मंगळवार, १३ जुलै, २०१०

कवचकुंडले!

विळीवर भाजी चिरताना कधी कधी घाईगडबडीत अचानक बोट कापते आणि त्यातून भळाभळा रक्त वाहायला सुरुवात होते, मग आपण रक्त वाहणारा हात/बोट थेट वाहत्या पाण्याखाली धरतो, रक्तस्त्राव थांबविण्यासाठी बोट तोंडात घालतो किंवा हळद चेपून रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न करतो. मोठा अपघात झाला किंवा गंभीर भाजण्याच्या घटनेतही मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव होतो. अशा वेळी पहिल्यांदा रक्तस्त्राव थांबविणे हे रुग्णाच्या जीवासाठी महत्त्वाचे असते. छोटी जखम असेल तर रक्तस्त्राव काही वेळाने आपोआप थांबतो, पण गंभीर जखम झाल्यास रक्तस्त्राव थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. आपल्या रक्तातील ‘प्लेटलेट्स’ रक्त गोठण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत असतात.त्यामुळे ‘प्लेटलेट्स’ म्हणजे आपल्या प्राणांसाठीचे कवचकुंडल आहेत.
‘प्लेटलेट्स’रुपी या कवचकुंडलांविषयी अधिक माहिती देताना नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात ‘निमा’च्या महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य डॉ. अभय कानेटकर यांनी सांगितले की, कोणत्याही गंभीर अपघातात किंवा भाजण्याच्या दुर्घटनेत तसेच डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस् यांसारख्या गंभीर आजारात प्लेटलेट्सची आवश्यकता भासते. आपल्या शरीरातील रक्तात हिमोग्लोबीन, कॅल्शिअम, पांढऱ्या आणि लाल पेशी, ऑक्सिजन असे अनेक महत्त्वाचे घटक असतात. तसेच आपल्या रक्तात ‘प्लेटलेट्स’ हाही एक महत्त्वाचा घटक असतो. रक्त गोठविण्याचे काम या ‘प्लेटलेट्स’ करीत असतात. एखादी जखम झाल्यास रक्तस्त्राव होतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये रक्तस्त्राव होण्याचा आणि तो थांबण्याचा काळ वेगवेगळा असतो. रक्तातील ‘प्लेटलेट्स’ हा घटक रक्त गोठविण्याचे (गुठळी तयार करण्याचे)काम करतो. जखमेच्या ठिकाणी प्लेटलेट्स एकत्र येतात आणि रक्तस्त्राव बंद होतो.
‘प्लेटलेट्स’साठी गोळ्या किंवा औषधे नाहीत
एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील हिमोग्लोबीन कमी झाले तर त्याला बाहेरून औषधे, गोळ्या किंवा इंजेक्शन देऊन त्याची पातळी वाढवता येते. तसेच कॅल्शियमच्याही गोळ्या किंवा इंजेक्शन देऊन ते वाढवता येते. मात्र रक्तातील ‘प्लेटलेट्स’ कमी झाल्या तर कोणत्याही गोळ्या, औषधे किंवा इंजेक्शन देऊन त्या वाढविता येत नाहीत. संबंधित व्यक्तीला त्या रक्तावाटेच द्याव्या लागतात, असे सांगून डॉ. कानेटकर म्हणाले की, रक्ताच्या तपासणीमध्ये अन्य घटकांप्रमाणेच ‘प्लेटलेट्स’चे प्रमाणही तपासता येते. सर्वसामान्य माणसाच्या शरीरात अडीच लाख इतक्या संख्येत ‘प्लेटलेट्स’ असतात, सुदृढ व्यक्तीसाठी ही संख्या आवश्यक असते. त्यापेक्षा प्रमाण कमी असेल तर ‘प्लेटलेट्स’ द्याव्या लागतात. काही वर्षांपूर्वी रक्तातून ‘प्लेटलेट्स’ वेगळ्या काढण्याचे तंत्र विकसित झालेले नव्हते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला रक्तातील फक्त ‘प्लेटलेट्स’ची गरज असली तरी त्याला संपूर्ण रक्त द्यावे लागायचे. मात्र आता तसे होत नाही. रक्तातील घटक वेगळे करणारी यंत्रणा ‘आयएसओ’ नामांकनप्राप्त रक्तपेढय़ांमध्ये असते. या ठिकाणी प्रयोगशाळेत रक्तातील ‘प्लेटलेट्स’ वेगळ्या काढून त्या वेगळ्या पिशवीत भरतात. त्यामुळे आता रुग्णाला फक्त ‘प्लेटलेट्स’ही देता येऊ शकतात.

एका पिशवीचा तिहेरी उपयोग
आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा रक्त जमा केलेली पिशवी रक्तपेढीत जमा केली जाते. या ठिकाणी रक्ताच्या प्रत्येक पिशवीतील लालपेशी (आरबीसी), हिमोग्लोबीन आणि ‘प्लेटलेट्स’ वेगळ्या केल्या जातात. हे तीन घटक वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरले जातात. त्यामुळे आता एका व्यक्तीने दिलेल्या रक्ताचा उपयोग तीन वेगवेगळ्या रुग्णांना होऊ शकतो. रुग्णाला ‘प्लेटलेट्स’ देण्याचे काम दोन प्रकारे होते. एक प्रकार म्हणजे रक्तपेढीत जमा झालेल्या रक्तातील वेगळ्या केलेल्या ‘प्लेटलेट्स’ ज्याला गरज आहे, त्याला देता येऊ शकतात. तर दुसरा प्रकार म्हणजे ‘प्लेटलेट्स’ दान (रक्तदान करण्याप्रमाणे ‘प्लेटलेट्स’ही दान करता येतात) करणाऱ्या दात्याच्या रक्तातून थेट ‘प्लेटलेट्स’ काढल्या जातात आणि त्या लगेच संबंधित रुग्णाला दिल्या जातात. रुग्ण आणि ‘प्लेटलेट्स’दाता हे एकाच वेळी रुग्णालयात हजर असतात. ही यंत्रणा डायलेसिस्सारखी असते. दात्याच्या रक्तातून काढलेल्या ‘प्लेटलेट्स’ रुग्णाच्या रक्तात मिसळल्या जातात.

