुंबई मिळू द्यायची नाही, या हेतूने षड्यंत्र रचले गेले. मोरारजी देसाई हे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अकारण गोळीबार, जुलूम केला. त्यात १०५ जण हुतात्मा झाले. त्यांच्या त्यागामुळे संयुक्त महाराष्ट्र होणे अपरिहार्य होऊन बसले. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. त्यामध्ये केशवराव जेधे, एस. एम. जोशी, श्रीपाद अमृत डांगे, प्र. के. अत्रे, उद्धवराव पाटील आदी सर्वांची एकजूट होती. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या उठावामध्ये सर्व स्तरांवरील मराठी भाषिक सहभागी झाले. स्त्रियांनीही निर्भयपणे त्यात भाग घेतला. चिंतामणराव देशमुख यांनी केंदीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि या प्रश्नाला जबरदस्त धार आली.
मुंबई राज्यात १९५७मध्ये निवडणुका झाल्या. मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनतेने निवडणुकीत काँगेसचा पराभव केला. मात्र, मराठवाडा आणि विदर्भामुळे काँगेस पक्षाला बहुमत मिळाले. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यांनी कौशल्याने राज्य चालवले. प्रतापगडाचा मोर्चा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. त्या मोर्च्यामध्ये मी सहभागी झालो होतो. पंडित नेहरू येथून जात असताना आम्ही 'संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' अशा घोषणा दिल्या. मराठी माणसांच्या भावना त्यांना कळल्या. संयुक्त महाराष्ट्र १९६०मध्ये स्थापन झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती सुरू ठेवायची की नाही, याबद्दल मतभेद झाले. समाजवादी पक्ष बाहेर पडला. ज्या कारणासाठी सर्वजण एकत्र आले होते, ते कारण सफल झाले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये महाराष्ट्रातील श्रमिकांची एकजूट होती. दुदैर्वाने ती आज राहिलेली नाही. पश्चिम महाराष्ट्राने विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय केला, असे बोलले जाते. मात्र मला तसे वाटत नाही. वसंतराव नाईक हे १२ वषेर् मुख्यमंत्री होते. तसेच दादासाहेब कन्नमवार आणि सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले. याशिवाय अर्थमंत्री आणि कृषिमंत्रीही या भागातले झाले. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर अन्याय केला, असे वाटत नाही. स्थानिक नेतृत्वामुळे त्या भागाचा विकास होतो. पश्चिम महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, रत्नाप्पा कुंभार, तात्यासाहेब कोरे आदींनी सहकार चळवळ सुरू केली. तशी विदर्भ आणि मराठवाड्यात झाली नाही, ही स्थानिक नेतृत्वाची अपूर्णता आहे.

धर्मांतराने दलितांना काय दिले?

मी डाव्या विचारांच्या चळवळीत ३०-३५ वर्षांर्हून अधिक काळ सामान्य कार्यकर्ता म्हणून काढले आहेत। धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ, सेक्युलर, अशा मित्रांच्या खांद्याला खांदा लावून मी २५-३० वर्षे काम केले। अलीकडे जेव्हा मी व माझ्या भटक्या विमुक्त समाजातील सहकाऱ्यांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचा निर्णय केला, तेव्हा अनेकांचे कान टवकारले. अनेकांच्या नजरा विस्फारल्या. काहींना आता लक्ष्मणचं हे काय नवंच खूळ, असं वाटत होतं; तर काही मित्र कुत्सितपणे म्हणत होते, आता काय लक्ष्मण 'नमो तत्स.' मी म्हणायचो 'जसं होईल तसं'. एक कम्युनिस्ट नेते कैक वर्षांचे माझे मित्र. ते मित्र मला म्हणत होते, 'काय होणार तुझ्या या धर्मांतरानं? आपण सारी सेक्युलर मंडळी. धर्माकडे पाठ करून उभी असलेली. बरं ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांचं तरी काय झालं? तर तुझ्या जाण्यानं नेमकं काय होईल?' तेव्हा त्यांना मी शांतपणे म्हणालो, 'होय आपण सारे सेक्युलर, तुम्ही मराठा सेक्युलर, भाई वैद्य ब्राह्माण सेक्युलर, जनार्दन पाटील कुणबी सेक्युलर, बाबा आढाव मराठा सेक्युलर, जनार्दन वाघमारे माळी सेक्युलर आणि मी कैकाडी सेक्युलर. असा आपला सेक्युलॅरिझम आहे. सेक्युलर म्हणण्यात तुमचे काय जातं? जातीचे सर्व फायदे तुमच्या ताटात पडतातच. ते तुम्ही कधी नाकारलेत? समाजाची वास्तविक प्रतिष्ठा जातीच्या उतरंडीनुसारच मिळते ना? मी सेक्युलर कैकाडीच रहाणार असेन, तर तुमचा सेक्युलॅरिझम माझ्या आणि माझ्या समाजाच्या काय कामाचा? आणि जे आधी धर्मांतरित झाले त्यांच्याबद्दल म्हणाल तर मी दोनच गोष्टी तुम्हांला विचारतो. एक महार मला असा दाखवा जो मेलेली ढोरं ओढतो आणि मेलेल्या ढोराचं मांस खातो. मी त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देतो आणि असा महार दाखवा की ज्याला सांगावं लागतंय की पोरगं शाळेत घालं. त्यालाही एक लाख रुपये देतो.' या प्रश्नाचं उत्तर मी काही गंमत म्हणून दिलं नव्हतं. धम्मचक्र प्रवर्तन अभियानामध्ये भंडाऱ्यापासून कोल्हापूरपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी प्रत्येक सभेत विचारत होतो, एक महार असा दाखवा जो मेलेल्या ढोराचं मांस खातो व मेलेले ढोर ओढतो. त्याला एक लाख रुपये बक्षीस देतो. आजतागायत असा महार मला भेटलेला नाही.
काय अर्थ या घटनेचा? कोणत्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी या हिंदू धर्माचा त्याग केला होता। (मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे ३०, ३१, मे व १ व २ जून १९३६ साली चार दिवस झाली. 'मुक्ती कोन पथे?' या नावानं बाबासाहेबांंचं भाषण प्रसिद्ध आहे). १९३६ साली ते म्हणाले, 'सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे, विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे, वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे, स्पृश्य हिंदूनी मारहाण केल्याची उदाहरणे सर्वांच्या डोळ्यापुढे नेहमी असतात. उंची पोशाख घातल्यामुळे, दागदागिने घातल्यामुळे, पाणी आणण्याकरिता तांब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे, जमीन खरेदी केल्यामुळे, जानवे घातल्यामुळे, मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे, पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे, भेटलेल्या स्पृश्य हिंदूस जोहार न घातल्यामुळे, शौचाला जाताना तांब्यात पाणी नेल्यामुळे, पंचाच्या पंगतीत चपाती वाढल्यामुळे, अशा कितीतरी कारणाने अमानुष अत्याचार, जुलूम केले जातात. बहिष्कार घातला जातो. प्रसंगी जाळपोळीला सामोरं जावं लागतं. मनुष्यहानी होते. मोलमजुरी मिळू द्यायची नाही. रानातून गुरांना जाऊ द्यायचे नाही. माणसांना गावात येऊ द्यायचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य हिंदू लोकांनी अस्पृश्य लोकांस जेरीस आणल्याची आठवण तुम्हांपैकी पुष्कळांना असेल. परंतु असे का घडते? याचे कारण स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजांतील तो कलह आहे. एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा हा प्रश्न नव्हे. हा एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेल्या आगळिकीचा प्रश्न आहे. हा वर्गकलह सामाजिक दर्जासंबंधीचा कलह आहे. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे, या संबंधाचा हा कलह आहे. या कलहाची जी उदाहरणे वर दिलेली आहेत, त्यावरून एक बाब उघडपणे सिद्ध होते; तीही की तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता, म्हणूनच हा कलह उपस्थित होतो. तसे नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे, उंची पोषाख घातल्यामुळे, जानवी घातल्यामुळे, तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे, घोड्यावरून वरात नेल्यामुळे ही भांडणे झाली नसती. जो अस्पृश्य चपाती खातो, उंची पोषाख करतो, तांब्याची भांडी वापरतो, घोड्यावरून वरात नेतो, तो वरच्या वर्गापैकी कुणाचे नुकसान करीत नाही. आपल्याच पदराला खार लावतो. असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करणीचा रोष का वाटावा? या रोषाचे कारण एकच आहे; ते हेच की अशी समतेची वागणूक त्याच्या मानहानीला कारणीभूत होते. तुम्ही खालचे आहात, अपवित्र आहात, खालच्या पायरीनेच तुम्ही राहिलात तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील. पायरी सोडली तरी कलहाला सुरुवात होत,े ही गोष्ट निविर्वाद आहे.'
