मंगळवार, २७ ऑक्टोबर, २००९

शिक्षकदिन कशासाठी?

पाच सप्टेंबर... दरवर्षी साजरा होणारा शिक्षकदिन कालच झाला. त्यानिमित्तानं शिक्षकांच्याप्रती आपल्याला असलेला आदर काल प्रत्येक विद्यार्थ्यानं व्यक्त केला
.. पण बाकीच्या दिवसांचं काय? शिक्षकांना आज मान मिळतो आहे का? 'शिक्षण हे गुणांधिष्ठित झाले आहे, ज्ञानाधिष्ठित नाही' हा काही या शिक्षकांचा दोष नाही. तरीही मनापासून शिकविणारे शिक्षक लक्षात राहतात... आयुष्यभर. आताच्या शिक्षणाबद्दल, शिक्षकदिनाबद्दल तुमचे काय मत आहे? क्लासला जादा महत्त्व आले नि शाळा-कॉलेजाचे महत्त्व कमी झाले ही वस्तुस्थिती आहे. मग आता शिक्षणाचे होणार तरी काय? याबाबत आपले मत कळविण्याचे आवाहन आम्ही केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडक पत्रं...
...............

दुष्टचक्राचे बळी!

पाच सप्टेंबरचा शिक्षक दिन कशासाठी तर त्या दिवशी तरी शिक्षकांशी काहीतरी संभाषण होईल ही आशा. साधारणत: शिक्षकांचे लक्ष आपल्या खाजगी शिकवणीकडे अथवा क्लासकडे असते. त्यामुळे शाळा, कॉलेजात शिकवणे नाममात्र आणि विद्याथीर्पण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मागे असल्याने त्यांना खाजगी क्लासशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे आता त्यांना शाळा, कॉलेजातील शिक्षकांची नावे माहीत नसतील; पण खाजगीत कोण काय शिकवतो याची इत्थंभूत माहिती असते. त्यामुळे शिक्षक शिकवत नाहीत म्हणून मुलांना शाळा-कॉलेजात शिकण्यात रस नाही आणि मुले खाजगी शिकवणीस जास्त महत्त्व देतात म्हणून शिक्षकांना उत्साह नाही, असे हे दुष्टचक्र आहे. सध्या शिक्षण हा एक व्यवसाय झाला आहे. शाळेच्या भरतीच्या वेळी देणगी द्यावी लागते आणि कॉलेजचा गोंधळ तर विचारू नका. त्यात एकापेक्षा एक विद्वान मंत्री. त्यामुळे पुरके गेले पाटील आले आणि विद्यार्थ्यांचे हाल जास्ती झाले.
- डॉ. विजकुमार रेगे, माहीम.

आधी समन्वय साधा

पूवीर् औपचारिक शिक्षणाबरोबर लोकशिक्षणाला प्राधान्य देणारे शिक्षक होते. परंतु आता खाजगी क्लास काढून पैसे कमाविणारे शिक्षकच अधिक सापडतात. आवड आणि वेळेची निकड हे शिक्षणाचे सुवर्णमध्य. सामाजिक, राजकीय, आथिर्क क्षेत्राचा विकास साधण्यासाठी शिक्षणाची अत्यंत गरज आहे. त्याकरिता शिक्षकांनी अध्यापन कार्यात स्वत:ला वाहून घेणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांशी शाळेत आणि शाळेबाहेर संवाद साधला गेला पाहिजे. परंतु शासनाने शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा बोजा लादला आहे. ही शिक्षणाची अधोगती आहे. आजही खेड्यात शिक्षकांना हगणदारी मुक्ती उपक्रमाला जुंपले जाते. त्यामुळे प्रशासन ग्रामविकास मंत्रालयाच्या अनुषंगाने शिक्षणाच्या प्राथमिकतेवर गदा आणत आहे. त्यामुळे विद्याथीर् मूलभूत प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहत आहेत. म्हणूनच शिक्षक आणि विद्याथीर् यांच्यात समन्वय साधला तरच शिक्षकदिन खऱ्या अर्थाने साजरा होईल.
- शिवदास शिरोडकर, लालबाग-मुंबई.

हा तर एक 'व्यवसाय'

शिक्षकांवर देशाचे सुजाण व सुसंस्कृत नागरिक बनविण्याची जबाबदारी अजूनपर्यंत होती; पण हल्लीच्या काळात शिक्षणक्षेत्राला व्यवसायाचा दर्जा लाभला आहे. आपल्या शिक्षण महषीर्ंनीच राज्यात सरकारकडून सर्व सवलती घेऊन आपापली विद्यापीठं व कॉलेजं उघडून शिक्षणाचा बाजार मांडला आहे. यात शिक्षकही व्यवसायिक व व्यवहारिक बनलेले आहेत. आताचे शिक्षणक्षेत्र म्हणजे पैसे कमाविण्याचे साधन बनले आहे. गुणाधिष्ठित शिक्षणामुळे पालकही वाईट मार्गाने भरपूर पैसा ओतून पाल्याच्या शिक्षणाची सोय करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची विचारसरणी बदलत आहे. शाळा, कॉलेजमधील शिक्षणापेक्षा क्लासच्या शिकवणीवर पालकांचा जास्त विश्वास बसला आहे. या विश्वासामुळे शिक्षकांचा शिकवण्याकडे व विद्यार्थ्यांचा शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेल्याने शिक्षणाचा दर्जा घसरत आहे.
- विवेक तवटे, कळवा.

संकुचित व्याख्या बदला

आजची आपली शिक्षणपद्धती स्पर्धात्मक आणि तांत्रिक कौशल्यावर आधारलेली आहे. व्यक्ती-व्यक्तीमध्ये सुसंवाद कसा निर्माण करता येईल, ही आजच्या शिक्षणापुढील खरी समस्या आहे. सतत वेगवेगळ्या तणावाखाली सारेचजण वावरत आहेत. आणि अशावेळी 'माणसाला स्वत:च्या मनाचं कार्य कसं चाललं हे समजून देणाऱ्या शिक्षणांची आज गरज आहे' असे थोर तत्त्वज्ञ जे. कृष्णमूतीर्ंनी म्हटले आहे. ते पुढे म्हणतात, ''आपण फक्त मुलांना कशाकशाचा विचार करायचा ते शिकवतो; पण विचार कसा करायचा हे मात्र शिकवत नाही.'' कारण विचार ही एक जिवन जगण्याची प्रक्रिया आहे. आपला प्रत्येक विचारच आपलं आयुष्य घडवत असतो. विचार, भावना व वर्तन या विषयीचं शास्त्रशुद्ध शिक्षण देणे अधिक गरजेचे आहे. भावनिकदृष्ट्या असुरक्षित वाटणाऱ्या आजच्या काळात आपापल्या व्यक्तिमत्त्वाचं, क्षमतांचं, उणिवांचं, आवडीचं आणि प्रवृत्तीचं आकलन करून देणारे शिक्षण आजच्या पिढीला अभिप्रेत आहे. आजच्या शिक्षकाने याचे भान राखले पाहिजे. लिहिणे-वाचणे आले म्हणजे शिक्षण झाले, ही शिक्षणाची संकुचित व्याख्या आहे. तर ज्ञानाविषयीची जिज्ञासा, समाजाविषयीची बांधिलकी, आपल्या प्राप्त कर्तव्याविषयी निष्ठा या गुणांचे संस्कार हेच खरे शिक्षण.
- मनोहर मुंबरकर, कणकवली.

ही तर मानवंदनाच

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमधूनच सर्वतोपरी प्रयत्न केले गेले पाहिजेत. कारण सध्याचे पालक दोघंही नोकऱ्या करत असतात. त्यामुळे मुलांचा अभ्यास व सामान्य ज्ञान, तसेच कला, खेळ, वक्तृत्व याकडे शाळांनीच लक्ष द्यावे. परंतु शाळेतही मोजक्या मुलांकडेच काही वेळा लक्ष दिले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. त्यामुळे शिक्षण व विद्याथीर् यांच्यातले नाते दृढ होईल. दोघांनाही एकेमकांबद्दल प्रेम व आदर वाटेल. चांगले शिकवणारे तसेच चांगल्या स्वभावाचे शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांना व पालकांना आवडतात. शाळा, कॉलेजांमध्ये विद्याथीर् घडत असतात. येथे त्यांच्या सर्वांगीण विकास होतो. त्यामुळेच शाळा, कॉलेज व क्लासेस् यांच्यात नेहमीच फरक राहील. क्लासेस्मध्ये शिक्षणाकडे/अभ्यासाकडे जास्त लक्ष दिले जाते. तेव्हा शिक्षक हा गुरू व अर्धा पालकच असतो आणि म्हणूनच नेहमी वंदनीय असतो. आणि म्हणूनच 'शिक्षकदिन' साजरा झालाच पाहिजे; कारण 'शिक्षकदिन' म्हणजे 'गुरूस केलेली मानवंदना' व 'गुरूचा केला जाणारा आदर' शिक्षकदिन अतिशय उत्साहाने साजरा केला जावा.

- सरोज आरोंदेकर, दादर.

'असे पाय' आहेत कुठे?

पूवीर्ची शिक्षणपद्धती आणि आताच्या शिक्षणात काळानुसार जसा आमूलाग्र बदल होत गेला तसाच शिक्षकी पेशाही आथिर्कदृष्ट्या बदलत होता. सर्व जग आज लक्ष्मीच्या मागे धावत असताना शिक्षकांनीच फक्त सरस्वतीची उपासना करत बसावं का? कदाचित हा आजच्या शिक्षकांचा विचार असावा. काही शिक्षकांचा अपवाद वगळता बहुतेक शिक्षकांनी लक्ष्मीची आराधना सुरू केलेली आहे. आज शिक्षणक्षेत्रात लक्ष्मीपुत्रच भरपूर गुण कमावत असताना आजचा गरीब विद्याथीर् अंगी गुण असूनही शिक्षणातील गुणात कमी पडतोय. शिक्षकदिनी श्ाद्धेने नतमस्तक होऊन पाय धरावेत असे पाय आज शोधावे लागतील.
- कमलाकर पांडे, गिरगाव.

मुळ हेतूचाच विसर

शिकणे व शिकविणे या शिक्षणक्षेत्रातील दोन प्रक्रिया परस्परावलंबी आहेत. शिक्षक आणि विद्याथीर् दोघांचा सहभाग यात आवश्यक असतो. पण शिक्षणप्रक्रियेत शिक्षकाचे स्थान महत्त्वाचे असते. शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम घडून येतो. आपल्या विषयाचे सखोल ज्ञान, शिकविण्याचे कैशल्य, वर्गावरील पकड, पेशाशी बांधिलकी, शिक्षकांचा वक्तशीरपणा याची विद्याथीर् कळत-नकळत नोंद घेतात. प्रेमळ, समजूतदार शिक्षक विद्यार्थ्यांना भावनिक-मानसिक आधार देतात. असे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आदरास पात्र होतात. शिक्षक-विद्याथीर् नातं बहुआयामी आहे. काळानुरूप या नात्यात फरक पडला आहे. हल्लीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकाविषयी आदर नाही आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांविषयी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी राहिलेली नाही. शिक्षक हा पगारी नोकर बनवलाय, अशी सर्वत्र ओरड आहे. हे सत्य कटू असले तरी बऱ्याचअंशी वास्तव आहे. त्याला आथिर्क, सामाजिक कारणे आहेत. त्याचप्रमाणे पालकांची पाल्यांची बदलती मानसिकता कारणीभूत आहे. शिक्षकांसाठी आपल्या पेशाविषयी आत्मभिमान नाही. विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानसंपन्न न करता चारित्र्यसंपन्न, उत्तम नागरिक म्हणून घडविणे हा शिक्षणाचा मुख्य हेतू आहे. बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. शिक्षण ही परिवर्तनाची प्रक्रिया आहे. गरजेनुसार शैक्षणिक आराखड्यात, अभ्यासक्रमात ठराविक काळानंतर बदल होत राहणे गरजेचे आहे. पण हे बदल घडवून आणताना सर्व घटकांचा साकल्याने, सवोर्तपरी विचारविनिमय करून निर्णय घेणे आवश्यक आहे. आपली शिक्षणपद्धती अधिक जीवनोपयोगी, व्यवसायभिमुख होण्याची गरज आहे. त्यातून स्वयंरोजगाराची निमिर्ती होईल आणि बेकारीला आळा बसेल. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येचे प्रमाण हेही शिक्षणक्षेत्राचे अपयश आहे. त्यामुळे जीवन कौशल्य आणि समस्यांचे समायोजनाचे धडे शालेय पातळीवर देण्याची नितांत गरज आहे.
- बेर्नादेत रुमाव, कांदिवली.

कालाय तस्मै नम:

आपण असे म्हणतो की, आताचे गुरू व्यवसायिक झाले आहेत. त्यांनी व्यवसायिक का होऊ नये? काळ बदलला की सगळे संदर्भ बदलतात आणि माणूस संदर्भहीन असूच शकत नाहीत. आपण नाही का आपल्या पाल्याला काळानुसार बदलायला उद्युक्त करतो? मात्र झपाट्याने बदललेल्या जमान्यात विद्यार्थ्यांची गुरू आणि आई-वडिलांवरील निष्ठा लोप पावत चालली आहे. त्याला कारण पालक आणि गुरूही आहेत. त्यामुळे 'शिक्षकदिन' हा आज केवळ देखावा वाटतो. आताच्या विद्यार्थ्यांना सगळे दिवस सारखेच वाटतात. आताचा अभ्यासक्रम 'पर्यायी पध्दतीने' स्वीकारला असल्यामुळे विद्यार्थ्यांना अंदाजे उत्तरे लिहिण्याची सवय लागलीय. त्यामुळे एखाद्या विषयाचे सखोल वाचन करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल नसतो. आयती उत्तरे मिळतात, मग एखाद्या प्रश्ानचे उत्तर तयार करण्याचा प्रश्ान्च येतो कुठे? हे तयार उत्तरांचे काम पुस्तके करतात त्याहीपेक्षा कितीतरी पटीने क्लासेस्वाले करतात. त्यामुळे क्लासेस्ना जास्त महत्त्व आले आहे. शिक्षणाचे तीनतेरा वाजायचा प्रश्ान्च उद्भवत नाही. फक्त ते देण्याच्या आणि स्वीकारण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. शिक्षकदिनाच्या अनुषंगाने त्याबाबत चिंता करण्याची गरज नाही, मात्र संस्काराबाबत चिंतन करण्याची जरूर वेळ आलेली आहे.
- संजय जाधव, सांताक्रुज

सरकारची भूमिका दिखाऊ

आज शालेय वा महाविद्यालयीन शिक्षणाबाबत सरकारची भूमिका दिखाऊ आहे. शिक्षणक्षेत्रातही राजकारण आल्याने ना शिक्षकांना, ना सरकारला शिक्षणाचं गांभीर्य आहे! आय.आय.टी.सारख्या संस्था सरकारी यंत्रणेतून चालवूनदेखील आपला दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीच्या तोडीचा कसा ठेवतात? हाच न्याय शिक्षणक्षेत्रातील इतर संस्थांनी का अंगीकारू नये? ज्ञानाच्या 'क्रिमी लेअर'मधील विद्यार्थ्यांकडून प्रगती साधणे आय.आय.टी.ला सोपे असले तरी त्यांच्या प्रगतीच्या योजना निश्चित आहेत. सरसकट भारी शिक्षणकर लावून सरकारने शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी निश्चित कार्यक्रम आखल्यास व राबविल्यास भारतातील गरिबातील गरीबदेखील मोठा शिक्षणकर उस्फुर्तपणे भरेल.
- चंदकांत वाकडे, पुणे

समाजाचा दोष

स्वतंत्र भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांची जयंती म्हणजे शिक्षकदिन. प्राचीन काळी गुरूपौणिर्मेस गुरूंबद्दल आदर व्यक्त करत. मात्र त्या काळातील 'अज्ञानाचा अंधकार दूर करतो तो गुरू' ही व्याखा वर्तमानकालीन शिक्षकांना लागू होत नाही. यामध्ये समाजाचा फार मोठा दोष असून शिक्षकीपेशा हा उत्पादन न करणारा असल्याने त्याच्याकडे सहसा हुशार विद्याथीर् वळत नाहीत. त्यातच चंगळवादी जीवनशैलीच्या आकर्षणामुळे इतर सर्व व्यावसायिकांप्रमाणे शिक्षकी पेशास धंदेवाईक स्वरूप आले आहे. याचाच परिणाम म्हणून पेपर फोडणे, कॉप्या पुरवणे, शाळेतील शिक्षकांनी खाजगी क्लासात शिकवणे यासारख्या बेकायदेशीर कृत्यात शिक्षक बिनदिक्कत सहभागी होतात. हे टाळण्यास उत्तम उपाय म्हणजे शिशुवर्ग ते चौथीपर्यंतच्या शिक्षकांचे मुख्याध्यापकांनी व पाचवीपासून पुढच्या शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी वाषिर्क मूल्यांकन करावे. अनुत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकांना कामावरून कमी करावे. उरलेल्यांना मिळणाऱ्या गुणांवर पगारवाढ अवलंबून ठेवावी. ग्रामीण भागांतील शिक्षकांना शहरी शिक्षकांच्या तोलामोलाच्या सुविधा द्याव्यात.
- डॉ. कृष्णकांत नाबर, माहीम

चितळे मास्तर हरवले?

विद्याथीर्दशेतील मुलांना शिक्षक अती वैचारिक पातळीवर शिकवतात. या वयात त्यांच्याशी सलगीने वागून त्यांना शिकवले तर निश्चितच ते त्यांच्या मनात खोलवर रूजेल. एकेकाळी शिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना नावानिशी ओळखत. व्यवसायिकतेच्या पलीकडे जाऊन पालक व शिक्षक यांचे संबंध सलोख्याचे होते. विद्यार्थ्यांची प्रगती व भवितव्य यासंबधी त्यांच्यात वेळोवेळी चर्चा होत. ही आत्मीयता दुरापास्तच झाली आहे. पु. ल. देशपांडे यांचे 'चितळे मास्तर' सांगतात 'पोराला आपल्या हातात दिल्यावर त्याला घासून-पासून स्वच्छ करून या जगात पाठवायचे हेच माझे काम.' बहुधा असे शिक्षक आता फक्त पुस्तकातच दिसतील; कारण सध्याचे शिक्षक हे नियमपालन समजून विद्यार्थ्यांशी वागतात. अगदी शिक्षकदिनही तसाच.
- प्रतिश गायकवाड, मालाड
...................

शिक्षकदिनीच गुणगान...!