‘प्लेटलेट्स’ची गरज
गंभीर अपघात, भाजणे यांसारख्या दुर्घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव होत असतो. अशा वेळी रक्तस्त्राव थांबवणे ही पहिली गरज असते. त्यासाठी प्लेटलेट्सची आवश्यकता भासते. डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस् यांसारख्या आजारात प्रतिजैविके देऊन ताप बरा केला जातो. मात्र ताप उतरला तरी रक्तातील ‘प्लेटलेट्स’ कमी होत असतात. कमी झालेल्या ‘प्लेटलेट्स’ कोणतीही औषधे किंवा इंजेक्शनने भरून निघत नाहीत. त्यासाठी थेट रक्तातील ‘प्लेटलेट्स’चे प्रमाण वाढविण्याची गरज असते. रुग्ण बरा होऊन घरी गेला आणि एखाद्या अपघातात तो जखमी झाला, तर रक्तस्त्राव होऊन त्याच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा रुग्णांना ‘प्लेटलेट्स’ची अत्यंत गरज भासते. रक्तदानाप्रमाणेच ‘प्लेटलेट्स’ दानही करता येऊ शकते. मात्र त्याचा मोठय़ा प्रमाणात प्रचार होण्याची गरज असून ‘प्लेटलेट्स’ दान करणाऱ्या दात्यांच्या संख्येत वाढ होणे आवश्यक आहे. त्यामुळे आता रक्तदान करणाऱ्यांप्रमाणेच ‘प्लेटलेट्स’ दान करण्यासाठी मोठय़ा संख्येने व्यक्तींनी पुढे यायला हवे, अशी अपेक्षाही डॉ. कानेटकर यांनी व्यक्त केली.
- शेखर जोशी

सोमवार, २१ जून, २०१०

दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते.

दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पिणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही


सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पेग पाशी गाडी अडते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते...


पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
विचारवंतांची गोलमेज परीषदच भरते
रात्री दिलेला शब्द प्रत्येक व्यक्ती
सकाळच्या आत विसरते


मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पेग बनवणारा त्यदिवशी
जग बनवणार्‍यापेक्षा मोठा असतो


स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाची फेरी घडते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते...


पिण्याचा कार्यक्रम म्हणजे पिणार्‍याला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पिण्याच्या क्षमतेवर श्रद्धा असते


आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात


शेवटी काय
दारु दारु असते
कोणतीही चढते...

पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते

पिणार्‍यामध्ये प्रेम हा
चर्चेचा पहिला विषय आहे
देवदासचे खरे प्रेम 'पारो की दारु '
याचा मला अजून संशय आहे


प्रत्येक पेग मागे तीची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते


तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भिडते...

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !


चुकून कधीतरी गंभीर विषयावरही
चर्चा चालतात
सगळे जण मग त्यावर
P.HD. केल्यासारखे बोलतात


प्रत्येकाला वाटते की त्यालाच
यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनिवडणूकीकडे वळते


जसा मुद्दा बदलतो
तशी आवाजाची पातळी वाढते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !

फेकणे, मोठेपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सिंगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही


पैशे पैशे काय आहे ते फक्त
खर्च करण्यासाठीच असतात
पेगजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात


रात्री थोडी जास्त झाली
की मग त्याला कळते

पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !

यांच्यामते मद्यपान हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पिण्यामागे सायन्स
तर देशी पिण्यामागे आर्ट आहे


यामुळे धीर येतो, ताकद येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्यभराची मवाळ व्यक्ती
त्या क्षणी राजा असते

दारुमुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते...


परंतु दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते !!!

मंगळवार, ८ जून, २०१०

रोज नवं आव्हान

करिअर निवडीसाठी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शनपर अशा 'महाराष्ट्र टाइम्स एचएससीनंतर काय?' या उपक्रमांतर्गत वाशी इथल्या आयसीएलई या कॉलेजमध्ये
पत्रकारिता क्षेत्रातील करिअर संधींची माहिती देणारं सेमिनार नुकतंच झालं. यावेळी 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक दिवाकर देशपांडे आणि 'स्टार माझा'चे न्यूज अँकर मिलिंद भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

......

प्रिण्ट मीडिया :

पूर्वी पत्रकारितेला समाजसेवेचं स्वरुप होतं. पण, आता पत्रकारिता एक व्यवसाय झाला आहे. वृत्तपत्र तसंच नियतकालिकांच्या वाढत्या संख्येमुळे या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.

आवश्यक कौशल्य :

विद्यार्थ्यांनी अंगी असलेल्या गुणांचा वापर करिअर घडवण्यासाठी केला पाहिजे. भाषेची, लिखाणाची तसंच वाचनाची आवड असेल, तर तुम्ही पत्रकारिता क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करू शकता. प्रिण्ट जर्नलिझममध्ये (वृत्तपत्र, मासिकं, नियतकालिकं) संपादकीय आणि तांत्रिक असे दोन विभाग असतात. संपादक, उपसंपादक, वार्ताहर, छायाचित्रकार अशी कामाची वर्गवारी यात असते.