मी अगदी लहान होतो, तेव्हा मी पाहिलं आहे, गावोगाव महारवाड्यांवर बहिष्कार चालू होते। माणसांना गावात येऊ दिले जात नव्हते, पाणवठे बंद होते, पिठाची गिरणी बंद होती, किराणामालाची दुकाने बंद होती. गावोगावच्या महारांनी, म्हणजे पूर्वाश्रमीच्या दलित जनतेने बाबासाहेबांकडून धम्म दिक्षा घेतली होती. तराळकी, येस्करकी नाकारली होती. निरोप्याचे काम नाकारले होते. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली निहित कर्तव्यं गावगाड्यात करावी लागणारी सर्व कामं मग, लाकूड फोडणे असेल, ढोर ओढणे असेल, सांगावा सांगणे असेल, हे सारे नाकारले होते. हे एका अर्थाने मोठे बंडच होते. शेकडो वर्षांपासून घरातील देव्हाऱ्यात पूजलेल्या ३३ कोटी देवांच्या प्रतिमा एका रात्रीत नदीत भिरकावून दिल्या. मरीआई लक्ष्मीआईची मंदिरं ओस पडली. सारे गंडे-दोरे, गळ्यातल्या माळा, डोक्यावरचे केस सर्व काढून फेकून दिले. गावागावात, वस्तीवस्तीत बुद्धवंदना निनादू लागली. सर्व आखाडे, देवळे, विठ्ठलमंदिरांचे बुद्ध विहारात रूपांतर होऊ लागले. त्यांच्या नावापुढील जात व धर्म जाऊन 'बौद्ध' असे लिहिले गेले. मुलांची, घरांची, गावांची, रस्त्यांची, संस्थांची नावे बदलली. सर्व समाज तरारून उठला. सापाने कात टाकावी, तशी कात टाकून सळसळून उभा राहिला. एक नवी अस्मिता घेऊन हा समाज अन्याय, अत्याचार, जूलूम याच्या विरोधामध्ये ठामपणे उभा राहिला. चाणी, बोटी, पड, हाडकी, हाडोळा ही गुलामीची सारी प्रतिके या समाजाने भिरकावून दिली. बुद्धकालीन इतिहास व बौद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब सर्वत्र दिसू लागले. माझी पिढी या सर्व घटनांची साक्षीदार आहे. बौद्ध स्थापत्यकला नवीन घरांवर विराजमान होऊ लागली. बुद्ध जयंती धूमधडाक्यात साजरी होऊ लागली. सामूहिकरीत्या लोक दारू सोडू लागले. जत्राखेत्रांवर होणारा प्रचंड खर्च, कोंबड्या-बकऱ्या बळी देणे, अंगात येणे या विरुद्धचे काहूर उसळू लागले. लग्नविधी, नामकरणविधी, अत्यंंविधी बदलले, लग्न-मरणातला बँड गेला. डफडं गेलं. हालगी गेली. गावाची चाकरी-सेवा गेली. समाज गावगाड्यातून बाहेर पडला. अंगारे-धुपारे-बुवा-बाबा मागीर् लागले. पोतराजांनी अंगावरली आईची वस्त्रं धडप्यात गुंडाळून नदीला सोडली. आपल्या मनुष्यत्वाचा शोध सुरू झाला. गुलामगिरीच्या आभूषणांना चूड लागली. लोकांनी खेडी सोडा, शहरांकडे चला हा मंत्र स्वीकारला. आणि लोक गावगाड्याच्या नरकातून, या गुलामगिरीच्या जोखडांमधून बाहेर पडले. ईश्वराच्या जोखडातून बाहेर पडले. कर्मकांडाच्या लफड्यातून बाहेर पडले. कालपर्यंत अंगात येणारी मरीआई कायमची नदीत विसजिर्त केली म्हणून काही आईचा कोप झाला नाही. कुणीही प्लेग, पटकी, कॉलरा या रोगांनी मेले नाहीत. कोणालाही हाग-वक झाली नाही. गपगुमान अंगातले देव पळून गेले. लोक दास्यातून मुक्त होऊ लागले.
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र मनोमनी या समाजाने स्वीकारला। आतून-बाहेरून घुसळण चालूच होती. या समाजाने शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन; पोरगं शिकवीन, त्याला डॉ. आंबेडकर करीन हा ध्यास त्या सर्व समाजाने घेतला. सर्वांचीच मुलं डॉक्टर, इंजिनीअर झाली असं नाही. पण सर्वांनी प्राथमिक शिक्षण घेण्याचा निर्धार केला. आज या समाजाच्या साक्षरतेचे प्रमाण ८६ टक्के इतके विक्रमी आहे. आज ५० वर्षांनंतर अॅड. शंकरराव खरात, डॉ. भालचंद मुणगेकर आणि डॉ. नरेंद जाधव हे महाराष्ट्रातल्या नामवंत पुणे, मुंबई, औरंगाबाद या विद्यापीठांचे कुलगुरू झाले. युनिव्हसिर्टी गँट कमिशनचे आजचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात साऱ्या देशातल्या उच्च शिक्षणाची धुरा सांभाळीत आहेत; तर डॉ. भालचंद मुणगेकर प्लॅनिंग कमिशनचे सदस्य आहेत. डॉ.रेंद जाधव हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते रिर्झव्ह बँकेचे सल्लागार होते. शेकडो लोक पीएच.डी. झालेले आहेत. हजारो लोक डॉक्टर आहेत, इंंजिनीअर आहेत, आकिर्टेक्ट आहेत. हजारो लोक प्राध्यापक आहेत आणि प्राथमिक- माध्यमिक शिक्षकांचा तर सुळसुळाटच आहे. समाजाचे क्रीम समजल्या जाणाऱ्या आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकाऱ्यांमध्ये डझनाने अधिकारी या आंबेडकरी समाजातले आहेत. अभिमान वाटावा असा मध्यमवर्ग, उच्चमध्यम वर्ग या समाजामध्ये निर्माण झाला आहे. वेश, भूषा, भवन, भाषा सारे बदलून गेले आहे. आज 'वाडावो माय भाकर येस्कराला' हे इतिहासजमा झाले आहे. आय.ए.एस. आय.पी.एस., यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी.,या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये देशात एक नंबरला ब्राह्माण आहेत आणि दोन नंबरला पूवीर्चे महार आणि आताचे बौद्ध आहेत. विद्वत्तेच्या सर्व क्षेत्रांमध्ये या दोन समाजांचीच स्पर्धा सुरू आहे. सर्वाधिक ब्राह्माण मुलींनी पूर्वास्पृश्य असलेल्या या समाजातील तरुणांशीच आंतरजातीय विवाह केल्याचे दिसेल. रोटी-व्यवहाराची तर क्रांती झालीच पण बेटी-व्यवहाराची क्रांती या समाजात घडते आहे. बेटी-व्यवहार आपल्या बरोबरीच्या माणसांशी होतो. साहित्याच्या क्षेत्रातही दलित साहित्याने आपला स्वतंत्र इतिहास निर्माण केला आहे. दलित कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, निबंध, प्रवासवर्णन आणि वैचारिक लेखनादि क्षेत्रांतील कार्याने भल्याभल्या सरस्वतीपुत्र म्हणवणाऱ्यांना तोंडात बोटे घालायला लावले आहे. केवळ लिहिलेच नाही, तर आपला वाचकवर्गही त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण केला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक ग्रंथ अभिमानाने व तेजाने आज तळपताना दिसत आहेत. दलित साहित्य आणि दलित जाणीव, दलित चळवळ आणि अलीकडे आंबेडकरी चळवळ ही देशातल्या अन्य कोणत्याही प्रांतात निर्माण होऊ शकली नाही. ती महाराष्ट्रातच निर्माण झाली; याचे कारण स्वत्व, स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि अस्मिता यांची पेरणी ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्या आंबेडकरी भूमीतच देशातले पहिले साहित्यातले बंड मराठीमध्ये झाले. लोक विनोदाने म्हणतात, 'ब्राह्माणांनी मटण महाग केले आणि दलितांनी पुस्तके महाग केली' ब्राह्माणाघरी लिवणं, कुणब्याघरी दाणं आणि महाराघरी गाणं हे आंबेडकरवाद्यांनी खोडून टाकले. आता दलिताघरी लिवणं आणि बामणाघरी गाणं असे नवे सूत्र मांडायला हरकत नाही. दीक्षाभूमीवर लागणारी पुस्तकांची दुकाने, गावोगाव भरणारी साहित्य संमेलने आणि त्या प्रत्येक साहित्य संमेलनाच्या बाहेर थाटलेली पुस्तकाची दुकाने, सीडी, कॅसेट्स यांची लागणारी दुकाने हा खरोखर आश्चर्याचा विषय आहे. तीर्थक्षेत्रावर हार, तुरे, माळा, नारळ, कुंकू, बुक्के, शेले, दुपट्टे, चादरींची रेलचेल असते. पण तिथे दीक्षाभूमीवर नानाप्रकारच्या हजारो ग्रंथांची झालेली गदीर् दिसते. हिंदू तीर्थक्षेत्रावरून हिंदू बंधू पवित्र गंगाजल आणतात, मुस्लिम बंधू हज यात्रेवरून 'आब-ए-जमजम' आणतात, आमचे बौद्ध बंधू मात्र दीक्षाभूमीवरून बुद्ध, बाबासाहेबांची ग्रंथसंपदा आणि प्रतिमा घेऊन जातात. ज्या समाजाला अक्षरबंदी होती, तो समाज ज्ञानाकांक्षी बनविला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या धम्म चळवळीने. ही ज्ञानाकांक्षा हेच धम्माचे सार्मथ्य आहे.