शिक्षका, तुझे शिक्षकदिनीच गुणगान

तुझ्या वर्गा मी प्रगट जाहलो, करावया सन्मान।।

तव लेक्चरची होय सांगता, भकास पडला रिक्त वर्गहा

प्रसन्न तरी ते 'हेड' तुझ्यावर, राधे कृष्ण भगवान।।

डॅडी-मम्मीची आज्ञा म्हणूनी, ट्यूशन क्लास मी जॉईन करूनी

शाळेला मग कसा येऊ मी, नका मानू अपमान।।

बेगडी शिक्षण आणि धोरणे, तुझे काम ते पाट्या टाकणे

धन्य शिक्षका, तुला लाभला सरकारी वरदान।।

कोण करी कोणाची कदर, जपला नाही कुणीच आदर

गुरू-शिष्यांचे होईल कैसे, मग हे आदान-प्रदान।।

कृतार्थ झालो या शिक्षकदिनी, कृतार्थ मीही तुझ्या दर्शने

दे आज्ञा मज उद्यापासूनी, मम ट्यूशन ठरो जीवदान।।

- माधव नाडकर्णी, अंधेरी
................

शिक्षक आदरस्थानीच!

देशाच्या माजी राष्ट्रपतींच्या गौरवार्थ आपण दरवषीर् ५ सप्टेंबर हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करतो. आपल्या संस्कृतीमध्ये-परंपरेमध्ये शिक्षक किंवा आपल्या गुरूला फार मानाचे स्थान दिले गेले आहे. माता-पिता-देव यांच्याइतकेच आपल्या शिक्षकांचे आपल्यावर झालेले उपकार हे न फेडता येण्याजोगेच असतात. काळाप्रमाणे शैक्षणिक व्यवस्था बदलली. शिक्षणाची परिभाषा बदलली. शिक्षक-विद्याथीर् यांच्यातील नातेसंबधाचे संदर्भ बदलले. शिक्षकाच्या मनोवृत्तीमध्ये व्यावसायिकता वाढू लागली. विद्याथीर्ही ज्ञानाथीर् होण्यापेक्षा परीक्षाथीर् होण्यातच धन्यता मानू लागले. शिक्षणक्षेत्र काहीसे अधिक व्यवहारी व अर्थकारणांशी निगडित असे होऊ लागले. शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्याथीर् व त्यांना शिकविणाऱ्या शालेयसंस्था यातील दरी वाढू लागली. त्यातून पुढे खाजगी शिक्षण वर्ग-क्लासेसचे पेर फुटले. आज शाळेपेक्षाही खाजगी क्लासेस्ना अधिक मागणी आहे. शाळा असो वा खाजगी क्लासे्स; तेथे शिकविणारे शिक्षक हे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्यापरीने उत्तमोत्तम ज्ञाान देण्याचाच प्रयत्न करतात व म्हणूनच वर्षातून एक दिवस आपल्या शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी 'शिक्षकदिन' पाळणे आवश्यक वाटते. शिक्षणक्षेत्रात कितीही बाजारूपणा वाढला तरी शिक्षकांचे महत्त्व कमी होऊ शकत नाही. सामाजिक परंपरेनुसार शिक्षक हा आदरस्थानीच असणे आवश्यक वाटते.
- शरद वर्तक, चेंबूर
..................

शैक्षणिक अनर्थ

मुलांच्या खांद्यावर वह्यांचे ओझे, वह्यांचे ओझे

बापाच्या मानेवर, कर्जाचे बोजे, कर्जाचे बोजे।।

क्लासमध्ये जाती पोरे भरून भरून

शाळेचेही वर्ग पडती भकास होऊन,

गुण शतकांचे झळके 'व्यवहारशून्य'

तरी कसे लागतात निकाल हे ताजे, मुलांच्या खांद्यावर, वह्यांचे ओझे।। १।।

ज्ञान इथले झाली आता जीवघेणी स्पर्धा

हजारोंनी खर्च करीती वाढवण्या 'अर्धा'

मूल्य सारे जाते वाया इथे मुळातून.

देणाऱ्याचे हात धरती, म्हणूनिया माझे, मुलांच्या खांद्यावर वह्यांचे ओझे।।२।।

मतलबी शिक्षणाचा, असा हा प्रभाव

'कुपमंडूकाचा' मेळा, मिसळण्या अभाव

जीवनाशी घेती पैजा, मनात कुजून

पुस्तकी कीडे झाले बेकारांचे तांडे, मुलांच्या खांद्यावर वह्यांचे ओझे।।३।।

मुलांच्या खांद्यावर वह्यांचे ओझे, बापाच्या मानेवर कर्जाचे बोजे!!

- शशिकांत नेने, ठाणे.
........................

उल्लेखनीय पत्रं -

आजच्या स्पर्धात्मक जगात ज्ञानार्जनापेक्षा अर्थार्जनाला महत्त्व दिले जात आहे. जो विद्याथीर् जन्मजात हुशार आहे किंवा मेहनत करणारा आहे तोच या स्पधेर्त तरेल अन्यथा बाकी सगळे भरडले जातील. डॉ. राधाकृष्णन यांच्यासारख्या विद्वानांचे नाव इतिहासजमा झाले आहे. शिक्षकदिन फक्त नावापुरताच उरला आहे.
- अनिल बिडये, अंधेरी.

जास्त फी भरून शाळा-कॉलेज अथवा क्लासेस्मध्ये प्रवेश मिळू शकतो, मात्र पैसे भरून शिक्षण विकत घेता येत नाही. हे सर्वांना कळले तरच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जाणारा हा दिवस खऱ्या अर्थाने 'शिक्षक'दिन होईल.
- रोहन म्हात्रे, गिरगाव.

गुरू हे शिष्यांचे आराध्य दैवत; श्ाद्धास्थान. शिष्याची गुरूवरील असीम श्ाद्धा व गुरूचे शिष्यावरील उत्कट प्रेम यातूनच ज्ञानाचे स्त्रोत अखण्ड वाहतात. ही श्ाद्धा पूवीर् होती; आजही आहे अगदी शिक्षण ज्ञानाधिष्ठित न राहाता गुणाधिष्ठित झालं, शिक्षणाला बाजारी स्वरूप आलं तरीही.
- कृ. म. गात (निवृत्त प्राचार्य), विलेपालेर्.

खरा शिक्षक तोच असतो, जो विद्यार्थ्यांचे प्रश्ान् सोडवतो. मग तो शाळेतला असो वा क्लासमधला असो वा घरातला. ज्याप्रमाणे पणतीच्या ज्योतीने खोलीतला अंधार नष्ट होतो, त्याप्रमाणे ज्ञानाच्या ज्योतीने अज्ञानाचा अंधार जातो.
- वैशाली मुझुमदार, विलेपालेर्.

स्वत:ला वेळ नाही आणि असलाच तर रस नाही, म्हणून नर्सरीपासूनच मुलांना खाजगी शिकवणीकडे वर्ग करणारे पालक शिक्षकांचे अवमूल्य करीत आहेत. विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र राबणारे प्रामाणिक शिक्षक अजूनही आहेत. गुन्हेगारी, भ्रष्टाचार, अस्थिरता यामुळे अंधत्व आलेल्या समाजाला असे शिक्षक हुडकून काढण्याची गरज आहे. सत्याच्या चाळणीतून गाळलेली नवीन पिढी तयार होईल तेव्हाच शिक्षकांप्रतीचा ऋणनिदेर्श करण्यासाठी ठरविलेला हा दिवस खराखुरा शिक्षकदिन म्हणून साजरा होईल.
- सूर्यकांत भोसले, मुलुंड.

आईवडील दोघेही नोकरीनिमित्त १०-१२ तास घराबाहेर असताना प्रेमासाठी भुकेलेला हा कोवळा जीव मायेचा ओलावा शोधण्यासाठी शिक्षकांकडे दृष्टी लावून आहे. क्लासचे महत्त्व वाढले तरी शाळांचे व पर्यायाने शिक्षकांचे महत्त्व कधीच कमी होणार नाही. वाढता अभ्यासक्रम, शिक्षणखात्याकडून वारंवार येणारे आदेश व सतत बदलणारे शैक्षणिक धोरण यांमध्ये आज शिक्षकांनी ठामपणे उभे राह्यचे आहे. क्लासबरोबर विद्यार्थ्यांना आवश्यक अवांतर ज्ञानही तुम्हाला द्यायचे आहे. जेणेकरून तुमच्या समोरील विद्यार्थ्यांना जाणीव होईल 'गुरूबिन कौन बतावे बाट.'
- विभा भोसले, मुलुंड.

जे सरकार शिक्षकांना शिक्षणेत्तर कामासाठी राबवते, त्यांना पगार वेळेवर देत नाही, आवश्यक सोयी पुरवत नाही, शिक्षणावर एकूण उत्पन्नाच्या दोन टक्केही रक्कम खर्च करीत नाही, त्या सरकारपुढे सर्व विद्यार्थ्यांनी हात टेकले (जोडले) पाहिजे.
- श्रीनिवास डोंगरे, दादर.

आत्ताचा 'शिक्षकदिन' केवळ एक फॅड वाटतं. जो तो आपल्या आवडत्या शिक्षकाचा म्हणजे जो ओरडत नाही, रागावत नाही, मारत नाही 'शिक्षण कम करमणूक' करतो अशांना शिक्षक मानतो आणि जे शिक्षक 'आपली गरज' असं न मानून संस्कार, विद्या देतात, थोडं कडक, कठोर बनून, उद्दिष्ट मानून शिकवतात, त्यांना नावं ठेवली जातात.
- नीलम शिंदे, अंधेरी.

शिक्षणातील शिक्षकांचा म्हणजे पर्यायाने विद्यार्थ्यांचा आनंद घटतो आहे. शिक्षकांची/विद्यार्थ्यांची घुसमट वाढली आहे. कृतीप्रधान मन घडवणारे संस्कारक्षम शिक्षण देणाऱ्या शिक्षकाला मान द्यायलाच कोणी तयार नाही तर प्रयोगशील शिक्षणाबद्दल कोण बोलणार? शिक्षणात सर्जनशीलता हरपलीय.
- प्रा. एस. के. कुलकर्णी, इस्लामपूर.

सध्याच्या काळात विद्याथीर् आणि शिक्षकांमधील विद्यार्जनाचे माध्यम पैसा झाला आहे. त्यामुळे गुरू-शिष्याची भावना लोप पावली आहे. त्याला पालकदेखील तितकेच जबाबदार आहेत.
- मधुकर नाकती, वडाळा.

सध्याचे शिक्षण कम्प्युटर ते इंटरनेट या माध्यमातून चालू आहे. परंतु यापुढील काळात ते कोणते स्वरूप घेईल हे एकंदर विकासावर व विज्ञानावर अवलंबून आहे. तरीही गुरू-शिक्षक याशिवाय ज्ञान मिळणार नाही. म्हणून आपल्या सामाजिक जिवनास आकार देणाऱ्या शिक्षकांवर प्रेम करावे व शिक्षकदिन जरूर साजरा करावा.
- सुदर्शन मोहिते, जोगेश्वरी.

शिकवण्यापेक्षा इतर कामे
नवे सरकार नवे तराणे
संस्काराचे इथे उणे
तयास शिक्षण म्हणावे का?
- अनुराधा मेहेंदळे, ठाणे.

ज्ञानाधिष्ठित शिक्षण असो अगर गुणाधिष्ठित शिक्षण. शिक्षकाने त्याचे काम शिक्षकासारखे करावे एवढीच समाजाची अपेक्षा आहे. सगळेच साने गुरुजी व्हावेत अशी अपेक्षा नाही. परंतु शिक्षकदिन साजरा करण्याइतपत शिक्षकांनी स्वत:च्या वर्तनाने समाजाला आदर्श घालून दिला पाहिजे.
- अनंतराव बोरावले, फलटण.

जनतेने सरकारवर दडपण आणायचे तरी कसे?

सामान्य जनतेला स्वत:चा चेहरा नाही, लोकांची एकजूट नाही, म्हणून आवाज नाही. अशावेळी सरकारवर कायमस्वरूपी दबाव आणणारी एखादी यंत्रणा/व्यवस्था सुवर्णमहोत्सवी वर्षात स्थापन व्हायला काय हरकत आहे?

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात विधानसभेच्या निवडणुका बंडखोरी आणि घराणेशाहीमुळे लक्षात राहिल्या. निवडणुका कोणत्या मुद्द्यावर लढल्या गेल्या, हे चार-सहा महिन्यांनी जनता विसरून जाईल. जनताच फारशी गंभीर नाही, तर मग सत्ताधाऱ्यांना कार्यक्रमाची आठवण का राहावी?

धोरणे आणि कार्यक्रम यांचा उच्चार काँगेस आघाडीने केला खरा; पण जाहीरनामे, आश्वासने यांचे फलीत काय? या गोष्टी किती गांभीर्याने घ्यायच्या असतात? 'सत्ता द्या, विकास घडवतो' असे सांगितले गेले. पण सत्ताधारी स्वत:ला हवे तेच करतात. कधी 'प्रिंटिंग मिस्टेक', कधी 'आश्वासने ही देण्यासाठी असतात, पाळण्यासाठी नाही!' असा धडा शिकवतात. मतदारांनी किती वषेर् हे असेच चालू द्यायचे?

काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याच्या मागणीवर फारच मोठे आंदोलन झाले, तर तशी तरतूद होईलही. (अर्थात, 'काम न करणारे' याची व्याख्या व निकष यावरच वाद होतील.) पण परिस्थिती न सुधारणाऱ्या सरकारला निवडणुकीआधी कसे बदलणार? ३५ वर्षांपूवीर् जयप्रकाश नारायण यांनी आंदोलन केले. जनतेची, काही राजकीय पक्षांची साथही मिळाली. पण परिणाम काय झाला? उलट, देशालाच आणीबाणीचा अनुभव मिळाला.

राज्यकतेर् हुषार असतात. लोकांच्या पुढे काहीतरी ठेवले पाहिजे, याची त्यांना कल्पना असते. मग ते मजकुरापेक्षा नेत्यांच्या छायाचित्रांनी नटलेल्या जाहिराती वृत्तपत्रांत देऊ लागतात. सरकारचा एकूण रोख हा आकडेवारी फेकण्याकडे असतो. किती पैसा गुंतवला, योजना हाती घेतल्या, एवढाच (इनपुट-आऊटपुट) विचार सरकार (त्यांना करता येण्याजोगा) करते. वास्तविक फलनिष्पत्ती काय, हे पटणाऱ्या भाषेत मांडले पाहिजे. याबाबत सामान्य जनता काय करू शकते? जवळजवळ काही नाही. टीका होते. वृत्तपत्रांत लेख प्रसिद्ध होतात. राजकीय पक्षांचा सहभाग असला, तर मोचेर्, निदर्शने होतात. हे सारे विरोधी पक्षांकडून झालेच. पण त्याचा अपेक्षित प्रभाव पडला नाही की हे सारे ध्यानात घेऊनही जनतेने त्याच सत्ताधाऱ्यांना पुन्हा निवडले? म्हणजे सरकारबद्दल असंतोष नव्हता, असे समजायचे?

थोडक्यात, आहे त्या परिस्थितीत सामान्य जनतेचे दडपण सरकारवर येत नाही, हेच खरे; कारण सामान्य जनतेला चेहरा नाही, पाठिंबा नाही, म्हणून आवाज नाही. पण तोच अण्णा हजारे यांच्यासारखा चेहरा असता तर? हजारेंचे आंदोलन तितकेसे यशस्वी झाले नाही अशी भावना पसरली, तरी अण्णा उपोषणाला बसले की सरकार अस्वस्थ होतेच. काही ना काही हालचाली सुरू होतात.

मग असाच, कायमस्वरूपी विधायक दबाव आणणारी, सरकारच्या कामाचे मूल्यमापन करणारी व्यवस्था/यंत्रणा महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने उभी करण्याचा प्रयत्न का होऊ नये? ज्यांच्याबद्दल जनतेला आदर आहे, विश्वास आहे, सरकारदरबारी मान आहे, अशा निष्पक्ष, जबाबदार, समंजस व्यक्ती समाजात अजूनही आहेत. त्यांच्यावर ही जबाबदारी टाकावी आणि त्यांनीही प्रश्ानचे गांभीर्य व त्यामागील उदात्त हेतू ध्यानात घेऊन पुढे यावे. रघुनाथ माशेलकर, वसंत गोवारीकर, अभय बंग, मेघा पाटकर आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर अभ्यासू व्यक्ती या नात्याने काही ज्येष्ठ लोकप्रतिनिधींनी जनतेचे विश्वस्त म्हणून काम करावे.

या मंडळींनी दर तीन महिन्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घ्यावी. कार्यक्रमाच्या अमलबजावणीबाबत सरकारचा अहवाल मिळवावा. त्याची चिकित्सा करावी. सत्य बाहेर आणावे. हे काम व्यवस्थित व्हावे व माहितीची खातरजमा करता यावी म्हणून कायमस्वरूपी कार्यालय असावे. तिथे उत्साही, किमान अनुभवी असणारी मंडळी वा कार्यकतेर् असावेत. त्यांना वेतन दिले जावे. या साऱ्याचा खर्च देणग्या गोळा करून भागवावा. प्रतिष्ठित व्यक्तींनी जनतेला आवाहन केले आणि या प्रयत्नातून समाजासाठी काही चांगले निष्पन्न होत आहे याची जाणीव झाल्यास, निधीची उपलब्धता ही मोठी अडचण राहू नये.

जनतेचे असंख्य प्रश्ान् आहेत. या यंत्रणेने कोणत्या प्रश्ानंना प्राधान्य द्यावे? पहिली बाब लोकसंख्यावाढ. प्रगती किती, अडचणी व उपाययोजना यांचा विचार व्हावा. मराठी जनतेचे दरडोई उत्पन्न एक लाख रु. करण्याचे आश्वासन दिले गेले. सध्या ते ३५ हजार रु. आहे. हरयाणात ते ६७,८९१ रु. आहे, हे पाहता केवढा मोठा पल्ला गाठायचा आहे हे स्पष्ट होईल.

सर्वप्रथम शेतकऱ्यांना दिलासा व आधार देण्याचे काम व्हावयास हवे, जे राजकीय पक्ष करत नाहीत. शेतमालाला चांगला भाव, पाण्याची व विक्रीची जवळपास सोय व प्रशिक्षण हे महत्त्वाचे.

कृष्णा खोऱ्यातील धरणांचे काम पाच वर्षांत पूर्ण करणे, त्यासाठी अनुशेषाचे भान ठेवून वाषिर्क २,६०० कोटींची तरतूद केल्यास धान्योत्पादन वाढेल. जलसंधारण कामांचे मूल्यमापन, नवीन कामांचा ठोस कालबद्ध कार्यक्रम व निधीची तरतूद हेही महत्त्वाचे. भूजलाची पातळी वाढविण्यासाठी लोकसहभागातून भूजलाच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण गावकऱ्यांना द्यावे. पथदशीर् प्रकल्प झाले आहेत. रेशनवर चांगले धान्य वेळेवर मिळते, त्याबद्दलच्या तक्रारी दूर करणे, कुपोषण दूर करणे व बालमृत्यूंचे प्रमाण कमी करणे याही बाबी महत्त्वाच्या. २०१० पर्यंत भारनियमन बंद करणे, नवीन प्रकल्प हाती घेणे, वीजगळती, वीजबिलांची वसुली हे पुढील मुद्दे. पोलिसांना घरे, दहशतवाद, नक्षलवाद्यांचा मुकाबला, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा याही बाबी निकडीच्या. अन्य विषयांचाही समावेश करता येईल.