या क्षेत्रात काम करताना उत्तम निरीक्षणशक्ती, अचूकता, भाषेची जाण यासारखे गुण अंगी असावे लागतात. यासाठी वाचन सगळ्यात महत्त्वाचं असतं. भाषा आणि विचार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरील वाचन करावं लागतं. संपादकीय विभागाबरोबरच तांत्रिक विभागाचं कामही जबाबदारीचं असतं. पेपरचा खप, डिझायनिंग, फोटो प्रोसेसिंगसारखी तितकीच महत्त्वाची कामं इथे करावी लागतात. त्याचबरोबर आपल्या इण्डस्ट्रीची माहिती असावी लागते.

संधी :

पत्रकारिता फक्त वृत्तपत्रांमध्ये नसून वेगवेगळ्या मासिकांसाठीही करता येऊ शकते. मराठी भाषेमध्ये अनेक साप्ताहिकं तसंच नियतकालिकं निघतात. स्पर्धा वाढल्यामुळे मासिकांसाठी काम करताना चांगला पगारही मिळतो. फ्री लान्सिंग पद्धतीने एकाच वेळी वेगवेगळ्या वृत्तपत्रांसाठी तसंच मासिकांसाठी लिखाणाचं काम करता येतं. केवळ ग्लॅमर म्हणून या क्षेत्रात येण्याची इच्छा ठेवू नका. मेहनत करण्याची तयारी असेल तरच पत्रकारितेचा विचार करा.

इलेक्ट्रॉनिक मिडिया :

गेल्या काही वर्षांमध्ये न्यूज चॅनेल्सच्या वाढत्या संख्येमुळे इलेक्ट्रॉनिक जर्नलिझममध्ये करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या ग्लॅमरस क्षेत्राकडे अनेक मुलं-मुली आकषिर्त होत आहेत. पण, इथे प्रचंड संघर्ष आणि मेहनत आहे हेही तितकंच खरं आहे.

इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे घड्याळाशी स्पर्धा असते. सतत एकसारख्याच उत्साहाने बोलता आलं पाहिजे. यासाठी अनेक विषयांचा अभ्यास आणि प्रभावीपणे बोलण्याचा सराव गरजेचा असतो. न्यूज अँकरिंगसाठी विविध क्षेत्रांतील मूलभूत माहिती असावी लागते. शुद्ध भाषा आणि स्पष्ट शब्दोच्चार हे न्यूज अँकरिंगसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. समोर स्क्रीनवर बातमी दिसत असली, तरी ती वाचायची नसते तर सांगायची असते. त्यामुळे गोष्टीसारखी (स्टोरी टेलिंग) बातमी सांगता आली पाहिजे. रिपोटिर्ंगसाठी एखाद्या घटनेचा मागोवा घेणं, सहनशीलता तसंच चौकसपणा अंगी असावा लागतो. बातमीचा गाभा आणि घडलेली घटना कथन करता आली पाहिजे. वृत्तवाहिन्यांमध्ये काम करण्यापूवीर् वृत्तपत्रांमध्ये काम केल्यास हे गुण विकसित होतात.

न्यूज रिपोर्टर तसंच अँकर याव्यतिरिक्त अनेक जागांवर काम करता येतं. कॅमेरामन, व्हिडीओ एडिटर, अॅनिमेटर, व्हिडीओ लायब्ररियन अशा पदांवरही जबाबदारीने काम करावं लागतं. अनेक न्यूज चॅनेल्सची स्वत:ची व्हिज्युअल लायब्ररी असते. ती सांभाळण्यासाठी नीटनेटक्या अशा माणसाची गरज असते. तुमच्याकडे जर व्यवस्थितपणा असेल, तर या पदावर तुम्ही काम करू शकता. अनेक वेळा एखाद्या घटनेचे व्हिज्युअल्स उपलब्ध नसतात. अशा वेळी ग्राफिक्स तयार करण्याचं काम अॅनिमेटरचं असतं. त्यामुळे अॅनिमेशनचं प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठीही न्यूज चॅनेल्समध्ये संधी आहेत. व्हिडीओ शुटिंगनंतर तो एडिट करणं महत्त्वाचं असतं. एडिटिंगची आवड असणाऱ्यांसाठी वृत्तवाहिन्यांमध्ये एडिटरची जागा आहे. शूट केलेला व्हिडीओ कमीत कमी वेळात अचूकपणे एडिट करणं जबाबदारीचं आणि महत्त्वाचं असतं.

जर्नालिझमचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था :

बारावीनंतर बीएमएम अभ्यासक्रमाचं शिक्षण विद्याथीर् घेऊ शकतात. त्याचप्रमाणे पदवीनंतर मास्टर्स तसंच डिप्लोमाचे कोसेर्स असणाऱ्या अनेक संस्था आहेत.

पत्रकारिता आणि संज्ञापन विभाग, मुंबई विद्यापीठ

रानडे इन्स्टिट्यूट, पुणे

डिप्लोमा कोर्सेस :

गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेण्ट
झेविअर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स, झेविअर्स कॉलेज

आई, असं का ग केलंस?

( मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र.. )
उरिया भाषेतील लेखक...श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना. त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून ते दृश्य आणि त्या अकाली फेकून दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि त्या आईलाच एक पत्र लिहिलं......उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी. ( सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतून आज हे पत्र इथे पोस्ट करतांना फक्त हीच विनंती आहे कि हे पत्र कॉपी करून शक्य तितक्या लोकांपर्यंत email करून पोचवा....
हे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी "सार्थक" झाले असे मी समजेन.....हे पत्र पोस्ट करायची हि जागा आहे का नाही मला माहित नाही...चुकल्यास क्षमा असावी. आणि पुन्हा एकदा हे पत्र शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा हि विनंती. )


आई, असं का ग केलंस?
का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस?
मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस.
तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता झाला मला.
माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्त तुझ्याचमुळे ग.
आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि रडू नकोस.
आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.

तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.
राजाभाईची छोटी बहिण येणार आहे.

तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.
भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात असूनही मी त्याला हळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने ढकलत असे. मला लागायचं.
तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच असते!

कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखी ठेव.
ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली आहे.
मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ" आहे,
जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.

माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा, तुला बघण्याचा!
एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास सोसल्यावर तुझा जन्म झाला.
मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....

त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या आईला बघण्यासाठी मला अजून
सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....

मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर पडलात.
रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग तू पप्पांना
गाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती काळजी वाटते,
हे पाहून मला किती बर वाटल होत.

दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,
तेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,
"मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."

थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो पप्पा नावाचा माणूस म्हणाला,........
"सर, अबोर्शन करा..."
डॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."
मी पोटामध्ये खिदळत होते.

दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणे जाऊन सुखरूप घरी येऊ दे."

मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या मोठ्या आईला म्हणाले,
की माझ्या आईला लवकर बर कर....

नंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....

आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.
मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला.
आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत जायचं आहे.
राजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.
आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्या कानाशी म्हण....
'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....'
............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच.........
------

"मी तुझ्याबरोबर खेळतो
तेच मुळी हरण्यासाठी
तुझ्या गालावरल्या खळीत
हसु भरण्यासाठी...!!!! "

गुरुवार, ६ मे, २०१०

गरीब मुलगा

शाळेने पत्रक काढलं,'यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे,तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल!
आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे,खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक विजार,एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात.गरीब मुलगा शोधायचा कसा?आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं,तुमच्यात कोण गरीब;तेही सर्वात गरीब म्हणून?! मोठीच अडचण होती.तीन-चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे;पण लहान मुलांमधे अडचणीचं. शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं,जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची.मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं,"मला एक मदत कराल का?आपल्या वर्गातला सर्वात गरीब .......?" क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले,"सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं,तो सर्वात गरीब आहे."
मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता. "कशावरून म्हणता?" "सर.त्याचा सदरा दोन-तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय.त्याने शिवलाय;पण फ़ाटलेला शर्ट घालतो. त्याची खाकी पॅंट तर नीट बघा,मागून दोन ठिगळं लावलेली आहेत.चपला त्याला नाहीतच.मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो.तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो.सर,ती भाकरीही कालचीच असते.भाजी कुठली सर?गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो,तो सर्वात गरीब आहे.शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी." मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली.पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते. मयूर एवढा गरीब असेल?की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत?
कारण, मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ,मोकळं होतं.त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं,"पाहिलंस!हे सातवीतल्या मुलाचे अक्षर.असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते.उत्तराल सुबक परीच्छेद,समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे........." चे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत यॆई.माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे. असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये,या गोष्टीचीच मला खंत वाटली. जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो......अरेरे!...,मी खूप कमी पडतोय. मयूर,गेल्या सहलीला आला नव्हता.अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती;पण त्याचं नाव यादीत नव्हतं.आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही. असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती.केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Park बघण्याचे राहून गेले.एका छान अनुभवाला मुकला होता तो. हा आनंद मी हिरावला होता.यादीत मयूरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? मयूर स्वत:हून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता!
शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो.खरंच आहे,मुलांनी सुचवलेलं नाव.आर्थिक मदत,तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी. आता शंकाच नव्हती.त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन टाकले.'मयूर जाधव,सातवी अ,अनुक्रमांक बेचाळीस' डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले, "खात्री केलीये ना सर?कारण थोडीथोडकी रक्कम नाही.या विद्यार्थ्याची वर्षाची फ़ी,त्याचे शालेय शिक्षण साहित्य,गणवेश...इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे." मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं, "सर,त्याची काळजीच करू नका.वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर-मयूर जाधवच आहे !" एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो. मयूरला मिळणारी मदत,त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही. दुस~या दिवशी शाळेत लवकरच गेलो.देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता.त्यावर 'गरीब असूनही आदर्श' असं म्हणून मयूरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो.इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला. त्याच्या चेह~यावरचा भाव समजत नव्हता.राग आवरावा तसा करारी चेहरा...
"सर,रागवू नका;पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका."
"अरे,काय बोलतोयस तुला समजतय का?"
"चुकतही असेन मी.वाट्टेल ती शिक्षा करा;पण ते नाव ...!!"
त्याच्या आवळलेल्या मुठी,घशातला आवंढा,डोळ्यातलं पाणी ......
मला कशाचाच काही अर्थ लागेना. मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत,तो असा.....? "सर,मला मदत कशासाठी?गरीब म्हणून?मी तर श्रीमंत आहे."