खेडी सोडून शहराकडे चला, हा मंत्र बाबासाहेबांनी दिला। अंधार युगातील अंध:कार कूप ठरण्याची भीती ओळखून बाबासाहेबांनी खेड्याला केंदबिंदू न ठरवता व्यक्तीला विकासाचा केंदबिंदू ठरवले होते. डॉ. भाऊ लोखंडे यांनी त्यांच्या एका लेखामध्ये फार छानपणे बाबासाहेबांचा खेड्यासंबंधीचा विचार मांडला आहे. पॅसिफीक रिलेशन्स परिषदेला सादर केलेल्या प्रबंधात बाबासाहेब म्हणतात,
अ)। जोपर्यंत अस्पृश्य लोक हे खेड्याच्या बाहेर रहातात, त्यांना उदरनिर्वाहाचे साधन नाही, त्यांची लोकसंख्या हिंदूंच्या मानाने कमी आहे, तोपर्यंत ते अस्पृश्यच रहाणार. हिंदूंचा जुलूम व जाच चालूच रहाणार व स्वतंत्र, संपूर्ण जीवन जगण्याला ते असमर्थच रहाणार.
ब). स्वराज्य म्हणजे हिंदू राज्यच होईल। त्यावेळी स्पृश्य हिंदूंकडून होणारा जुलूम व जाच अधिकच तीव्र होईल. त्यापासून दलितवर्गाचे चांगल्यारीतीने संरक्षण व्हावे.
क). दलितवर्गातील मानवाचा पूर्ण विकास व्हावा। त्यांना आथिर्क व सामाजिक संरक्षण मिळावे, अस्पृश्यतेचे उच्चाटन व्हावे म्हणून या परिषदेचे पूर्ण विचारांती असे ठाम मत झाले आहे की, भारतात प्रचलित असलेल्या ग्रामपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आला पाहिजे. कारण गेली कित्येक वर्षे स्पृश्य हिंदंूकडून दलितवर्गाला सोसाव्या लागणाऱ्या दु:खाला ही ग्रामपद्धतीच कारणीभूत झालेली आहे. खेड्यातील दलित बांधवांची अवस्था आठवून बाबासाहेब ढसढसा रडत असत. ते म्हणत असत, 'खेडापाड्यातून रहाणाऱ्या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा माझा उद्देश सफल होऊ शकला नाही. म्हणून माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले माझे सार्मथ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी खर्च करण्याचा निश्चय केला आहे. जोपर्यंत ते खेडी सोडून शहरात रहायला येणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या जीवनस्थितीत सुधारणा होणार नाही. खेड्यात रहाणाऱ्या या आमच्या अस्पृश्यांना वाडवडिलांच्या गावी रहाण्याचा मोह सुटत नाही. त्यांना वाटते, तेथे आपली भाकरी आहे. परंतु भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे. ज्या गावी कुत्र्यासारखे वागविले जाते, ज्या ठिकाणी पदोपदी मानभंग होतो, जेथे अपमानाचे स्वाभिमानशून्य जीवन जगावे लागते ते गाव काय कामाचे? खेडेगावातील या अस्पृश्यांनी तेथून निघून जेथे कोठे पडिक जमीन असेल ती ताब्यात घ्यावी आणि नवनवीन गावे वसवून स्वाभिमानपूर्ण माणूसपणाचे जीवन जगावे. तेथे नव-समाज निर्माण करावा. तेथील सर्व कामे त्यांनीच करावी. अशा गावातून त्यांना कुणी अस्पृश्य म्हणून वागविणार नाही. गेल्या ५० वर्षांत दोन जातींनी खेडी सोडली. एक बौद्ध व दुसरे ब्राह्माण. दोघे शहरांमध्ये येऊन राहिले. पूर्वास्पृश्य असलेल्या दलितांना शेतीच्या उत्पादनव्यवस्थेत काही स्थान नव्हते. तर ब्राह्माण कुळ कायद्यामुळे व ४८च्या गांधी हत्येनंतर खेड्यांमधून शहरांकडे धावले. जातींची बहुसंख्या आणि जातींची अल्पसंख्या ही परिस्थिती भयावह आहे. घटनेमध्ये एक माणूस, एक मूल्य हा सिद्धांत बाबासाहेबांनी मांडला असला, तो घटनेने स्वीकारला असला, घटनेने स्वातंत्र्य-बंधुता-न्याय ही तत्त्वे स्वीकारली असली, तरी वास्तवामध्ये हिंदू नावाची काही गोष्टच नसते. तेथे जाती असतात आणि जातीच राजकारणाचे रूप घेऊन अल्पसंख्य, बहुसंख्य ठरवित असतात. त्यामुळे जातीने अल्पसंख्य व जातीने बहुसंख्य हेच सूत्र सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या फेरवाटपात महत्त्वाचे ठरते आहे. या स्थितीचा अल्पसंख्य जातींनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मला वाटते. या देशात जात बदलताच येत नाही असे रोज सांगितले जाते. परंतु आधीच्या बौद्धांनी हे सिद्ध केले आहे की जात बदलता येते; तिचे वास्तवही बदलता येते. आता ज्यांनी धर्म बदलला नाही, त्यांची काय परिस्थिती आहे? महाराष्ट्रातल्या अस्पृश्यांमध्ये एक नंबरला पूवीर्चे महार होते; तर दोन नंबरची लोकसंख्या पूवीर्च्या मांगांची आहे. आता अस्पृश्य कुणीही राहिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लेखणीच्या एका फटकाऱ्यात अस्पृश्यता नष्ट केली आहे. या दोघांशिवाय बाकी छोट्या छोट्या अस्पृश्य जाती आहेत; ज्या आजही गावगाड्यात आहेत. त्यांची परिस्थीती काय आहे? त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण काय आहे? मातंग समाजात एखाद-दुसरा अपवाद सोडला तर कुणीही आय.एस.आय. अधिकारी नाही. अपवादानेच एखाद-दुसरा आय.पी.एस.अधिकारी असेल. तीच परिस्थिती बाकीच्या स्पर्धापरीक्षांची आहे. ज्या ठिकाणी पूवीर्च्या महारांनी गावगाडा सोडला, गावाची सेवा-चाकरी सोडली, ती सारी कामे ही मातंगांच्यावर लादली गेली आणि त्यांनी ती स्वीकारली. त्यामुळे एक-दोन टक्के तरी शिक्षण असेल की नाही, याची चिंता केली पाहिजे. सबंध मातंग, चर्मकार, ढोर या सगळ्यांच्या शिक्षणाचा व त्यांना ५० वर्षांत काय मिळाले याचा स्वतंत्र अभ्यास होण्याची गरज आहे. डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनीअर, कलेक्टर, कमिशनर, या समाजाच्या प्रशासन यंत्रणांमध्ये काय प्रमाण या समाजाचं आहे, याचाही तपशीलवार अभ्यास होण्याची गरज आहे.