या चचेर्च्या अनुषंगाने सरकारने दर तीन महिन्यांनी पुढील बाबींचा समावेश असणारा प्रगतीचा आढावा जाहीर करावा. नवीन किती उद्योग सुरू झाले, कितीजणांना रोजगार मिळाला, ८० टक्के स्थानिकांना मिळाला का, उद्योजकांच्या अडचणी, दारिद्यरेषेखालील लोकांची संख्या, वृद्ध शेतमजुरांना पेन्शन, गरीब व मध्यमवगीर्यांसाठी किती घरे बांधली, शिक्षण, आरोग्य व स्वच्छता याबाबत प्रगती, भ्रष्टाचाराबद्दल किती लोकांना शिक्षा झाली, वनक्षेत्रांत झालेली वाढ, दलित व महिलांवरील अत्याचार, अनुसूचित जमातीच्या महिलांना बिनव्याजी कर्ज- आश्ामशाळातील गैरकारभाराबाबत झालेली कारवाई, रोजगार हमी व रेशनसंबंधींच्या तक्रारींचे निराकरण, पालिका-महापालिकांचे ऑडिट, नव्याने उभारलेल्या झोपड्या व त्याबाबत संबंधितांवर कारवाई-ग्रामीण भागांत किती पाणीपुरवठा व लिफ्ट योजना नव्याने सुरू झाल्या, किती बंद पडल्या त्याबाबतची कारणे, या योजना चालविता याव्या, याबद्दल गावकऱ्यांना प्रशिक्षण. यात अन्य मुद्यांचीही भर घालता येईल. पाठपुरावा करून लक्ष ठेवता येईल.

एखाद्या चांगल्या, अनुभवी संस्थेने पुढाकार घेतला, तर यंत्रणा उभी राहून इष्ट परिणाम दिसू लागतील. मतदारांचे समाधान होईल. ही व्यवस्था अमलात आणणे व चालू राहिणे हा सारा खटाटोप म्हणजे शिवधनुष्यच, पण ते उचलणे आवश्यक आहे.

बुधवार, २१ ऑक्टोबर, २००९

पत्रकारिता-'इति' पर्यंत

'पत्रकारिता विद्या' हे पुस्तक मुख्यत: मराठीत पत्रकारिता करू पाहणार्‍Zया विद्यार्थ्यांसाठी, नवोदित पत्रकारांसाठी आहे; पण केवळ मराठी वऋत्तपत्रं आणि मराठी पत्रकारिता यामध्ये न अडकता राष्ट्रीय व जागतिक स्तरावरील पत्रकारितेच्या इतिहासातील आवश्यक, महत्त्वाच्या घटनांचा, नोंदींचा संदर्भ या पुस्तकात आढळतो.

पुस्तकाचे संपादक किरण गोखले हे ज्येष्ठ पत्रकार कै. दि.वि. गोखले यांचे पुत्र. प्रास्ताविकात त्यांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली आहे. पुस्तक तीन भागात आहे. पहिला भाग 'पत्रकारितेचे अंतरंग- वऋत्त संकलन, संपादन व लेखन.' दुसर्‍Zया व तिसर्‍Zया भागात 'पत्रकारितेची विविध क्षेत्रे: राजकीय पत्रकारिता, शोध पत्रकारिता, क्रीडा पत्रकारिता इत्यादी... आणि 'पत्रकारितेसाठी आवश्यक ज्ञन - कौशल्ये' या विषयावर अनुक्रमे माहिती मिळते. तीनही भागात पत्रकारितेतील सर्व घटकांवर, विषयांवर त्या त्या क्षेत्रातील अनुभवी, तज्ज्ञ व्यक्तींचे लेख आहेत. उदाहरणार्थ, भाग एकमध्ये दैनिकांच्या रविवार पुरवणीच्या संपादनासंबंधी शंकर सारडा, स्तंभलेखन व वाचकांचा पत्रव्यवहार यासंबंधी प्रकाश बाळ, साप्ताहिकाच्या संपादनासंबंधी ह.मो. मराठे आणि दैनिकाच्या संपादनासंबंधी कुमार केतकर यांनी लिहिले आहे.

पत्रकारितेतील सर्व स्तरांतील ऐतिहासिक घडामोडींचा, बदलांचा, विकास टप्प्यांचा केवळ उल्लेख न करता त्या मागच्या कारणांची, पुढे होणार्‍Zया परिणामांची, आव्हानांची चर्चा करायचा प्रयत्न केतकरांनी केला आहे. हा लेख वाचल्यावर पुढील तीन भागातील विषय समजून घेण्याची मानसिकता तयार होते. मराठे यांनी 'भूज भूकंपांची घटना दैनिके, न्यूज चॅनेल्स आणि साप्ताहिकांनी कशी 'कव्हर' केली हे सांगून 'साप्ताहिकांचे संपादन' आणि इतर वऋत्तपत्रांचे, नियतकालिकांचे संपादन यामधील साम्यभेद नेमकेपणाने मांडला आहे बातमी कशी ओळखायची, मिळवायची आणि लिहायची? बातमीदार कसा असावा व नसावा, संपादकाची भूमिका, संपादकीय विभागाची कार्यपद्धती, वऋत्तपत्राचे दैनंदिन कामकाज, वितरण व छपाई विभागाची भूमिका इत्यादी सर्व अंगांची व वऋत्तपत्रांच्या संबंधातील कायद्याची माहिती पुस्तकात मिळते; मनोहर बोडेर्करांच्या 'प्रूफ रीडिंग व शुद्धलेखन' या लेखात 'प्रूफ रिडिंग' व 'प्रूफ रीडर' यांचे महत्त्व सांगणारी सोदाहरण माहिती आहे. भाषांतर व अनुवाद यातील फरक समजावून देण्याचे काम अशोक जैन यांच्या 'मराठी भाषांतर व भाषांतर कला' या लेखाने केले आहे. दत्तात्रय पाडेकरांनी मांडणी व सजावर यावर माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. मजकूर मांडणी, टाईप, साईझ किंवा फॉण्टस साईझ, शीर्षकासाठी 'सुलेखन'चा वापर, रेखाचित्रांचे प्रकार, नकाशे व व्यंगचित्रांचा वापर इत्यादी मजकुराची मांडणी, सजावट यासंबंधीची माहिती पाडेकर यांच्या नुसत्या शब्दांतून नव्हे, तर अनेक चित्रांतून प्रकट होते.

दूरचित्रवाणीवरील बातम्यांचे जग नितीन केळकर यांनी उलगडले आहे, तर विश्वास मेहेंदळे यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियातील कामाच्या संधींविषयी मार्गदर्शन केले आहे.

'पत्रकारितेतील क्षेत्रे' या भागात राजकीय (दिनकर रायकर), क्रीडा (वि.वि. करमरकर), चित्रपट व नाट्य (कमलाकर नाडकणीर), वऋत्तसंस्था (प्र.के. नाईक), अर्थ-उद्योग (निरंजन राजाध्यक्ष), विज्ञन (डॉ. बाळ फोएंडके), शोध (अरुण साधू), युद्ध (दिवाकर देशपांडे), ग्रामीण (बा.भा. पुजारी) हे लेख आहेत. संपादक व लेखकांनी सर्वसमावेशक माहिती पोचवण्याचे काम शक्य करून दाखवले आहे. नवोदित पत्रकारांना 'पत्रकारिता' या विषयातील सैद्धांतिक माहिती, आवश्यक कला-कौशल्यांची जाणीव, नीतिमूल्ये आणि उपलब्ध रोजगार संधी यांची माहिती एका पुस्तकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.

- रवींद पालेकर
महाराष्ट्र टाईम्स नोव्हेंबर २६ २००५

पत्रकारितेत येणार्‍यांसाठी...

गेल्या काही वर्षांमध्ये दृकश्राव्य माध्यमाने पत्रकारितेच्या क्षेत्रात क्रांतीच घडविली आहे. पत्रकारितेला ग्लॅमर मिळवून देण्याचे काम विविध वृत्तवाहिन्यांनी केले आहे. पूवीR राजकारण- समाजकारण असे प्राथमिक उद्दीष्ट होते. मध्यंतरीच्या काळात मालक- संपादक असा प्रकार अस्तित्वात आला आणि आता पत्रकारितेला व्यावसायिक रुप आले आहे. व्यावसायिक म्हणून त्याकडे पाहिले जाते. या नानाविध पैलूंचा परिचय देणारे पत्रकारिता- विद्या हे किरण गोखले यांनी संपादित केलेले पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. हे पुस्तक तीन प्रमुख भागांमध्ये विभागलेले आहे. वार्तासंकलन, संपादन व लेखन या विषयावर पहिला भाग आहे. यात विविध प्रकारच्या संपादनावर विविध संपादकांनी लिहिले आहे. दैनिकाच्या संपादनावर 'लोकसत्ता'चे संपादक कुमार केतकर, सायंदैनिकाबाबत निखिल वागळे, साप्ताहिकाबाबत ह. मो. मराठे तर रविवार पुरवणीच्या संपादनाबाबत शंकर सारडा यांचे माहितीपूर्ण लेख आहेत. पत्रकारितेतील विविध क्षेत्रांमध्ये राजकीय (दिनकर रायकर), क्रीडा (वि. वि. करमरकर), चित्रपट व नाटय (कमलाकर नाडकणीR), वृत्तसंस्था (प्र. के. नाईक) यांचे लेख आहेत. या पुस्तकाचा आणखी एक विशेष म्हणजे अर्थ- उद्योग (निरंजन राजाध्यक्ष), विज्ञान (बाळ फोंडके), युद्ध (दिवाकर देशपांडे), शोध पत्रकारिता (आरुण साधू) व ग्रामीण पत्रकारिता (बा. भा. पुजारी) या मराठीत काहीशा उपेक्षित राहिलेल्या विषयांवरही यात चांगल्या लेखांचा समावेश आहे. अखेरच्या भागात पत्रकारितेसाठी आवश्यक ज्ञान व कौशल्ये यांची माहिती असून यात अरुण साधू, अशोक जैन, मनोहर बोर्डेकर, गिरीश कुबेर, दत्तात्रय पाडेकर यांचे लेख आहेत. या पुस्तकास कुमार केतकर यांची सध्याचा पत्रकारितेचा आवाका नेमका स्पष्ट करणारी प्रस्तावना लाभली आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.
संपादन - किरण गोखले
लोकसत्ता, रविवार, १३ जून २००४

पत्रकारिता


कोणे एकेकाळी एखाद्या इमारतीच्या भिंतीवर ‘डोंगरे बालामृत पिऊन मुले गुटगुटीत होतात’ अशा काळ्या-पिवळ्या जाहिरातीच्या खाली ‘उंदीर आणि झुरळी मारण्याचे प्रभावी औषध’ असं अनाकलनीय निवेदन.. असंच जनसंपर्काचं ओबडधोबड आणि बटबटीत स्वरूप असायचं! आज मात्र दोन-अडीच वर्षाची मुलं आपल्या सदनिकेच्या दिवाणखान्यात सर्व व्यावसायिक जाहिराती तोंडपाठ म्हणताना पाहून साहजिकच मनात विचार येतो की, काळ किती झपाटय़ानं बदलला आणि प्रत्यही बदलत आहे. टपाल माध्यमातून आठ-पंधरा दिवसांनी मिळणारी बातमी दूरध्वनीमुळे आज तात्काळ कानी पडते. घटना घडून गेल्यानंतर समजणारा वृत्तपत्र वृत्तांत आता दूरदर्शनवर जिवंत पाहायला मिळतो. इंटरनेटच्या साक्षात्कारानं तर ‘मास कम्युनिकेशन’ म्हणजे जनसंपर्क आज अक्षरश: चुटकीच्या अंतरावर आपलं जीवन व्यापून राहिला आहे. तरीसुद्धा या क्षेत्रातील अभ्यासक्रम कित्येकांना अज्ञातच राहिले आहेत. शिवाय या अभ्यासक्रमांसाठी कोणत्या प्रकारची मानसिक क्षमता लागते याचा नीट अंदाज न घेता ‘स्कोप’, ‘डिमांड’ आणि ‘र्सटटी’ अशा शंकांचा त्रिकोण गळ्यात अडकवून आजचे अनेक इच्छुक ‘जर्नालिझम माझ्यासारख्याला जमेल का?’, ‘अ‍ॅडव्हर्टायझिंगमध्ये कॉम्पिटिशन खूपच आहे का हो?’ किंवा ‘जनसंपर्क माध्यम फार काळ जॉब सॅटिसॅफ्शन देतात का?’ अशांसारखे प्रश्न विचारतात. मास कम्युनिकेशन क्षेत्रातील पत्रकारिता, जाहिरातकला आणि जनसंपर्क यातील अभ्यासक्रम एकमेकांशी संलग्न आणि काहीसे पूरकही आहेत; म्हणूनच त्यांचा स्वीकार करण्यापूर्वी इच्छुकांनी एकदा स्वत:च आपल्या व्यक्तिमत्त्वाचं परीक्षण करणं आवश्यक आहे. हे अभ्यासक्रम घेतल्यानंतर ते यशस्वीपणे राबविण्यासाठी एक प्रकारचं स्वानंदी, स्वाध्यायी आणि बहुढंगी व्यक्तिमत्त्व विकसित करण्याची मानसिकता प्रत्येकानं आवर्जून सांभाळली पाहिजे. उत्कृष्ट पत्रकार होण्यासाठी लेखन व वक्तृत्वासह भाषेवर प्रभुत्व, लघुलेखन, टंकलेखन आणि आता संगणक माध्यमाची उत्तम माहिती, प्रदीर्घ आणि वैविध्यपूर्ण वाचन करून सामान्यज्ञान वाढविण्याबद्दल जिज्ञासा आणि छायाचित्रणशास्त्राची आवश्यक तेवढी माहिती या गोष्टींना अजिबात पर्याय नाही. थोडक्यात पत्रकार हा टीपकागदासारखा असावा. समोर येणारं कडू-गोड सारंच काही त्याला व्यवस्थित टिपून घेता यायला हवं. त्याच्यावर आवश्यक ते संस्कार करून त्यातून वाचकांच्या अंत:करणापर्यंत पोहोचण्याची किमया त्याला साधता यायला हवी. जाहिरातकलातज्ज्ञ होण्यासाठी प्रश्नप्य उत्पादनाचं प्रयोजन, व्यक्तिमत्त्व आणि परिणामकारकता यांचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास करण्याची तयारी हवी. तद्वतच आपल्या ग्राहकांशी बाजारपेठेबद्दल वास्तविक चर्चा करणं, बाजारपेठांचं सर्वेक्षण घडवून आणणं, ग्राहकांच्या उत्पादनाचं सादरीकरण अशा तऱ्हेने करणं की त्यातून स्वाभाविकपणे ग्राहक राजा खूश होऊन जावा, अशा प्रकारची विविध कार्ये निश्चित वेळात प्रभावीपणे पार पाडता यायला हवीत. अ‍ॅडव्हर्टायझिंग म्हणजे कॉपीरायटिंग असं समजण्याचे दिवस आता संपले आहेत. जनसंपर्कासाठी उपलब्ध माध्यमांची सखोल माहिती, त्यात कालमानानुसार त्वरेनं बदल घडवून आणण्याइतपत दूरदर्शित्व, जनताभिमुख स्वभाव, उमदी विचारसरणी आणि सातत्याने नावीन्याकडे कल्पक दृष्टीने पाहण्याची मानसिक तयारी एवढी शिदोरी हवीच!
प्रसारमाध्यमांची जननी म्हणून पत्रकारितेकडे मोठय़ा आदराने पाहिले जाते. पत्रकारितेमध्ये वृत्तसंकलन, लेखन, संपादन, छायाचित्रकारिता, वृत्तप्रसारण इ. बाबींचा समावेश होतो. पत्रकारितेमध्ये एखाद्या वृत्तसंस्थेत नोकरी अथवा मुक्त पत्रकार म्हणून काम करता येते. (स्थानिक, क्षेत्रीय, भाषिक, इंग्रजी, राष्ट्रीय वृत्तसंस्था) अथवा इतर नियतकालिके उदा. साप्ताहिक, पाक्षिक त्याचप्रमाणे दृक्श्राव्य (इलेक्ट्रॉनिक मीडिया) माध्यमातून काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. वृत्तपत्र व्यवसायाचे स्वरूप, महत्त्व, सर्वसाधारण ओळख, वृत्तपत्र पत्रकारांसाठीची आचारसंहिता, वृत्तसंस्था, आक्षेपार्ह जाहिरातीचा कायदा, पहिला वृत्तपत्र आयोग, वृत्तपत्र कार्यालयातील विभाग, बातमीदाराकडे कोणते गुण असावेत, बातमीचे प्रकार, डी.टी.पी., जाहिरात, मुद्रितशोधन इ. बाबींचा अभ्यासक्रमात समावेश होतो.
कामाचे स्वरूप/वातावरण : बातमीदारांना विशिष्ट विषयांवरील वृत्तसंकलन अथवा त्या त्या विषयातील बातमीचा वेध घेण्यासाठी कामाची जबाबदारी दिली जाते. त्याचप्रमाणे बातमीची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.
विशेष प्रतिनिधी : परदेश, राजकीय, सामाजिक घडामोडी, कोर्ट, क्रीडा अथवा त्या त्या विषयाशी संबंधित शहरातील बातम्या, त्यांचे विश्लेषण करणे इ. जबाबदारी विशेष प्रतिनिधींवर असते. बातमीदार आणि विशेष प्रतिनिधींना अतिशय व्यस्त कामाचे स्वरूप असते. त्यांना ठराविक वेळेतच आपले काम पूर्ण करावे लागते.
स्तंभलेखक : स्तंभलेखकांना नियमितपणाने एका विशिष्ट विषयावर विश्लेषणात्मक लेख लिहावा लागतो.
फिचर रायटर्स : विविध विषयांवर संशोधनात्मक, अभ्यासपूर्ण लेख तयार करणे यासाठी कालमर्यादा असते; परंतु त्यांना पुरेसा वेळ दिला जातो व शब्दमर्यादा निश्चित केली जाते. यात पुस्तक परीक्षणे, चित्रपट अथवा ध्वनिचित्रफीत रसग्रहण, टी.व्ही. आणि रेडिओ प्रश्नेग्रॅम, सीडीज्, ऑडिओ-व्हिडीओ कॅसेटस् परीक्षण, वेबसाइटस् इ. अनेक गोष्टींचा समावेश होतो.
उपसंपादक : बातमीदारांनी दिलेल्या बातमीची सत्यासत्यता पडताळणे, संपादन करणे, शक्य असल्यास बातमीचे पुनर्लेखन करणे, बातमीचा मथळा ठरविणे, एखादी बातमी अद्ययावत करणे, आवश्यकता वाटल्यास पानाचा लेआऊट बदलणे इ. स्वरूपाची कामे उपसंपादकांना करावी लागतात.
मुख्य संपादक : धोरणात्मक आणि वृत्तपत्रात/ प्रकाशनात प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराची जबाबदारी सांभाळावी लागते.
मुक्त पत्रकार : मुक्त पत्रकार म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती या कुठल्याही संस्थेला बांधील नसतात. त्यांना त्यांच्या कामासाठी स्वत:च बाजारपेठ शोधावी लागते.
आवश्यक कौशल्य, दृष्टिकोन : या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींकडे बहुश्रुतता विविध विषयांवरील गुणवत्तापूर्ण वाचन, स्वत:चे मत स्पष्ट शब्दात लिहिण्याची क्षमता, एखाद्या घटनेचे विश्लेषण करण्याची क्षमता, प्रसंगी संशोधनात्मक काम करण्याची मनाची तयारी, सामाजिक भान, वेळेचे बंधन पाळण्याची हातोटी, उत्कृष्ट आकलन क्षमता, मातृभाषेबरोबरच इंग्रजी, हिंदी तसेच शक्य तितक्या इतर भाषेचे ज्ञान असणे, काम करण्याच्या दृष्टीने सोयीचे जाते. वृत्तपत्र/ प्रकाशन व्यवसायाची आवड व त्याचे थोडेफार ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रवास व चौफेर, चौकस बुद्धिमत्ता आणि कष्ट करण्याची मनाची तयारी आवश्यक आहे.
प्रशिक्षण : देशातील बहुतेक विद्यापीठांमध्ये या विषयीचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. पदवी अथवा पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. Print Media,Electronic Media यांची कार्यपद्धती भिन्न असली तरी पत्रकारितेची तत्त्वे एकच असल्यामुळे उमेदवारांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण घेण्याची सधी उपलब्ध होऊ शकते. ग्रॅज्युएशननंतर मास कम्युनिकेशन या विषयात उमेदवार प्रवेश घेऊ शकतात.
आता आपण या क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमांची थोडक्यात ओळख करून घेऊ :
१) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन : भारत सरकारच्या इन्फर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मंत्रालयाच्या अधिपत्याखालील ही एक स्वायत्त संस्था असून या संस्थेत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यम/ जाहिरात विभागात काम करणाऱ्या संपर्क व्यावसायिकांसाठी अल्पावधीचे प्रशिक्षणवर्ग आहेत. शिवाय वर्षातून दोन वेळा या अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाते. या संस्थेमध्ये ओरिएन्टेशन कोर्स फॉर ऑफिसर्स ऑफ दि इंडियन इन्फर्मेशन सव्‍‌र्हिस, ब्रॉडकास्ट जर्नालिझम कोर्स फॉर पर्सोनेल ऑफ आकाशवाणी आणि दूरदर्शन आणि डिप्लोमा कोर्स इन न्यूज एजन्सी जर्नालिझम फॉर नॉनअलाइज्ड कंट्रीज असे तीन अभ्यासक्रम राबविले जातात. शिवाय पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन जर्नालिझम हा अभ्यासक्रम सर्व पदवीधारकांसाठी खुला आहे. यांची माध्यमे इंग्रजी आणि हिंदी आहेत. त्याव्यतिरिक्त डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन्स हा एक कोर्स आहे. या सर्वाचा कालावधी आठ महिने आहे. परीक्षा आणि मुलाखत दिल्ली मुक्कामी देऊन प्रवेश घ्यावा लागतो. मागणीनुसार परीक्षा केंद्र मुंबईमध्ये येते. फ्रीशिप्स आणि शिष्यवृत्त्या आहेत. संपर्क : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, अरुणा असफअली मार्ग, नवी दिल्ली- ११००६७.
२) मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटर, जमिया मिलिया इस्लामिया, जमियानगर, नवी दिल्ली- ११००२५ कोर्स : एम. ए. (मास कम्युनिकेशन) कालावधी : दोन वर्षे प्रवेशपात्रता : पदवीधर
३) डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, पुणे विद्यापीठ, रानडे इन्स्टिटय़ूट, फग्र्युसन कॉलेज रस्ता, पुणे- ४११००४ प्रवेशपात्रता : पदवीधर कालावधी : एक वर्ष जर्नालिझम (मराठी) कालावधी : सहा महिने प्रवेशपात्रता : बारावी पास (इंग्रजीसह)
४) गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करियर एज्युकेशन, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ, मुंबई- ४०००९८. कालावधी : एक वर्षाचा अंशकालीन पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशपात्रता : पदवीधर
५) एस. एन. डी. टी. वुमेन्स युनिव्हर्सिटी, पाटकर मार्ग, चर्चगेट, मुंबई- २१. कोर्स : जर्नालिझम (मराठी)
६) एम. आय. टी. स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर स्टडीज, १२४, पौड रोड, कोथरूड, पुणे- ४११०३८ एक वर्षाचा अंशकालीन डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायझिंग अँड कम्युनिकेशन्स मॅनेजमेंट प्रवेशपात्रता : पदवीधर
७) मुंबई मराठी पत्रकार संघ : संघाच्या वतीने मराठी भाषेत पदविका (पदवीधरांसाठी) आणि प्रमाणपत्र (बारावी उत्तीर्णांसाठी)अभ्यासक्रम चालविण्यात येतात. यंदाचे अभ्यासवर्गाचे १०वे वर्ष असून १३ ऑगस्टपासून हे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. दर गुरुवारी आणि शुक्रवारी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत चालणाऱ्या या अभ्यासवर्गांना ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शन करतात. अधिक माहितीसाठी, पत्रकार भवन, मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान, महापालिका मार्ग येथे प्रत्यक्ष किंवा २२६२०४५१, २२७०४१८९ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन या विषयात अंशकालीन पदविका देणाऱ्या मुंबईतील काही संस्था :
८) भारतीय विद्याभवन चौपाटी, मुंबई- ४००००७.
९) बॉम्बे कॉलेज ऑफ जर्नालिझम,
के. सी. कॉलेज इमारत, चर्चगेट, मुबई- ४०००२०.
१०) बॉम्बे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, दिनशा वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई- ४०००२०.
११) देहली इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अँड सव्‍‌र्हिसेस २६३, दादाभाई नवरोजी मार्ग, फोर्ट, मुंबई- ४००००१.
१२) हरकिसन मेहता फाऊंडेशन इन्स्टिटय़ूट ऑफ जर्नालिझम,
नरसी-मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स, विलेपार्ले, मुंबई
१३) हॉर्निमन कॉलेज ऑफ जर्नालिझम, माटुंगा, मुंबई
१४) मराठी वृत्तपत्र लेखक संघ, शिंदेवाडी, पालन मार्ग, दादर, मुंबई- ४०००१४.
१५) सेंट झेविअर्स इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन, मुंबई- १.
१६) सोफिया कॉलेज (बी. के. सोमाणी पॉलिटेक्निक) भुलाभाई देसाई रोड, मुंबई- ४०००२६.
१७) सोमैया इन्स्टिटय़ूट ऑफ जर्नालिझम अँड मास कम्यु. विद्याविहार, मुंबई- ४०००७७.
१८) सिद्धार्थ कॉलेज ऑफ मास कम्युनिकेशन, आनंद भवन, दादाभाई नवरोजी मार्ग, मुंबई- ४००००१.
१९) पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अँड प्रश्नेफेशनल स्टडीज.
२०)मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (प.), मुंबई- ४०००८०.
याव्यतिरिक्त अनेक खाजगी संस्था व शिवाय भारतातील कित्येक विद्यापीठात पत्रव्यवहाराद्वारेसुद्धा काही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अनेक माध्यमं, असंख्य उत्पादनं आणि विशाल पसरलेला आपला भारत देश अशा परिस्थितीत स्पर्धात्मक युगाची साक्ष ठेवून ‘मास कम्युनिकेशन’ या क्षेत्रातले व्यवसाय एक प्रकारे चलनी नाणंच ठरणार आहे. सृजन आणि कल्पक विद्यार्थ्यांनी या व्यवसायातील आव्हानं अवश्य स्वीकारावीत.
पुष्कर मुंडले
९९६९४६३६१०