त्याची रफ़ू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती.येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते.
शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती.
"अरे पण....?"
"सर,विश्वास ठेवा.मी श्रीमंत आहे.कदाचित सर्वात श्रीमंत असेन...सर,मी गरीब आहे हे ठरवले कोणी? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला;पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज."
अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले. त्याला उठवत मी म्हणालो,"ठीक आहे.तुला नकोय ना ती मदत,नको घेऊस;पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय?"
"सर,माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा,कुठल्याही विषयाच्या....त्या पूर्ण आहेत.पुस्तकं मी Second Hand वापरतोय...खरयं! पण मजकूर तर तोच असतो ना ? मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का?सर,माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत.

सर...सर,सांगा ना,मी गरीब कसा?"मयूर मलाच विचारत होता
आता मघाचचं दु:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं.
"खरयं मयूर.पण तुला या पैशाने मदतच ......."
"सर,मदत कसली?माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल.शाळाच फ़ी देतीये म्हटल्यावर,मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन ! "
"म्हणजे?"
"वडील घरांना रंग द्यायचे काम करतात.Contractor बोलावतो तेव्हाच काम मिळते.तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात.चार पैसे मला मिळतात,ते मी साठवतो.सर,संचयिका आहे ना शाळेची,त्यातलं माझं पासबुक बघा.पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात...मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले दिसते.....म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं.पण सर,मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे.घरातले सगले काम करतात.काम म्हणज कष्ट.रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात.आई धुणं-भांडी करते.मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते.सर,वेळ कसा जातो,दिवस कसा संपतो ते कळतच नाही....शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत.तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी.सर,माझ्या घरी याच तुम्ही,माझ्याकडे पु.ल.देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे. .
.......सर,आहे ना मी श्रीमंत?"
आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता.

सर,शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो.रात्री देवळात होण्या~या भजनात मीच पेटीची साथ देतो.भजनीबुवा किती छान गातात!ऐकताना भान हरपून जातं."त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता.
अभावितपणे मी विचारलं,"व्यायामशाळेतही जातोस?" "सर,तेवढी फ़ुरसत कुठली?घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो." अंगावर एक थरार उमटला...कौतुकाचा.
"मयूर मित्रा,मला तुझा अभिमान वाटतो.तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा.."

"म्हणूनच म्हणतो सर......!"
"हे नाव ज्या कारणासाठी आहे,त्यात तू नक्कीच बसणार नाहीस.आमची निवड चुकली;पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल.शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून,हे पारितोषीक तरी........."
"सर,एवढ्यात नाही.त्याला वर्ष जाउ द्या.मी लिंकनचं,सावरकरांचं चरित्र वाचलं,हेलन केलरचं चरित्र वाचलं.सर,हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली.माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या,योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा;पण सर,नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल.जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल...सर.....प्लीज.....!"

वाचनानं,
स्पर्धांतल्या सहभागानं,
कलेच्या स्पर्शानं,
कष्टानं.......
त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती,
संस्कारामुळे नम्रतेची झालर होती.
आता मला माझ्या समोरचा मयूर जाधव स्पष्ट दिसतही नव्हता.
त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते.
शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता.
परिस्थिती पचवून,परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा !
श्रीमंत ! सर्वात श्रीमंत

बुधवार, २८ एप्रिल, २०१०

आयुष्यात प्रेम करायचय मला ...

दूर कुठेतरी समुद्रकिनारीहातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघतानाभविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

माझ्या मांडीत डोक ठेऊनतिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहातानास्वतःशी स्मित करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुनतिला रागाने लालबुंद करायचय मला,
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

आयुष्यातील तिचा हिमालयतिच्या बरोबरीने चढायचाय मला,
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंदतिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

ति माझ्यापासुन दुर जात असताना विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला,
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांनाडोळ्यावाटे मुक्त करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यसोबतचे माझे आयुष्यझऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला,
पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठीतिचा चेहेरा पहात जायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

This poem is very close to my heart... and hope it touches yours too

असा हा आजचा महाराष्ट्र.

असा हा आजचा महाराष्ट्र

* 35 दिवसांत सुमारे 70 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
* सुमारे 21 हजार गावांचे घसे पडले कोरडे
* भारनियमनाचा हंगाम सुरूच राहणार
* महाराष्ट्राच्या डोक्‍यावर एक लाख 80 हजार कोटींचे कर्ज
* रोजगारनिर्मितीला नाही वेग, अनेक उद्योग जाताहेत महाराष्ट्राबाहेर.
* मुंबईसह ठिकठिकाणी मराठी शाळा बंद होताहेत.

राजकीय अजेंड्यावर...
* मराठी-अमराठी वाद
* चित्रपटाचे राजकारण
* परवान्याचे राजकारण
* जुन्या वादाची नव्याने धुणी-भांडी
* प्रतीकात्मक आंदोलने

कशी समजणार यांना महागाई
लोकप्रतिनिधींना महागाई लवकर का कळत नाही त्याचे हे एक कारण. प्रत्येक खासदाराला मिळणाऱ्या पुढील सवलती पाहा...
* मासिक वेतन 12,000 रुपये
* कामकाजासाठी मासिक खर्च 10,000 रुपये
* कार्यालयीन खर्च 14,000 रुपये
* प्रवासभत्ता (किलोमीटरला आठ रुपयांप्रमाणे) 48,000 रुपये
* अधिवेशन काळात रोज 500 रुपये
* रेल्वेत प्रथम वर्गातून देशभर कुठेही कितीही प्रवास
* विमानात बिझनेस क्‍लासमधून पत्नी किंवा पीए सोबत 40 वेळा मोफत प्रवास
* घरगुती वापरासाठी 50 हजार युनिटपर्यंत वीज मोफत
* स्थानिक संपर्कासाठी एक लाख 70 हजार कॉल मोफत
* कार्यालयासाठी काही अत्यावश्‍यक वस्तू / सुविधा
* प्रत्येक खासदारावर सरकारी तिजोरीतून दरमहा अंदाजे 2.66 लाख आणि वर्षाला 32 लाख रुपये खर्च
* सर्व म्हणजे 534 खासदारांवर वर्षाला सरकारी तिजोरीतले होतात 855 कोटी रुपये खर्च
* मंत्र्यांचा तोरा न्यारा