आज अन्याय, अत्याचार सर्वाधिक होत आहेत ते मातंगांवर सर्व गावगाड्यांतल्या कामाचं स्वरूप उदा. डफडे वाजवणे एवढी गोष्ट लक्षात घेतली तरी काय जाणवते? डफडे वाजविण्याचा पारंपरिक धंदा हा मातंगांच्या गळ्यात मारला आहे. मातंग समाज स्वत:ला हिंदू धमीर्यच समजतो. त्यांनी हिंदूंच्या सण, उत्सव, लग्नात डफडे वाजविलेच पाहिजे. नाहीतर त्याचा परिणाम त्याला भोगावाच लागतो. त्याने डफडे वाजवले तरीही आणि नाही डफडे वाजवले तरीही त्याला काही मारुतीच्या मंदिरात पाया पडायला जाता येत नाही. आणि गेला तर मार बसतोच. वरात घोड्यावरून काढल्यास, चांगले कपडे घातल्यास, चांगले रहाणीमान केल्यास, शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास, सवर्णांच्या विहिरीवर पाणी भरल्यास, सवर्णांची लहान-मोठी कामे न केल्यास जनावरांसारखा मार खावाच लागतो. अगदी अलीकडेच, म्हणजे या महिन्या-दोन महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यातील साकेगाव येथील सुनील आव्हाड याने पोळ्याच्या दिवशी डफडे वाजविण्यास नकार दिल्यामुळे गावातील जातीयवादी गावगुंडानी त्याला जातीवाचक शिवीगाळ करून वेशीवर बांधून बेदम मारहाण केली. त्याच्या घरावर हल्ला करून कुडाची भिंत तोडली. त्याचा लहान भाऊ, वडील यांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारले. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कोतळी गाव येथील भारतीय जनता पक्षाचे विधानसभा गटनेते एकनाथ खडसे यांच्या मुलाने, पोळ्याच्या दिवशी डफडे वाजविण्यास नकार दिल्याने नीना अढायके या मातंग तरुणास बेदम मारले. त्याचा मुलगा व पत्नी यांनाही मारले. या दोन्ही घटनांमध्ये अन्याय करणारे पोलिस पाटील, सरपंच तसेच इतर अनेक लोक आहेत. या अगदी अलीकडच्या घटना आहेत. रोज कुठेना कुठे अशा घटना घडतच असतात. सर्वांची नोंद होतेच असेही नाही. डफडे वाजवायचे की वाजवायचे नाही, हा त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. पण असे स्वातंत्र्य मातंगांना आहे काय? सोलापूर जिल्ह्यातल्या चर्मकार समाजातल्या भगिनीवर पाच-सहा महिन्यांपूवीर् अतिप्रसंग झाला. काय तिने कोणाचे घोडे मारले होते? ती हिंदू आहे, अस्पृश्य आहे आणि ती पाटील सांगेल त्या गोष्टीला हो म्हणत नाही. मग दुसरे काय होणार? जोवर हे सारे हिंदू राहतील, तोपयंत त्यांच्यावर असाच अन्याय होत राहील. तीच परिस्थिती भटक्या विमुक्तांची. दलितांचा बहिष्कृत भारत; आमचा तर उद्ध्वस्त भारत. आमच्या तर मनुष्यत्वालाच अर्थ नाही. स्वातंत्र्याला ६० वर्षे झाली; पण आमच्या शिक्षणाचे प्रमाण ०.०६ टक्के आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या कोणत्याही सुविधांचा आम्हांला स्पर्श झालेला नाही. एका जागेला हा समाजतीन दिवसांपेक्षा जास्त रहातच नाही. त्यामुळे मतांच्या राजकारणात यांना कुणी विचारत नाही. अल्पसंख्य असणे हा यांचा गुन्हा आहे. जोवर ती माणसे लमाण, कैकाडी, माकडवाला, वडार रहातील तोपर्यंत लोकशाहीपर्यंत पोहचूच शकत नाही. लोकशाहीमध्ये त्यांचा प्रतिनिधी नसेल तर ६० वर्षांत काय स्थिती झाली आपण पहातोच आहोत. त्यामुळे जाती नष्ट करायला पर्याय नाही. ज्यांनी जात नष्ट केली, ते पुढे गेले. ते बौद्ध असोत, मुस्लिम असोत, ख्रिश्चन असोत. ज्यांनी जात सोडली नाही, जातीची मानसिकता सोडली नाही, वर्णव्यवस्थेची गुलामगिरी सोडली नाही ते वेगाने मागे पडतायत. मग ते मराठे असोत, माळी असोत, कुणबी असोत. ब्राह्माणेतरांमध्ये सर्व गरीब गट वेगाने मागे जात आहेत. या सगळ्याचा गांभीर्यपूर्वक विचार केल्यानंतरच मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला मार्ग स्वीकारलेला आहे. सवलती मिळोत किंवा न मिळोत; आम्हाला आमच्या पायावर उभे राहिलेच पाहिजे. कारण जे पायावर उभे राहिले तेच पुढे गेलेले आहेत. लाचार गांडुळांच्या फौजा म्हणून जगण्यापेक्षा बंडखोर म्हणून जगणे आणि अस्मितेच्या शोधात निघणे हे मला अत्यंत गरजेचे वाटते.
- लक्ष्मण माने

बाबासाहेबांनी भूमी सुपीक केलीय!

' मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही', अशी गर्जना करत डॉ। बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली लाखो दलित बांधवांसह बौद्ध धम्म स्वीकारला आणि जातिव्यवस्थेवर उभ्या असलेल्या हिंदू धर्माला मोठा तडाखा बसला. कोणत्याही आमिषाशिवाय झालेलं हे जगातलं सर्वात मोठं धर्मांतर. या धर्मांतरानं दलितांना स्वत्व आणि सत्त्व दोन्हीही दिलं. कर्मविपाकाच्या गाळात रूतलेल्या शोषितांच्या लढ्याला बळ दिलं. जगायला प्रयोजन दिलं. दलितांनी रातोरात देव फेकले आणि 'बुद्धं सरणं गच्छामि'चा घोष केला. या थरारून टाकणाऱ्या घटनेला पन्नास वर्षं झाली. एका मोठ्या ऐतिहासिक घटनेकडे वळून पाहायला, तिचं पुनरावलोकन करायला हा काळ पुरेसा आहे. या पन्नास वर्षांच्या कालखंडात धर्मांतरामुळं काय काय स्थित्यंतरं झाली? दलितांचा जातिअंताचा लढा कुठवर आला? धर्मांतर न केलेल्या दलितांचं काय झालं? धर्मांतरित आणि बिगर धर्मांतरित यांनी दलित राजकारणामध्ये कोणते पेच निर्माण केले? खुद्द हिंदू धर्म या आघातानं किती बदलला? आणि महत्त्वाचं म्हणजे, अलीकडेच लक्ष्मण माने यांनी दहा लाख दलित-आदिवासींसह बौद्ध धम्म स्वीकारताना पन्नास वर्षांपूवीर्चेच प्रश्ान् आणि धर्मांतरामागची तीच प्रेरणा आजही तशीच होती काय? या सर्व प्रश्ानंचा धांडोळा घ्यायला याहून योग्य वेळ ती कोणती?.... ................