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २००९

राजकारण.

नेत्यांनी कोणाचे ऐकावे? हल्ली आजूबाजूला मतलबी लोकांचा वेढा पडलेला असताना जनमानसाकडे पुढार्‍यांचे लक्ष जातच नाही. राजकारणाचा धंदा झाला आहे हे जनता जाणते पण हे जाणणारे ’जाणते’ नेते आहेत कोठे ? निवडणूकींच्या निकालाकडे पाहताना आज - उद्याचे वर्तमानपत्र जपून ठेवून वाचले तर निखळ करमणूकीची खात्री देता येईल.

मतलबी चमच्यांनी सरकारवर दबाव टाकून बरीच धोरणे आपल्याला सुखदायक करून घेतली आहेत. पण आता चमच्यांत देखील फूट पडली आहे- उदा. अनिल वि. मुकेश. अशाने नवी ध्रुवीकरणे जन्मास येऊ शकतात. आज मुख्यत: धार्मिक आणि निधर्मी असे दोनच गट असावे असे कॉंग्रेसला सोयीने वाटत होते ते संपेल. खरे म्हणजे हे धर्माधिष्ठीत ध्रुवीकरणच देशाला तारू शकते पण हे त्तथाकथित धार्मिक पक्षाच्याच नजरेत येत नसल्या मुळे पंचाईत होतेय.

मला वाटते या सर्व लोकांना धडा शिकविण्याची एक संधी येत्या निवडणूकीत आपल्याला मिळणार आहे. त्या वेळी पक्षाला मत न देता आपल्या विभागातील एखाद्या चांगले काम करणार्‍या उमेदवारास द्यावे हे उत्तम.
- Namdev Bamane

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २००९

बाप्पा रे!

तुला हाक मारताना आताच्या प्रथेप्रमाणं प्रिय म्हणावं की तीर्थरूप म्हणावं याचा निर्णय करता आला नाही. मग ठरवलं तुला हाकच मारायची. तीसुद्धा एकेरी. कारण त्यातून जवळीक साधल्याचा आभास निर्माण करता येतोच; शिवाय आताच्या काळाला धरूनही होतं. आता कुणाशीही पटकन एकेरीत बोलण्याचीच रीत आहे. टेलिव्हिजनवर किंवा जाहीर कार्यक्रमात 'मोठ्या' माणसाची मुलाखत घेताना असं एकेरी बोलून आपलंही वजन वाढवता येतं. ही दाखवेगिरी आहे, असं तू म्हणशीलच. पण अशी दाखवेगिरी करूनच आता सर्वकाही साध्य करता येतं.

बाप्पा रे! कोणे एकेकाळी भादपद महिन्याच्या शुद्ध चतुथीर्ला तू घरोघरी यायचास. धुंवाधार पावसानं हवाही ओलीगच्च झालेली असायची आणि आसमंत हिरवागार. श्रावणसरींचा गोडवा आणि मधूनच पडणारे उन्हाचे उबदार सोनेरी कवडसे यांची मोहक चित्रं मनात ताजी असतानाच तुझं आगमन व्हायचं. घर आनंदानं भरून जायचं. पाव्हणा म्हणूनच तू यायचास आणि पाव्हण्यासारखाचा राहून निघून जायचास. पुढच्या वषीर् लवकर येण्याचं आश्वासन मुलांच्या मनात पेरून जायचास. तुझं येणं-जाणं असं सहज होतं. पण बाळ गंगाधर टिळक नावाच्या माणसाला लोकांना एकत्र करण्याचा हुकमी एक्का म्हणून तूच चांगला वाटलास. घराघरातल्या देवघरातच राहून गुपचूप परत जाणारा तू सार्वजनिक ठिकाणी राहू लागलास. तुझं असं एका मर्यादित अर्थानं सामाजिकीकरण होणं ही काळाचीच गरज होती. देवाचं असं सार्वत्रिकीकरण तेव्हा आवश्यकच होतं. पण तेव्हाच का; आताही काही काही बातम्या ऐकल्या की अशा सार्वत्रिकीकरणाची आजही गरज आहे, असं तीव्रतेनं वाटतं बरं. पण आता अशा सार्वत्रिकीकरणाऐवजी राजकीयीकरण करणंच अनेकांच्या उपयोगाचं असतं. अशी गरज अधिकाधिक भासू लागली तेव्हापासून तुझ्या आगमनालाच एक बटबटीत रूप येऊ लागलं.

बाप्पा रे! लहानपणापासून ऐकत आलो की तु बुद्धीची, कलेची देवता आहेस. ज्ञानेश्वर माऊलीनं भगवद्गीतेवरील आपलं भाष्य 'मऱ्हाटी' बोलीत सुरू करताना सुरुवातीला २१ ओव्यांमध्ये तुझंच स्मरण केलं. 'अकार चरण युगुल। उकार उदर विशाल। मकार महामंडल। मस्तकाकारे।। हे तिन्ही एकवटले। तेथ शब्द ब्रह्मा कवळले। ते मिया श्रीगुरूकृपा नमिले। आदिबीज।। आता अभिनववाग्विलासिनी। जे चातुर्यार्थ कलाकामिनी। ते श्रीशारदा विश्वमोहिनी। नमिली मिया।। ' असं तुझं वर्णन करून तुला दंडवत घातला. गीतेवरचं ते मऱ्हाटी भाषेतलं भाष्य ही त्या काळातली बंडखोरी होती. संस्कृतातलं धन प्राकृतात आणून जनसामान्यांसाठी खुलं करणं हा विदोहच होता. पण आम्ही मुदलातलं विसरलो आणि ज्ञानेश्वरीची पूजा करण्यातच धन्यता मानू लागलो. भावार्थ नजरेआड करायचा आणि बाह्योपचारालाच महत्त्व देऊन त्यातच गुुंतून पडायचं ही तशी आमची जुनीच रीत. वाईट एवढंच वाटतं की तीच रीत अजूनही चालू आहे.

बाप्पा रे! हे एकविसावे शतक. तुला २१ आकडा प्रिय. दुर्वा व्हायच्या त्या २१. मोदक अर्पण करायचे ते २१. अथर्वशीर्ष म्हणायचं तेही किमान एकवीसदा! जो आकडा तुला प्रिय तोच आकडा धारण करणारं शतक सध्या चालू आहे. आता या शतकात तरी आम्हाला चांगली बुद्धी दे. ज्ञानाची कास धरण्याची वृत्ती दे. विश्लेषक नजर दे. नवीन ते ग्रहण करण्याची क्षमता दे. आजचे प्रश्न समजून घेण्याची कुवत दे. जात आणि धर्म या गोष्टी वैयक्तिक जीवनापुरत्याच ठेवण्याची उपरती सगळ्यांनाच होऊ दे. आमच्या राजकारण्यांना, नाही रे बाप्पा; सत्ताकारण्यांना दूरवरचं बघण्याची दृष्टी दे. तुझा उत्सव हा मन प्रसन्न करणारा होऊ दे. प्रदूषण आणि पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शेती आणि पाणी या विषयाचं महत्त्व साऱ्या साऱ्यांना उमजू दे!

बाप्पा रे! तुझ्या तीर्थरूपांच्या आवडत्या चंदावर आम्ही पोचलो आहोत; मंगळावर जाण्याची तयारी करतो आहोत. केवळ अवकाशविज्ञानातच नाही, तर विज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये आम्ही प्रगती करत आहोत. पण प्रगतीची ही कवाडं महानगरांपुरतीच आहेत. ती खेड्यापाड्यांतही पोचायला हवीत. आधुनिक आयुविर्ज्ञानाचे फायदे अगदी आडबाजूच्या खेड्यात राहणाऱ्याला सामान्य माणसालाही मिळू देत. त्यासाठी आम्हाला बळ दे. येणाऱ्या दुष्काळाला तोंड देण्याची शक्ती दे. पुन्हा अशी वेळ येऊ नये म्हणून प्रदूषण कमी करण्याची, अधिकाधिक झाडं लावण्याची, तिवरांचं रक्षण करण्याची, पाणथळ जागा वाचवण्याची, खाड्यांमध्ये भराव न घालण्याची, प्लास्टिकच्या पिशव्यांना दूर ठेवण्याची, थमोर्कोलच्या आराशीला बाजूला सारण्याची बुद्धी आम्हाला दे. थोडक्यात, आमची जीवनशैली सुधारण्याची उपरती आम्हाला होऊ दे. इतकं करशील ना रे बाप्पा?
यावें... शिवपार्वतीनंदना, आपले स्वागत असो! दैत्यदानवकंदना, आपलं आगमन आम्हाला कल्याणकारी ठरो. गजवदना, मूषकवाहना आम्ही अधीर मनाने तुमच्या आगमनाची केव्हापासून वाटत पाहातो आहोत. आपण यावे, आम्ही आनंदाने आणि परमभक्तीने तुमच्यासमोर नतमस्तक होण्यास आतुरलो आहोत.

आमच्याप्रमाणे आमच्या गेल्या कित्येक पिढ्या तुमच्यासमोर अशाच किंबहूना यापेक्षा अधिक भक्तिभावनेने नतमस्तक होत आल्या आहेत. गेली किती शतकंहा तुमचा उत्सव अखिल हिंदूमात्र उत्साहात, आनंदात घरोघरी साजरा करत आले आहेत त्याची तर गणतीच नाही. हे गणराया, कुठल्याही पंथाचा, कुठल्याही जातीचा हिंदू तुम्हाला निरंतर पिढ्यानुपिढ्या वंदन करत आला आहे. तुमचं भजन-पूजन गेली हजारो वर्षं या भारतभूमीत निनादतं आहे. आपली म्हणजे गजाननाची मूतीर् घरातल्या मखरातून सार्वजनिक मैदानात आणणारे लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला तुमचा उत्सव आता यावषीर् ११६ वर्षांचा झाला. केवळ पाच उत्सवांनी सुरू झालेली ही उज्ज्वल परंपरा आणि प्रथा आता पन्नास हजार एवढी प्रचंड संख्या गाठण्याएवढी विशाल झाली आहे. हा उत्सव महाराष्ट्रात सुरू झाला आणि महाराष्ट्रातच वाढला. असं सांगतात की, इतक्या मोठ्या प्रमाणात सातत्याने दहा-अकरा दिवस चालणारा दुसरा उत्सव जगाच्या पाठीवर कुठेही नाही. या उत्सवात मुख्यत: तरुण भाग घेतात. तुमच्या भक्तीभावनेने देहभान विसरतात. त्यांच्या हातून क्वचित काही आगळीक घडली की त्याचा गाजावाजा केला जातो. काही आगळीक होऊ नये म्हणून सर्वप्रकारची दक्षता घेतली पाहिजे हे खरंच! पण उत्सवी वातावरण म्हटलं की, उत्साहाला उधाण आल्याशिवाय कसं राहिल आणि उधाण समुदाचं काय किंवा माणसाच्या मनातल्या आनंदाचं काय, कधी कधी सीमारेषेचं उल्लंघन करणारच. तुमच्या उत्सवाचं योगदान इतकं प्रचंड आहे की, त्या जोरावरच उत्साही कार्यर्कत्यांकडे थोडं क्षमाशील दृष्टीने पाहिलं जातं.