---सकाळ वृत्तसेवा

Orkut next generation (Marathi)

मंगळवार, २७ एप्रिल, २०१०

Confidence Trust and Hope

I got these definitions in one of the forword, good ones


CONFIDENCE:
Once all village people decided to pray for rain. On the day of
prayer all people gathered and only one boy came with an
umbrella.... ... that's Confidence..


TRUST:
Trust should be like the feeling of a one year old baby when you
throw him in the air, he laughs.....because he knows you will catch
him.... that's Trust..


HOPE:
Every night we go to bed, we have no assurance to get up alive in
the next morning but still we have plans for the coming
day....that's Hope..


KEEP CONFIDENCE !
TRUST OTHERS !!
NEVER LOSE HOPE !!

गुरुवार, १५ एप्रिल, २०१०

नसतेस घरी तू जेंव्हा…

नसतेस घरी तू जेंव्हा
एक पेग ओतला जातो
बर्फाचे पडती तुकडे
अन् सोडा ओतला जातो

पापड दाणे आणून
कबाबही मी करतो
चणाडाळीवरती कांदा
आणि लिंबू मारुनी ठेवतो

येतात टेग दाराशी
आणि घुसूनी जाती आत
खिडकशी टेकून कोणी
सिगरेट ओढण्या बसतो

त्या पार्टीत बडबडणारे
मज दिसती ते बालमित्र
त्यांच्याशीच मैत्री टिकावी
ह्यासाठीच पार्टी करतो

ना अजुनी संपली व्हिस्की
ना हवेत अजुनी गेलो
स्मीरनऑफची बाटली खुणावते
मी स्प्राइट आणायला जातो

तू सांग सखे मज आता
तू परत जशील केंव्हा?
मित्रांचे फोन येतात
आता परत पार्टी केंव्हा??

नसतेस घरी तू जेंव्हा
एक पेग ओतला जातो
बर्फाचे पडती तुकडे
अन् सोडा ओतला जातो………

आई

गॉडस् गिफ्ट!

- शरद पवार

देव आपल्याला दिसत नाही... पण, त्याची अदृष्य शक्ती जाणवते! सामान्यांच्या दुनियेत जन्म घेऊन त्यांच्या


दु:खावर हळुवार फुंकर घालावी, अशी प्रार्थना आभाळातल्या देवाकडे करत असतानाच दैवी सूर उमटले...

ते होते गानकोकिळा लता मंगेशकर यांचे... त्यानंतर देवाच्या काठीचा आवाज ऐकायला आला... तो होता

मास्टर सुनील गावस्कर यांच्या खणखणीत स्ट्रेट ड्राईव्हचा! आणि मग साक्षात देवच दिसला... सचिनच्या रूपात!!

एका साध्या मध्यमवगीर्य कुटुंबात जन्मलेल्या या देवाची पाऊले कृष्णाच्या लिलेसारखी होती... नटखट आणि अवखळ! सचिन जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याच्यातील अद्भुत शक्तीचा साक्षात्कार होऊ लागला. त्याच्या खेळावर जीव ओवाळून टाकणारे करोडो चाहते आज जगभर पसरलेत. या साऱ्यांचा श्वासच सचिन आहे... गेल्या वीस वर्षांपासून!

..................


विश्वातल्या मान्यवर खेळाडूंचे सारे विक्रम मोडून सचिन जगातला सवोर्त्कृष्ठ फलंदाज ठरला. क्रिकेटच्या दुनियेत त्याने नुकतेच गाठलेले यशाचे शिखर खरोखरच अलौकिक आहे. तमाम भारतीयांची मान गर्वाने उंच व्हावी अशा या लक्षणीय यशाला सलाम करताना सचिनचे अभिनंदन कसे करावे, त्यासाठी नेमके शब्द चटकन सुचत नाहीत. खरंतर मी स्वत: परमेश्वर मानत नाही, तरीही या क्षणी असे म्हणावेसे वाटते की तमाम भारतीयांसाठी सचिन 'गॉडस् गिफ्ट' ठरला आहे!