नव्या पिढीला 'बौद्ध' म्हणून राखीव जागेचा फायदा घेता येत नसे तेव्हा नोकरी लागावी म्हणून बौद्धाचं 'हिंदू-महार' कसं करावं, हे तंत्र त्यांना शिकवलं जात होतं। तुम्ही धर्मांतरित झालात, हे थांबवणं आमच्या हातात नसलं तरी तुम्हाला पुन्हा 'महार' बनवणं मात्र आमच्या हातात आहे, असं काँग्रेसनं दाखवून दिलं आणि चळवळीचा मोठा अपमान केला, पण या अपमानातून बाहेर काढण्याचं काम मात्र विश्वनाथ प्रताप सिंगांनी केलं, अशी मांडणी करताहेत भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख... अॅड. प्रकाश आंबेडकर ......................
भारतरत्न डॉ। बाबासाहेब आंबेकरांनी मे महिन्यात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची मुंबईत स्थापना केली. नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेबांनी या संस्थेचं 'भारतीय बौद्ध महासभा' असं नामकरण केलं. मे १९५६ मध्ये लंडनच्या ब्रिटिेश ब्रॉडकास्टिंग कॉपोर्रेशनने बाबासाहेबांचं एक भाषण प्रसिद्ध केले. या भाषणाचा विषय होता, 'मला बौद्ध धम्म का आवडतो?' त्या भाषणात काही बाबी त्यांनी मांडल्या. ते म्हणतात, प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्त्वं कोणत्याही धर्मात आढळत नाहीत. तथागत म्हणतात, अंधश्ाद्धा, चमत्कार, देव नि आत्मा समाजाचं भलं करू शकत नाहीत तर समाजाला या गोष्टी अंध:कारात ढकलून देतात. तथागत गौतमबुद्धांनी आपलं तत्त्वज्ञान जनतेच्या भाषेत म्हणजे त्याकाळच्या पाली भाषेत मांडलं, तर वैदिकांनी ठरविक वर्गाची जहागिरी असलेल्या संस्कृत भाषेत आपलं तत्त्वज्ञान मांडलं. म्हणून बुद्धाचं तत्त्वज्ञान जगभर प्रसिद्धी पावलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं, त्याचं भारतीय व्यवस्थेत कोणीही पूर्णपणे विश्लेषण केलेलं नाही, आणि मी म्हणतो, हे जाणीवपूर्वक केलेलं नाही। हा माझा इथल्या व्यवस्थेवर आरोप आहे. सामाजिक विषयावर अनेक पी.एचडी. घेण्यात आल्या, पण त्यांच्याही विश्लेषणात बाबासाहेबांचा बौद्ध धम्म स्वीकारणं व त्याच्या परिणामाची चर्चा केली गेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारण्यापूवीर् या देशात लोकांनी मुसलमानांची राजवट, छोट्या छोट्या विभागातील राजांची राजवट, अशोकाची राजवट, ब्रिटिशांची राजवट यांचा अनुभव घेतला होता. भारताचा एकतेचा आणि शांततेचा काळ हा अशोकाच्या कालावधीतच दिसतो. उरलेल्या कालावधीत एकमेकांशी लढणं, एकमेकांना संपवणं, मोगलांचा, ब्रिटिशांचा संघर्ष, त्यात एकमेकांवर कुरघोडी करणं याच गोष्टी दिसतात. त्याकाळी राजांच्या भांडणांची कारणं कोणत्या देवाला कोण मानतो वगैरे असायची. जातीच्या अहंकारातून कत्तली केल्या जायच्या. त्याकाळी वैदिक परंपरा विरूध्द संतपरंपरा, असा तो लढा होता. पण या दोन्ही विचारसरणींना हिंदू या शब्दाने संबोधल्यामुळे ना सामाजिक विचारसरणी बदलली, ना त्यामुळे असलेली एकमेकांबद्दलची द्वेषभावना. अशा व्यवस्थेत बाबासाहेबांनी, स्त्री-पुरुष भेद मिटवणारा, एकमेकांचा आदर करायला शिकवणारा, समाजात सामंजस्य निर्माण करणारा, बुद्धिप्रामाण्यावादी, विज्ञाननिष्ठ असा बौद्ध धम्म स्वीकारला आणि देशाला मानवतेचा चेहरा प्राप्त करून दिला.
भारतीय समाजव्यवस्थेत जो वर्ग गुलामीत आणि अस्पृश्यतेत जीवन जगत होता, त्याला बौद्ध धम्मामुळे एक नवसंजीवनी मिळाली। याचंच प्रत्यंतर आपल्याला कालांतराने बघायला मिळालं. ज्यांनी बौद्ध धम्म आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्या वर्गाची शैक्षणिक, सामाजिक, आथिर्क प्रगती झाली. ज्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला नाही, त्यांची प्रगती मंदावली. याचं मुख्य कारण म्हणजे मनूच्या सामाजिक जातिव्यवस्थेने नुसतं आथिर्क गुलाम केलं नव्हतं, तर मानसिक गुलामही केलं होतं. बौद्ध धम्म स्वीकारल्यामुळे त्यांनी स्वत:ला मानसिक गुलामीतून मुक्त केलं. मी माणूस आहे आणि माणसाचे काही निसर्गदत्त अधिकार आहेत, ते उपभोगणं हा माझा अधिकार आहे. मी इतरांपेक्षा कमी नाही. म्हणून मला बरोबरीने वागवलं गेलं पाहिजे. अशारितीने तो स्वत:ला घडवत गेला आणि प्रगतीशील झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याअगोदर नवीन व्यवस्थेत समाज एकसंध राहावा म्हणून बौद्ध महासभेच्या खांद्यावर नवी संस्कृती, नवी परंपरा, नवी रूढी निर्माण करण्याची जबाबदारी दिली होती। ज्याचा आधार समता आणि बंधुत्व असेल. हे काम बाबासाहेबांच्या नंतरही ही संस्था करीत आहे. याही संस्थेला बदनाम करण्याचं, पर्यायी संस्था उभी करण्याचं काम अनेकांनी केलं. परंतु बौद्ध अनुयायांनी ते हाणून पाडून बौद्ध महासभा ही त्यांची मातृसंस्था मानली आणि तिने दिलेले कार्यक्रम प्रथा, व्यवस्था मान्य केल्या. बौद्ध महासभेच्या आज अठरा राज्यात संघटना असून तिने धर्मांतर सुवर्ण महोत्सवी वर्षात अनेक संकल्प केले, त्यापैकी अनेक तडीस नेले. सोलापूर, परभणी, अहमदनगर, नांदेड येथे दीक्षेचे कार्यक्रम करून विविध मागास जातीतील हजारोंना बुद्ध धम्माची ओळख पटवून दिली. महाराष्ट्रात आज ५००० बौद्धाचार्य, एक हजार शिक्षक आणि दहा हजार समता सैनिक दलाचे सैनिक समतेचा संदेश देत आहेत. देशभरातील बौद्ध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी, बौद्ध महासभेने अल्प दरात सहलींचं आयोजन केलं, आतापर्यंत सुमारे वीस हजार लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. या संकल्पवर्षात स्वत:च्या जागा घेऊन महाविहार निर्माण करण्याचं कार्य महाराष्ट्रात सहा ठिकाणी मूर्त रूपात पहायला मिळतंय, तर माता रमाई स्मारक मु. पो. वणंद, तालुका दापोली, जि. रत्नागिरी येथे आकारास येत आहे. बौद्ध महासभा विविध चोवीस कार्यक्रमातून धम्माची शिकवण देत आहे. आज असंख्य कार्यकतेर् बौद्ध महासभेत योगदान देतात. त्यांच्या संस्थेकडून काहीही अपेक्षा नसतात. ते समपिर्त भावनेतून काम करतात. आपल्यावर उद्या काही आरोप होऊ नयेत म्हणून ज्यांनी ज्यांनी धर्मांतर केलं त्या सर्वांचे 'मी स्वेच्छेने धर्मांतर केले', असे संस्थेने फॉर्म भरून घेतले आहेत. धम्मदीक्षेचे कार्यक्रम आजही सुरू आहेत. मध्यंतरी साहित्यिक लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्तांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याचं आम्ही स्वागत करतो. त्यांनी स्वीकारलेल्या बौद्ध धम्मावर काहींनी टीका केली, हेतूबद्दल शंकाही उपस्थित केल्या. पण आम्ही त्यांच्या हेतूबद्दल शंका न घेता त्यांच्या कृतीचं समर्थन करतो. त्यांच्यासोबत जे दीक्षित झाले आहेत, त्या भटक्या विमुक्त समाजातील लोकांची सर्वांगीण शैक्षणिक, सामाजिक आणि आथिर्क प्रगती व्हावी म्हणून बौद्ध बांधवांनी प्रयत्नशील राहायला हवं. या व्यवस्थेने भटक्या विमुक्त समाजाला न्याय तर दिला नाहीच उलट त्यांना राहाण्याचं ठिकाणही नाकारलं. त्यांना कोणत्याही सामाजिक आणि आथिर्क प्रगतीचा लाभ झालेला नाही. ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यांनी आपली सामाजिक, आथिर्क, शैक्षणिक आणि राजकीय 'आयडेन्टिटी' निर्माण केली. त्याच आयडेन्टिटीशी आपली नाळ जुळली तर आपली सुद्धा प्रगती झाल्याशिवाय रहाणार नाही, असं लक्ष्मण मानेना वाटते. त्यांचं हे वाटणं शुद्ध स्वरूपाचं आहे, असं मी मानतो.