या प्रदीर्घ काळात कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या भक्तीत एवढाही उणेपणा येऊ दिला नाही. कधी अन्नधान्याची टंचाई, कधी वर्षादेवतेचा रूसवा, कधी गगनाला भिडणारी महागाई तर कधी देशाच्या सीमेवर जमणारे युद्घाचे ढग आणि कधीकधी तर लोकशाहीच्या नावाखाली चालणाऱ्या निवडणुकीच्या गदारोळामुळे गढुळलेलं वातावरण... या आणि यासारख्या अनेक चिंता-विवंचना पाचवीलाच पूजलेल्या असतानासुद्घा तुमची चतुथीर् मात्र आम्ही मनापासून, आनंदाने साजरी करत आलो आहोत. 'सुखकर्ता दु:खहर्ता' ही तुमची श्रीसमर्थ रामदासस्वामींनी लिहिलेली आरती आम्ही गेली साडेतीनशे वर्षं मनापासून म्हणतो आहोत. 'अथर्वशीर्षा'ची आवर्तनं, सहस्त्रावर्तनं उत्सवात नित्यश: होत आहेत. तुमचा अवाढव्य देह आणि त्या देहावर विराजमान झालेलं गजराजाचं मस्तक अनेकांच्या कुतूहलाचा विषय. माणसाच्या देहावर हत्तीचं मस्तक बसेलच कसं, असा प्रश्न मोठमोठ्या विचारवंताना, संशोधकांना गेली अनेक वर्षं, अनेक तपं सतावतो आहे. पण 'अथर्वशीर्ष' ह्याचा एक अर्थ 'अ-थर्व', न थरथरणारं शीर्ष म्हणजे डोकं.. अथर्वशीर्षाचं पठण मानसिक शांतता आणि बौद्घिक स्थिरता देते असा निर्वाळा आहे. आता शीर्ष म्हणजे डोकं स्थिर राहायला हवं असेल तर ते तसंच वजनदार नको काय? येणाऱ्या आणि येऊ घातलेल्या सर्व अडीअडचणींना शांत डोक्याने सामोरं जायचं असेल तर डोकं तसं भरभक्कम पाहिजेच.

कोणी कोणी सांगतात, अथर्वशीर्ष हे मंत्रगर्भ स्तोत्र अथर्ववेदाच्या परिशिष्टात आहे. म्हणजे एकापरीने शीर्षस्थानी आहे. म्हणून त्याचं नाव 'अथर्वशीर्ष'. असेलही, कोणी काही, कोणी काही अनुमाने काढून त्यानुसार तुमच्याकडे पाहतात. कोणी म्हणतात, तुम्ही शेतकऱ्यांचे आवडते आहात. तुमचा शेतकऱ्यांवर लोभ आहे. म्हणून भाताच्या लोंब्या असाव्यात तशी तुमची सोंड आहे आणि धान्य पाखडण्यासाठी ज्या सुपांचा उपयोग केला जातो तसे तुमचे कान आहेत. म्हणून तर तुम्हाला 'शूर्पकर्ण' असंही म्हणतात. पण एक गोष्ट खरी, तुमचं आगळंवेगळंं रूप, चार हात, 'लंबोदर' म्हणजे मोठं पोट, गजमुख हा सगळा काही वेगळाच प्रकार आहे.

कोणी सांगतात, तुम्ही मूळचं आर्यांचं दैवत नाही. तुमच्या स्वरूपाची मूळ संकल्पना 'विघ्नहर्ता' म्हणून नव्हे, तर 'विघ्नकर्ता' म्हणून झाली. अजूनही अगदीच अल्प प्रमाणात असणारे काही लोक तुम्हाला 'विघ्नकर्ता' म्हणून ओळखतात आणि तुम्हाला वचकतात, बिचकतात. मात्र गेल्या हजारो वर्षांच्या प्रवासात तुमचा 'विघ्नकर्ता' हा स्वभाव कुठे कधीकाळी असलाच तर तो आता पूर्णत: दूर झाला आणि आपलं बळ वापरून भक्तभाविकांची विघ्नं, संकटं दूर कशी करावीत, त्यांच्या आधी व्याधींचं निरसन कसं करावं या गोष्टीकडेच आपण अधिक ध्यान दिलंत. आम्हाला याचा अनुभव आहेच. पण आमची तुमच्यावर असलेली भक्ती त्या अनुभवासाठी हपापलेली नाही. तुमच्यावर आमचं मनापासून प्रेम आहे. तुमचे पाय आमच्या घराला लागावेत म्हणून कितीतरी आधीपासूनच तुमच्या आगमनाकडे आम्ही डोळे लावून असतो. तुम्ही आल्यावर तुमची काळजी आम्ही मनापासून घेतो. तुमच्या मूतीर्ला एवढीही इजा पोहोचू नये म्हणून आमच्या जीवाची तळमळ अखंडपणे चालू असते आणि आम्ही तुमच्या भक्तांनी तुमच्यावरची भक्तीपोटी किती आघात सोसले, तुमचे भक्त कोणाकोणाशी आणि कसे कसे लढले हे तर तुम्ही जाणताच.

गोव्यात चारशे वर्षांपूवीर् पोर्तुगीजांच्या राजवट जेव्हा स्थिरावली, तेव्हा त्यांनी तुमचा उत्सव होऊ नये म्हणून जीवघेणी बंधनं तुमच्या भक्तांवर लादली. त्याआधी असलेलं मोगली वातावरण तुमच्या भक्तांना छळत होतेच. पोर्तुगीजांनी मोगलाला पिटाळून लावलं आणि सुरुवातीची काही वर्षं तुमच्या पूजन-अर्चनाबाबत उदार धोरण दाखवलं. पण थोडीशी स्थिरस्थावरता येताच त्यांनी आपलं खरं रूप बाहेर काढलं आणि उत्सवात गणेशपूजन करणाऱ्याला देहदंडाची शिक्षा फर्मावली आणि तो देहदंडही असातसा नाही. गणेशभक्ताला अक्षरश: आगीच्या लोळात ढकलून देऊन त्याला तीव्र यातना देण्याचा अघोरी प्रकार सुरू केला. एवढ्यानेही काही झालं नाही. इतक्या हालअपेष्टा समोर दिसत असतानासुद्धा तुमच्या भक्तांनी गुपचुपपणे तुमचं पूजन चालूच ठेवलं होतं. मूतीर् घडवणं आणि घरात आणणं अवघडच होतं. म्हणून तुमचं एखादं चित्र पेटीच्या झाकणाच्या आतल्या बाजूला लावायचं आणि घराची दारं-खिडक्या बंद करून ती पेटी उघडून मनापासून तुमचं पूजन करायचं आणि हलक्या आवाजात तुमची आरती म्हणावयाची, मंत्रपुष्पांजलीचा उच्चार करायचा. आजदेखील कागदावरच्या चित्राची परंपरा क्वचित कुठे आढळतेे आणि तिथे मूतीर्ऐवजी कागदाच्या चित्राचं पूजन केलं जातं. हे असंच, कदाचित इतकं तीव्र नसलं तरी हालअपेष्टा भोगायला लावणारे प्रसंग अनेकदा आले. तुमची चेष्टाकुचेष्टा अन्य धमिर्यांकडून नाठाळपणे केली गेली. पण त्या निंदेचंही तुम्ही आणि तुमच्या भक्तांनी स्वागतच केलं. तुम्ही तर ही निंदेची उत्तरं आपल्या विशाल कानाआड करत आलात.

आम्ही महाराष्ट्रीय लोक तुम्हाला जे मानतो त्याची पाळंमुळं फार पुरातन काळापर्यंत गेलेली असली तरी सात-आठशे वर्षांपूवीर् ज्ञानेश्वरमहाराजांनी अध्यात्म क्षेत्रातलं उच्चतम तत्त्वज्ञान आपल्या मराठी भाषेत आणलं ते 'ँ़ नमोजी आद्या' अशा अजरामर शब्दांनी तुमचे स्मरण करून! गेली कित्येक शतकं जेव्हा जेव्हा काही नव्या कार्याला प्रारंभ केला जातोे तेव्हा 'प्रारंभी विनंती करू गणपती' असंच आम्ही म्हणतो. सुमधुर संगीतामुळे मराठी भाषेत चिरतरूण राहिलेलं संगीत नाटक 'सौभद' लिहिताना अण्णासाहेब किलोर्स्करांसारख्या मराठी रंगभूमीच्या आद्य दिग्गज नाटककाराची मती कुंठित झाली. त्यांना काही सूचेना, नाटक अर्ध्यावर थांबलं. अण्णांंना मुंबईच्या एका दुकानात तुमच्या मूतीर्चं दर्शन झालं आणि काय आश्चर्य, तत्क्षणी त्यांना पुढची कथा सुचली. अण्णांनी झपाट्याने नाटक पूर्ण करून महाराष्ट्रशारदेच्या चरणी अर्पण केलं. पुढल्या शे-पन्नास पिढ्या या नाटकाचा मनमुराद आनंद लुटत आल्या. घरातल्या दारावरच्या गणेशपट्टीपासून ज्या घरात तुमचं चित्र नाही, ज्या देवघरात तुमची मूतीर् नाही असं कोणतंही घर वा देवघर सापडणार नाही. अगदी आजकालची फ्लॅटसंस्कृतीही याला अपवाद नाही. आम्ही तुमच्याशी किती एकरूप झालो आहोत म्हणून सांगू! आताच्या जीन्स-टीशर्टच्या युगात वावरणारी मुलं-मुली तुमच्या मंदिरासमोरच्या लांबच लांब रांगेत तासन्तास तिष्ठत उभी असलेली दिसतात. ते काय मनात भक्तिभाव असल्याशिवाय? त्यांना काही प्रचिती आल्याशिवाय का? असा तुमचा महिमा आमच्या मनोमनी रूजला आहे. यावे गणेशदेवा! सुखकर्ता दु:खहर्ता हे आपलं बिरूद सार्थ करण्याकरता यावं.

बा अदब, बा मुलाहिजा, होश्शियार, श्रीगणेशजी आ रहे है, निगाह रक्खो होश्शियार!
-ज्योर्तिभास्कर जयंत साळगावकर

मंगलमूर्ते दयाळा...

काहीतरी अपेक्षेने किंवा नवस बोलण्यासाठी देवदर्शनाला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मंदिरात भक्तांपेक्षा याचकांचीच गर्दी जास्त असते. गणेश या देवतेबद्दल तर 'नवसाला पावणारा गणपती' ही संकल्पना भलतंच स्वार्थी मूळ धरू लागली आहे. समाजमनावर याचा विपरीत परिणाम होतोय. ज्या गणेशाने सर्व मोह, लोभ, विकारांचा त्याग केला, त्या वीतरागी गणेशाकडे नवस बोलणं हे ईश्वरीय अज्ञानाचं द्योतक आहे.

....

हे गिरिजाकुमरा गजानना, लंबोदरा, विघ्नहरा तुला माझा शिरसाष्टांग नमस्कार.

गणराया, जे भक्त तुझे चिंतन करतात, त्यांना विघ्नं बाधत नाहीत. त्यांच्या सर्व शुभ आकांक्षा पुऱ्या होतात. म्हणून सर्व मंगल कार्यारंभी तुला वंदन करण्याची पद्धत आहे. तू चतुर्दश विद्यांचा स्वामी आहेस. वेद, शास्त्रे आणि पुराणे हे तुझेच ध्वनी आहेत. कृपानिधी गणनाथा, अभयदाता विनायका, माझ्या बुध्दीमध्ये चैतन्य येऊ दे. माझ्या मनामध्ये जीवनमुक्त होण्याची वासना प्रबळ होत आहे. ती पुरी व्हावी यासाठी मी तुला साष्टांग नमस्कार करतो.

खरं म्हणजे कुठल्याही उपासनेचा अंतिम हेतू मोक्षप्राप्तीच हवा. जन्ममरणाचे फेरे चुकवण्यासाठी अत्यंत तळमळीने, कष्टाने प्रखर उपासना केली पाहिजे. गणेशाच्या उपासकांना 'स्वानंद लोक' प्राप्त होतो आणि पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. अनादि काळापासून मंगलमय स्वरूपाची ही देवता आहे. 'श्री गणेशय नम:' याच मंत्राने कुठल्याही शुभ कार्याचा आरंभ होतो. विश्वमाता आणि विश्वपिता असलेल्या पार्वती-महादेवांनीच गणेशाला प्रथम पूजेचा मान दिला आहे. विघ्नांवर, संकटांवर संपूर्ण नियमन असलेली ही गणेशदेवता भक्तांची विघ्नं सहज दूर करते.

सिद्धी आणि बुद्धी या गणेशाच्या दोन शक्ती. म्हणून कुठलेही कार्य करण्यास लागणारी बौद्धिक प्रेरणा गणेशाच्या कृपेनेच मिळते. सर्व देवांचा आद्य-पूजनीय अनंतकोटिब्रह्मांडनायक, गणांचा अध्यक्ष ब्रह्माणस्पती, सकल विद्यांचा निधी, निर्गुणाचाही मूळारंभ असा जो हेरंब, अष्टसिद्धीयुक्त असून त्याची कृपा असीम असते हे निजभक्तांचे अनुभव आहेत.

अध्यात्म हा विषय अंत:करणात उचंबळणाऱ्या अवर्णनीय भक्तीप्रेमाचा हवा. निखळ प्रेमाला बुद्धी, पांडित्य, व्यवहार अभिप्रेत नसतात. या परमार्थाच्या वाटचालीत निर्व्याज प्रेमाची, अव्याभिचारी भक्तीची, स्फटिकासारख्या स्वच्छ पारदर्शक अंत:करणाची नितांत आवश्यकता असते. पूजा करताना, भगवंताच्या लीला ऐकताना, प्रार्थना करताना, नाम स्मरताना, ईश्वरप्रेमाने ज्याचं अंत:करण भरून येत नाही, कंठ दाटून येत नाही, डोळे पाणावत नाहीत, हृदयात ब्रह्मारूप प्रकटत नाही त्याची भक्ती वांझ असते. ईश्वरचरणी सर्वस्वाने वाहिलेलं मन हीच खरी पूजा होते.

दुदैर्वाने अशी भक्ती पाहावयास मिळत नाही. काहीतरी अपेक्षेने किंवा नवस बोलण्यासाठी देवदर्शनाला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मंदिरात भक्तांपेक्षा याचकांचीच गदीर् जास्त असते. गणेश या देवतेबद्दल तर 'नवसाला पावणारा गणपती' ही संकल्पना भलतंच स्वाथीर् मूळ धरू लागली आहे. समाजमनावर याचा विपरीत परिणाम होतोय. ज्या गणेशाने सर्व मोह, लोभ, विकारांचा त्याग केला, त्या वीतरागी गणेशाकडे नवस बोलणं हे ईश्वरीय अज्ञानाचं द्योतक आहे. आपले प्रश्न पुरूषार्थाने, विवेकाने, अध्यात्मिक साधनेने आपणच सोडवायचे असतात. पण लोकसमूहाला स्वाथीर्, मतलबी ठेकेदारांनी नवसाच्या फळाची प्रलोभनं दाखवली आहेत. गणेश भावाचा भुकेला आहे, नवसफेडीच्या वस्तूंचा नाही. गणेशचतुथीर्पासून अनंत चतुर्दशीपर्यंतचा सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा चालू करताना लोकमान्यांच्या मनात फार उदात्त लोकजागरणच्या भावना होत्या. कारण गणेश ही बुद्धीची देवता आहे. या सार्वजनिक कार्यक्रमातून वैचारिक उद्बोधन व्हावं, अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, मरगळ, निराशा नष्ट व्हावी, प्रबोधनाने जनतेचा आत्मविश्वास वाढावा, प्राप्त परिस्थितीवर मात करण्याचे कौशल्य आत्मसात कसं करावं याबद्दलची व्याख्यानं व्हावी अशा उत्तमोत्तम संकल्पना मांडून त्या महापुरुषाने सर्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. पण आज त्या संकल्पनेचा फज्जा उडालेला दिसतो. भक्तीभावना तर फोफावत नाहीच. पण अनेक वाममागीर् धंदे उत्सवाच्या नावाखाली चालतात.

१) जबरदस्तीने वर्गण्या वसूल करणं.

२) गजाननांच्या प्राणप्रतिष्ठा केलेल्या पवित्र मूतीर्समोर अश्लील सिनेमे, अर्वाच्य भाषा असलेली नाटके, ऑकेर्स्ट्राचा, धांगडधिंगा, कार्यर्कत्यांचं रात्री दारू पिऊन पत्ते खेळणं, दोन मंडळांतल्या मारामाऱ्या पर्यायाने सामाजिक अशांतता दिसते.

३) मोठ्या आवाजातल्या लाऊडस्पीकरने प्रचंड ध्वनिप्रदूषण, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करणं, गणेशमूतीर् आणताना आणि विसर्जन करताना फटाक्यांच्या माळा लावणं, ताशा वाजवणं, तान्ही मुलं, वृद्ध व्यक्ती,रुग्ण यांचा विचार न करणं, रस्त्यारस्त्यावर गणेशमूतीर् स्थापन करून ट्रॅफिक जाम करणं हे लोकमान्यांना अभिप्रेत होते काय? या सर्वांत गणेशाबद्दल प्रेम किती आणि स्वत:चा आनंद किती हा विचार केल्यास सार्वजनिक गणेशोत्सवात विधायक असं फारसं काही घडत नसून स्वार्थ साधण्याची वृत्ती बळावताना दिसते.

४) भक्तीभावाने गोड स्वरात आरत्या ऐकू येत नाहीत. विचारांची भाषणं होत नाहीत. मार्गदर्शन, प्रबोधन कार्यक्रम नसतात. गणपती विसर्जनाच्या दिवशीही गणेशाला निरोप देताना कंठ दाटून आलेले, व्याकूळ झालेले भक्त दिसत नाहीत. उलट अचकट विचकट हावभाव, उद्वेगजनक अंगविक्षेप, मद्यपान करून धुंद नाचत गुलाल उधळणं या सर्व गोष्टीत काय अध्यात्म आहे, हेच समजत नाही.

५) गणपतीच्या देवळात उलटं चालत जाणं, तासन्तास रांगेत उभे राहणं, नवस बोलून देवाला वेठीस धरणं, हार-तुरे-मिठाई यावर पैसे उधळणं हे सर्व करण्यापेक्षा गणेशाची मनापासून उपासना करणं, प्रेमाने स्तोत्र म्हणणं, आपल्याकडून शांततेचा भंग होणार नाही ही काळजी घेणं, मनोरंजनाच्या नावाखाली होणारी पैशांची उधळपट्टी थांबवून तोच पैसा गोरगरिबांच्या अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान या गरजांसाठी दिल्यास गजाननांची केवढी प्रसन्नता प्राप्त करून घेता येईल!

सूज्ञ भक्तांनी उत्सवाचा उद्देश, भक्तीची मूळ संकल्पना समजून घ्यायला हवी. माझा खूप मोठा प्रेमसखा गणेशा आहे याचीच नेमकी विस्मृती होते. सिनेमा-नाटके-वाद्यवृंद-लावण्या यांचा गजाननांच्या भक्तीशी काहीही संबंध नाही तो अपवित्र धांगडधिंगा प्राणप्रतिष्ठीत पवित्र गणेशमूतीर्समोर घालून आपण पापंच जोडत आहोत हे विचार केल्यास कळेल.