अर्थात त्याने हे यश मिळवले, ते कोणाच्या मेहेरबानीने नव्हे. लहानपणापासून अत्यंत कष्टाने मैदानावर जी मेहेनत त्याने केली, केवळ क्रिकेटवर सातत्याने लक्ष केंदीत केले, त्यामुळेच हा महान विक्रम तो करू शकला. मुंबई क्रिकेट क्लबचा अध्यक्ष या नात्याने सचिनची अनेक वैशिष्ट्ये जवळून पाहिली. त्यातले सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे पाय आजही जमिनीवर आहेत! अफाट लोकप्रियता, जागतिक प्रतिष्ठा आणि क्रिकेटचे अनेक सन्मान मिळवल्यानंतरही यशाचा अहंकार त्याला कधी शिवला नाही. वांदे-कुर्ला परिसरात क्रिकेटचे एक नवे स्टेडियम अलिकडेच तयार झाले. सचिन मुंबईत असला की सकाळी तो या स्टेडियमवर दिसणारच. खेळाप्रमाणेच त्याची वेळही इतकी अचूक की स्टेडियमवर सचिनला पाहून सकाळी ९ वाजता आपले घड्याळ चेक करून घ्यावे. दररोज तासभरच्या सरावानंतर मोठेपणाचे सारे मान बाजूला ठेवून सचिन सामान्य मुंबईकरांप्रमाणे लहान खेळाडूंमधे मिसळतो. त्यांना मार्गदर्शन करतो. क्रिकेटवर सचिनची मन:पूर्वक भक्ती असल्याचा हा बोलका पुरावा आहे. क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष असताना प्रकर्षाने जाणवलेल्या आणखी एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. भारताबाहेर परदेशात जे सामने खेळले जायचे त्यात सचिन, राहुल दविड आणि अनिल कुंबळे हे तीन असे खेळाडू मी पाहिले की जे मैदानातल्या खेळाविषयी गंभीर असायचेच, याखेरीज त्यांच्या वर्तनात कमालीची शालिनता आणि विनम्रता जाणवायची. कोणत्याही प्रसंगाला अत्यंत सभ्यपणे सामोरे जातांना, भारतीय सुसंस्कृतपणाचे दर्शन या तिघांनी जगाला घडवले. क्रिकेटच्या माध्यमातून भारताची प्रतिष्ठा वाढवणारे हे तिघेही माझ्या मते परदेशात देशाचे एका अर्थाने राजदूतच ठरले. विक्रमाचे जे शिखर सचिनने आज काबीज केले. त्यात खेळातले सातत्य, विनम्रता यांचा अर्थातच मोठा वाटा आहे. असे गुण जगात प्रत्येक खेळाडूत नसतात.

त्याचा जन्म क्रिकेटसाठी झाला...

- रमाकांत आचरेकर ,(सचिनचे गुरू व दोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक)

सचिनच्या आंतरराष्ट्रीय कारकीदीर्ला बघता बघता वीस वर्षे झाली, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही... अजूनही तो शाळकरी सचिन मला आठवतो! कुरळ्या केसाचा, कमी उंचीचा. लाजराबुजरा! त्याचा मोठा भाऊ अजित त्याला माझ्याकडे घेऊन आला, तेव्हा एक क्रिकेटप्रेमी पालक आपल्या पाल्याला घेऊन आलाय, असं मला वाटलं. पण, पठ्ठ्याने हातात बॅट घेतल्यानंतर मी चक्रावूनच गेलो... क्रिकेटची देवदत्त देणगी घेऊनच तो जन्माला आलाय, असे स्पष्टपणे दिसले. त्याचा स्टान्स, बॅट पकडण्याची शैली, फ्रंटफूट, बॅकफूटवरचा सफाईदार वापर आणि सर्वात विशेष म्हणजे गोलंदाजांवर हुकुमत गाजवण्याची ताकद.

मला दुसरा अर्जुन सापडला होता : सचिन रमेश तेंडुलकर! कारण माझ्याकडे त्यावेळी आणखी एक अर्जुन होता. विनोद गणपत कांबळी!! विनोदची बॅटिंग भन्नाट होती... त्यालाही देवाने दोन्ही हाताने भरभरून दिले होते. विनोद सचिनपेक्षा खूप मोठा होईल, असे मला त्यावेळी वाटत होते. या डावखुऱ्या फलंदाजाची नजाकत, त्याची आक्रमकता भारी. सचिनपेक्षा एक पाऊल तो पुढे असायचा. पण... नंतर सचिन खूप मोठा मोठा होत असताना विनोदला ती गती राखता आली नाही. एका एकाचा नशिब असतं.

सचिनला बाद करण्यासाठी मी स्टम्पवर नेहमी एक रूपयांचं नाणं ठेवायचो. त्याचा बोल्ड काढणाऱ्याला गोलंदाजाला ते नाणं बक्षीस! पण, सराव संपेपर्यंत बोल्ड काढण्याची करामत कुठल्याच गोलंदाजाला करता यायची नाही आणि नाणं सचिन घेऊन जायचा. अशी असंख्य नाणी त्याच्याकडे जमा झाली असतील... आणि मुख्य म्हणजे आजही त्याने ती जपून ठेवलीत. त्याची सरावाची भूक कधी संपायचीच नाही. एकदा बॅट घेतली की तो तासनतास सराव करत राहायचा. शेवटी आम्हीच कंटाळायचो. त्याच्यातील गुणवत्ता पाहून मी त्याला एका दिवशी दोन, चार सामन्यात खेळवायचो. स्कुटरवर पाठीमागे त्याला बसवला की स्वारी खुश! मग त्याला आधीच्या मैदानावरील कामगिरीपेक्षा सरस खेळ करण्याचा उत्साह यायचा...

वांद्याहून शिवाजी पार्कला सराव व पुन्हा शाळा अशी छोट्या सचिनची धावपळ पाहून अजितला त्याची शाळा बदलण्यास सांगितली. मी शारदाश्रममध्ये असल्याने तो या शाळेत आला असता तर शाळेलाही आणि मला त्याच्यावर आणखी लक्ष करण्यास पुरेसा वेळ मिळाला असता... त्यांच्या घरच्यांनी मला छान प्रतिसाद दिला. शिवाजी पार्कला काकांकडे राहायला आल्यानंतर तर तो क्रिकेटमय होऊन गेला... शाळेनंतर कीर्ती कॉलेजचाही मीच प्रशिक्षक असल्याने आमचं गुरू-शिष्याचं नातं आणखी गहिरं होत गेलं.