१९५६ ला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि इकडे काँग्रेसने जातीच्या आधारावर मिळणाऱ्या बौद्धांच्या सवलती बंद केल्या. धम्मदीक्षेच्या विरोधात वातावरण निर्माण केलं गेलं असताही दीक्षेचे समारोह चालूच राहिले. नवीन पिढी उदयास आली, तिला 'बौद्ध' म्हणून राखीव जागेचा फायदा घेता येत नसे. त्यावेळी आम्ही अनेकांना नोकरी लागावी म्हणून बौद्धाचं 'हिंदूमहार' कसं करावं हे तंत्र शिकवत होतो. हे करीत असताना मनाला सतत टोचणी होती की, आपण चळवळीशी प्रतारणा करीत आहोत. हे बदललं पाहिजे असं सतत वाटायचं. काँग्रेसने काय केलं? तर तुम्ही धर्मांतरीत झालात, हे थांबवणं आमच्या हातात नसलं तरी तुम्हाला पुन्हा 'महार' बनवणं हे मात्र आमच्या हातात आहे, असं दाखवून दिलं आणि चळवळीचा मोठा अपमान केला. या अपमानातून बाहेर काढण्याचं काम विश्वनाथ प्रताप सिंगांनी केलं. माझी त्यावेळी कवाडे आणि गवई यांच्याशी चर्चा झाली होती। मी त्यांना एकच म्हणालो, की या पापात मी सहभागी नाही. तुम्ही दोघं त्या पापाचे भागीदार आहात. समाजाला थुंकायला लावलं आणि चाटायला लावलं काँग्रेसनं. तुम्ही त्यांच्याबरोबर आहात. उद्या व्ही. पी. सिंगांची सत्ता येईल, न येईल, पाच वर्षांमध्ये आमदार, खासदार होऊ किंवा न होऊ याची फिकीर नाही, पण या माणसानं बौद्धांच्या सवलती देण्यासाठी घटनादुरुस्ती करून आपल्याला पुन्हा स्वाभिमान दिला. बाबासाहेबांनी आपल्याला जो सन्मान दिला होता, तोच या माणसानं आपल्याला पुन्हा प्राप्त करून दिला. म्हणून काहीही झालं तरी माझ्याबरोबर एकही माणूस जरी आला नाही तरी एक निवडणूक मी त्यांच्याबरोबर जाईन. मी त्यावेळी ठाम भूमिका घेतली. त्या पूवीर्च्या गेल्या चाळीस वर्षात प्रत्येक हॅण्डबीलवरची पहिली मागणी कोणती होती? तर बौद्धांच्या सवलतीची! ती सोडवणाऱ्याच्या पाठीमागे जाणार नसाल आणि ज्यांनी थुंकी चाटायला लावली त्यांच्यामागं जाणार असाल तर माझ्या मते तो सर्वात मोठा 'वैचारिक भ्रष्टाचार' आहे. निदान मी तरी तो करणार नाही, हे माझ्यापुरतं मी ठरवलं. प्रश्ान् चळवळीच्या विश्वासार्हतेचा आहे. सत्ता म्हणजे सर्वस्व आणि आपण सत्तेसाठीच राजकारण केलं पाहिजे ही जी काही चुकीची संकल्पना समाजामध्ये रूढ झालेली आहे, ती आपण बदलणं आवश्यक आहे. गवई १५ वर्षं सत्तेत होते, नव्हे स्पीकर होते. तरीही त्यांना कधी बौद्धांच्या सवलतीचा प्रश्ान् सोडवता आला नाही. दादासाहेबांनी भूमिहीनांचा सत्याग्रह केला नसता आणि डाव्यांनी मदत केली नसती तर कदाचित महाराष्ट्र शासनानंही हा प्रश्ान् सोडवला नसता. तेलंगणाची चळवळ बिहारपर्यंत येऊन थडकली होती. तेलंगणा ते औरंगाबाद, औरंगाबाद ते नगर, नगर ते नाशिक, नाशिक ते दिंडोरी आणि दिंडोरी ते सुरत असा या चळवळीचा प्रवास सुरू होता. याला ब्रेक लावायचा असेल तर त्यातून बौद्धांना बाहेर काढा, हे सूत्र यशवंतराव चव्हाणांना समजलं होतं. त्यामुळे १९६० मध्ये त्यांनी भूमिका घेतली की, घटनाबाह्य असेल तर असेल पण मी महाराष्ट्रापुरत्या बौद्धांना सवलती देतो. डाव्यांबरोबर ज्यावेळी दादासाहेब गेले त्यावेळी त्यांनी अँन्टी काँग्रेस राहूनच महाराष्ट्रापुरता बौद्धांच्या सवलतींचा प्रश्ान् सोडवला.
केंदामध्येसुद्धा बौद्धांचा प्रश्ान् अँन्टीकाँग्रेस राहूनच सोडवता आला। आजची रिपब्लिकन चळवळ एकजातीय दिसते. पण बाबासाहेबांनी आपल्या चळवळीला कधीही एकजातीय बनू दिलं नव्हतं. १९३७ साली स्वतंत्र मजूर पक्षाने विधानसभेसाठी स्पृशास्पृश्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यापैकी अनंतराव चित्रे, भाऊसाहेब गडकरी, शामराव परुळेकर या स्पृश्य उमेदवारांनी विजय मिळविला होता. पण आज मायावती कांशीराम यांनी आम्हीच हा पहिला प्रयोग केला आणि करतोय, असे दावे ठोकले. महाराष्ट्रात आम्ही भारिप-बहुजन महासंघाच्या माध्यमातून बहुजन राजकारणाला गती देऊन यशस्वी केलंय. आदिवासी, बंजारा, धनगर, कोळी समाजाचं नेतृत्व आम्ही विधानसभेत पाठवलं. स्थानिक स्वराज्य संस्थेत तर आम्ही 'मायक्रोस्कोपिक' कम्युनिटीलाही सत्तेत नेऊन बसवलं आहे. मूळात आज ज्या चळवळी आहेत त्या स्वत:च्या व्यक्तिगत स्वार्थासाठी उभ्या राहिल्या आहेत. रामदास आठवले यांनी आथिर्क निकषांवर आधारित आरक्षण देण्यासाठीच्या जाहीरनाम्यावर सही का केली? पंढरपूरमधून स्वत:ला खासदार व्हायचंय म्हणून? म्हणजे एका पंढरपूरच्या सीटसाठी चळवळीशी प्रतारणाच नाही, तर आंबेडकरी चळवळीशी फारकत घ्यायची वेळ आली तरी चालेल. संपूर्ण आंबेडकरी समाजाला मी मूर्ख बनवू शकतो, या भावनेतूनच हा विश्वास आला आहे. आता गवईंच घ्याना. काँग्रेसने त्यांना एवढं वापरलं आणि आता जाता जाता गव्हर्नर केलं. ते गव्हर्नर झाले त्यात आनंद आहे मला; पण त्यांच्या गव्हर्नरशीपचा समाजाला काय फायदा आहे? चळवळीचे कोणते प्रश्ान् सुटले? समाजाचे काय प्रश्ान् सुटले?