गणेशोत्सवाच्या काळात ५०-५० पावलांवर नव्या मंडळांच्या गणेशमूतीर् स्थापन होतात. सहस्त्रावर्तनाच्या उद्देशाने शेकडो लिटर दूधाचा अभिषेक होतो. ते दूध गरीब कुपोषित बालकांना प्यायला मिळाल्यास गणेशाची केवढी मोठी कृपा प्राप्त करून घेता येईल!

एखाद्या गणेश मंदिरात उसळणारी भक्तांची गदीर् हे त्या देवळाचं किंवा त्या मूतीर्चं 'नवसाला पावणारी देवता' हे गमक नसून स्वत:च्या स्वार्थ साधण्यासाठी होणारी ती लोभी माणसांची गदीर् आहे, निजभक्तांची नव्हे. कारण खरा भक्त मंदिरात कधीही याचना करत नाही तर फक्त व्याकूळ प्रार्थना करतो. मनुष्य जगण्यासाठी जन्माला येत नाही, जाणण्यासाठी येतो. सकाम भक्ती जीवनाचा व्यापार असतो. निष्काम भक्ती आत्म्याचा आनंद असतो. लोकांची गदीर् वाढावी. पर्यायाने दानपेटीत भरपूर माया जमावी या उद्देशाने 'जागृत देवस्थान', 'नवसाला पावणारा गणपती' असे चमत्कार अभिप्रेत असतील तर तिथे स्वाथीर् गदीर् असेल पण जाणकार ददीर् नसतील. चमत्काराच्या जोरावर लोकांना आपल्याकडे आकृष्ट करून घेणं म्हणजे परमार्थातली वेश्यागिरी करण्यासारखं आहे. साक्षात्कार हा परमार्थमार्गाचा कळस आहे.

देवाला नवसफेडीची लालूच दाखविणाऱ्या अज्ञानी भक्तांनी साधा विचार करावा त्या अनंतकोटी ब्रम्हांडनायकाला आपण एवढेसे चिमुकले जीव काय देणार! त्या कर्तुमकर्तुम महाशक्तीला आपल्यासारख्या क्षुद, र्मत्य माणसांकडून कोणती अपेक्षा असणार? कोटी सूर्यांचं तेज असणाऱ्या त्या महाशक्तीला आपण चिमुकल्या निरांजनाने ओवाळतो हा आपला आनंद आहे. मोठेपणाच्या भावनेने आपण देवासाठी जे जे करतो ते सारे परमात्म्यानेच निर्माण केले आहे, हे विसरू नये. फळं, फुलं, जल ही सर्व त्याचीच निमिर्ती नव्हे का? माझे अमूक काम झाल्यास मी तमुक वस्तू तुला देईन असा नवस बोलून आपण त्या विराट शक्तीला किती कमी लेखतो. नित्य तृप्त परमात्मा कशाचीही अपेक्षा करत नाही. तान्हं मूल स्वतंत्रपणे काहीही करू शकत नाही तर त्याचं सर्व आईलाच करावं लागतं. तरीही या एका गोष्टीने आई कंटाळत नाही. उलट त्याचं सर्व करताना मातेला खूप आनंद होतो, धन्य वाटतं. ती गोष्ट म्हणजे त्या तान्हुल्याचा निरागस चेहरा, निष्पाप डोळे, आई दिसली नाही की कासावीस होणं, त्याचं निर्व्याजपण आणि आईला पाहताच खुदकन हसणं एका आईशिवाय त्याला काहीही सुचत नाही.

अति चांगट जरी ललना। खेळ भातुके देता नाना।

तेथे न जडे बाळभावना। कुरूपहीन माता गोड।।

तशी भक्ताची अवस्था होणं आणि त्या भावावस्थेत परमेश्वराची उत्कट भक्ती करणं हेच आध्यात्माचं रहस्य आहे. अभक्तीने केलेले राजोपचारही परमात्म्याला रुचत नाहीत. काही अपेक्षा मनात ठेवून ईश्वरसेवा करणं हा व्याभिचारी व्यवहार होतो आणि व्यवहारात कुठली आली- आपुलकी, जवळीक आणि ओलावा! म्हणून वरवरची बेगडी भक्ती ठेवून सेवेचं प्रदर्शन करू नये. प्रेम नसलेली पण अपेक्षा असलेली गणिकाच प्रेमाचं जास्त प्रदर्शन करते. पण प्रेमाने ओथंबलेली गृहिणी फक्त अबोल त्यागच करत असते. मणभर पेढ्यांपेक्षा कणभर प्रेमच श्रेष्ठ असतं.

गणपती उत्सवानंतर कुठल्या गणपती मंडळाला किती किलो सोनं मिळालं, किती लाख रुपये मिळाले, हिऱ्याचा मोबाईल मिळाला, कोणत्या देवस्थानाचे उत्पन्न सर्वाधिक अशा बातम्या सचित्र पेपरमध्ये किंवा वाहिन्यांवर दाखवल्या जातात तेव्हा या सर्वांची कीव करावीशी वाटते. गजाननांचा साक्षात्कार कोणाला झाला, मानसिक किंवा आत्मिक शांती किती जणांना मिळाली, प्रबोधनामुळे किती जीवने सुधारली त्याबद्दल एकही उदाहरण छापून येत नाही किंवा दाखवलं जात नाही म्हणून उत्सव मंडळं ही मोठी आथिर्क उलाढाली करणारी केंदं होऊ नयेत. कारण खऱ्या भक्तीचा त्यात लवलेशही नसतो. उलट देवाच्या नावावर धांगडधिंगा घातल्याने ते विकृत स्वरूप आस्तिकालाही नास्तिक करण्याचा संभव असतो.

सावधान! यापुढे धांगडधिंग्याची ही सर्व पध्दत बंद करून खऱ्या गणेशभक्ताने त्याच्या चरणी प्रार्थना करावी...

मंगलमूतेर् दयाळा धावत बा येई। दुस्तर या भवजलमधुनी पार मला नेई।

स्वानंदेशा श्रीहेरंबा बहुतचि मी चुकलो। अज्ञानत्वे सर्वस्वाला माझ्या मी मुकलो।

धरणीधरा ऐसे द्यावे। सर्वांभूती लीन म्या व्हावे।

।। मंगलमूर्ति मोरया।।

गुरुवार, २७ ऑगस्ट, २००९

हे तरुणांनीच बदलायला हवं.


आज गणेशोत्सवाचं रूप बदलायची जबाबदारी तरुणांवर आहे. कारण हा उत्सव त्यांचा आहे. ते करू शकतील अशा गोष्टीही भरपूर आहेत.
......


मला तरुणांच्या ओठावर कोणते गीत आहे सांगा, मी त्या देशाचं भवितव्य सांगतो असं कोणी विचारवंत सांगून गेला आहे. अत्यंत समर्पक असे हे उद्गार. दरवषीर् मुंबईत, गोविंदा, गणेशोत्सव अशा दरवषीर् होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळी या वचनाची आठवण येते. मुळात उत्सव म्हटलं की, सळसळती तरुणाईच डोळयासमोर येते. अगदी आयोजनापासून ते सांगता होईपर्यंत. यात ज्येष्ठांचा सहभाग अर्थातच असतो, पण त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा असते. सारी धावपळ, दगदग, आयोजन ही जबाबदारी तरुणांची असायला हवी.

मुंबईत तरी, हे उत्सव म्हटलं की तरुणच डोळयासमोर येतात ही सकारात्मक बाब आहे. उत्सव कदाचित एखादा दिवस किंवा नऊ दिवस किंवा दहा दिवस रंगणारा असो, साधारण १६ ते ३० वर्षं वयोगटातील युवक सर्वत्र दिसतात. बेभान होऊन नाचताना किंवा रात्रभर जागरण करून पुन्हा पहाटे कामाला लागणारा असा हा तरुणांचा गट असतो. यांच्यामुळेच हे उत्सव दणक्यात होतात हेही मान्य करायला हवं. पण गेल्या काही वर्षांत हे उत्सव अधिकाधिक त्रासदायक होऊ लागले आहेत अशाही तक्रारी होत आहेत. अनेकदा नियम, कायदे धाब्यावर बसवून ते साजरे होताना दिसतात. असं होत असेल तर त्याचीही जबाबदारी तरुणांनी स्वीकारावी लागेल. आपल्याकडे उत्सव म्हणजे, भरपूर सजावट, भपना, अमाप खर्च असे समीकरण होऊन बसले आहेत. यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचं समर्थन असं असतं की, आम्ही वर्षभर उत्सव साजरे करत नाहीत, तेव्हा थोडा त्रास झाला तर काय बिघडतं? कोणी याबाबत विरोधी आवाज उठवला तर काही वेळा धमक्यापर्यंत मजल जाते.

यात एक बाब लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे, वर्षभर समाजाचा कोणता ना कोणता घटक आपापले उत्सव साजरे करत असतो. प्रत्येकाने अशी भूमिका घेतली तर वर्षभर लोकांना त्रास सहन करावा लागेल. नको ती गाणी मोठमोठ्याने लावताना कोणीतरी वृद्ध, बालक झोपलं असेल, कोणी विद्याथीर् अभ्यास करत असेल, कोणाकडे शोककार घटना घडली असेल याचाही तरुणांनी विचार करायला हवा. आपल्या हौसेची किंमत इतरांनी का मोजावी असा प्रश्ान् निर्माण होतो.

काही ठिकाणी मंडळाच्या पैशाचे हिशेब लागत नाहीत, किती वर्गणी जमा झाली हे कळत नाही अशा तक्रारीही होतात. असं होणं अर्थातच तरुणांना शोभादायक नाही. या अशा उत्सवांच्या निमित्ताने, अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. उत्सवादरम्यान ते अमलात येतात पण असं कार्य वर्षानुवर्षं कसे करता येतील याचा विचार होत नाही.

तरुणांनी आपली शक्ती कशी कामी लावायची हे ठरवायला हवं. आज मराठी तरु ण लष्करात जात नाही, अशी तक्रार आहे. यावर, साहसाची आवड असणाऱ्यांना याकडे उद्युक्त करण्याचं काम या तरुण कार्यर्कत्यांनी करायला हवं. गरीब वस्तीत शिक्षणाची आच आहे, पण पैशाअभावी ती साध्य करता येत नाही ही स्थिती असणारे अनेक असतात. ही मंडळं, तरुण त्यांच्यापर्यंत कसे पोहोचतील याचा विचार व्हायला हवा.

अनेक मंडळं आपापल्या परीने काम करत असतात, पण तरीही एकंदर चित्र अधिक आशादायक करता येईल. पण असंही दिसतं की, अनेक तरुण कोणत्या का कोणत्या राजकीय पक्षांनी बांधलेले असतात. राजकीय पक्षांचा कार्यक्रम मर्यादित असतो. त्यांना ही शक्ती सत्ता मिळवण्यासाठी, आंदोलने करण्यासाठी वापरायची असते. पण लोकांना भेडसावणाऱ्या रोजच्या समस्यांना हात घालावं असं त्यांना वाटत नाही. साधं उदाहरण म्हणजे, मुंबईतले रस्ते सुमार दर्जाचे आहेत. श्री गणेशाला याच रस्त्यावरून यावं लागतं आणि विसर्जनाचा प्रवासही ठेचकाळत करावा लागतो. पण अशा मंडळांच्या तरुणांनी एकत्र येऊन आवाज उठवल्याचं दिसत नाही, राजकीय पक्षांना हा कार्यक्रम घ्यायला भाग पाडलं जात नाही. याला कारण बहुसंख्य तरुण राजकीय पक्षांकडे झुकलेले असतात, स्थानिक नगरसेवक, आमदार, अशांनी त्यांना बांधून ठेवलेलं असतं.

आज अनेक समस्या सामान्य माणसाला भेडसावत आहेत. हे बहुतेक तरुण याच घरांतून आलेेले असतात. त्यांनी आपली शक्ती आणि युक्ती केवळ उत्सवाचं आयोजन करण्यात दवडण्यात काय अर्थ आहे? उदाहरणच द्यायचं झालं तर, लोकलमधून येत असताना, भजनी मंडळ एका डब्यात जोरजोरात टाळ वाजवत आणि कर्कश्श स्वरात भजनं म्हणत असतात. यात अनेक तरुण असतात. अशा प्रकारे, इतरांना उपदव ठरून देव पावत नाही हे त्यांना कळत नसेल का? रेल्वेचा डबा ही आपली खाजगी मालमत्ता नाही हे त्यांना कळत नसावं? पण दिशा चुकलेले असे युवक उत्सवात वावरत असतात.

हे उत्सवच नव्हे तर, एकंदर सर्वत्र शिस्त, शांतता येईल याची जबाबदारी या युवकांवर आहे. त्यामुळे या युवकांचं कार्य सांगा, मी शहराचं भवितव्य सांगतो, असं म्हणायला हवं.

शुक्रवार, १० जुलै, २००९

वी लव्ह हिम.

आजही तरूणांचं आदरस्थान म्हणून पहिलं नाव शिवाजी महाराजांचं घेतलं जातं . इतिहासात अभ्यासासाठी असूनही शिवाजीराजे कोणाला नकोसे झाले नाहीत . मोबाइलच्या स्क्रीन सेव्हरपासून ऑरकुटच्या साइटवरही ते आरूढ झाले . पण ... शिवाजीराजांची एवढी क्रेझ असूनही त्यांची माहिती फारच थोड्यांना आहे . शिवाजी महाराजांनी अफझलखानाची बोटं कापली असा शोध कोणी लावतं , कोणासाठी ते ' लीडर ' आहेत , तर कोणासाठी ' ग्रेट राजा '!
.........................

' शिवरायांचा आठवावा प्रताप ,' असं आपण म्हणत असलो तरी आपल्याला तो आठवावा लागत नाही . त्यांनी घडवलेला इतिहास केवळ पुस्तकापुरता नाही , तर तो आजही सगळ्यांना स्फूर्ती देणाराच ठरतो . त्यांनी केलेला प्रताप , त्यांनी घडवलेला इतिहास सगळ्यांनाच माहित आहे , असं आपण गृहित धरतो .

ज्या काळात हिंदूंना कोणी त्राता नव्हता , त्या काळात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं साम्राज्य उभं राहिलं . स्वराज्याचं सुराज्य करणाऱ्या या राजाच्या दूरदृष्टीमुळे शत्रूलाही सळो की पळो करुन सोडलं होतं . या कर्तव्यदक्ष राजाचा प्रताप आणि त्याची न्यायप्रियता यावर त्या काळात हिंदूच नाही , तर अन्य धमिर्यांनाही विश्वास होता . मराठी माणसाला अभिमान वाटावा असाच हा कालखंड . आपल्या प्रजेची काळजी वाहणाऱ्या या राजाला आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा .

खरं सांगायचं तर शिवरायांना आठवायला आपल्याकडे निमित्त लागत नाही . त्यांचा अभिमान बाळगायला केवळ मराठी असण्याची गरज नाही . भाषणात त्यांची उदाहरणं देण्यासाठी अमुक एका पक्षाची उमेदवारी करावी लागत नाही . इतिहासात अभ्यासायला आले किंवा भाषेच्या पुस्तकात त्यांच्यावर एखादा धडा होता , म्हणून मुलांना ते कधीच नकोसे झाले नाहीत . आजच्या आयटी युगातही ते ' सॉल्लिड पॉप्युलर ' आहेत . तरुणांनी ऑरकुटवर त्यांची कम्युनिटी आणि एक साइटही आणलीय . मोबाइलचा स्क्रीन सेव्हरवर म्हणूनही ते सेट झाले आहेत . एकंदरीत छत्रपती शिवराय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके आहेत . आवडता राजा म्हणून आजही त्यांचाच पहिला नंबर लागतो . पण जेव्हा वेळ येते त्यांच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं देण्याची तेव्हा ... तेव्हा मात्र कपाळाला हात लावायची पाळी येते . हे हवेतले तीर नाहीत . कॉलेजमधल्या काही मुलांशी गप्पा मारल्या . म्हटलं , जाणून घेऊयात शिवाजी महाराजांचा आदर करणाऱ्या या ' मराठ्यां ' ना शिवाजी महाराजांबद्दल कितपत माहिती आहे ते ! म्हणून शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारल्या तेव्हा आलेला अनुभव अतिशय धक्कादायक होता . आपल्या माहितीसाठी एक नमुना पेश है -

प्रश्न : शिवाजी महाराज कोण होते ?

उत्तर : लीडर

प्रश्न : शिवरायांचा राज्याभिषेक कोणी केला ?

उत्तर : शहाजीराजांनी (' हो ना ?'आपल्यालाच उलट प्रश्न विचारण्यात येतो .)

प्रश्न : शिवाजी महाराजांनी कोणाची बोटं कापली ?

उत्तर : अफझलखानाची (' ए चुकलं तर चालेल ना ?')

प्रश्न : शिवाजीराजांना तलवार कोणी दिली ?

उत्तर :( अरे , आम्हाला हा प्रश्न होता !) औरंगजेबाने

प्रश्न : शिवरायांनी कोणता युद्धप्रकार आणला ?

उत्तर : गुरिला वॉर ( मराठीत काय म्हणतात ते आठवत नाही )

इतिहास कच्चा होता किंवा इतिहासातील काही आठवत नाही , असं म्हणत आपल्या अज्ञानाचं समर्थन करायला मात्र कोणी विसरत नाही . शिवाजी महाराजांचे गुरू कोण , शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातल्या व्यक्तींची नावं काय , गड आला पण सिंह गेला असे उद्गार त्यांनी कोणाला उद्देशून काढले , असे प्रश्न म्हणजे मुलांना परत एकदा परीक्षा द्यायला लावण्यासारखंच होतं . या प्रश्नांना बरोबर उत्तरं देणारी फारच कमी मुलं होती . चुकीची उत्तरं ऐकून आपण चक्रावून गेलो नाही , तरच नवल !

या प्रश्नांना मिळणा-या चमत्कारिक उत्तरांनंतर खरं तर अनेकजण निराश होतील . अशा वेळेला आजच्या मुलांना इतिहासाचं महत्त्व ते काय कळणार , जन्मत : च स्वातंत्र्य मिळालेल्या या मुलांना स्वातंत्र्याची किंमत काय कळणार अशा प्रतिक्रिया साहजिकच व्यक्त होतात . यापेक्षा आणखी भयंकर उत्तरं न मिळता काहीतरी बरं ऐकू येईल या आशेवर आपण आणखी प्रश्न विचारत राहतो . महाराजांमधला कोणता गुण तुम्हाला आवडतो किंवा महाराजांना तुमच्या लेखी एवढं महत्व का हा प्रश्न मुलांना विचारताच जवळजवळ सर्वच मुलांनी महाराजांच्या न्यायप्रियतेचा आणि परस्त्रीला सन्मान देण्याच्या गुणांचं कौतुक केलं . त्यांच्यातील याच गुणामुळे आपण महाराजांचे फॅन , ओह सॉरी महाराजांचा आदर करतो असं सांगितलं . शिवाजी महाराज , मराठी भाषा , मायबोलीचा डंका पिटणाऱ्यांच्या राज्यात ' वाघिणीचं दूध ' पिण्याची भलतीच ओढ दिसून येते . त्यामुळे बोलताना भाषेची गल्लत होतच होती . परस्त्रीला ' इज्जत द्यायचे ,' शिवाजी महाराज म्हणजे ' अरे , सॉलिड राजा . मानतो आपण त्यांना ! ग्रेट माणूस यार ,' अशी तरुणांच्या बोलीभाषेची गरुडझेप दिसत होती . पण त्यात शिवरायांचा अपमान करण्याची भावना नव्हती . उलट , ज्यांना उत्तरं देता आली नाहीत , महाराजांबद्दल आपल्याला माहिती नाही म्हणून वाटणारी खंत त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत असते . कुठलीही परीक्षा नाही , जाहीर सभा नाही , सहज चालणा-या गप्पातही आपल्या तोंडून शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारला जाऊ नये म्हणून मुलांना काळजी वाटत असते . तरीही संभाषण संपवताना सगळे सांगायला विसरत नाहीत , ए , कूल , वी लव हिम !