उण्यापुऱ्या पाच सहा वर्षात मला त्याचा लळा लागला. परदेश दौऱ्यावर जाताना तो माझा आशीर्वाद घ्यायला घरी येतो तेव्हा त्याचे जमिनीवर असलेले पाय पाहून मी थक्क होतो... एवढा मोठा माणूस होऊनही तो इतका नम्र कसा? असा प्रश्न मात्र मला पडत नाही. कारण ते तेंडुलकर घराण्याच्या संस्कारात आहे. म्हणूनच २० वर्षांनंतरही तो नवनवी शिखरे गाठत जातो तेव्हा मला फारसं आश्चर्य वाटत नाही. सचिन तू आणखी बरीच वर्षे खेळत राहा... माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे.

मोठा माणूस

- राज ठाकरे
शिवाजी पार्कमधील आम्ही सगळे 'अंडरआर्म'वाले... जोरजोरात बॉल टाकणारे. मीही त्यावेळी जोरात बॉल टाकायचो. एकदा आम्ही एमआयजी क्लबवर सचिनसोबत 'अंडरआर्म'ची मॅच घेतली. सचिन टूरवर जाण्याआधी आमची मॅच होती. आधीच रबरी बॉल, त्यात विकेट ओलसर असल्याने तो तुफान वेगात जायचा. अतुल रानडे, सुनील हषेर् अशी सगळी आमची टीम होती. सचिनने त्यावेळी तुफान बॅटिंग केली... दोन-तीन रबरी बॉल फोडूनही टाकले. माझ्या बोलिंगवरही त्याने फोर-सिक्स मारले. माझी बोलिंग त्याने चांगलीच झोडपली तरीही सचिनच्या फोर-सिक्सचेच मला अधिक कौतुक होते.

मॅच संपवून आम्ही नेटबाहेर बसलो होतो. रात्री मी आणि सचिन जेवायला जाणार होतो. आम्ही तसे बऱ्याचदा जेवायला भेटतो. मात्र त्यादिवशी सचिन म्हणाला, 'माझा हात खूप दुखतोय, आजचे रात्रीचे जेवण आपण कॅन्सल करूया. हाताचे दुखणे सहन होत नसल्याने रात्रीचे जेवण आपण एकत्र घेणे मला जमणार नाही.' तो दिवस सचिनच्या 'टेनिस एल्बो'चा होता. पुढे सचिनचा हात फारच दुखायला लागला आणि त्याला 'टेनिस एल्बो'ची शस्त्रक्रिया करावी लागली. यात जवळपास महिना गेला. ऑपरेशन झाले लंडनमध्ये. हॉस्पिटलमधून ज्या दिवशी सचिनला डिस्चार्ज मिळाला तेव्हा योगायोगाने त्यादिवशी मीही लंडनमध्ये होतो. त्यामुळे आमच्या जेवणाचा बेत त्यादिवशी लंडनमध्ये पार पडला. ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे ब्रम्हदेशाचे फूड फार छान मिळते. जेवताना त्याने मला त्याच्यावरील ऑपरेशनबाबत सगळी बारिकसारिक माहिती सांगितली.

पुरस्कारांपेक्षाही मोठा...

- राज ठाकरे
लतादिदी असो की सचिन तेंडुलकर, ही माणसे कोणताही पुरस्कार मिळण्याआधीच मोठी झाली आहेत. त्यांचे कर्तृत्व हे त्यांना मिळणाऱ्या पुरस्कारापेक्षा मोठे आहे. सचिनला अजून 'भारतरत्न' मिळाला नसला तरी त्याने क्रीडाक्षेत्रात भारतला जो बहुमान दिला आहे त्याच्या जोरावर सर्वसामान्यांच्या मनात तो 'भारतरत्ना'सारखाच आहे. त्याची इतर कोणत्या खेळाडूशी तुलना करायची म्हटले तरी मला ती करता येणार नाही. सर्वच बाबतीत तो सर्वांच्या पुढे आहे.

सचिनमध्ये बरेच गुण आहेत, मात्र कोणत्याही गोष्टीच्या खोलात जाणे हा त्याचा गुण मला सर्वाधिक मोठा वाटतो. घड्याळ असो की कार, ऑडिओ सिस्टिम असो की एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू. तो त्या वस्तूच्या खोलात जातो. त्या वस्तूमध्ये नेमके कोणते पार्टस् आहेत, त्यांचे नेमके कार्य काय याची तो सखोल माहिती करून घेतो आणि समोरच्याला ती देतोही.

सचिनच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा मी त्याला सर्वप्रथम भेटलो. त्यानंतर आजतागायत आम्ही भेटतच आलो आहोत आणि आमच्यात चांगलेच मैत्रीसंबंध आहेत. मुंबईतील त्याच्या मॅचेस मी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. एरवी त्या मी टीव्हीवरच बघतो. अत्यंत सरळ, मनमिळावू, विनम्र असा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे सहसा त्याच्या नावाला वादविवाद कधी चिकटत नाहीत. त्याच्यावर कधी तोंड उघडण्याची वेळ येत नाही. तो जे बोलतो ते त्याच्या बॅटनेच. तो जेव्हा बॅटिंगला उतरतो आणि तुफान फटकेबाजी करतो तेव्हा माझा काय किंवा प्रत्येकाचाच मूड पालटतो.