१९६५ च्या निवडणुकीत बिगर काँग्रेसी सरकार आलं। उत्तर प्रदेश आणि पंजाब या दोन राज्यात आर. पी. आय.चा सहभाग होता. महाराष्ट्रातील चळवळ काँग्रेसच्या दावणीला बांधल्यामुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली तीच परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये बी. पी. मौर्य काँग्रेसमध्ये गेल्यानंतर झाली होती. नेतृत्त्वहीन झालेल्या समाजाला कांशीरामांच्या निमित्ताने नेता मिळाला. त्या नेतृत्वाच्या पाठीमागं तो राहिला आणि पुन्हा सत्तेत गेला. त्यामुळे ते जे त्यांचं यश सांगतात ते त्यांचं नाही. मुळात ती भूमी बाबासाहेबांनी आणि त्यावेळच्या कार्यर्कत्यांनी सुपीक केली होती. त्यामध्ये बी. पी. मौर्यांचासुद्धा सहभाग होता. म्हणून त्यांना चरणसिंग सरकारच्या वेळी खासदार होता आलं, सत्ता मिळवता आली. तोच नेता काँग्रेस पक्षात गेल्यानंतर नेतृत्वहीन झालेल्या चळवळीला नेतृत्व मिळालं, ते बाबासाहेबांचं होतं. मग ते आर. पी. आय.चं होतं की बी. एस. पी.चं होतं याची समाजानेने पर्वा केली नाही. तो समाज सत्तेत गेला.
कांशीराम आणि मायावती हे केव्हाही आंबेडकरवादी नव्हते। कांशीराम यानी जो विचार मांडला तो करुणेचा नव्हता तर द्वेषाचा होता. ते नेहमीच म्हणत, जे खाली आहेत, त्यांना वरती आणायचं आहे आणि जे वरती आहेत त्यांना खाली आणायचं आहे. त्यातून त्याना कायम एक संघर्ष अपेक्षित होता. त्या दोघांनीही स्वत:ची चळवळ उभी करण्यासाठी बाबासाहेबांचा वापर केला. आणि बाबासाहेबांच्या नावाने त्यांनी आपली स्वत:ची 'थिअरी' मांडली. पुणे कराराचा धि:कार हा त्यातला त्यांचा आवडता कार्यक्रम. ब्रिटिशांच्या राजवटीत स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन होणार आणि त्यामार्फत विकासाच्या कामांना सुरूवात होणार आणि नेमक्या अशा वेळी मागासवगीर्य प्रतिनिधी निवडून आले पाहिजेत, या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. या मागणीला म. गांधींनी विरोध केला. नंतर समझोता होऊन पूनापॅक्ट निर्माण झाला. या पुनापॅक्टचा धिक्कार करणारा कार्यक्रम बीएसपीकडून आखला जातो. भारताला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, मी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडतो, असं जाहीर केलं. त्याची त्यांनी कारणंही दिली. बाबासाहेब म्हणाले, 'आम्हीच उद्याचे राज्यकतेर् आहोत. तेव्हा त्या राज्यामध्ये आपलं वेगळेपण ठेवण्यापेक्षा, अलिप्ततावादी राहाण्यापेक्षा त्या व्यवस्थेत सामील होऊन त्याचं नेतृत्व करण्याची संधी आपण घालवून देता कामा नये.' आज कांशीराम आणि मायावतीचे अनुयायी याच पुनापॅक्टचा विरोध करीत आहेत. ज्या पुनापॅक्टमुळे शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण लागू झालं. त्याचा धि:कार करायचा असेल तर त्यांनी या कराराच्या माध्यमातून मिळालेल्या शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं जे आरक्षण मिळतंय त्याचा त्याग करावा, असं आवाहन आपल्या अनुयायांना का केलं नाही? पुनापॅक्टचा फक्त राजकीय संदर्भ घेऊन त्याचा निषेध करणं याचाच अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुनापॅक्टचे 'व्हिलन' आहेत, असं चित्र ते उभं करू पाहात आहेत. अशी अनेक उदाहरणं आणि त्यांचा कार्यक्रम यामार्फत ते बाबासाहेबांना 'रिप्लेस' करून कांशीराम यांना मोठं करू पाहात आहेत. उत्तरप्रदेश सरकारच्यावतीने मुख्यमंत्री मायावतींनी जो कार्यक्रम घोषित केला, त्यामध्ये बारापैकी अकरा योजना कांशीरामांच्या नावाने व फक्त एक योजना माता रमाईच्या नावाने दिसते. उत्तरप्रदेशातील आंबेडकरपार्कचा प्रचार मायावती यांनी इतर राज्यात तसंच उत्तर प्रदेशातील निवडणुकीत वापरला आणि मतांची गणित मांडली. त्याच मायावतींनी आंबेडकरपार्कचं रूपांतर कांशीराम पार्कमध्ये धडाक्याने सुरू केलंय. त्यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'रिप्लेस' करण्याचं काम जोरात सुरू आहे.
भारतीय राजकारणात आता एक व्यक्ती आणि त्याची 'लिडरशिप' मान्य होणार, अशी काही परिस्थिती नाही. लोक, आता मी या जातीचा आहे, असं म्हणत नाहीत तर मी अमुक समाजाचा आहे, असं म्हणतात. देशाच्या एकतेसाठी ही 'फेज' मी चांगली मानतो. परंतु देशाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींसाठी ही अत्यंत वाईट बाब आहे. जातीतून समाजाकडे होणारं परिवर्तन हे संघर्षमय परिवर्तन आहे. या संघर्षमय परिस्थितीत ज्याला कुणाला अंतविर्रोध सांभाळता किंवा कमी करता येतील अशांचं नेतृत्व टिकून राहील. यामध्ये उपेक्षित समूह, दलित समूह यांना आपण सत्तेवरती आलो पाहिजे, ही इच्छा आहे. आणि त्यासाठी पहिल्यांदा ते काहीही करण्यास तयार आहेत, जे आज आपल्याला उत्तरप्रदेशमध्ये दिसतंय. जेव्हा या उत्तरप्रदेशातील उपेक्षित आणि दलित समूहाला कळून चुकेल की आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही, तेव्हा ते बाहेर पडलेले असतील आणि ते नव्या पर्यायाच्या शोधात असतील. हा जो संघर्षमय काळ आहे तो बोटीतल्या तुटलेल्या होकायंत्रासारखा आहे. ही बोट भरकटत आहे. पंतप्रधानपदाचं स्वप्न बघणारे आणि दाखवणारे यांच्याकडे नवीन होकायंत्र नाही. हे जे 'पोलिटिक्स ऑफ ग्रिमिक्स' आहे, ते फार काळ चालणार नाही. तेव्हा मायावतींनी पंतप्रधान झाल्यावर मी बौद्ध धम्माची दीक्षा घेईन, असं म्हणणं म्हणजे, दीक्षांतरित लोकांना आकषिर्त करण्यासाठी दाखवलेलं गाजरच होय.
- प्रकाश आंबेडकर

हे महाप्रतिभावंता...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना वाहिलेली काव्यांजली ....