तुझी साथ.

जीवनाच्या या खडतर वाटेवर लाभली तुझी साथ
स्वखुशीने पुढे केलास तू प्रेमाचा हात
तुझे ते सुमधुर बोलणे पटकन मनात
ठसते
बाह्यांगावरूनच तुझ्या सोज्वळतेची खात्री पटते.
तुझा तो लाघवी स्वभाव मनात उमेद निर्माण करतो
प्रत्येक नवीन गोष्ट करण्याची मला प्रेरणा देतो.
तुझ्याशिवाय माझे हे जगणं व्यर्थ आहे
तुझ्यामुळेच माझ्या जगण्याला अर्थ आहे.
तुझे अस्तित्व मला सर्व ठिकाणी जाणवते
तू माझ्या जवळच आहेस याची जाणीव करून देते.
तुझे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व मनाला भुलवते
त्यामुळेच तुझ्या आठवणीत मी दिवसरात्र झुरते.
तुझ्या या प्रेमळ वागण्याने माझी झोपच उडाली आहे
सांग बरं, माझ्यावर तू कोणती जादू केली आहेस?
नकळत तुझे आणि माझे सूर जुळले
माझे अवघे जीवनच बदलून गेले.

जगण्याचा मार्ग.

स्वत:चं भविष्य, करिअर सगळेच बघतात. मी पण बघतोय आणि पण हे सगळं असताना सामाजिक देणं म्हणून मी नेहमी काही ना काही सामाजिक कार्य करत असतो.

मला काय मिळणार... काय फायदा होणार, याशिवाय कुठलंच काम होत नाही का किती फायदा बघणार! आतापर्यंत आपण प्रत्येक जण फायदाच बघत आलोय. फायदा बघतोय आणि पुढे ही बघतच राहणार.

जन्माला आल्यानंतर नकळत्या वयापासून आपण स्वत:चा फायदाच बघतोय. मी आणि माझं हेच... पाहत आलोय.

मग आपण आपल्या आयुष्यातला काही वेळ स्वत:चा फायदा न बघता कुठलं काम करू शकत नाही का?

एवढं आपण मीपणात गुरफटून गेलोच की. आपल्या फायद्याशिवाय काहीच विचार किंवा काम करता येत नाही.

इतिहास डोकावून पाहिला तर समजेल.

बाबू गेनू यांनी परदेशी मालाने भरलेल्या गाडीखाली झोकून दिले. त्याने बघितला होता का स्वत:चा फायदा?

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव स्वातंत्र्यासाठी हसतहसत फासावर गेले त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

महात्मा गांधी यांनी आपलं आयुष्य स्वातंत्र्यासाठी घालवलं त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

विनोबा भावे गोरगरीबांसाठी गावोगावी फिरले, त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले स्वत: शिकून हालअपेष्टा झेलत स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून त्यांच्यासाठी शाळा काढल्या. त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी समर्पण केले. त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

बाबा आणि साधनाताई आमटे यांनी सुखी जीवन सोडून जंगलात वाईट दिवस काढून ज्या कुष्ठरोगींची सेवा करून त्यांच्याकडून एक वेगळं विश्व निर्माण केलं. त्यांनी साधनाताईंनी बघितला होता का आपला फायदा? त्याची मुलं, सुना, नातवंडे पण हेच कार्य करताहेत त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

या लोकांनी जर आपला फायदा स्वार्थ बघितला असता तर काय झालं असतं या देशाचं, हे आपण कल्पना करूनच पाहवं. आपल्याला जरी या लोकांत सारखं महान कार्य करता येत नसलं तरी मला वाटतं आपण प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी आपला फायदा विसरून, स्वार्थ सोडून, मीपणा काढून काहीतरी कार्य करायला हवं आणि याच निस्वार्थ मनाने केलेल्या कार्यानेच आपला एक परिपूर्ण माणूस बनायला मदत होते.

मीपण तेच करतोय अर्थात मी पण स्वत:चा विचार करतोय मला आर्ट डायरेक्टर बनायचंय आहे. त्यासाठी शिकायचं आहे. घरची जबाबदारी संभाळायची आहे. गाडी, बंगला, बँक बॅलन्स मलाही करायचं आहे. आणि त्यासाठी जी मेहनत करायची आहे ती करतोय. आणि मला पूर्ण विश्वास आहे की, मी ठरवलं आहे ते मी करेनच, त्यासाठी मी सतत प्रयत्नशील असतो. मग हे करत असताना जर मी काही वेळ स्वत:चा फायदा न बघता, कोणाची तरी मदत करत असेल, एखाद्या गरजू व्यक्तीसाठी मी उपयोगी पडत असेन. एखादं सामाजिक कार्य करत असेल तर यात माझं काही चुकतंय का?

मला वाटतं अजिबात नाही चुकत माझं.

प्रत्येकाने असाच विचार करायला हवा, खरं आयुष्य जगणं म्हणजे हेच आहे. पण मी मात्र थांबणार नाही. स्वत:साठी करतोयच पण नि:स्वाथीर् मनाने जिथे गरज असेल तिथे दुसऱ्यांना मदत करतच राहिल. बाकी कोणीही काही बोलो. मला माझा जगण्याचा मार्ग सापडला आहे आणि मी असाच जगत राहणार.

- Namdev Bamane.

गुरुवार, ९ जुलै, २००९

बेळगावचा धडा.

मराठी उमेदवार निवडून येतील, असे बेळगाव, कारवार भागात जेमतेम सहा मतदारसंघ. तिथे समितीतर्फे एकेकच मराठी उमेदवार उभे असते, तर सहाच्या सहा निवडून येऊ शकले असते. पण तसे झाले नाही. सर्वत्र मराठी आडनावाचे किमान दोन उमेदवार रिंगणात एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे राहिले आणि सारेच कोसळले. हे असे होणार, हे त्यांना ठाऊक नव्हते, असे कसे मानायचे? कारण या मंडळींची उभी हयात या एक, दोन जिल्ह्यांचे राजकारण करण्यातच गेली. त्यांना गल्लीन् गल्ली आणि घरन् घर ठाऊक असे बोलले जात होते. पण ज्यांना घरे ठाऊक होती, त्यांना त्यांत राहणा-या माणसांची मने मात्र माहीत नव्हती, हेच निकालांवरून दिसते.

.................

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे कवित्व अद्याप चालू आहे आणि ते आणखी काही काळ चालू राहील, याचे महत्त्वाचे कारण हे की, पुढील लोकसभा निवडणुकांपूर्वीचा दक्षिण भारतातील हा बहुधा शेवटचाच सार्वजनिक कौल. म्हणूनच कर्नाटकची जनता कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकते, याकडे ब-याच जणांचे बारीक लक्ष होते. त्यातले अनेकांचे अंदाज चुकले, हे ओघाने आलेच. ज्यांचे अंदाज चुकले, ते आधी छातीठोकपणे आपण बोलतो, लिहितो ती कशी काळ्या दगडावरची रेघ आहे, हे सांगत होते. आता तीच मंडळी चुकलेल्या अंदाजांचे तर्कशास्त्र वाचक आणि टीव्ही प्रेक्षकांच्या गळी उतरवत आहेत. हे असेच दर वेळी चालते. या निवडणुकीतील महाराष्ट्राच्या दृष्टीने बातमी ही की, कर्नाटक विधानसभेतील बेळगाव, कारवार या सीमाभागातील जनतेचा गेली पाच दशके चाललेला लढा या निवडणुकीने संपुष्टात आणला. यंदा महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही उमेदवार निवडणूक जिंकू शकला नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. आता विधानसभा सीमाभागाविषयी जो काही निर्णय घेईल व विविध सामाजिक, सांस्कृतिक धोरणे संमत करेल, त्याचा प्रतिवाद विधिमंडळाच्या आत करण्याच्या वाटा बंद झाल्या आहेत. निदान ही विधानसभा हयात असेपर्यंत सीमावासीयांना आपल्या मागण्यांसाठी विधानसौधाच्या बाहेर फूटपाथवरच तिष्ठावे लागणार. गेली पाच दशके केवळ एकाच मागणीसाठी लढत राहणा-या बेळगाव, कारवारातील मराठी माणसांचा पुन्हा एकदा स्वप्नभंग झाला आहे.

भाषानिहाय प्रांतरचना करण्याचा फाझलका कमिशनचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला व १९५६ साली मुंबई प्रांतातून कानडी भाषिक वगळले व म्हैसूर राज्याला जोडले, तेव्हापासून हा लढा चालू आहे. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचे साडेतीन-चार वर्षे पेटलेले आंदोलन मुख्यत्वे मुंबईचा समावेश महाराष्ट्राची राजधानी म्हणून व्हावा, यासाठी होते. त्यामुळेच गुजरात व महाराष्ट्र राज्यांच्या स्थापना होताना १९६० साली मुंबईचा समावेश महाराष्ट्राची राजधानी म्हणून झाला, यातच मराठी जनांचे हात स्वर्गाला टेकले. गुजरात-महाराष्ट्र सीमेवरचा डांग जिल्हा अगोदर वादग्रस्त होता, पण तो वाद तिथेच विरला. आणखी काही सीमाप्रांतही चूप बसले, पण बेळगाव, कारवारची मंडळी जोर लावत राहिली. त्यांची सांस्कृतिक आणि मुख्य म्हणजे आथिर्क नाती महाराष्ट्राशी अधिक जवळची होती, हे एक कारण होतेच. त्यामुळे सीमाभागातील काही लढवय्ये लढत राहिले आणि हरतही राहिले. महाजन आयोग महाराष्ट्राच्या आग्रहाखातर अस्तित्त्वात आला. त्याचा निकाल विरुद्ध गेला. कर्नाटकच्या दृष्टीने हा प्रश्न तिथेच सुटला, पण लोकेच्छा तशी नाही, हे त्यानंतरच्या विविध स्तरांवरील निवडणुकांनी वारंवार दाखवून दिले. कायदेशीर प्रक्रिया आणि निवडणुकीतून जाहीर होणारी लोकेच्छा या स्वतंत्र बाबी आहेत, हे खरे. पण संसदीय लोकशाही मानणा-या राज्यव्यवस्थेत या निवडणुकीतून प्रकट झालेल्या लोकेच्छेचाही विचार व्हायला हवा. ही लोकेच्छा अधिक स्पष्टपणे आजमवायची, तर सार्वमत हा मार्ग होता. तो घ्यायची गरज कर्नाटकला वाटत नव्हती, कारण सीमाभाग तांत्रिकदृष्ट्या कर्नाटकाचाच भाग होता. महाराष्ट्राला असे सार्वमत घेण्यात धोका वाटत होता, कारण गोव्यात सार्वमत घेण्याचा प्रयोग महाराष्ट्राच्या अंगलट आला होता. अशा वेळी वारंवार आंदोलने पेटवणे, मोर्चे, धरणे, उपोषणे, शिष्टमंडळे आदी शिष्टसंमत उपायच अंमलात येत होते.

या विषयात कर्नाटकात अर्थातच स्वारस्य नाही. महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूर आदी सीमाभागातील प्रदेश वगळता कोणाला त्यात सोयरसुतक नाही. आधी एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांनी आणि नंतर एन. डी. पाटील, शरद पवार यांनी हा प्रश्न हाती घेतला खरा, पण तो केवळ राजकारण म्हणून. मुंबई, दिल्लीत बसून सीमावासीयांच्या बैठका घ्यायच्या, त्यांना आश्वासनांची गाजरे दाखवायची, झिंदाबादच्या घोषणा ऐकून कान तृप्त करून घ्यायचे आणि आपाल्या उद्योगांना लागायचे, यापलीकडे केव्हाही काहीही झाले नाही. शिवसेनेनेही हा विषय हाती घेऊन कोणालाही जमले नाही, असे उग्र आंदोलन उभारले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हाताबाहेर चाललेली परिस्थिती ओळखून विशाल गोमंतकचा पर्याय मांडला. तोही तिथेच थिजला.

अशा वेळी सीमाभागातील मंडळींना आपला लढा केवळ स्वत:च्याच जोरावर लढावा लागणार, हेही स्पष्ट झाले. महाराष्ट्र एकीकरण समिती या संयुक्त व्यासपीठावर सर्व मराठी जनांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातच विलीन होण्याची मागणी सातत्याने लावून धरली असती, तर कदाचित चित्र बदलले असते. पण जसजशी वर्षे मागे जाऊ लागली, तसतसे या भागातील नवतरुण या मागणीपासूनही दूर जाऊ लागले, हे वास्तव आहे. पिकलेल्या केसांच्या आणि टक्कल पडलेल्या निवृत्त व निरुद्योगींचा टाइमपास असे सीमालढ्याचे स्वरुप उरले, हे वास्तवही नाकारता येत नाही. पण ही मंडळी आपल्या भूमिकेविषयी कमालीची हळवी आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्याच्या पेपरांत या आंदोलनाविरुद्ध ब्र जरी छापून आला, तरी रान उठते. त्यांची भावना ठीक आहे. तिचा आदर राखतानाच वास्तवाचे भान सोडून कसे चालेल?

' सार्मथ्य आहे संघटनेचे, जो जो करील तयाचे, मात्र तेथे भगवंताचे वास्तव्य पाहीजे', असे समर्थ रामदासांनी सांगितले. सीमावासीयांनी संघटना तर बांधली. पण ती समर्थ कशी होणार? कारण संघटनेचे मुख्य सूत्र एकी हे असेल, तर तिचाच अभाव या एकीकरण समितीत आहे. गेल्या काही वर्षांत कर्नाटक सरकारने बेळगाव शहराला 'उपराजधानी'चा दर्जा दिल्याने शहराचे रुप पालटू लागले. महाराष्ट्रात जाऊन एका जिल्ह्याचे गाव बनण्याऐवजी 'उपराजधानी' म्हणून दिमाखात राहावे, असे काही मराठी तरुणांनाच वाटू लागले, हे खरे आहे. त्यांना सत्य परिस्थिती सांगून आपल्याकडे वळवायचे, तर समितीत ऐक्य हवे आणि हे ऐक्य निवडणुकीत दिसायला हवे. मराठेशाहीच्या उत्तरार्धात मराठे सरदार आपसात लढले आणि सर्वजण पराभूत झाले. बेळगावातील मराठी नेत्यांनी हा उत्तर पेशवाईचाच आदर्श स्वत:समोर ठेवला.

मराठी उमेदवार निवडून येतील, असे बेळगाव, कारवार भागात जेमतेम सहा मतदारसंघ. तिथे समितीतर्फे एकेकच मराठी उमेदवार उभे असते, तर सहाच्या सहा निवडून येऊ शकले असते. पण तसे झाले नाही. सर्वत्र मराठी आडनावाचे किमान दोन उमेदवार रिंगणात एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे राहीले आणि सारेच कोसळले. हे असे होणार, हे त्यांना ठाऊक नव्हते, असे कसे मानायचे? कारण या मंडळींची उभी हयात या एक, दोन जिल्ह्यांचे राजकारण करण्यातच गेली. त्यांना गल्लीन् गल्ली आणि घरन् घर ठाऊक असे बोलले जात होते. पण ज्यांना घरे ठाऊक होती, त्यांना त्यांत राहणाऱ्या माणसांची मने मात्र माहीत नव्हती, हेच निकालांवरून दिसते.

समितीतले नेते छोट्या स्वार्थासाठी आपसात लढले आणि परिणाम म्हणून एकीकरण समितीचाच नव्हे, तर मराठी भाषिकांचा गुणफलक कोराच राहीला. हा पराभव केवळ महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणून मिरवणाऱ्या डझनभर लोकांच्या टोळीचा नव्हे, तर समस्त मराठी समाजाचा झाला. या पराभवाच्या पापाचे धनी कर्नाटकातील कानडी नेते नसून मराठी भाषिकच आहेत, हे ध्यानात घ्यायला हवे. कर्नाटकातील सर्व मोठ्या पक्षांना सीमाभाग आपल्याच राज्यात हवा आहे. म्हणून त्यांच्या पाठिंब्याचा प्रश्नच नाही. पण या प्रश्नावर महाराष्ट्रात रान उठवणारे किती मराठी नेते एकीकरण समितीच्या प्रचाराला गेले? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह निम्मे मंत्रिमंडळ कर्नाटकात 'प्रचार' करत होते. त्यांनी आपल्या पक्षांच्या उमेदवारांचा जरूर प्रचार केला असेल. पण तिथल्या तुमच्या भाषा बांधवांचे काय? त्यांची तुम्हाला काळजी नाही, हे आता स्पष्ट झाले. मग महाराष्ट्रात एकीकरणाच्या परिषदा आणि राणाभीमदेवी आगखावू भाषणे कशाला? आणि कोर्टकज्जे तरी कोणाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी? याचा एकदाच अंतिम निर्णय घ्यायला हवा. कारण सीमाभागातील मराठी बांधवांच्या मनाशी असा वर्षानुवर्षे खेळ खेळणे अमानुषपणाचे आहे.

बेळगावची महापालिका जिंकून तिथल्या मराठी समाजाने आपला ध्वज तिथं मानाने फडकावला होता, पण महापालिकेत जे जिंकले, ते मोठ्या प्रमाणावरील विधानसभेत पूर्णपणे गमावले. आता मराठीचा मुद्दा कोण लावून धरणार? महाराष्ट्र सरकारने सीमाभागाचा प्रश्न ब-याच उशीराने का होईना, सुप्रिम कोर्टात नेला आहे, त्याचा निकाल लागेल, तेव्हा लागो, तोपर्यंत विधानसभा निकाल हेच सार्वमत मानून कर्नाटक सरकार बेळगावचे कानडीकरण करणार. त्यास विरोध कोण व कसा करणार?

बेळगावचा धडा असा आहे. गेल्यावर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान मुंबई कोणाची? हा सवाल उपस्थित झाला आणि समस्त मराठी जनांनी त्याचा जवाब ती मराठी माणसाचीच, असा दिला. त्याचा परिणाम दिसलाच. ठाण्याच्या निवडणुकीतही असेच ऐक्याचे दर्शन घडले. बेळगावने अशीच एकजूट दाखवली असती, तर इतिहास बदलला असतो. पण आता ती वेळ पाच वर्षांसाठी तरी टळलेली आहे. आता केवळ चचेर्चे कवित्वच आपल्या हाती आहे.

bharat.raut@timesgroup.com

( लेखक टाइम्स ऑफ इंडिया समुहाचे संपादकीय सल्लागार असून शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आहेत.)