अहं ब्रह्माास्मि।
अस्मिन सस्ति इदं भवति।
सतत चालले आहे महायुद्ध
आत्मवादी-अनात्मवादी यांत।
- म्हणे बीजातून फुटतो अंकूर
म्हणे बीज होते म्हणून अंकूर फुटला
अविनाशी दव्याचे पाठीराखे कुणी
कुणी सर्व काही क्षणिकमचे पाठीराखे
महाप्रतिभावंता
मी शिकलो आहे तुझ्याकडून
दु:खाचे व्याकरण जाणून घ्यायला
सर्व दु:खाचे मूळ तृष्णा
कुठून जन्मास येते,
केव्हा तिचा क्षय होतो ते।
सरकतो आहे माझ्या डोळ्यांसमोरून
मनुष्यजातीच्या उत्क्रांतीचा प्रागैतिहास।
दृष्टांत देणारी उत्क्रांत माणसांची रांग
विहंगम-
आणि एक बुटका केसाळ माकडसदृश्य
त्याच्यानंतर दुसरा
त्याच्यानंतर तिसरा-
शून्ययुगापासून आण्विकयुगापर्यंत
चालत बदलत आलेली माकडं की माणसं?
करून जातायत माझं मनोरंजन।
प्रतीत्य समुदायाच्या पक्षधरा,-
आता कळतो मला अष्टोदिकांचा अर्थ
काय असतात दहा अव्याकृते
आणि बारा निदाने
काय असते निर्वाण-
निर्वाण तृष्णेचा क्षय : दु:खाचा क्षय
क्षणिकम आहे दु:ख; क्षणिकम आहे सुख
दोन्ही अनुभव अखेर विनाशीच.
बीज आधी की अंकूर
बीज होते म्हणून अंकूर निर्माण झाला
या गहनचर्चा माझ्या
जिज्ञासेला डिवचतात
धावती ट्रेन माझ्या सामान्य आयुष्याची
मला प्रेषितासारखं बोलता येत नाही
फक्त दिसतं पुढचं
भविष्यातलं नाही, वास्तवातलं
स्वप्नातलं नाही, वर्तमानातलं
माणसाची प्रतिमा अधिक उजळ करणाऱ्या
महापरिनिर्वाणोत्तर तुझं अस्तित्व
जागृत ज्वालामुखी होऊन बरसते आहे
आमच्यावर झिमझिम पावसासारखे
उत्स्फूर्त लाव्हाचं उसळतं कारंजं
ठिणगी ठिणगी फूल झालेलं
काळाच्या महालाटेवर बसून
कलिंगचं युद्ध हरलेला येतो आहे
आमच्यापर्यंत.
त्याच्या अंगावरली काषायवस्त्रे
सूर्यकिरणांनी अधिक गडद केलेली.
काळ किती विरोधी होता आमुच्या
काळाचे किरमिजी जावळ पकडून
तू बांधून टाकलेस त्याला
आमच्या उन्नयनाला
अंतर्यामी कल्लोळाला साक्षी ठेवून
तुझे उतराई होणे हीच आमची
जगण्याची शक्ती
***
फुलांचे ताटवे झुलताहेत नजरेसमोर
बहरून आलीयेत फुलाफळांची शेतं
या फुलांवरून त्या फुलांवर विहरत
राहणारी फुलपाखरं
चतुर उडते -पारदशीर् पंखांचे- फुलाफांदीवर
लँडिंग करणारे-
काय त्यांची निर्भर ऐट- झुलत्या फुलांवर अलग थांबण्याची-
रंगांची पंचमी फुलपाखरांच्या पंखांवर चितारलेली
अमूर्ताची चिरंजीव शैली- डोळ्यांना रिझवणारी
किती किती प्रयोग चित्रविचित्र रंगमिश्रणाचे
चतुर हवेला खजिल करत अधांतरी तरंगणारे
आम्ही -मी झालो आहे धनी - या गडगंज ऐश्वर्याचे
अहाहा -झिंग चढली आहे ऐहिकाला
नेमका हाच आनंद भोगता आला नाही-
माझ्या बापजाद्यांना
संस्कृतीच्या मिरासदारांनी केला त्यांच्यावर अत्याचार
- आणि केला अनन्वित छळ
छळाच्या इतिहासाची सहस्त्रावधी वर्षं
माझ्याही पिढीने यातले सोसले पुष्कळसे
आमचे नारकीय आयुष्य संपवून टाकणाऱ्या
आकाशातील स्वर्ग तू आणलास
आमच्यासाठी ओढून पृथ्वीवर
किती आरपार बदलून गेलं माझं माझ्या लोकांचं साक्षात जीवन.
आमच्या चंदमौळी घरातील मडकी गाडगी गेलीयत- माणिक मोत्यांनी भरून
रांजण- भरून गेलेयत पाण्याने
कणग्या भरून गेल्यायेत
अन्नधान्यांनी ओतप्रोत.
दारिद्याचे आमचे शेतही गेले आहे
कसदार पिकाने फुलून
गोठ्यातील जनावरेसुद्धा आता नाही उपाशी मरत
श्वान आमच्या दारातले इमानी
भाकरीसाठी नाही विव्हळत।
बळ आले तुझ्यामुळे आमच्या शिंक्यातील भाकरीला
आता भूकेचा दावानल नाही आम्हाला सतावीत.
चिमण्यांचा गोतावळा वेचीत राहतो
विश्वासाने दारात टाकलेले दाणे.
धीट चिमण्यांनी बांधले आहे आमच्या
घराच्या आढ्याला घरटे
खाली घरकारभारीण शिजवते आहे
चुलीवर रोजचे अन्न.
जळत्या ओल्या सुक्या लाकडांना
घालते आहे फुंकर फुंकणीने
तिचे विस्कटलेले केस आणि डोळ्यातले सुखीप्रंपचाचे अश्रू
घरट्यात जन्म घेऊ लागलीत रोज नवी पिल्ले
मांसाचा चिंब चिंब आंधळा गोळा
पुकारतो आहे आपल्या आईला.
अगं, चिमणीबाई बघ गं आपल्या पोराला
घरातील म्हातारी पाहते आहे संसार चिमण्यांचा
घरट्याबाहेर तरंगत लटकलेली
चिमणी नावाची आई
बाळाच्या चोचीत देते आहे चोच.
किती अवर्णनीय आनंदाचे धनी आम्हाला केलेस हे महामानवा-
कुठल्या उपमेने तुला संबोधू-
प्रेषित म्हणू - महापुरुष कालपुरुष!
किती उंच ठिकाणी आणून ठेवलेस आम्हाला
आम्ही आता नाही उकरत इतिहासाची मढी
सनातन शत्रूला आता सारे विसरून आम्ही लावले आहे गळ्याला-
वैरात वैर संपत नाही हे सांगणाऱ्या आधुनिक बोधीसत्ता-
ज्याला आदी नाही, अंत नाही अशा अंतरिक्षाला
जाऊन भिडणारे तुझे कर्तृत्व
कोण मोजणार उंची तुझी?
मी -आम्ही जगतो आहोत या संक्रमण काळात
तुझा सिद्धांत उराशी बाळगून
प्रागैतिहासिक माणसांच्या अवस्था मनात ठेवून
हा प्रतिसृष्टी निर्माण करणारा माणूस.
विध्वंस करायला निघालाय आपल्याच निमिर्तीचा-
हे आधुनिक बोधीसत्त्वा-
शक्ती दे मला या विध्वंसक्याला
वठणीवर आणायला.
कोणी काहीही समजो मला
तुझ्याविषयीची माझ्या मनातली श्रद्धा आहे अपार-
कोणी घेऊ देत शंका
अखेर माणूस शंकासूरच ना?
मी गुडघे टेकून तुझ्या चैतासमोर
या छोट्याशा विहारात
कबुली देतो आहे माझ्या सर्व गुन्ह्यांची
किती प्रसन्न वाटतं म्हणून सांगू?
पश्चिमेचा विश्रब्ध समुद वाहतो आहे शांत
मावळत्या सूर्याची काषाय किरणं-
ललामभूत करून सोडताहेत चराचराला-
हे माझ्या चैतन्या-
बोल एखादा तरी शब्द माझ्याशी-
मी शरण तुला..........

- नामदेव ढसाळ