शनिवार, २७ जून, २००९

सप्रेम धन्यवाद, विनंती विशेष! - श्री. राज ठाकरे


लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना लोकांनी भरभरून मतदान केले त्याबद्दल प्रथम मी सर्वांचे आभार मानतो. अवघ्या तीन वर्षांच्या `मनसे' ला आपण जे प्रेम दिले, जो विश्वास दाखवला, तो सार्थ ठरविण्यासाठी सर्वशक्ती पणाला लावून मी यापुढील वाटचाल करीन. महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून पक्षाची स्थापना केल्यानंतर झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीतही आपण मला साथ दिली होती. त्यावेळी पक्षाला मिळालेल्या मतांपेक्षा दुप्पट मतदान लोकसभा निवडणुकीत करून आपण माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मराठी अस्मितेसाठी यापुढे अधिक कडवटपणे लढण्याचे बळ मला मिळाले आहे. आपले प्रेम यापुढेही असेच भरभरून मिळावे, यासाठी माझे `महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न' आपल्यासमोर मांडत आहे.

गुणवत्ता ठासून भरलेली असतानाही महाराष्ट्राचा खर्‍या अर्थाने विकास का झाला नाही? महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात देशाचा आदर्श का बनू शकले नाही? या प्रश्नांचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. सर्वच पक्ष याला कमी-अधिक प्रमाणात जबाबदार आहेत. त्या सार्‍यानीच महाराष्ट्राच्या विकासाची वाट लावण्याचे काम केले आहे. दिल्लीपुढे लोटांगण घालत आपली खुर्ची सांभाळण्याचे काम केले आहे. मराठीचा मुद्दा आमचाच, असे म्हणणार्‍यानाही महापालिकेत सत्ता असतानाना दुकानांवर मराठीत पाट्या लावता आल्या, ना संसदेत महाराष्ट्राचा आवाज उठवता आला. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत सार्‍याचीच नावे उठता-बसता घेणाऱ्या ‍आजच्या राजकारण्यांनी या युगपुरुषांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आज आहे का, व त्यासाठी आपण कोणते प्रामाणिक प्रयत्न केले, याचा एकदा तरी आढावा घ्यावा. `मनसे' ला लोकसभेत एकाही जागी विजय मिळाला नसला तरी अवघ्या तीन वर्षांच्या माझ्या पक्षाला मतदारांनी दिलेली `लाखमोला' ची मते ही लोकांना`गृहित' धरून राजकारण करणार्‍याच्या डोळ्यापुढे दिवसा काजवे चमकावून जाणारी आहेत. कालपर्यंत `मनसे' ला अनुल्लेखाने टाळणारी ही मंडळी आज `मनसे' मुळे मराठी मतांचे विभाजन झाल्याचे गळा काढून सांगत आहेत. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जात आहे. या मंडळींनी गेल्या काही वर्षांत आपली विश्वासार्हता किती गमावली आहे, याचा आढावा घेण्याची गरज आहे. एकीकडे शरद पवार यांच्याशी चुंबाचुंबी करायची, तर दुसरीकडे उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून लाई चना आणि उत्तर प्रदेश दिन साजरे करायचे, हा मराठी माणसांचा विश्वासघात नाही का?

गेल्या तीन वर्षांच्या वाटचालीत `मनसे' ने अनेक आंदोलने केली. माझ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, रक्तबंबाळ होईपर्यंत मार खाल्ला, अनेक केसेस अंगावर घेतल्या, तडीपार्‍या भोगल्या. माझ्या स्वत:वर ८० हून अधिक केसेस आहेत. हे सारे मराठी माणूस उघडे डोळे ठेवून पाहात होता. माझ्या भाषणातील तसेच कृतीतील तळमळ त्याला दिसत होती. त्यामुळेच त्यांनी `मनसे' ला भरभरून मतदान केले. यामध्ये नवमतदारही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाढलेल्या जाबादारीची संपूर्ण जाणीव मला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करताना महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न मी पाहिले. जगाला हेवा वाटावा, असा महाराष्ट्र घडविण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी विकासाची `ब्लू प्रिंट' मी तयार केली. आज जो विश्वास आपण दाखवलात, तसाच विश्वास यापुढेही दाखवलात आणि महाराष्ट्राची सत्ता `मनसे' च्या हाती दिलीत, तर लोकहितासाठी कठोरपणे राज्यकारभार करून महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न खर्‍या अर्थाने साकार करून दाखवेन, एवढाच शब्द आज मी आपल्याला देतो.

दिल्लीच्या मनात महाराष्ट्राचा विकास होऊ नये, असेच आहे. किंबहूना, महाराष्ट्राविषयी दिल्ली व उत्तरेतील राजकारण्यांच्या मनात आकस व रागच आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यापासूनच हा आकस कायम असल्याचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळीच स्पष्ट झालेले आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविण्यासाठी १०६ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. त्यावेळी चिंतामणराव देशमुख यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना दाखविलेल्या बाणेदारपणानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुतेक सर्वच नेत्यांनी दिल्लीश्वरांपुढे कायम लोटांगणच घातल्याचे दिसून येईल. महाराष्ट्रातील आजचे राज्यकर्ते तर टीकेपलीकडेच आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विकासाचे एक स्वप्न उराशी बाळगून मी `महाराष्ट्र नवनिर्माण सेने' ची स्थापना केली. आज जो मी लढत आहे, तो केवळ विरोधासाठीचा विरोध म्हणून नाही, तर एक ठाम भूमिका घेऊन मी उभा आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि विकासाचा हा लढा आहे.

जगभर अनेकदा फिरण्याचा मला योग आला आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातही मी अनेकदा फिरलो आहे. जगातील मोठ्या राष्ट्रांनीच नव्हे, तर अनेक छोट्या देशांनी केलेली प्रगतीही थक्क करणारी आहे. तेथील रस्ते, पाण्याची व्यवस्था, उद्योग वाढविण्यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न, पर्यटनाच्या माध्यमातून केलेला विकास, वाळवंटात धरण बांधण्याची साधलेली किमया... हे पाहताना माझ्या महाराष्ट्रात असे का साकारू शकत नाही, असा विचार मनात आल्याशिवाय राहात नाही. या सर्व देशांतील नेत्यांनी देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांचा स्वार्थ कधी आड येऊ दिला नाही. प्रखर राष्ट्रनिष्ठा असलेले आणि विकासाचाच विचार करणारे लोक अशा प्रकारची प्रगती करू शकतात. महाराष्ट्राचाही सर्वार्थाने विकास करणे शक्य आहे. त्यासाठी लागणारी गुणवत्ताही येथे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती येथे नाही, हेच आपले दुर्देव आहे. त्यामुळेच राज्याच्या निर्मितीनंतर ६० वर्षानंतरही पाणी, वीज, बेरोजगारी या प्रश्नांवरच निवडणुका लढविल्या जात आहेत. हे सारे चित्र बदलायचे आहे की नाही, याचा विचार आता महाराष्ट्रातील सूज्ञ मतदारांना करायचा आहे. गेल्या ६० वर्षांतील सर्वच राजकीय पक्षांनी लोकांना गृहीत धरले आहे. जातीपातीचे राजकारण केले आहे. यामुळे महाराष्ट्र गर्तेत गेला आहे. शेतकर्‍याना आत्महत्या कराव्या लागत आहेत, तर चांगल्या शिकलेल्या तरुणांनाही बेरोजगारांच्या रांगेत उभे राहावे लागत आहे.

महाराष्ट्रावर राज्यकर्त्यांचा वचक राहिलेला नाही. कोणाचा पायपोस कोणाला नाही. वीज फुकट देऊ, नोकर्‍याच देऊ, दोन रुपयांत धान्य देऊ, अशा लोकप्रिय घोषणा करणार्‍याच राजकीय नेत्यांना व त्यांच्या पक्षांना निसर्गाकडून फुकट मिळणार्‍या पाण्याचे साधे नियोजन करता आलेले नाही. नुसता मराठवाड्याचा विचार केला, तर तेथे पाण्याची पातळी ७०० फुटांहून खाली गेली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर १५ ते २० वर्षांनंतर मराठवाड्याचे वाळवंटात रुपांतर होण्याची भीती काही अभ्यासकांनी आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. याच मराठवाड्यात शेतीचे व शेतकर्‍याचे पाण्याअभावी हाल होत आहेत. परंतु, त्यांचा विचार करण्यासाठी राज्यकर्त्यांकडे वेळ नाही.

औरंगाबाद येथे बीअरच्या सहा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यासाठी पाण्याचा उपस मराठवाड्यातच केला जात आहे. बीड आणि लातूर येथे बिस्लेरीसारख्यांचे अनेक प्रकल्प टाकण्यात आले आहेत. लोकांना बाटल्यांतील पाणी घेण्याची सक्ती करणारे हे कोणते धोरण आहे? दिवसेंदिवस परिस्थिती भीषण होत असताना आमचे राजकारणी मात्र सत्तेत मश्गुल आहेत. शेतकर्‍याच्या आत्महत्त्या झाल्या की, कर्जमाफी करायची; परंतु प्रश्नाच्या मुळाशी जाऊन सोडवणूक करायची नाही. शेतीचे, पाण्याचे, वाढत्या शहरीकरणाचे,विजेचे महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी योग्य नियोजन करायचे नाही. तात्पुरती मलमपट्टी करून प्रश्र्नच लोंबकाळत ठेवायचे, अशी या राजकारण्यांची नीती आहे. जेथे नियोजनाच्याच नावाने बोंब आहे, तेथे अंमलबजावणीचा प्रश्नच येत नाही. भविष्याचा वेध घेणे, आगामी काळाच्या गरजा लक्षात घेणे, त्यासाठी महाराष्ट्रातील प्रश्नांचा आढावा घेणे - यासाठी राज्यकर्त्यांकडे वेळही नाही आणि इच्छाशक्तीही नाही, हेच या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

`महाराष्ट्र नवनिर्माण सेने' ची स्थापना करण्यापूर्वी मी महाराष्ट्राचा दौरा केला होता. लोकांचे प्रश्न पुन्हा एकदा समजून घेतले. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक चांगल्या व तज्ज्ञ लोकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. महाराष्ट्राच्या विकासाचा लढा लढताना लोकांचा पाठिंबा मिळेल का, याची पाहणी केली. त्यानंतरच पक्षाची स्थापना केली. हे सारे करताना केवळ महाराष्ट्राचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. पक्ष स्थापनेनंतर शिवाजी पार्क येथील भाषणात महाराष्ट्राच्या विकासाची `ब्लू प्रिंट' तयार करण्याची घोषणा केली होती. आजही काही लोक खवचटपणे `ब्लू प्रिंट' कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित करतात. अशी `ब्लू प्रिंट' माझ्याकडे तयार आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठीचे सात विषय आम्ही तयार केले आहेत. त्यासाठी पक्ष स्थापनेच्यावेळीच पुणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण अकादमीची स्थापना केली होती. या अकादमीत तज्ज्ञ लोकांच्या मदतीने महाराष्ट्रातील विविध प्रश्नांचा निरंतर अभ्यास करण्यात येत आहे. यामध्ये अर्थकारण, आरोग्य, शेती, उद्योग, शिक्षण तसेच पायाभूत सुविधांसह अनेक विषयांवर नेमके काय केल्यास महाराष्ट्राचा खर्‍या अर्थाने विकास होईल, यांच्या योजना तयार केल्या जात आहेत.

चांगले रस्ते बांधल्यामुळे अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते, उद्योगांचा विकास होऊ शकतो. आजचे अनेक राजकारणी वेळोवेळी परदेशात जातात. तिथून येताना आपल्या नातेवाईकांसाठी अनेक गोष्टी आणतात. मात्र त्यांना महाराष्ट्रासाठी एखादी गोष्ट आणावी, असे का वाटत नाही? परदेशात एकदा रस्ते बांधले की, ते ३० वर्षे टिकतात. असे चांगले रस्ते आपण कधी बांधणार? चांगले रस्ते बांधले तर त्यावर खड्डे कसे पडणार आणि मग खड्डे बुजवण्यासाठी व पुन्हा रस्ते बांधण्यासाठी निविदा कशा काढणार, एवढाच विचार करणारे राजकारणी महाराष्ट्राचे काहीही भले करू शकत नाहीत. ब्रिटनमधील कंपन्यांनी शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलांसंदर्भात अलीकडेच येथील महापालिकांना पत्र पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे की, सदर पुलाची जाबदारी ही १०० वर्षापर्यंत आमची होती. आता ही जबाबदारी तुम्ही सांभाळा. अशी बांधीलकी आमच्यात कधी निर्माण होणार? आम्ही आज पूल बांधले की, दुसर्‍या आठवड्यात त्यावर डांबर टाकण्याचे काम सुरू केले जाते. वर्षभरात पुलाला खड्डे पडून दुरुस्तीच्या नावाखाली बंद केला जातो. या खराब बांधणीमुळे राज्याच्या नियोजनावर मोठा परिणाम होतो आणि विकासाचा पैसा खड्ड्यात जातो. दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांकडे द्रष्टेपणा नाही. एवढेच नव्हे, तर प्रश्न लोंबकळत ठेवायचे किंवा वाढवत न्यायचे, एवढेच काम ही मंडळी करत आहेत. यातून केवळ महराष्ट्रच नव्हे, तर सार्‍याच देशाचा विकास अडकून पडला आहे. चांगले रस्ते न बांधणार्या कंत्राटदारांवर कठोरपणे कारवाई होत नाही, की या कामांवर लक्ष ठेवणार्‍या अधिकार्‍याना जेलची हवा खावी लागत नाही, कारण राजकीय नेत्यांचे यामध्ये हितसंबंध गुंतलेले असतात.

स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात ज्यांनी आपल्या बलिदानाची आत्माहुती दिली, अशा स्वातंत्र्यवीरांचे बलिदान भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत बुडविणार्‍या राजकारण्यांना धडा शिकविण्याची आता वेळ आली आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रमार्ग शत्रू प्रवेश करू शकतो, असा इशारा दिला होता. तरी आपण आजही झोपलेलो आहोत. त्यामुळेच समुद्रमार्गे येऊन मुंबईवर हल्ला करण्याची हिम्मत पाकिस्तानी अतिरेकी करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने अफजल गुरूला फाशी देण्याचा निर्णय दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नाही. लोकांनी अशा बेजबाबदार नेत्यांना आणि पक्षांना धडा शिकविण्याची गरज आहे.

आज शहरांच्यानियोजनाचा पत्ता नाही. नियोजनाअभावी शहरे बकाल होत आहेत. अनधिकृत झोपड्या वाढत आहेत. कोणीही यावे व कसेही राहावे. कोणतेही नियंत्रण नाही. कसलाही धाक नाही. मुंबई व महाराष्ट्रात परप्रांतातून लोंढे येत आहेत. अनधिकृत झोपड्या बांधून राहत आहेत. या अनधिकृत झोपड्यांना मान्यता देऊन त्यांनाच मोफत घरे देण्याचे उद्योग राजकारणी करत आहेत. यातूनच मुंबईसारख्या शहरांमध्ये परप्रांतीयांची दादागिरी मतांच्या रूपाने वाढत आहे. दिवस - रात्र सेवा करणाऱ्या पोलिसांना तसेच सरकारी नोकरांना हक्काची घरे नाहीत आणि बिहार, युपीतून येणाऱ्या लोंढ्यांना मात्र मोफत घरे मिळत आहेत. अरबाच्या तंबूत घुसलेल्या उंटासारखी येथील मराठी माणसाची अवस्था होणार आहे.

मतांच्या राजकारणासाठी शहरांची वाट लावली जात आहे. मुंबईतून केंद्राला ६८ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र त्यातून महाराष्ट्राला योग्य वाटा केंद्राकडून दिला जात नाही. अविकसित राज्ये या नावाखाली बिहार व उत्तर प्रदेशसारख्या राज्यांना या महसुलातील मोठा वाटा मिळतो. एकीकडे महराष्ट्राने या राज्याच्या विकासाचा वाटा उचलायचा आणि ते कमी ठरावे, म्हणून तेथून येणार्‍या लोंढ्यांनाही येथे पोसायचे, हे उद्योग महाराष्ट्राला फार काळ परवडणारे नाही. येथील भूमीपुत्रांनाच शंभर टक्के येथील व्यवसायात अथवा नोकर्यांरमध्ये वाटा मिळायला हवा. रेल्वे, आयकर अथवा अन्य केंद्रीय सेवांमध्ये महाराष्ट्रात भरती होणार असेल तर येथील मराठी तरुणांनाच नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत, यावर मी ठाम आहे. यासाठीच `मनसे' ने मधल्या काळात आंदोलन पुकारल्यानंतर दिल्लीतील युपी-बिहारच्या नेत्यांनी मी देश तोडायला निघाल्याचा आरोप केला.

आज प्रत्येक राज्य आपला विकास, अस्मिता, भाषा व वेशभूषा यासाठी पराकेटीचे आग्रही आहेत. दक्षिणेतील राज्यांकडे याबाबत आदर्श म्हणून पाहता येईल. आपल्याकडील बिनकण्याच्या नेत्यांमुळे मराठी तरुणांचे हक्क डावलले जात आहेत. दुकानांवर मराठी पाट्या लावणे, शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा असणे आणि नोकऱ्या मध्ये मराठी तरुणांना प्राधान्य देणे या मुद्दांवर मी ठाम आहे.

दुर्दैवाने मराठी मते फोडल्याचा आरोप माझ्यावर लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेतील काही `बालबुद्धी' च्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मराठी मतदार म्हणजे काही शिवसेनेच्या गोठ्यातील गाय नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. २००४ साली `मनसे' हा पक्ष नव्हता. त्यावेळी मुंबईत लोकसभा निवडणुकीत काय झाले होते? मराठी मतदारांनी तेव्हा शिवसेनेला का मते दिली नाहीत, याचा विचार प्रथम त्यांनी करावा आणि त्यानंतरच मराठी मते फुटल्याचा बेताल आरोप करण्याची हिम्मत करावी.

खरे तर मराठी मते फुटलेली नाहीत. नवमतदारांनी `मनसे' ला भरभरून मते दिली आहेत. मी मांडत असलेले विचार, त्यासाठी केलेली आंदोलने, घेतलेल्या केसेस आणि माझी तळमळ अवघ्या तीन वर्षांत लोकांपर्यंत पोहोचल्यामुळेच लोकंनी `मनसे' ला मते दिल्याचे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे व अस्मितेचे स्वप्न घेऊनच मी राजकारणाच्या रणांगणात उभा आहे. आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांना आपण राज्यात सत्ता देऊन पाहिली आहे. आता एकदा माझ्यावर विश्वास टाकून पाहा. विधानसभा जिंकण्याची संधी द्या. जगाला हेवा वाटावा, असा महाराष्ट्र मी घडवेन, एवढेच मनापासून सांगतो.

- मा. राज ठाकरे
***
(शब्दांकन - संदीप आचार्य)
सौजन्य : लोकसत्ता - लोकरंग, रविवार २४ मे, २००९.